जिल्ह्याचा मध्यमगती स्विंग गोलंदाज मुहम्मद सईद शिंग्रे याने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या U-16 मल्टीडे इन्व्हिटेशन टूर्नामेंटमध्ये दुर्मिळ विक्रम नोंदवला आहे.
केवळ घरगुती वापरासाठीच नाही, तर स्थानिक व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांनाही या टंचाईचा मोठा फटका बसला आहे. सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल चालवणे कठीण झाले.
भाजपाने आणलेले महिला आरक्षण विधेयक प्रत्यक्षात महिलांच्या हितासाठी नसून, लोकसभेचे मतदारसंघ स्वतःला पूरक कसे ठरतील, यासाठी रचलेले एक राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.
उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना व सुट्टीमध्ये आजोळी मामाच्या गावाला जाणाऱ्या मुलांना एसटीच्या १० टक्के हंगामी भाडेवाढचा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
आंजर्ले येथील प्रसिद्ध Kadyavarcha Ganpati Temple मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्यात आली. या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून, सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
रामपूर येथील भीषण हत्याखंडाचा अवघ्या 24 तासात तपास लावून आरोपींना गजाआड करणारे चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना दोन दिवसांपूर्वी घडलेल्या आणखी एका गुन्ह्याचा छडा लावण्यात यश आले आहे.
चिपळूणमध्ये भाजप शहर मंडलातर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला. संस्थांना उभारी देणाऱ्यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव असल्याचे सुभाषराव चव्हाण यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना पेन्शन वेळेवर न मिळाल्याने त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन केले. मागण्या मान्य न झाल्यास १३ एप्रिलपासून उपोषण व साखळी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेत 'मिनी मंत्रालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या निवडीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. अध्यक्ष आणि विषय समिती सभापतीसह या समितीत एकूण आठ सदस्यांची निवड होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील आदर्श व्यक्ती आणि संस्थांच्या सन्मान सोहोळ्यात चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्षांचा नवराष्ट्रचे संपादक संजय मलमे यांच्या हस्ते 'आदर्श जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शहरातील गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेत हॉटेल सन्मान समोरील बिपिन कॉर्नर येथे शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. अचानक लागलेल्या आगीमुळे काही क्षणांतच परिस्थिती गंभीर झाली होती.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड हालचालींना वेग आला असून, सर्वांचे लक्ष मंगळवार दिनांक ७ एप्रिल रोजी होणाऱ्या स्थायी आणि विषय समिती सदस्य निवड प्रक्रियेकडे लागले आहे.