Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आयएएस सोडून इतर काही विचारच केला नव्हता’ : IAS अधिकारी अश्विनी भिडे

१९९५च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे, सध्या मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आय़ुक्त आहेत. १० वर्षांहून अधिक काळ पायाभूत सोयीसुविधा क्षेत्रात त्यांचा मोठा अनुभव आहे.

  • By Aparna Kad
Updated On: Mar 08, 2022 | 10:47 AM
‘आयएएस सोडून इतर काही विचारच केला नव्हता’ : IAS अधिकारी अश्विनी भिडे
Follow Us
Close
Follow Us:

आयएएस होण्याचं स्वप्न अनेकांचं असतं, पण ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अफाट कष्ट करावे लागतात. आयएएस अधिकारी झाल्यानंतरही आपल्या कामाचा ठसा निर्माण करावा लागतो. अशाच एका महिला आयएएस अधिकारी, ज्यांच्या नावाचा लौकिक मुंबईतील मेट्रोमुळे घराघरात पोहचलेला आहे, आजच्या महिला दिनानिमित्त आम्ही त्यांच्याशी खास चर्चा केली. २०१५ ते २०२० या ५ वर्षे त्या मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच एमडी या पदावर कार्यरत होत्या. मुंबईसारख्या मोठ्या शहरात मेट्रोचे जाळे विणण्याच्या महत्त्वाकांक्षी कार्यात त्यांचा सहभाग फार मोलाचा आहे.

आएएस व्हायचं केव्हा ठरवलं,

‘मी शाळेत अगदी दहावीपासूनच या क्षेत्रात येण्याचा विचार करत होते. या क्षेत्राकडे विशेष आकर्षण होतं त्यामुळे शालेय जीवनातच या क्षेत्रात येण्याचा विचार केला होता.’ पुढे त्यांच्या शालेय शिक्षणाविषयी देखील त्यांनी सांगितलं, ‘माझं संपूर्ण शालेय शिक्षण हे मराठी माध्यमातूनच झालं. कोल्हापूर, सांगली, तासगाव अशा अनेक ठिकाणी माझं शिक्षण झालं. माझे वडील हे बँकेत नोकरी करायचे आणि त्यामुळे आम्हाला अनेक ठिकाणी रहावं लागायचं. शालेय शिक्षणानंतर कॉलेज आणि मास्टर्सचं शिक्षण पुण्यातून घेतलं.’

त्या काळात आणि आजच्या काळात करिअर निवडताना महिलांचा कल कसा आहे?

‘आजच्या काळात महिला कोणत्याच क्षेत्रात वर्ज्य नाहीत. अगदी डॉक्टर, इंजीनियर पासून ते सीव्हील इंजीनियरींग, वैमानिक अशा सगळ्याच क्षेत्रात महिला करिअर करताना दिसत आहेत. पण त्यावेळी कल थोडा वेगळा होता. मी आणि माझ्यासारख्या खूप कमी या क्षेत्राची निवड करत होत्या. बहूतेकजणी या डॉक्टर किंवा शैक्षणिक क्षेत्रात सध्या कार्यरत आहेत. काहीजणी शिक्षिका आहेत.’

एक महिला म्हणून या क्षेत्रात प्रवेश करताना कोणत्या संकटांचा सामना करावा लागला होता का?

‘संकटं असं नाही, पण त्या काळी आजच्या इतकं इंटरनेट नव्हतं. माझ्या कुटुंबियांनी मला पूर्ण सपोर्ट केला. त्यांच्याशिवाय मला इथे पोहोचणं शक्य नव्हतं. योगायोगाने माझी भेट माझ्या एका काकांशी झाली त्यांनी मला शाळेत असताना या क्षेत्राची माहिती दिली होती. पण तेव्हा आजच्या इतकं इंटरनेट नव्हतं. मुबलक आभ्यासाचं साहित्य उपलब्ध नव्हतं. महत्त्वाची पुस्तकं किंवा साहित्य हे ठराविक ठिकाणी मुंबई, पुण्यातच उपलब्ध व्हायची. त्यामुळे अभ्यासाठी थोडे जास्त कष्ट घ्यावे लागत होते.’

शासकिय अधिकारी म्हणून कामाचा किती ताण असतो कोणती आव्हानं असतात.

‘जेव्हा आपण शासकिय कामात असतो तेव्हा आपला जास्तीत जास्त वेळ हा आपल्या कामाला देणं गरजेचं असतं. कामं वेळेत पूर्ण करण हे एक टास्क असतं. निरनिराळ्या कामांच्या जबाबदाऱ्या असतात. त्या पार पाडाव्या लागतात. ताणतणाव देखील असतो.’

कुटुंबाचा तुमच्या कामासाठी किती सपोर्ट मिळतो, काम आणि कुटुंब हे संतुलन कसं पेलवता.

‘कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे. कुटुंबाचा मला खूप आधार आहे. माझे पती जे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत, माझ्या सासूबाई, मुलं सगळेच मला नेहमीच सपोर्ट करतात. त्यांच्याशिवाय काम करणं कठीण आहे. कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडून कुटुंबाकडेही लक्ष देणं हे लक्षात ठेवलं की हे होऊन जातं. अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये मला त्यांची मदत होते.’

आयएएस नसतात तर कोण असता?

‘हा प्रश्न माझ्यासाठी फारच कठीण आहे. कारण याशिवाय दुसरा मी जास्त विचार केलाच नाही. या क्षेत्रात येणं हेच माझं धैय होतं. तरीही विचार केलाच तर मी शैक्षणिक क्षेत्रात शिक्षिका वैगरे असते. कारण सुरूवातीला काही महिने मी हे काम केलं होतं. पण शासकिय अधिकारी होणं हेच मी सुरूवातीपासूनच ठरवलं होतं.’

मुंबई मेट्रोसाठी तुम्ही फार महत्त्वाचं काम केलंत, महत्त्वाची जबाबदारी पार पाडलीत हे किती आव्हानात्मक होतं

‘जबाबदारी फारच मोठी होती मात्र आधीही पाच वर्षे मी एमएमआरडीए साठी काम केलं होतं. तेव्हाही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या त्यामुळे हे कामंही त्याच धाटणीचं होतं. अनेक महत्त्वाची कामं असतात. अनेकदा काही लोक अँक्टीव्हीस्ट काही याचिका दाखल करतात अशा वेळी कामात अडथळा निर्माण होतो. पण हे सगळं सांभाळत काम पूर्ण करावं लागतं.’

या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नवोदितांना काय सल्ला द्याल

‘या क्षेत्रात येताना आधी संपूर्ण विचार करून मगच क्षेत्र निवडा. कामाचा व्यापही लक्षात घेतला पाहिजे. तसेच सुरूवातीपासूनच आभ्यासाची तयारी ठेवायला हवी. जमेल तितकं अभ्यासाच्या साहित्यांचा उपयोग करा.’

Web Title: Womens day with ias officer ashwini bhide read her journey nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2022 | 07:00 AM

Topics:  

  • Women's Day Special

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.