कल्याण-डोंबिवलीत अल्प पावसातच अनेक भागांत पाणी साचल्याने केडीएमसीच्या नालेसफाईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. महासभेत शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी प्रशासनावर संताप व्यक्त करत नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
भाईंदर पोलीस ठाण्यासमोर MBMC परिवहन विभागाच्या एका बसचे पुढील चाक आडवे झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने बस थांबल्यानंतर हा गंभीर बिघाड लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, संबंधित बसच्या फिटनेस प्रमाणपत्राची मुदत संपल्याचा दावा करण्यात येत असून, अशा बसला रस्त्यावर धावण्याची...
मीरा-भाईंदरमध्ये रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील उड्डाणपुलावरून अॅक्टिवा स्कूटरने प्रवास करत असताना स्कूटरच्या आतील भागातून अचानक साप बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली. प्रसंगावधान राखत वाहनचालकाने तत्काळ स्कूटर बाजूला घेतल्यामुळे मोठा अपघात टळला. या घटनेनंतर नागरिकांनी सापाला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा ...
भिवंडीतील दोन गाळ्यांमध्ये अवैधरित्या साठवून ठेवलेले ७५० व्यावसायिक गॅस सिलेंडर अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने जप्त केले. या कारवाईत सुमारे १२.८० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २७ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या परिवर्तन पॅनलला विजयी करण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या संयुक्त महायुतीकडून ‘छत्री’ या चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे.
मिरा-भाईंदर परिसरातील आदिवासी जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा ठपका ठेवणारा चौकशी अहवाल ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांकडे सादर केला आहे. या अहवालात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचाही उल्लेख आहे.
Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेच्या नालेसफाई कामात अल्पवयीन मुलांना नाल्यात उतरवून कचरा आणि गाळ काढण्याचे काम करून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पोकलेन मशीनच्या बकेटवर मुलांना बसविल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मीरा-भाईंदरमधील अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. काशिमीरा पोलिसांसह संबंधित यंत्रणांना तातडीने आणि संवेदनशीलतेने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कल्याण पश्चिमेतील गांधारी गावात एका घरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशोक लोखंडे यांच्या घराच्या कोपऱ्यात चक्क कोब्रा नागाची 15 ते 20 पिल्लं आढळून आली. कुटुंबीयांनी घाबरून सर्पमित्राला बोलावले. सर्पमित्र कपिल कारभारी यांनी सर्व पिल्लांना सुरक्षित पकडून जंगलात सोडले.
भिवंडीतील खंडूपाडा परिसरातील 'फेमस शोरमा' दुकानातून चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यानंतर अन्न विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. अवघ्या ३६ तासांत रुग्णसंख्या शंभरी पार गेल्याने उपजिल्हा रुग्णालयावर मोठा ताण निर्माण झाला आहे.
Navi Mumbai International Airport : नवी मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याची तारीख निश्चित झाली असून, 'या' दिवशी पहिल्या उड्डाणांचा श्रीगणेशा होणार आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कॉफी टेबल पुस्तकात आगरी-कोळी भूमिपुत्रांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाची उपेक्षा झाल्याचा आरोप करत आगरी-कोळी समाज आक्रमक झाला आहे. वादग्रस्त पुस्तक तात्काळ रद्द करून त्याचे पुनर्लेखन करावे, तसेच पुस्तक निर्मिती समितीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी.....
Mira Bhayandar Water Crisis : शहरातील तीव्र पाणीटंचाई आणि वारंवार होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात मनसेने मिरा-भाईंदरमध्ये अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. कार्यकर्ते विविध देवतांच्या वेशात महानगरपालिका परिसरात दाखल झाले.