ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने २१ पैकी १६ जागा जिंकत मोठा विजय मिळवला. या विजयानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीचे कौतुक करत विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २७ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या परिवर्तन पॅनलला विजयी करण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या संयुक्त महायुतीकडून ‘छत्री’ या चिन्हावर निवडणूक लढवली जात आहे.
मिरा-भाईंदर परिसरातील आदिवासी जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा ठपका ठेवणारा चौकशी अहवाल ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल मंत्र्यांकडे सादर केला आहे. या अहवालात भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचाही उल्लेख आहे.
Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेच्या नालेसफाई कामात अल्पवयीन मुलांना नाल्यात उतरवून कचरा आणि गाळ काढण्याचे काम करून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पोकलेन मशीनच्या बकेटवर मुलांना बसविल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मीरा-भाईंदरमधील अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. काशिमीरा पोलिसांसह संबंधित यंत्रणांना तातडीने आणि संवेदनशीलतेने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कल्याण पश्चिमेतील गांधारी गावात एका घरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशोक लोखंडे यांच्या घराच्या कोपऱ्यात चक्क कोब्रा नागाची 15 ते 20 पिल्लं आढळून आली. कुटुंबीयांनी घाबरून सर्पमित्राला बोलावले. सर्पमित्र कपिल कारभारी यांनी सर्व पिल्लांना सुरक्षित पकडून जंगलात सोडले.
भिवंडीतील खंडूपाडा परिसरातील 'फेमस शोरमा' दुकानातून चिकन शोरमा आणि पिझ्झा खाल्ल्यानंतर अन्न विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. अवघ्या ३६ तासांत रुग्णसंख्या शंभरी पार गेल्याने उपजिल्हा रुग्णालयावर मोठा ताण निर्माण झाला आहे.
Navi Mumbai International Airport : नवी मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी! नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू होण्याची तारीख निश्चित झाली असून, 'या' दिवशी पहिल्या उड्डाणांचा श्रीगणेशा होणार आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कॉफी टेबल पुस्तकात आगरी-कोळी भूमिपुत्रांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक योगदानाची उपेक्षा झाल्याचा आरोप करत आगरी-कोळी समाज आक्रमक झाला आहे. वादग्रस्त पुस्तक तात्काळ रद्द करून त्याचे पुनर्लेखन करावे, तसेच पुस्तक निर्मिती समितीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी.....
Mira Bhayandar Water Crisis : शहरातील तीव्र पाणीटंचाई आणि वारंवार होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्येविरोधात मनसेने मिरा-भाईंदरमध्ये अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. कार्यकर्ते विविध देवतांच्या वेशात महानगरपालिका परिसरात दाखल झाले.
कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरात बोधगयाच्या धर्तीवर भव्य आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून साकार होणाऱ्या या प्रकल्पामुळे कल्याणच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटन व...
आंतरराष्ट्रीय अल्ट्रा धावपटू कार्तिक जोशी यांनी कारगिल ते कन्याकुमारी (के-टू-के) या ४,२०० किलोमीटरच्या ऐतिहासिक धाव मोहिमेला स्केचर्सचे बळ मिळाले आहे. ठाण्यात पोहचलेल्या कार्तिकने ५५ दिवसांत ही मोहीम पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात जमिनीत गाडलेला जुन्या काळातील जिवंत तोफगोळा आढळून आल्याने खळबळ उडाली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर मिरा-भाईंदर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणीत तो अविस्फोटित स्फोटक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.