ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना गटात संघर्ष पाहायला मिळत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
ठाणे महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली होती.
राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असून मनसेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसने मुलांना राजकारणात सक्रिय केले. यामुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातवरण निर्माण केले आहे. घराणेशाही राजकारणाचा इतिहास शहरात पुन्हा एकदा उजेडात आला आहे.
कल्याणमध्ये एका भीषण अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. इमारतीच्या सतराव्या मजल्यावर काम सुरू असताना क्रेन अचानक कोसळून दोन मजुरांच्या अंगावर पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
निवडणुकीची धामधूम सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे. यावेळी प्रचाराचे गणितच वेगळे झाले आहे. नेते स्वार्थी झाल्याचेही दिसून येत आहे. संस्थानिकांबाबत आता काय निर्णय घेणार?
ठाणेमध्ये लवकरच रिंग मेट्रो सुरू होईल. हा २९ किलोमीटरचा मार्ग अंतर्गत प्रवासाला गती देईल. तो मुंबई मेट्रो लाईन्स ४ आणि ५ ला जोडेल, ज्यामुळे मुंबई, ठाणे आणि कल्याण दरम्यान थेट मेट्रो प्रवास करता येईल.
सोसायटीमध्ये मतदारांना मतदान करता यावे यासाठी मतदान केंद्र तयार करण्यात आले होते मात्र यातून आता गृहसंकुलांना वागण्यात आले आहे. नक्की याची काय कारणं आहेत आणि प्रशासनाने का निर्णय घेतला जाणून घ्या
दिवा परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे लहान मुलं आणि परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आल्याचं समोर आलंय.
Thane Mulund New Railway Station: ठाणे ते मुलुंड दरम्यानच्या नवीन उपनगरीय रेल्वे स्थानकाचे रखडलेले काम आता रेल्वे स्वखर्चाने पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
राज्यभर बिबट्याची दहशत वाढत जात आहे. कोकण, पुणे, नाशिकनंतर आता कल्याणमध्ये देखील बिबट्याचा वावर आढळला आहे. तालुक्यातील वसद गावात बिबट्याने गाईच्या वासरांचा फडशा पडला.
अनधिकृत गोमास विक्रीचा मुद्दा हा वादाचा केंद्रबिंदू ठरला असून या प्रकरणी अनेक वेळा गुन्हे दाखल झाले आहेत. या उद्देशाने मिरारोड परिसरात कूरेशी समाजाने गोमास विक्री करणाऱ्यांवर थेट बहिष्कार टाकला आहे.