भिवंडीत अनधिकृत शाळांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेने 21 बेकायदेशीर शाळांची यादी जाहीर करत कारवाईचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
डोंबिवली येथे सुमती निवास ही इमारत अतिधोकादायक स्थितीत असून, नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे.अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे
मीरा रोड घोडबंदर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी २ कोटींचा निधी मंजूर करत कामाला गती देण्याचे आदेश दिले आहेत.
डोंबिवली पश्चिम येथे नवीन दुय्यम निबंधक कार्यालय सुरू होणार असून, यासाठी आमदार रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे नागरिकांना मालमत्ता नोंदणीसाठी होणारी गैरसोय कमी होणार आहे.
कळवा परिसरात वाढत्या उष्णतेत वारंवार वीज खंडिती होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात ४-५ तास वीज नसल्याने जीवन विस्कळीत झाले आहे. कामगार वर्ग, वृद्ध आणि रुग्णांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे.
मीरा-भाईंदर शहरात आगीच्या तांडवात अनेक कुटुंब होरपळून गेली. या दुर्घटनेत चार ते पाच इमाराती आगीच्या विळख्यात सापडल्या. याबाबत परिवहन मंत्र्यांनी घटनास्थळी दाखल होत पालिकेला सुचना केल्या आहेत.
नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
गेल्या १० वर्षात सुमारे ६०० कोटींची वसुलीपात्र रक्कम वसूल करण्यात आली नसून बड्या विकासकांना मोकाट सोडण्यात आले आहे. यासंबधित उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.
कल्याण ग्रामीण भागात 65 अनधिकृत इमारती घोषित करण्यात आल्या होत्या . या सगळ्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशनुसार या समस्येवर आज बैठक घेण्यात आली.
मॉरिशसमधील मोका येथे महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी पायाभरणी सोहळा रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. ८ कोटींचा निधी मिळाल्याने मराठी संस्कृतीच्या जतनाला चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.