मिरा-भाईंदरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून राजकारण तापले आहे. मॉल उभारण्यासाठी हा डाव रचल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
घोडबंदर येथील जे. पी. इन्फ्रा मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या अवजड वाहनाने एका दुचाकीस्वाराला ठोकर दिली. ही ठोकर इतकी भयानक होती की, या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
भाईंदर पश्चिम येथील कोस्टल रोड बांधकाम प्रकल्पातील कास्टिंग यार्डमध्ये दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात दोन बांधकाम कामगारांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी म्हणजे शहरात लवकरच डबल डेकर बस सुरू होणार आहेत. त्यासोबतच टीएमटीच्या ताफ्यात ३०० नवीन बसेस दाखल होणार असून, सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांची महाराष्ट्र नगराध्यक्ष महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण कामाची ही पोचपावती मानली जात आहे.
शहर पुन्हा एकदा धक्कादायक घटनेने हादरले आहे. मिरा रोडमधील नया नगर परिसरात पहाटेच्या सुमारास दोन सुरक्षा रक्षकांवर अज्ञात व्यक्तीकडून चाकूने हल्ला करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.
मीरा-भाईंदर शहरात मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून रंगलेल्या वादात गुणरत्न सदावर्ते यांच्या सभेला विरोध करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतुक केले आहे.
मीरा-भाईंदर शहरात सध्या सुरू असलेले राजकारण केवळ सत्तासंघर्षापुरते मर्यादित न राहता वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमकी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या संघर्षांपर्यंत पोहोचले आहे.
मीरा-भाईंदरमधील शासकीय रुग्णालयात तब्बल १.६५ कोटी रुपयांची मुदतबाह्य औषधे सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
कल्याण येथे उड्डाणपुलाचे काम गेल्या ७ वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस ने आंदोलनाचा इशारा दिला असून, काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे.