Published Dec 16, 2024
By Shweta Chavan
Pic Credit - social Media
नागपुरात 16 ते 21 डिसेंबर असं सहा दिवसांचं विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन होत आहे.
नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे म्हणून हे हिवाळी अधिवेशन होत असेल असं अनेकांना वाटतं. पण तसं नाही.
1854 पासून ते 1956 पर्यंत म्हणजेच तब्बल 102 वर्ष नागपूर ही ब्रिटिश कालीन नागपूर प्रांताची राजधानी होती.
1953 च्या डिसेंबरमध्ये केंद्र सरकारच्या जस्टिज फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली या देशातील पहिले राज्य पुन:रचना आयोग प्रस्थापित केले गेले.
10 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या विधानसभेत राज्यपालांचा संदेश वाचून दाखवण्यात आला.आज पासून विधानसभा बरखास्त करण्यात आली आहे
1953 मध्ये जो करार होता त्या करारानुसार नागपूरला राजधानीचा दर्जा गमवावा लागला
यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या अधिवेशनाचे एक अधिवेशन वर्षातून एकदा तरी नागपुरात घेण्यात यावे अशी तरतूद 1953 च्या करारात करण्यात आली.
करारानुसार 1960 च्या पहिल्या अधिवेशनाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात संपन्न झाले ते आज तागायत तिथे भरवले जाते.