Sindhudurg News : सिंधुदुर्गात देशातील पहिल्या सबमरीन पर्यटन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून, पर्यटकांना समुद्रतळावरील जैवविविधता जवळून अनुभवण्याची अनोखी संधी मिळणार आहे.
Ratnagiri School News : चिपळूणमधील बापट आळीतील कन्याशाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना स्वागताऐवजी अवजड लोखंडी कपाटे उचलण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीतील ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनींना कष्टप्रद काम करावे लागल्याचा व्हिडीओ सोशल ...
महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील कांदोशी, हुंबरी, सवेणी, अस्तान व मुसाड या पाच ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र अस्तान गावातील नदीपात्रातील गाळ काढताना मोठ्या प्रमाणावर वाळू गायब झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Ratnagiri Politics- मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील असलेले सहदेव बेटकर हे कुणबी समाजातील प्रभावी नेते मानले जातात. ओबीसी समाजामध्येही त्यांचा चांगला प्रभाव मानला जातो. त्यामुळे आता त्यांच्या भाजप प्रवेशाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
गुहागर तालुक्यातील असगोली समुद्र किनाऱ्यावर समुद्राच्या पाण्याला गडद सोनेरी व काही भागांत काळसर छटा आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, सागरी जीव अभ्यासक स्वप्नजा मोहिते यांनी हा बदल पावसाळ्याच्या सुरुवातीला समुद्रातील घुसळण, उंच लाटा आणि नैसर्गिक घटकांच्या मिश्रणामुळे होत असल्य...
अंमलबजावणी, देखभाल आणि कार्ड वितरणाचे काम इक्विबस टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
कर्जमाफी योजनेतील अटी-शर्ती पाहता ही योजना कर्जमाफीपेक्षा कर्जवसुलीची योजना असल्याचे दिसून येते. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा अपेक्षित लाभ मिळणार नसल्याचा आरोप त्यांनी केला.
आपल्या हद्दीच्या शेवटी पोहोचल्यावर तो शेजारच्या भागातील पेट्रोलमनसोबत ‘पेट्रोल डायरी’ची अदलाबदल करतो. ही डायरी एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनपर्यंत सुरक्षितपणे पोहोचणे, म्हणजेच तो रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो.
करंबवणे खाडीत पुन्हा जीवसृष्टीची चाहूल लागली असून कोळंबी, खेकडे आणि कोलीम यांसारखे जलचर पुन्हा मिळू लागल्याने मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लोटे परिसरातील प्रदूषणात झालेली घट आणि सांडपाणी वाहिनीच्या नूतनीकरणामुळे खाडीच्या पर्यावरणात सकारात्मक बदल दिसून येत आहेत.
चिपळूण नगरपरिषदेतील दिव्यांग कोट्यातील खोका वाटप प्रकरणावरून वातावरण चांगलेच तापले असून, चिपळूण शहरचे पदाधिकारी, नगरसेवक आणि शेकडो शिवसैनिकांनी मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या दालनात धडक देत जोरदार भूमिका मांडली.
रायगड-रत्नागिरी-स्निधुदुर्ग मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी हॆ माहिती दिली आहे. बाळ माने यांनी या निवडणुकीत माघार घेतल्याने पक्षाकडून हि मोठी कारवाई करण्यात आली आहे.
कोणत्याही परिस्थितीत या वर्षात काम पूर्ण करून पुढील वर्षी चिपळूणचे अद्ययावत बसस्थानक जनतेसाठी खुले केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.