<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	xmlns:media="http://search.yahoo.com/mrss/"
	>

<channel>
	<title>Marathi News | Live News in Marathi | मराठी बातम्या | US-Israel-Iran War</title>
	<atom:link href="https://www.navarashtra.com/feed" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://www.navarashtra.com</link>
	<description>Read Maharashtra No 1 Marathi News Portal navarashtra.com</description>
	<lastBuildDate>Fri, 12 Jun 2026 05:18:26 +0000</lastBuildDate>
	<language>mr</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=6.9</generator>

<image>
	<url>https://d2lkn59rua3ry2.cloudfront.net/wp-content/uploads/2024/06/favicon-1-1.png</url>
	<title>Marathi News | Live News in Marathi | मराठी बातम्या | US-Israel-Iran War</title>
	<link>https://www.navarashtra.com</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>International Men&#8217;s Health Week: पुरुष मानसिक आरोग्याबद्दल बोलण्यास का कचरतात आणि शांतपणे का त्रास सहन करतात?</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/international-men-s-health-week-why-men-do-not-speak-about-problems-1251252.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिपाली नाफडे]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 10:48:26 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 10:48:26 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Mental-health-of-men-1_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[हेल्थ]]></category>
		<category><![CDATA[men health]]></category>
		<category><![CDATA[mental health]]></category>
		<category><![CDATA[mental stress]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251252</guid>

					<description><![CDATA[आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि अनेकदा लहानपणापासूनच मुलांना तुम्ही किती स्ट्राँग आहात आणि रडणं चुकीचं आहे, व्यक्त होणं चुकीचं आहे शिकवलं जातं. यामध्ये न बोलून त्यांची घुसमट होते, जाणून घ्या 
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Mental-health-of-men-1_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="International Men S Health Week Why Men Do Not Speak About Problems"  fetchpriority="high"   /></figure><ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">पुरुषांचे मानसिक आरोग्य चांगले असणे काय महत्त्वाचे </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">आंतरराष्ट्रीय पुरुष आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने महत्त्वाची माहिती </span></i></li>
</ul><span class="bullet-text"><span style="font-weight: 400;">तणाव, दबाव, अस्वास्थ्यकर सवयी आणि अधूनमधून येणाऱ्या आरोग्य समस्यांनी भरलेल्या जीवनात शरीर कमजोर होणे स्वाभाविक आहे. हे काही गुपित नाही की, जरी तुम्ही मनाने पंचवीस वर्षांचे असाल, तरी तुमचे शरीर साथ देत नाही. वाढत्या वयानुसार तुम्हाला कोणत्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे आणि कोणत्या समस्यांबद्दल सावध राहिले पाहिजे हे महत्त्वाचे आहे. विशेषतः अनेक पुरुष मनातल्या गोष्टी बोलत नाहीत आणि त्याचा त्रास होत राहतो. <a href="https://www.navarashtra.com/topic/mental-health"><span style="color: #3366ff;">मानसिक आरोग्यही</span></a> तितकेच महत्त्वाचे आहे. या आंतरराष्ट्रीय पुरुष आरोग्य सप्ताहात, मानसिक आरोग्यही किती महत्त्वाचे आहे आपण जाणून घेऊया.</span></span><p><b>भारतातील पुरुषांचे मानसिक आरोग्य</b></p>
<p><span style="font-weight: 400;">आपण अनेकदा ऐकतो की पुरुष रडत नाहीत, पुरुषांना वेदना होत नाहीत, पण या सामाजिक धारणेमुळे किती पुरुषांचे मानसिक आरोग्य उद्ध्वस्त झाले आहे, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का"https://www.navarashtra.com/lifestyle/mental-health-is-increasing-in-the-country-748260.html"><span style="color: #3366ff;">मानसिक आरोग्य</span></a> ही एक गंभीर समस्या बनली आहे आणि आरोग्य तज्ज्ञांनी अनेक अहवालांमध्ये चिंता व्यक्त केली आहे.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, भारतातील सुमारे ७०% आत्महत्या पुरुषांच्या आहेत. ही आकडेवारी पुरुषांना भेडसावणारा मानसिक ताण दर्शवते. शिवाय, भारतीय समाजात पुरुषांना लहानपणापासूनच शिकवले जाते की त्यांनी कणखर, कमावते आणि भावनिकदृष्ट्या खंबीर असले पाहिजे. त्यांना त्यांच्यातील कमकुवतपणा लपवण्यास भाग पाडले जाते; भावना व्यक्त करणे हे एक दुर्बळपणाचे लक्षण मानले जाते. मनोविकारतज्ज्ञांच्या मते, या सर्व परिस्थितींमुळे ते मानसिकदृष्ट्या असुरक्षित बनत आहेत.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/lifestyle/5-worst-habits-that-can-impact-your-mental-health-728718.html"><span style="color: #3366ff;"><strong>‘या’ रोजच्या 5 सवयी करू शकतात Mental Health खराब, वेळीच घ्या जाणून</strong></span></a></p>
<p><b>पुरुषांमधील आत्महत्येचे प्रमाण</b></p>
<p><span style="font-weight: 400;">अमेरिकन फाउंडेशन फॉर सुसाइड प्रिव्हेंशनच्या माजी उपाध्यक्ष, मानसशास्त्रज्ञ जिल हारकावी-फ्रीडमन म्हणतात की, पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढण्याचा कल बऱ्याच काळापासून दिसून येत आहे. पुरुषांच्या आत्महत्येच्या पद्धतींचा विचार करणे देखील महत्त्वाचे आहे. पुरुष आणि महिला दोघांच्याही आत्महत्येच्या प्रयत्नांच्या अभ्यासातून असे दिसून येते की पुरुषांच्या आत्महत्येच्या पद्धती अनेकदा अधिक हिंसक असतात, आणि कोणी हस्तक्षेप करण्यापूर्वीच मृत्यूचा धोका जास्त असतो.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">यूकेच्या एका अहवालानुसार, १९८१ पासून पुरुषांच्या आत्महत्येच्या दरात लक्षणीय सुधारणा होऊन तो प्रति १,००,००० व्यक्तींमागे सुमारे १५.५ मृत्यूंपर्यंत पोहोचला असला तरी, ४५ वर्षांखालील पुरुषांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे, तर महिलांमध्ये हे प्रमाण केवळ ५ आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाण ऑस्ट्रेलियामध्ये तीन पटींनी, अमेरिकेत ३.५ पटींनी, तर रशिया आणि अर्जेंटिनामध्ये चार पटींपेक्षा जास्त आहे.</span></p>
<p><b>काय सांगतात तज्ज्ञ</b></p>
<p><b>मुंबईतील झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी</b><span style="font-weight: 400;"> म्हणाल्या की, मानसिक आरोग्याच्या समस्या स्त्रिया आणि पुरुष दोघांनाही प्रभावित करतात. पुरुषांमध्येही चिंता (Anxiety), ताणतणाव (Stress) आणि नैराश्य (Depression) यांसारख्या समस्या सामान्यपणे आढळतात आणि त्यांच्याकडे वेळेवर लक्ष देणे आवश्यक असते. मात्र, अशा समस्यांचा सामना करणारे अनेक पुरुष आपल्या भावनिक संघर्षांबद्दल मोकळेपणाने बोलण्यास संकोच करतात. यामागे सामाजिक अपेक्षाही मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात. लहानपणापासून पुरुषांनी खंबीर, स्वावलंबी आणि भावनिकदृष्ट्या कठोर राहावे, अशी शिकवण त्यांना दिली जाते. परंतु मानसिक आरोग्याविषयी बोलणे किंवा मदत मागणे हे कमकुवतपणाचे लक्षण नसून, स्वतःची काळजी घेण्याचे महत्त्वाचे पाऊल आहे. दुःख, चिंता किंवा तणाव यांसारख्या भावना व्यक्त करणे आणि योग्य वेळी मदत घेणे हे पूर्णपणे स्वाभाविक आहे.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/lifestyle/excessive-stress-weakens-the-body-from-within-know-the-serious-consequences-lifestyle-news-in-marathi-1161464.html"><span style="color: #3366ff;"><strong>Mental Health Alert: जास्त तणाव शरीराला करतो आतून कमकुवत; जाणून घ्या गंभीर परिणाम</strong></span></a></p>
<p><b>अनेकदा भावना ओळखताच येत नाहीत </b></p>
<p><span style="font-weight: 400;">अनेक पुरुषांना स्वतःच्या भावना ओळखणे किंवा त्याबद्दल बोलणे कठीण जाते. त्यामुळे मानसिक स्थितीबद्दल बोलण्याऐवजी ते कुटुंबीय आणि मित्रांपासून दूर राहू लागतात, चिडचिडे, अस्वस्थ, निराश किंवा एकाकी होऊ शकतात. काही जण तणाव कमी करण्यासाठी मद्यपान किंवा इतर व्यसनांचा आधारही घेतात. दुर्दैवाने, मदत घेण्यास उशीर झाल्यास मानसिक आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर होऊ शकतात आणि त्याचा परिणाम नातेसंबंध, कामाची क्षमता तसेच एकूणच जीवनमानावर होऊ शकतो. त्यामुळे पुरुषांनी मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि आपले जीवन अधिक निरोगी बनवावे. मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी मित्र आणि कुटुंबीयांशी मोकळेपणाने संवाद साधा, नियमित व्यायाम करा, तसेच योग आणि ध्यानधारणा यांसारख्या रिलॅक्सेशन तंत्रांचा अवलंब करा. यामुळे मानसिक तणाव कमी होऊन तुम्हाला अधिक सकारात्मक आणि आनंदी वाटू शकते.</span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Strait Of Hormuz : भारताचा अमेरिकेला थेट इशारा; ओमानच्या समुद्रात भारतीय खलाशांवर हल्ले का? MEA ने बजावला &#8216;डिमार्च&#8217;</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/world-day-against-child-labour-12-june-ilo-child-rights-india-laws-1251219.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 10:44:03 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 10:44:03 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/US-Navy-attacks-merchant-ships-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[America]]></category>
		<category><![CDATA[India news]]></category>
		<category><![CDATA[US-Israel Iran War]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251219</guid>

					<description><![CDATA[परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, "या घटनांमध्ये सामील असलेली तिन्ही जहाजे परदेशी ध्वज असलेली होती. यापैकी दोन जहाजांवर पलाऊचा ध्वज होता, तर तिसऱ्या जहाजावर गिनी-बिसाऊचा ध्वज होता. ही जहाजे भारतीय मालकीची नव्हती."
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/US-Navy-attacks-merchant-ships-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="World Day Against Child Labour 12 June Ilo Child Rights India Laws"    /></figure><ul>
<li><span data-path-to-node="4,0,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="4,0,0" data-index-in-node="0">अमेरिकन नौदलाचे व्यापारी जहाजांवर हल्ले</b></span></li>
<li><span data-path-to-node="4,1,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="4,1,0" data-index-in-node="0">भारताचा तीव्र राजनैतिक निषेध</b></span></li>
<li><span data-path-to-node="4,2,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="4,2,0" data-index-in-node="0">भारताचा वॉशिंग्टनला गंभीर संदेश</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="32,0,0"><strong>US Navy attacks merchant ships 2026 :</strong> आखाती देशांमध्ये आणि मध्य पूर्वेमध्ये गेल्या १०० दिवसांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या लष्करी तणावाने आता अत्यंत धोकादायक वळण घेतले आहे. आंतरराष्ट्रीय समुद्रकिनाऱ्यावर व्यापारी जहाजांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, एका धक्कादायक आंतरराष्ट्रीय घडामोडीत अमेरिकन नौदलाने ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय कर्मचारी असलेल्या तीन वेगवेगळ्या व्यापारी जहाजांवर थेट लष्करी हल्ले केले आहेत. या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये ३ भारतीय खलाशांना आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर घटनेनंतर भारताने आक्रमक पाऊल उचलत अमेरिकेकडे आपला तीव्र निषेध नोंदवला असून, &#8220;हे हल्ले आता पूर्णपणे थांबलेच पाहिजेत,&#8221; असा कडक आणि थेट संदेश वॉशिंग्टनला दिला आहे.</p>
<p data-path-to-node="9">भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (<a href="https://www.navarashtra.com/topic/indian">MEA</a>) देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच जाहीरपणे हे मान्य केले आहे की, अमेरिकेच्या नौदलाने भारतीय कर्मचारी असलेल्या व्यापारी जहाजांना लक्ष्य केले आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या घटना पडद्यामागे राहिल्या होत्या, मात्र ३ भारतीय सुपुत्रांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने या प्रकरणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र वाचा फोडली आहे.</p>
<h3 data-path-to-node="10"><b data-path-to-node="10" data-index-in-node="0">गेल्या ४ दिवसांत काय घडले? ३ जहाजांवर झालेल्या हल्ल्यांची सविस्तर टाइमलाईन</b></h3>
<p data-path-to-node="11">ओमानच्या समुद्रधुनीजवळ आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या परिसरात अमेरिकन सैन्याकडून इराणच्या संदर्भात एक मोठी सागरी नाकेबंदी (Naval Blockade) राबवली जात आहे. याच मोहिमेदरम्यान गेल्या चार दिवसांत तीन व्यापारी जहाजे अमेरिकेच्या निशाण्यावर आली:</p>
<p data-path-to-node="11"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/special-coverage/world-day-against-child-labour-june-12-history-significance-ilo-2026-1251191.html"> End Child Labour : लहान हातांना हवी पुस्तकांची साथ; जाणून घ्या जागतिक बालकामगार विरोधी दिनाचा इतिहास आणि आपले कर्तव्य</a></span></strong></p>
<p data-path-to-node="12">१. <b data-path-to-node="12" data-index-in-node="3">८ जून २०२६ (MT Marivex वरील हल्ला):</b> अमेरिकी सैन्याने २४ भारतीय खलाशी असलेल्या &#8216;मारिव्हेक्स&#8217; (Marivex) या तेलवाहू जहाजावर पहिला मोठा हल्ला केला. हे जहाज पलाऊ देशाचा ध्वज लावून प्रवास करत होते. या हल्ल्यात जहाजाचे मोठे नुकसान झाले आणि ते निकामी झाले. सुदैवाने, ओमानच्या स्थानिक प्रशासनाच्या मदतीने सर्व २४ भारतीय खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश आले.</p>
<p data-path-to-node="12">२. <b data-path-to-node="12" data-index-in-node="351">१० जून २०२६ (MT Settebello वरील प्राणघातक हल्ला):</b> पहिली घटना ताजी असतानाच, अमेरिकेने &#8216;सेट्टेबेलो&#8217; (Settebello) या दुसऱ्या पलाऊचा ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजावर भीषण हल्ला केला. या जहाजावर एकूण २४ भारतीय खलाशी तैनात होते. अत्यंत दुर्दैवाने, या हल्ल्यात ३ भारतीय खलाशांचा मृत्यू झाला. केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी या ३ भारतीय खलाशांच्या मृत्यूची पुष्टी केली असून त्यांच्या कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत.</p>
<p data-path-to-node="12">३. <b data-path-to-node="12" data-index-in-node="792">११ जून २०२६ (MT Jalveer वरील ताजा हल्ला):</b> काल गुरुवारी &#8216;जलवीर&#8217; (Jalveer) नावाच्या आणखी एका टँकरला अमेरिकेच्या लढाऊ विमानाने लक्ष्य केले. गिनी-बिसाऊ या देशाचा ध्वज असलेल्या या जहाजावर २० भारतीय नागरिक प्रवास करत होते. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावरील कर्मचाऱ्यांनी अमेरिकेच्या लष्करी सूचनांचे पालन केले नाही, ज्यामुळे अमेरिकेच्या एका एफ/ए-१८ सुपर हॉर्नेट (F/A-18 Super Hornet) लढाऊ विमानाने जहाजाच्या इंजिन रूममध्ये दोन हेलफायर (Hellfire) क्षेपणास्त्रे डागली आणि जहाज उद्ध्वस्त केले.</p>
<h3 data-path-to-node="13"><b data-path-to-node="13" data-index-in-node="0">भारताचा मोठा राजनैतिक प्रहार; अमेरिकेच्या प्रभारी राजदूतांना समन्स</b></h3>
<p data-path-to-node="14">&#8216;सेट्टेबेलो&#8217; जहाजावरील हल्ल्यात ३ भारतीय खलाशी ठार झाल्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्रालय प्रचंड आक्रमक झाले आहे. नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाने तात्काळ अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स (Jason Meeks) यांना समन्स पाठवून कार्यालयात बोलावून घेतले. भारताने अमेरिकेच्या राजदूतांच्या हातात एक कडक शब्दांतील राजनैतिक निषेध पत्र म्हणजेच &#8216;डिमार्च&#8217; (Demarche) सुपुर्द केले.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">We conveyed concerns to Amercian side on these attacks, says MEA Spox Randhir Jaiswal</p>
<p>Full remarks: <a href="https://t.co/bDuCNSyHOt">pic.twitter.com/bDuCNSyHOt</a></p>
<p>— Sidhant Sibal (@sidhant) <a href="https://x.com/sidhant/status/2065138845499502609">June 11, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><strong>credit &#8211; social media and Twitter</strong></p>
<p data-path-to-node="15">परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत भारताची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, &#8220;आम्ही आमच्या खलाशी समुदायाच्या कल्याणाला आणि सुरक्षेला सर्वोच्च महत्त्व देतो. व्यापारी जहाजांवर सातत्याने होणारे हे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते त्वरित थांबले पाहिजेत. आखातातील संघर्षावर केवळ शांततापूर्ण संवाद आणि राजनैतिक मार्ग हाच एकमेव पर्याय आहे.&#8221; भारताने अमेरिकेला स्पष्टपणे बजावले आहे की, आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार &#8216;होर्मुझच्या सामुद्रधुनीतून&#8217; (Strait of Hormuz) सर्व देशांच्या जहाजांना कोणताही अडथळा न येता निर्बाध दळणवळण करण्याचा अधिकार आहे आणि त्यावर गदा आणता येणार नाही.</p>
<p data-path-to-node="15"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/special-coverage/mount-everest-old-name-peak-xv-history-sir-george-everest-tibet-nepal-1249510.html">Mount Everest: एव्हरेस्ट नाही तर ‘हे’ होते जगातील सर्वोच्च शिखराचे जुने नाव; एका ब्रिटीश अधिकाऱ्याने कसा बदलला जगाचा इतिहास?</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="16"><b data-path-to-node="16" data-index-in-node="0">अमेरिकेने या जहाजांवर हल्ले का केले? काय आहे कारण?</b></h3>
<p data-path-to-node="17">अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) सोशल मीडियावर या हल्ल्यांचे समर्थन करताना सांगितले की, ही जहाजे अमेरिकेच्या &#8216;ऑफिस ऑफ फॉरेन असेट्स कंट्रोल&#8217; (OFAC) ने लादलेल्या आर्थिक निर्बंधांचे उल्लंघन करत होती. अमेरिकेचा असा दावा आहे की, ही जहाजे इराणवरील आंतरराष्ट्रीय नाकेबंदी झुगारून इराणचे कच्चे तेल चोरट्या मार्गाने वाहून नेण्याचा प्रयत्न करत होती आणि अमेरिकन नौदलाने वारंवार धोक्याचे इशारे देऊनही या जहाजांच्या कॅप्टन आणि क्रू मेंबर्सनी गाड्या थांबवल्या नाहीत किंवा त्यांच्या सूचनांचे पालन केले नाही.</p>
<p data-path-to-node="18">तथापि, यावर परराष्ट्र मंत्रालयाने एक अत्यंत महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा उपस्थित केला आहे. प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, &#8220;ज्या ३ जहाजांवर अमेरिकेने कारवाई केली, ती आंतरराष्ट्रीय कंपन्यांची आणि परदेशी ध्वज (Foreign-Flagged) असलेली जहाजे होती. ती भारतीय मालकीची जहाजे नव्हती, केवळ त्यांवर काम करणारे कर्मचारी आणि खलाशी हे भारतीय नागरिक होते.&#8221;</p>
<h3 data-path-to-node="19"><b data-path-to-node="19" data-index-in-node="0">१८ हजार भारतीय खलाशांची सुरक्षा धोक्यात; सरकार हाय अलर्टवर</b></h3>
<p data-path-to-node="20">या आंतरराष्ट्रीय संकटामुळे समुद्रात काम करणाऱ्या हजारो भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या आखाती देशांच्या समुद्र परिसरात सुमारे १८,००० हून अधिक भारतीय खलाशी वेगवेगळ्या परदेशी जहाजांवर कार्यरत आहेत, तर ५०० हून अधिक भारतीय खलाशी भारतीय ध्वज असलेल्या जहाजांवरून प्रवास करत आहेत.</p>
<p data-path-to-node="21">या पार्श्वभूमीवर, भारताच्या नौवहन मंत्रालयाने आणि &#8216;डायरेक्टोरेट जनरल ऑफ शिपिंग&#8217; (DG Shipping) या नियामकाने आंतरराष्ट्रीय समुद्रातून प्रवास करणाऱ्या सर्व भारतीय खलाशांना आणि जहाजांना &#8216;हाय अलर्ट&#8217; जारी केला असून, या धोकादायक युद्धजन्य क्षेत्रातून प्रवास करताना कमालीची सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, मृत खलाशांच्या कुटुंबीयांना &#8216;सीमन वेल्फेअर फंड सोसायटी&#8217;कडून तात्काळ प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून, जखमी व इतर सुरक्षित खलाशांना मायदेशी आणण्यासाठी ओमानमधील भारतीय दूतावास युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.</p>
<h3 data-path-to-node="23"></h3>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Apple Watch यूजर्ससाठी खुशखबर! Telegram ने लाँच केल खास अ‍ॅप; QR कोड स्कॅन करताच मिळणार अ‍ॅक्सेस</title>
		<link>https://www.navarashtra.com/technology/telegram-launched-app-for-apple-watch-users-will-get-access-after-scanning-qr-code-1251247.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा जाधव]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 10:38:38 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 10:39:42 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/new-telegram-app_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विज्ञान तंत्रज्ञान]]></category>
		<category><![CDATA[apple]]></category>
		<category><![CDATA[Tech News]]></category>
		<category><![CDATA[Telegram]]></category>
		<category><![CDATA[Telegram App]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251247</guid>

					<description><![CDATA[Telegram App For Apple Watch: टेलिग्रामने ॲपल वॉच यूजर्सना मोठी भेट दिली आहे. कंपनीने वॉचओएससाठी पुन्हा एकदा नेटिव्ह अ‍ॅप लाँच केले असून आता यूजर्स थेट स्मार्टवॉचवरून मेसेजिंग आणि इतर अनेक फीचर्सचा वापर करू शकणार आहेत. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/new-telegram-app_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Telegram Launched App For Apple Watch Users Will Get Access After Scanning Qr Code"    /></figure><ul>
<li>Telegram ने अ&#x200d;ॅपल वॉचसाठी नेटिव्ह अ&#x200d;ॅप लॉन्च केले असून यूजर्स आता थेट वॉचवरून मेसेज पाठवू आणि प्राप्त करू शकतात.</li>
<li>नवीन अ&#x200d;ॅपमध्ये व्हॉईस मेसेज, स्टिकर्स, जिआयएफ, व्हिडिओ प्लेबॅक आणि लोकेशन शेअरिंगसारखी फीचर्स उपलब्ध आहेत.</li>
<li>अ&#x200d;ॅप वापरण्यासाठी यूजर्सना आयफोनवरील टेलिग्राम अ&#x200d;ॅपमधून क्यूआर कोड स्कॅन करून सेटअप पूर्ण करावा लागेल.</li>
</ul><span class="bullet-text">सोशल मीडिया प्लॅटफॉर्म <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/telegram-app"><strong>टेलिग्राम</strong></a></span>ने <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/apple"><strong>अ&#x200d;ॅपल</strong> </a></span>वॉचसाठी एक संपूर्ण नेटिव्ह ॲप लाँच केले आहे. हे ॲप अ&#x200d;ॅपलच्या वियरेबल डिव्हाईसवर मेसेजिंग फीचर्सचा एक संपूर्ण सेट ऑफर करतो. या रिलीझमुळे अनेक वर्षांनंतर या प्लॅटफॉर्मचे वॉचओएसवर पुनरागमन झाले आहे, कारण कंपनीने आपले अधिकृत स्मार्टवॉच ॲप्लिकेशन बऱ्याच काळापूर्वी बंद केले होते. या नव्या ॲपमुळे यूजर्स आता थेट त्यांच्या मनगटावरून कन्वर्सेशन्स अ&#x200d;ॅक्सेस करू शकणार आहेत, मेसेज पाठवू शकणार आहेत आणि रिसिव्ह देखील करू शकणार आहेत.</span><p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="डिझाईन पाहताच प्रेमात पडाल… 8,000mAh बॅटरीसह नवा TECNO स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत वाचून व्हाल थक्क" href="https://www.navarashtra.com/technology/tecno-pova-8-launched-in-india-smartphone-design-is-very-attractive-read-price-1251216.html"><strong> डिझाईन पाहताच प्रेमात पडाल… 8,000mAh बॅटरीसह नवा TECNO स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत वाचून व्हाल थक्क</strong> </a></span></p>
<h3>यूजर्सना मिळणार नवे फीचर</h3>
<p>तसेच नव्या अ&#x200d;ॅपमुळे अ&#x200d;ॅपल वॉचमध्ये कॉन्टॅक्ट्स ब्राउज केले जाऊ शकतात, व्हॉईस मेसेज ऐकू शकतात, स्टिकर्स पाहू शकतात, जीआयएफ आणि व्हिडीओ प्ले करू शकतात आणि त्यांचे लोकेशन देखील शेअर करू शकतात. हे ॲप टेलिग्रामची बहुतेक मुख्य कार्यक्षमता ॲपल वॉचवर आणते, ज्यामुळे केवळ साध्या स्मार्टफोन नोटिफिकेशन्स प्राप्त करण्यापेक्षा खूपच चांगला वॉचओएस अनुभव मिळतो. <strong>(फोटो सौजन्य – X) </strong></p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en"><img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/231a_V_png--1280x720-4g.webp" alt="⌚" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> A fully native Telegram app for Apple Watch is out. <a href="https://t.co/3wSr5igssE">pic.twitter.com/3wSr5igssE</a></p>
<p>— Pavel Durov (@durov) <a href="https://x.com/durov/status/2064434685023854663">June 9, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<h3>पावेल डुरोव्ह यांनी केली घोषणा</h3>
<p>टेलिग्रामचे फाऊंडर आणि चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर सिईओ पावेल डुरोव्ह यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत याबाबत घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, अ&#x200d;ॅपल वॉचसाठी पूर्णपणे नेटिव्ह टेलिग्राम ॲप्लिकेशन आले आहे.</p>
<h3>असा मिळणार नव्या अ&#x200d;ॅपचा अ&#x200d;ॅक्सेस</h3>
<p>पावेल डुरोव्ह यांनी घोषणा केल्यानंतर समोर आलेल्या रिपोर्टनुसार, यूजर्सना या स्मार्टवॉच अ&#x200d;ॅपद्वारे कनेक्ट करण्यासाठी सर्वात आधी त्यांच्या आयफोनमध्ये टेलिग्राम अ&#x200d;ॅप ओपन करून एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. याची सेटअप प्रोसेस पूर्णपणे तशीच आहे, ज्याप्रमाणे टेलीग्रामच्या वेब किंवा डेस्कटॉप क्लाइंट्सवर साइन-इन केले जाते. ज्या यूजर्सनी त्यांच्या अकाऊंटवर अ&#x200d;ॅडिशनल क्लाउड पासवर्ड (टू-स्टेप वेरिफिकेशन) इनेबल केले आहे, त्यांना अ&#x200d;ॅपचा अ&#x200d;ॅक्सेस मिळण्यापूर्वी व्हेरिफिकेशन स्टेप पूर्ण कराव्या लागणार आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Apple WWDC 2026: iPhone यूजर्सची प्रतिक्षा संपली! iOS 27 मध्ये अलार्म आणि रिंगटोनसाठी मिळणार स्वतंत्र वॉल्यूम कंट्रोल" href="https://www.navarashtra.com/technology/apple-wwdc-2026-iphone-users-will-get-separate-volume-control-for-alarm-and-ringtone-1249592.html"><strong> <span class="color-red">Apple WWDC 2026</span>: iPhone यूजर्सची प्रतिक्षा संपली! iOS 27 मध्ये अलार्म आणि रिंगटोनसाठी मिळणार स्वतंत्र वॉल्यूम कंट्रोल</strong> </a></span></p>
<h3>सेटअप प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मिळणार या फीचर्सचा अ&#x200d;ॅक्सेस</h3>
<p>एकदा सेटअप प्रोसेस पूर्ण झाले की, अ&#x200d;ॅपल वॉच अ&#x200d;ॅप तुमच्या सर्व संपर्क आणि जुने चॅट्स अ&#x200d;ॅक्सेस करण्याचा पर्याय देणार आहे. यानंतर यूजर्स थेट वॉचवर टेक्स्ट मेसेजेस पाठवू शकतात आणि रिसिव्ह करू शकतात, व्हॉईस मेसेज ऐकू शकतात, लोकेशन डिटेल्स शेअर करू शकतात, स्टिकर्स पाहू शकतात आणि थेट वॉच स्क्रीनवर जीआयएफ आणि व्हिडीओ देखील प्ले करू शकणार आहेत. यापूर्वी 2014 मध्ये टेलिग्रामने अ&#x200d;ॅपल वॉच अ&#x200d;ॅप सादर केला होता. मात्र त्यानंतर हे सॉफ्टवेअर बंद करण्यात आले आणि मूळ वॉचओएस (watchOS) सपोर्ट काढून टाकण्यात आला. मात्र आता कंपनीने लेटेस्ट अपडेटसह अ&#x200d;ॅप पुन्हा एकदा लाँच केले आहे. नवीन अपडेटेड वर्जन आता त्या सर्व रीजन्समध्ये रोलआउट होणार आहे, जिथे टेलीग्राम उपलब्ध आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Networth: एका दिवसात अंबानी-अडानीच्या एकूण संपत्तीपेक्षा अधिक कमाई, Trillionaire होण्याच्या तयारी Elon Musk</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/elon-musk-net-worth-jumps-274-billion-dollar-now-he-is-set-to-worlds-first-trillionaire-soon-1251240.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिपाली नाफडे]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 10:27:09 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 10:27:09 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Elon-Musk-1_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[elon musk]]></category>
		<category><![CDATA[Net Worth]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251240</guid>

					<description><![CDATA[जगातील सर्वात मोठ्या IPO मागील कंपनी, स्पेसएक्स, आज सूचीबद्ध होणार आहे. कंपनीचे संस्थापक, इलॉन मस्क यांच्या निव्वळ संपत्तीत लक्षणीय वाढ झाली असून निव्वळ संपत्ती १.१ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Elon-Musk-1_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Elon Musk Net Worth Jumps 274 Billion Dollar Now He Is Set To Worlds First Trillionaire Soon"     /></figure><ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">जगातील पहिला ट्रिलियनएअर होण्याचा मान मिळणार इलॉन मस्कला</span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">अंबानी आणि अडानीच्या एका दिवसाच्या कमाईपेक्षा अधिक कमाई </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">इलॉन मस्कची संपत्ती तरी किती?</span></i></li>
</ul><span class="bullet-text"><span style="font-weight: 400;">जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, <a href="https://www.navarashtra.com/topic/elon-musk"><span style="color: #3366ff;">इलॉन मस्क</span></a> यांच्या मालकीची स्पेसएक्स (SpaceX) आज सूचीबद्ध होणार आहे. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या ७५ अब्ज डॉलर्सच्या मेगा आयपीओचे स्वागत केले आहे. केवळ रिटेल भागासाठीच ७० अब्ज डॉलर्सच्या बोली लागल्या आहेत. स्पेसएक्सच्या सूचीकरणापूर्वीच, गुरुवारी मस्क यांच्या <a href="https://www.navarashtra.com/business/elon-musk-to-become-worlds-first-trillionaire-spacex-ipo-marathi-news-1249830.html"><span style="color: #3366ff;">निव्वळ संपत्तीत</span></a> २७४ अब्ज डॉलर्सची वाढ झाली, ज्यामुळे त्यांनी गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांची एकत्रित निव्वळ संपत्ती ओलांडली. यासह, ते ९७१ अब्ज डॉलर्ससह जगातील पहिले ट्रिलियनपती बनण्याच्या उंबरठ्यावर आहेत.</span></span><p><span style="font-weight: 400;">असे मानले जाते की स्पेसएक्सच्या सूचीकरणामुळे मस्क यांची निव्वळ संपत्ती १.१ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल. स्पेसएक्समधील त्यांच्या हिश्श्याचे मूल्य अंदाजे ८६६ अब्ज डॉलर्स आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गुरुवारी मस्क यांच्या निव्वळ संपत्तीत २७४ अब्ज डॉलर्सची वाढ झाली. यावर्षी त्यांच्या निव्वळ संपत्तीत ३५१ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. मस्क यांच्या निव्वळ संपत्तीच्या जवळपास कोणीही पोहोचू शकत नाही. गुगलचे सह-संस्थापक लॅरी पेज हे ३०४ अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/latest-news/declining-birth-rate-of-india-raising-concerns-elon-musks-statement-world-1247354.html"><span style="color: #3366ff;"><strong>भारतात जन्मदर वेगाने घसरतोय! इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता</strong></span></a></p>
<p><b>नक्की उत्पन्न कुठून येते?</b></p>
<p><span style="font-weight: 400;">दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया येथे जन्मलेले ५४ वर्षीय मस्क हे व्यवसायाने अभियंता आहेत. १९९७ मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, ते २००८ मध्ये टेस्लाचे सीईओ बनले. टेस्ला आणि स्पेसएक्स व्यतिरिक्त, त्यांनी इतर पाच कंपन्यांची स्थापना केली आहे: बोगदा खोदणारी स्टार्टअप कंपनी &#8216;द बोरिंग कंपनी&#8217; आणि ब्रेन इम्प्लांट बनवणारी &#8216;न्यूरालिंक&#8217;. टेस्ला आणि स्पेसएक्समधील त्यांची हिस्सेदारी हा त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे.</span></p>
<p><b>अंबानी-अदानी यांची निव्वळ संपत्ती</b></p>
<p><span style="font-weight: 400;">ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या निव्वळ संपत्तीत गुरुवारी ३.९० अब्ज डॉलर्सची घट झाली. ११२ अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीसह ते जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत १७ व्या क्रमांकावर आहेत. यावर्षी त्यांच्या निव्वळ संपत्तीत २७.६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. ८३.१ अब्ज डॉलर्सच्या निव्वळ संपत्तीसह मुकेश अंबानी या यादीत २३ व्या क्रमांकावर आहेत. इलॉन मस्क हे दिवसेंदिवस अधिक श्रीमंत होत चालले असून त्यांची संपत्ती सामान्य माणसाच्या कल्पनेपलीकडे आहे. </span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/elon-musk-tesla-struggles-in-india-as-vinfast-steals-spotlight-1237282.html"><span style="color: #3366ff;"><strong>भारतात Elon Musk ला मोठा झटका! ‘या’ इलेक्ट्रिक बाईकने Tesla ला बॅकफुटवर टाकले, १० पट अधिक विक्रीची नोंद</strong></span></a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Hormuz Attack: भारतीय नाविकांच्या मृत्यूप्रकरणी इराणचा हल्लाबोल; अमेरिकेवर केला गंभीर आरोप</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/iran-reacts-to-death-of-indian-sailors-1251232.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 10:21:08 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 10:21:08 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Iran-reacts-to-death-of-Indian-sailors_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[America]]></category>
		<category><![CDATA[Iran News]]></category>
		<category><![CDATA[Strait of Hormuz]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251232</guid>

					<description><![CDATA[Hormuz Attack Update : अमेरिकेच्या हल्ल्यात भारतीय नागरिकांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी इराणने आक्रमक टीका केली आहे. इराणने अमेरिकेच्या कारवाईला समुद्री लुटमार संबोधले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Iran-reacts-to-death-of-Indian-sailors_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Iran Reacts To Death Of Indian Sailors"     /></figure><ul>
<li>अमेरिकेच्या जहाजांवरील हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू</li>
<li>इराणची आक्रमक भूमिका</li>
<li>अमेरिकेवर इराणचे गंभीर आरोप</li>
</ul><span class="bullet-text">Hormuz Attack News in Marathi : तेहरान : गेल्या तीन दिवसांत ओमानच्या किनाऱ्याजवळ तीन व्यापारी जहाजावंर अमेरिकेने हल्ले केले होते. ज्यामध्ये ३ भारतीय नाविकांचा मृत्यू झाला. यामुळे भारत आणि अमेरिकेत राजनैतिक हालचालींना वेग आला आहे. या दरम्यान इराणने देखील या घटनेर प्रतिक्रिया दिली आहे. इराणने भारतीय नाविकांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर अमेरिकेवर गंभीर आरोप करत आक्रमक भूमिका घेतली आहे.</span><p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/hormuz-attack-3-major-strike-in-3-days-mt-jalveer-targeted-indian-sailors-at-risk-1250668.html">Hormuz Attack : तीन दि</a></span></strong><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/hormuz-attack-3-major-strike-in-3-days-mt-jalveer-targeted-indian-sailors-at-risk-1250668.html">वसांत तिसरा मोठा हल्ला! होर्मुझमध्ये जहाज MT Jalveer ला लक्ष्य; २० भारतीय नाविक धोक्यात?</a></span></strong></p>
<p>ओमानच्या समुद्रातून प्रवास करणाऱ्या एमटी मॅरिव्हेक्स, एमटी सेटेबेलो आणि एमटी जलवीर या जहाजांवर हल्ला केला होता. या तिन्ही जहाजांवर भारतीय नाविक तैनात होते. यातील एमटी मॅरिव्हेक्स जहाजावरील ३ भारतीय नाविकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर भारताने तीव्र चिंता व्यक्त केली असून अमेरिकेकडे याचे स्पष्टीकरण मागितले आहे. तसेच हल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.</p>
<h3>भारतीय नाविकांच्या मृत्यूवर इराणची प्रतिक्रिया</h3>
<p>या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना इराणचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी अमिरेकेवर जोरदार टीका केली आहे. व्यापारी जहाजंवरींल अमेरिकेच्या हल्ल्याला त्यांनी समुद्री दरोडेखोरी म्हटले आहे. भारतीय नाविकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत भारत सरकार आणि नागरिकांबद्दल सहवेदना व्यक्त केला आहेत. तसेच नाविकांच्या मृत्यूसाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे.</p>
<h3>भारतीच प्रतिक्रिया</h3>
<p>दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्याच्यां सुरक्षेबाबत चिंका व्यक्त केली आहे. सध्या ओमानमधील भारतीय दूतावास स्थानिक सरकारच्या मदतीने परिस्थितीवर बारकाईने लक्ष्य ठेवनू आहे.</p>
<p>भारताने मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्ष आणि समुद्री मार्गांवरील हल्ले तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. दोन्ही देशांना संयम बाळगून संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. परिसरात शांतता प्रस्थापित व्हावी आणि व्यापारी जहाजांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे सरकारने म्हटले आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">The brutal U.S. attacks on Indian commercial vessels which have killed at least three Indian nationals, stand as clear evidence of America’s ongoing policy of armed robbery and State piracy.</p>
<p>We extend our sympathies to the families and friends of the slain Indian sailors and…</p>
<p>— Esmaeil Baqaei (@IRIMFA_SPOX) <a href="https://x.com/IRIMFA_SPOX/status/2065177891445355004">June 11, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><br />
<strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/us-iran-peace-deal-trump-claims-war-may-end-soon-hints-on-hormuz-reopening-1251187.html">US Iran Peace Deal : ट्रम्प यांचा पुन्हा शांततेचा दावा; अमेरिका-इराण युद्ध थांबणार? होर्मुझबाबतही मोठे संकेत</a></span></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Hrithik Roshan Jailer 2: शाहरुख खानने नाकारलेली भूमिका आता हृतिक रोशन साकारणार? ‘जेलर 2’बाबत मोठी चर्चा</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/will-hrithik-roshan-play-the-role-rejected-by-shah-rukh-khan-major-buzz-around-jailer-2-1251225.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 10:18:10 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 10:18:10 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/rajni_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[बॉलीवूड]]></category>
		<category><![CDATA[Bollywood News]]></category>
		<category><![CDATA[Hrithik Roshan]]></category>
		<category><![CDATA[king shahrukh khan]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251225</guid>

					<description><![CDATA[रजनीकांतच्या बहुचर्चित ‘जेलर 2’ चित्रपटात हृतिक रोशन दमदार भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. शाहरुख खानने ही भूमिका नाकारल्यानंतर निर्मात्यांनी हृतिकशी संपर्क साधल्याचे वृत्त समोर आले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/rajni_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Will Hrithik Roshan Play The Role Rejected By Shah Rukh Khan Major Buzz Around Jailer 2"     /></figure><p>दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट &#8216;जेलर&#8217;चा सिक्वेल असलेल्या &#8216;जेलर २&#8217; बद्दल सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. चित्रपटाबद्दलची प्रत्येक नवीन माहिती चाहत्यांचा उत्साह आणखी वाढवत आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ज्यामुळे देशभरातील चित्रपटप्रेमींना आश्चर्य आणि आनंद झाला आहे. बॉलिवूडचा हँडसम हंक, <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Hrithik-Roshan">हृतिक रोशन</a></span>, या चित्रपटाच्या कलाकारांच्या यादीत सामील झाला आहे. रजनीकांत यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपटात तो एका अत्यंत विशेष आणि दमदार कॅमिओ भूमिकेत दिसणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांचा आनंद आणखी वाढला आहे.</p>
<p>हे लक्षात घेण्यासारखे आहे की, या चित्रपटाच्या चर्चेत सुरुवातीला बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचे नाव घेतले जात होते. निर्मात्यांना <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/shahrukh-khan">शाहरुख खान</a></span>ने चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारावी असे वाटत होते आणि रजनीकांत व शाहरुख खान यांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. त्याचा आगामी चित्रपट &#8216;किंग&#8217; आणि इतर प्रकल्पांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शाहरुख खानला या भूमिकेसाठी वेळ काढता आला नाही. तारखांच्या कमतरतेमुळे त्याने या प्रकल्पातून माघार घेतली. त्यानंतर निर्मात्यांनी हृतिक रोशनशी चर्चा केली आणि आता हृतिक रोशनने या मोठ्या प्रकल्पासाठी अधिकृतपणे होकार दिला आहे.</p>
<p>वृत्तानुसार, हृतिक रोशन चित्रपटात केवळ काही सेकंदांसाठी नाही, तर एका महत्त्वाच्या वळणावर दिसणार आहे. त्याचे पात्र रजनीकांतच्या टायगर मुथुवेल पांडियन या पात्राला कथा पुढे नेण्यास मदत करेल. हृतिक रोशनच्या भूमिकेच्या या भागाचे चित्रीकरण २२ आणि २३ जून रोजी चेन्नईमध्ये होणार आहे. निर्माते हृतिकचे पात्र भव्य प्रमाणात सादर करण्याची तयारी करत असून, त्यासाठी अनेक लूक टेस्ट घेतल्या जात आहेत. प्रेक्षकांना या चित्रपटात हृतिक रोशनचा एक पूर्णपणे नवीन आणि अनोखा अवतार पाहायला मिळेल, जो त्याने यापूर्वी कधीही साकारलेला नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="‘३७० ची बिर्याणी’ विवाद नडला! प्रणित मोरे आणि हिमांशूला राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स; डीजीपींना कडक कारवाईचे आदेश" href="https://www.navarashtra.com/entertainment/article-370-biryani-controversy-backfires-national-commission-for-women-summons-pranit-more-and-himanshu-1251036.html"> ‘३७० ची बिर्याणी’ विवाद नडला! प्रणित मोरे आणि हिमांशूला राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स; डीजीपींना कडक कारवाईचे आदेश </a></strong></span></p>
<p>हृतिक रोशन आणि रजनीकांत यांचे पडद्यावर एकत्र येणे हा चित्रपटप्रेमींसाठी एक अत्यंत भावनिक आणि ऐतिहासिक क्षण असणार आहे. बरोबर ४० वर्षांपूर्वी, १९८६ साली प्रदर्शित झालेल्या &#8216;भगवान दादा&#8217; या चित्रपटात या दोन सुपरस्टार्सनी एकत्र काम केले होते. त्या चित्रपटात हृतिक रोशनने बालकलाकार म्हणून काम केले होते आणि रजनीकांत यांच्या पात्राच्या सावत्र मुलाची भूमिका साकारली होती. हृतिक रोशनने मुलाखतींमध्ये अनेकदा सांगितले आहे की तो रजनीकांत यांचा किती आदर करतो आणि लहानपणी चित्रीकरणादरम्यान तो त्यांची किती काळजी घेत असे. आता, ४० वर्षांनंतर, हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा एकत्र मोठ्या पडद्यावर आग लावण्यासाठी सज्ज झाले आहेत.</p>
<p><iframe loading="lazy" title="JAILER 2 - Announcement Teaser | Superstar Rajinikanth | Sun Pictures | Nelson | Anirudh" src="https://www.youtube.com/embed/aaNq2NL6D4A" width="855" height="481" frameborder="0" allowfullscreen="allowfullscreen"></iframe><br />
<span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Dinyar Tirandaz Passes Away: ‘जबान संभाल के’ फेम अभिनेते दिनयार तिरंदाज काळाच्या पडद्याआड, 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास" href="https://www.navarashtra.com/entertainment/actor-dinyar-tirandaz-has-passed-away-at-the-age-of-69-1251204.html"> <span class="color-blue">Dinyar Tirandaz Passes Away</span>: ‘जबान संभाल के’ फेम अभिनेते दिनयार तिरंदाज काळाच्या पडद्याआड, 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास </a></strong></span></p>
<p>नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित &#8216;जेलर २&#8217; हा २०२६ मधील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असेल अशी अपेक्षा आहे. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटात केवळ हृतिक रोशनच नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीतील इतर अनेक प्रमुख नावेही दिसणार आहेत. चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये मोहनलाल, शिव राजकुमार, विजय सेतुपती आणि मिथुन चक्रवर्ती यांसारख्या ज्येष्ठ कलाकारांच्या पाहुण्या भूमिका (कॅमिओ) असण्याची शक्यता आहे. एस.जे. सूर्या, रम्या कृष्णन, विद्या बालन आणि योगी बाबू हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. हा चित्रपट सप्टेंबर २०२६ मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Vastu Tips: घराच्या उंबरठ्यावर बसणं का मानलं जातं अशुभ आणि वर्जित, कारण वाचून बसेल धक्का</title>
		<link>https://www.navarashtra.com/religion/vastu-tips-as-per-astrology-house-threshold-rules-narashimha-laxmi-effect-1251237.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिपाली नाफडे]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 10:02:27 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 10:02:27 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/threshold-_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[धर्म]]></category>
		<category><![CDATA[astrology news]]></category>
		<category><![CDATA[Vastu Shastra Tips]]></category>
		<category><![CDATA[Vastu Tips]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251237</guid>

					<description><![CDATA[ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार, घराचा उंबरठा हे भगवान नरसिंह आणि देवी लक्ष्मी यांच्याशी संबंधित एक पवित्र स्थान मानले जाते. त्यामुळे, उंबरठ्यावर बसणे अशुभ मानले जाते.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/threshold-_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Vastu Tips As Per Astrology House Threshold Rules Narashimha Laxmi Effect"     /></figure><ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">उंबरठ्यावर बसणं का ठरतं अशुभ </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">नक्की काय कारण </span></i></li>
</ul>
<ul>
<li style="font-weight: 400;" aria-level="1"><i><span style="font-weight: 400;">काय सांगते ज्योतिषशास्त्र </span></i></li>
</ul><span class="bullet-text"><span style="font-weight: 400;">भारतीय ज्योतिष, वास्तुशास्त्र आणि धार्मिक श्रद्धांमध्ये घराच्या उंबरठ्याला किंवा दाराच्या चौकटीला एक विशेष स्थान आहे. घरातील वडीलधारी मंडळी अनेकदा मुलांना दाराच्या चौकटीवर बसण्यास मनाई करतात. बरेच जण याला केवळ एक जुनी परंपरा मानतात, परंतु ज्योतिष आणि धार्मिक ग्रंथ यामागे एक गहन आध्यात्मिक महत्त्व असल्याचे सांगतात. प्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर यांनीही दाराच्या चौकटीशी संबंधित अशाच श्रद्धांचा उल्लेख केला आहे, ज्या आजही लाखो लोकांच्या श्रद्धेचा भाग आहेत. जर तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की दाराच्या चौकटीवर जास्त वेळ बसणे किंवा उभे राहणे अशुभ का मानले जाते, तर त्यामागे केवळ सामाजिक नियमच नव्हे, तर धार्मिक आणि वास्तुशास्त्राचीही अनेक कारणे आहेत.</span></span><p><span style="font-weight: 400;">असे मानले जाते की दाराची चौकट हे असे स्थान आहे जिथून घराची ऊर्जा, देव-देवतांचे आशीर्वाद आणि सकारात्मक स्पंदने प्रवेश करतात. म्हणूनच या जागेला केवळ एक सामान्य जागा न मानता एक पवित्र सीमा मानले जाते. चला तर मग, ज्योतिष, पौराणिक कथा आणि वास्तुशास्त्रानुसार दाराच्या चौकटीचे महत्त्व आणि या जागेला विशेष आदराने वागवण्याचा सल्ला का दिला जातो, हे जाणून घेऊया.</span></p>
<p><b>दाराची चौकट पवित्र स्थान का मानली जाते?</b></p>
<p><span style="font-weight: 400;">ज्योतिषशास्त्र आणि सनातन परंपरेनुसार, घराची दाराची चौकट म्हणजे केवळ लाकूड किंवा दगडाचा तुकडा नाही. ती घरातील आणि बाहेरील ऊर्जांमधील प्रवेशद्वार मानली जाते. हे असे स्थान आहे जिथून शुभ ऊर्जा, आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता प्रवेश करतात. असे मानले जाते की ज्या घराची उंबरठा स्वच्छ आणि आदरपूर्वक ठेवला जातो, त्या घराला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद दीर्घकाळ लाभतो. म्हणूनच अनेक घरांमध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी दाराच्या चौकटीवर दिवे लावण्याची आणि रांगोळी काढण्याची परंपरा आहे.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/religion/adhik-maas-end-amavasya-mithun-sankranti-and-mhuharrum-both-festivals-of-hindu-and-muslim-on-15th-june-1250512.html"><span style="color: #3366ff;"><strong>Hindu – Muslim: 15 जूनला येणार हिंदू मुस्लीम एकत्र, ठरणार ‘खास’ दिवस; एक नाही तर 4 कारणं</strong></span></a></p>
<p><b>देवकीनंदन ठाकूर काय म्हणाले?</b></p>
<p><b>प्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर</b><span style="font-weight: 400;"> यांच्या मते, घराची दाराची चौकट भगवान नरसिंहाशी संबंधित आहे. ते म्हणतात की दाराच्या पायरीवर बसणे अयोग्य मानले जाते, कारण ते दैवी शक्तींचे प्रतीक मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, देवाच्या अवताराशी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या दैवी घटनेशी संबंधित असलेल्या ठिकाणी अनादर किंवा निष्काळजीपणा टाळला पाहिजे. यामुळेच दाराच्या चौकटीवर बसण्यास मनाई आहे.</span></p>
<p><b>भगवान नरसिंह आणि दाराची चौकट यांचा संबंध</b></p>
<p><b>हिरण्यकशिपूच्या अंताची कथा</b></p>
<p><span style="font-weight: 400;">पौराणिक कथेनुसार, राक्षस राजा हिरण्यकशिपूला असा वर मिळाला होता की, त्याला घराच्या आत किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री, माणूस किंवा प्राणी यांपैकी कोणीही मारू शकणार नाही. तेव्हा भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला. संध्याकाळच्या वेळी, त्यांनी हिरण्यकशिपूला घराच्या दाराच्या चौकटीवर बसवले आणि आपल्या नखांनी त्याला ठार मारले. दाराची चौकट पूर्णपणे घराच्या आत किंवा बाहेर नव्हती, त्यामुळे वराच्या सर्व अटी रद्द झाल्या. या घटनेनंतर, उंबरठ्याला एक दैवी आणि पवित्र स्थान मानले जाऊ लागले. ज्योतिषी मानतात की दाराच्या चौकटीवर बसणे हे या पवित्रतेच्या आदराच्या विरुद्ध मानले जाते.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">जर तुम्हाला आरोग्य, नातेसंबंध, जीवन किंवा धार्मिक ज्योतिषशास्त्राशी संबंधित काही वैयक्तिक समस्या असतील, तर कृपया आम्हाला व्हॉट्सॲप करा आणि आम्ही तुमचे नाव उघड न करता माहिती देऊ.</span></p>
<p><b>ज्योतिषशास्त्रानुसार दाराच्या चौकटीचे महत्त्व काय आहे?</b></p>
<p><span style="font-weight: 400;"><a href="https://www.navarashtra.com/religion"><span style="color: #3366ff;">ज्योतिषशास्त्रानुसार</span></a>, घराचा मुख्य दरवाजा आणि दाराची चौकट हे राहू, केतू आणि इतर ग्रहांच्या नकारात्मक प्रभावांना रोखणारे क्षेत्र मानले जाते. अनेक ज्योतिषी म्हणतात की घराचे प्रवेशद्वार हे एक प्रमुख ऊर्जा केंद्र आहे. उंबरठ्यावर बराच वेळ बसल्याने किंवा तो अस्ताव्यस्त ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा येऊ शकतो. जरी हा विश्वास श्रद्धेवर आधारित असला तरी, अनेक लोक आजही तो गांभीर्याने मानतात.</span></p>
<p><b>संध्याकाळची वेळ विशेष महत्त्वाची का मानली जाते?</b></p>
<p><span style="font-weight: 400;">धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतरची वेळ अत्यंत संवेदनशील मानली जाते. असे म्हटले जाते की या काळात देवी लक्ष्मी घरांना भेट देते. दाराच्या पायरीवर बसणे हा तिच्या मार्गातील अडथळा मानला जातो. याच कारणामुळे, अनेक कुटुंबे संध्याकाळी दाराच्या पायरीवर बसणे, झाडू ठेवणे किंवा घाण साचू न देण्याचा सल्ला देतात. यामुळे घरात आनंद, शांती आणि संपत्तीचा प्रवाह टिकून राहतो, असा विश्वास आहे.</span></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/religion/kitchen-vastu-tips-unfit-to-have-gas-and-sink-neighbors-1250216.html"><span style="color: #3366ff;"><strong>Kitchen Vastu Tips : गॅस आणि सिंक शेजारी असणे योग्य की अयोग्य? वास्तुशास्त्रातील मान्यता काय सांगतात</strong></span></a></p>
<p><b>वास्तुशास्त्र काय सांगते?</b></p>
<p><span style="font-weight: 400;"><a href="https://www.navarashtra.com/religion/what-vastu-shastra-says-about-habits-that-we-does-in-kitchen-1250202.html"><span style="color: #3366ff;">वास्तुशास्त्रानुसार</span></a>, मुख्य दरवाजा हे घराचे प्रवेशद्वार आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा चेहरा महत्त्वाचा असतो, त्याचप्रमाणे घराची दाराची चौकट देखील त्यांच्या ओळखीचा एक भाग मानली जाते. वास्तुशास्त्रज्ञ दाराची चौकट स्वच्छ ठेवण्याचा, त्यावर अनावश्यक वस्तू ठेवणे टाळण्याचा आणि त्या जागेचा आदर करण्याचा सल्ला देतात. असे केल्याने घरात सकारात्मक वातावरण टिकून राहते आणि आनंदी वातावरण निर्माण होते.</span></p>
<p><span style="font-weight: 400;">दाराच्या पायरीवर न बसण्याची परंपरा ही केवळ एक जुनी श्रद्धा नसून, धर्म, ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये रुजलेली एक श्रद्धा आहे. भगवान नरसिंहाची आख्यायिका, देवी लक्ष्मीच्या आगमनावरील श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेचे तत्त्व या परंपरेला अधिकच महत्त्वपूर्ण बनवतात. श्रद्धेचा विषय म्हणून पाहिले तरी किंवा सांस्कृतिक वारसा म्हणून, भारतीय परंपरेत दाराच्या चौकटीला आजही एक विशेष आदराचे स्थान आहे.</span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Maharashtra Politics:  राजकीय भूकंप!  शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंचे सूचक विधान</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/big-political-reshuffle-sharad-pawars-ncp-to-merge-with-congress-soon-1251175.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 09:48:28 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 09:48:28 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-8-10_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[Congress]]></category>
		<category><![CDATA[Nationalist Congress Party]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251175</guid>

					<description><![CDATA[Maharashtra Breaking News-  याच पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि या मोठ्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले होते.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-8-10_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Big Political Reshuffle Sharad Pawars Ncp To Merge With Congress Soon"     /></figure><ul>
<li>शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मूळ काँग्रेस पक्षात संभाव्य विलीनीकरण</li>
<li>काँग्रेस हायकमांडने हर्षवर्धन सपकाळ आणि नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलावणे</li>
<li>सेक्युलर मतांचे विभाजन थांबवण्यासाठी आणि देश-संविधान वाचवण्यासाठी सेक्युलर विचारांच्या पक्षांनी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Maharashtra Politics:</strong> पश्चिम बंगालमधील दारूण पराभवानंतर तृणमूल काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीनीकरण करणार असल्याची बातमी समोर आली होती. ही बातमी ताजी असतानाच आता महाराष्ट्रातील असाच एक मोठा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची माहिती आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना शह देत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला आगामी काळात रोखण्यासाठी विरोधी गोटात अत्यंत मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत.</span><p>शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थेट मूळ काँग्रेस पक्षात विलीन करण्याच्या चर्चेने सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड जोर धरला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या विलीनीकरणाबाबत अतिशय गांभीर्याने विचारमंथन सुरू असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.</p>
<p>याच पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि या मोठ्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले होते. हर्षवर्धन सपकाळ यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर आता माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही काँग्रेस हायकमांडने दिल्ली वारीचे फर्मान सोडल्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.</p>
<p>काँग्रेस हायकमांडकडून महाराष्ट्रातील एकापाठोपाठ एक बड्या नेत्यांना दिल्लीत बोलावून चर्चा केली जात असल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) काँग्रेसमधील विलीनीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे का? अशा चर्चांना उधाण आले आहे. जर हा निर्णय प्रत्यक्षात आला, तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय समीकरणे आणि आघाड्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलून जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.</p>
<p>यासंदर्भात बोलताना काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ऑलरेडी पवार साहेबांनी दिला होती. पण काही कारणास्तव निर्णय घेण्यास उशीर झाला. आता देशातील राजकारणात जे काही चाललं आहे.देशाची सैंविधानिक व्यवस्था संपत चालली आहे. अशातच सेल्युलर मतांचे विभाजन थांबवण्यासाठी, देश आणि संविधान वाचवण्यासाठी जे काही सेक्युलर विचारांचे पक्ष आहेत, त्यांनी एकत्रित आले पाहिजे, यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे.</p>
<p>भाजपला रोखण्यासाठी देशपातळीवर आघाडी उभी करण्यासाठी पवार साहेब, तृणमूल काँग्रेस हे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या मानसिकतेती आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी या सगळ्यांकडून त्यासंदर्भात विचारमंथन सुरू आहे. सेक्युलर मतांना एकत्रित करून आता मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढणे हा एकमेव अजेंडा आहे. मोदी सरकारकडून देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याच आणि त्याची पाळंमुळ खोदण्याचं काम सुरू आहे,अशी टीकाही नाना पटोले यांनी यावेळी केली.</p>
<h3>NCP Merger in Congress: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सावध प्रतिक्रिया</h3>
<p>शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसपासून वेगळे झालेले समविचारी पक्ष पुन्हा काँग्रेससोबत एकत्र यावेत, असे मत व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.यासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले की, &#8220;भाजपविरोधी राजकारण अधिक प्रभावी करण्यासाठी काँग्रेसची ताकद वाढवणे आवश्यक आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन केलेल्या नेत्यांनी पुन्हा एकत्र येण्याचा विचार करावा आणि त्यासाठी पुढाकार शरद पवार यांनी घ्यावा, असेही त्यांनी म्हटले होते.</p>
<h3>राष्ट्रवादीच्या नेत्यांची सावध प्रतिक्रिया</h3>
<p>राऊत यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील प्रमुख नेत्यांकडे या चर्चेबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. मात्र, पक्षातील नेत्यांनी कोणतीही ठाम भूमिका न मांडता अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांचाच असेल, असे स्पष्ट केले.</p>
<p>आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, &#8220;काँग्रेसमध्ये विलिनीकरणासंदर्भातील कोणताही निर्णय शरद पवार घेतील. त्यामुळे यावर मी भाष्य करणार नाही.&#8221; तर &#8220;आम्ही लढणारे कार्यकर्ते आहोत. पक्षाच्या भविष्यासंदर्भातील निर्णय शरद पवार घेतील,&#8221; असे सांगत आमदार रोहित पवार यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले.</p>
<h3>सुप्रिया सुळे यांचा स्पष्ट खुलासा</h3>
<p>खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र या चर्चांबाबत सावध भूमिका घेतली. त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसमध्ये विलिनीकरणाबाबत सध्या कोणताही अधिकृत प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव काँग्रेसकडून नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चा या केवळ राजकीय पातळीवरील अंदाज आणि शक्यतांपुरत्याच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे.</p>
<h3>निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष</h3>
<p>राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या भविष्यासंदर्भात विविध चर्चा सुरू असल्या तरी पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी अंतिम निर्णयाचा अधिकार शरद पवार यांच्याकडेच असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यामुळे आगामी काळात या विषयावर शरद पवार काय भूमिका घेतात, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.</p>
<p data-path-to-node="3">
<p data-path-to-node="3">
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>डिझाईन पाहताच प्रेमात पडाल&#8230; 8,000mAh बॅटरीसह नवा TECNO स्मार्टफोन भारतात लाँच! किंमत वाचून व्हाल थक्क</title>
		<link>https://www.navarashtra.com/technology/tecno-pova-8-launched-in-india-smartphone-design-is-very-attractive-read-price-1251216.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा जाधव]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 09:42:58 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 09:42:58 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Pova-8-_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विज्ञान तंत्रज्ञान]]></category>
		<category><![CDATA[smartphone]]></category>
		<category><![CDATA[tech launch]]></category>
		<category><![CDATA[tech updates]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251216</guid>

					<description><![CDATA[TECNO Pova 8 Launched: टेक्नोने भारतात 8,000mAh ची दमदार बॅटरी आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 प्रोसेसरसह एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Pova-8-_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Tecno Pova 8 Launched In India Smartphone Design Is Very Attractive Read Price"     /></figure><ul>
<li>Tecno Pova 8 मध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.</li>
<li>स्मार्टफोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट असलेला 6.76-इंच फुल-एचडी+ डिस्प्ले आणि मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 प्रोसेसर मिळतो.</li>
<li>Pova 8 च्या 6GB+128GB व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये असून तो व्हाइट, प्लाज्मा ऑरेंज आणि टर्मिनल ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे.</li>
</ul><span class="bullet-text">TECNO <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/smartphone"><strong>Smartphone</strong> </a><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/tech-launch"><strong>Launched</strong></a></span>: टेक कंपनी टेक्नोने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या नव्या स्मार्टफोनचे नाव Pova 8 असे आहे. कंपनीने सादर केलेला नवा स्मार्टफोन गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Pova 7 चा सक्सेसर आहे. नव्या Pova 8 स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स मिळणार आहेत.</span><p>कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन तीन रंग आणि दोन रॅम व स्टोरेज पर्याय लाँच केला आहे. विशेष म्हणजेच, स्मार्टफोनच्या मागील बाजूला कस्टमाइजेबल &#8216;अलाइव मॅट्रिक्स डिस्प्ले&#8217; देखील मिळणार आहे, जो वेगवेगळ्या अ&#x200d;ॅप्सचे नोटिफिकेशन दर्शवतो. याशिवाय, कंपनीने लाँच केलेल्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 चिपसेट देखील मिळणार आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="मार्क झुकरबर्गचा मोठा डाव! Meta सुरु करणार भारतातील पहिले AI डेटा सेंटर, ‘या’ ठिकाणाची केली निवड" href="https://www.navarashtra.com/technology/meta-teams-up-with-reliance-to-launch-its-first-ai-data-center-in-india-1249776.html"><strong> मार्क झुकरबर्गचा मोठा डाव! Meta सुरु करणार भारतातील पहिले AI डेटा सेंटर, ‘या’ ठिकाणाची केली निवड</strong> </a></span></p>
<h3>Pova 8 स्मार्टफोनची किंमत आणि उपलब्धता</h3>
<p>कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन 6GB+128GB आणि 8GB+128GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या 6GB+128GB व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आणि 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहक हा स्मार्टफोन व्हाइट, प्लाज्मा ऑरेंज आणि टर्मिनल ग्रीन या तीन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकणार आहेत. स्मार्टफोनची विक्री लवकरच फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. <strong> (फोटो सौजन्य – TECNO) </strong></p>
<h3>Pova 8 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स</h3>
<h3>डिस्प्ले</h3>
<p>लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट वाला 6.76-इंच फुल-एचडी+ आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टफोन हाय ब्राइटनेस मोडमध्ये 950 निट्सपर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करतो.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">POVA 8. Say hello to Peak Design.</p>
<p>You can have it all:<br />
<img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/27a1_V_png--1280x720-4g.webp" alt="➡" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> 8000mAh* Super Power<br />
<img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/27a1_V_png--1280x720-4g.webp" alt="➡" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> 45W Fast Charge<br />
<img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/27a1_V_png--1280x720-4g.webp" alt="➡" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> 50MP Sony LYTIA 600 Camera<br />
<img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/27a1_V_png--1280x720-4g.webp" alt="➡" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> 2X Optical Zoom With 2K Recording<br />
<img src="https://s.w.org/images/core/emoji/17.0.2/72x72/27a1_V_png--1280x720-4g.webp" alt="➡" class="wp-smiley" style="height: 1em; max-height: 1em;" /> Triple Chipset With 20 5G Bands</p>
<p>Sale starts 18 June, 12 Noon. On Flipkart and at retail stores near you.… <a href="https://t.co/3x60OMs19F">pic.twitter.com/3x60OMs19F</a></p>
<p>— POVA Mobile India (@pova_mobile) <a href="https://x.com/pova_mobile/status/2064974162108838171">June 11, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<h3>प्रोसेसर</h3>
<p>फोनमध्ये ऑक्टा-कोर 6nm मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 प्रोसेसर देखील मिळणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये माली-जी610 एमसी2 जीपीयू मिळणार आहे. डिव्हाईस 6GB आणि 8GB एलपीडीडीआर5एक्स या रॅम पर्यायांनी सुसज्ज आहेत. तर स्मार्टफोन 128GB व 256GB यूएफएस 2.2 स्टोरेज ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये खास G1 आणि SE1 सिग्नल चिप देखील मिळणार आहे.</p>
<h3>कॅमेरा</h3>
<p>फोटोग्राफीसाठी Pova 8 मध्ये 50-मेगापिक्सेलचा सोनी एलवायटी-600 प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. तसेच या फोनमध्ये एक लाइट सेंसर देखील दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये समोरील बाजूला 13-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. डिव्हाईसमध्ये एआय कॅमेरा, पोर्ट्रेट मोड, सुपर नाइट मोड, टाइम-लॅप्स, डुअल व्हिडीओ, व्लॉग मोड आणि स्लो मोशन सारखे अनेक दमदार फीचर्स देखील देण्यात आले आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="8000mAh बॅटरीसह Realme च्या नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री! किंमत फक्त 18,999 रुपये, ‘या’ दिवशी सुरु होणार सेल" href="https://www.navarashtra.com/technology/realme-p4r-launched-in-india-with-8000mah-battery-first-sell-will-start-on-this-day-1249736.html"><strong> 8000mAh बॅटरीसह Realme च्या नव्या स्मार्टफोनची भारतात एंट्री! किंमत फक्त 18,999 रुपये, ‘या’ दिवशी सुरु होणार सेल</strong> </a></span></p>
<h3>बॅटरी</h3>
<p>या स्मार्टफोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिली आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>एसटी वाचविण्यासाठी जनआंदोलनाची गरज; नेतृत्त्व प्रताप सरनाईक यांनीच करावे : श्रीरंग बरगे</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/a-mass-movement-is-needed-to-save-the-st-pratap-sarnaik-should-lead-it-says-shrirang-barge-1251211.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 09:36:19 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 09:36:19 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Barage_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra ST Buses]]></category>
		<category><![CDATA[pratap sarnaik]]></category>
		<category><![CDATA[Shrirang Barge]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251211</guid>

					<description><![CDATA[राज्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या एसटी महामंडळाचा संचित तोटा १२ हजार कोटी रुपयांहून अधिक झाला आहे, तर वैधानिक देणी आणि थकीत रकमेचा आकडा ७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Barage_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="A Mass Movement Is Needed To Save The St Pratap Sarnaik Should Lead It Says Shrirang Barge"     /></figure><p><strong>मुंबई :</strong> दररोज सुमारे ५५ लाख प्रवाशांची, जीवनवाहिनी असलेल्या आणि ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेशी निगडित एसटी महामंडळ अभूतपूर्व आर्थिक संकटातून जात असल्याने ती वाचविण्यासाठी राज्यव्यापी जनआंदोलन उभारण्याची वेळ आली आहे. या लढ्याचे नेतृत्व परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/pratap-sarnaik"> प्रताप सरनाईक</a> </span>यांनी स्वतः करावे, असे आवाहन महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केले.</p>
<p>बरगे म्हणाले की, राज्याच्या सर्वांगीण विकासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या एसटी महामंडळाचा संचित तोटा १२ हजार कोटी रुपयांहून अधिक झाला आहे, तर वैधानिक देणी आणि थकीत रकमेचा आकडा ७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गर्दीचा हंगाम आणि भाडेवाढ असूनही यंदाच्या मे महिन्यात एसटीला ५० कोटी ६३ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला, विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच कालावधीत महामंडळाने १८ कोटी २२ लाख रुपयांचा नफा नोंदविला होता.</p>
<p><strong><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/statewide-drive-against-illegal-passenger-transport-near-st-bus-stands-pratap-sarnaik-news-marathi-1246221.html"><span class="color-red">St Mahamandal </span>: आता काय खैर नाही! एसटी स्थानकांभोवती अवैध प्रवासी वाहतुकीवर राज्यव्यापी धडक; २०० मीटर परिसरात विशेष मोहीम</a></strong></p>
<p>या आर्थिक अडचणीच्या काळात राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याची जबाबदारी महामंडळाची असल्याचे स्पष्ट केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली असून, ८६ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य आणि ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था धोक्यात आल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.</p>
<p>एसटीच्या इतिहासाचा दाखला देताना बरगे यांनी सांगितले की, पूर्वी संकटाच्या काळात तत्कालीन अध्यक्ष पी. के. अण्णा पाटील, गिरीश बापट यांनी एसटीची पाठराखण केली होती. तसेच, मॅक्सी कॅबच्या स्पर्धेमुळे एसटीसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना तत्कालीन अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी स्वतः आंदोलनात सहभागी होत नेतृत्व केले होते.</p>
<p>आज पुन्हा तशीच निर्णायक परिस्थिती निर्माण झाली असून, एसटी वाचविण्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातून लोकचळवळ उभी राहणे आवश्यक असल्याचे बरगे यांनी म्हटले.</p>
<p><strong>एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ</strong></p>
<p>दुसरीकडे, एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून, <a href="https://www.navarashtra.com/topic/msrtc">महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन</a> महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची ऐतिहासिक घोषणा केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>End Child Labour : लहान हातांना हवी पुस्तकांची साथ; जाणून घ्या जागतिक बालकामगार विरोधी दिनाचा इतिहास आणि आपले कर्तव्य</title>
		<link>https://www.navarashtra.com/special-coverage/world-day-against-child-labour-june-12-history-significance-ilo-2026-1251191.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा पाटोळे]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 09:31:45 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 09:32:02 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/World-Day-Against-Child-Labour-2026_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[नवराष्ट्र विशेष]]></category>
		<category><![CDATA[day history]]></category>
		<category><![CDATA[navarashtra special]]></category>
		<category><![CDATA[navarashtra special story]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251191</guid>

					<description><![CDATA[World Day Against Child Labour : जागतिक बालकामगार विरोधी दिन दरवर्षी १२ जून रोजी साजरा केला जातो. बालकामगार प्रथेविरुद्ध जनजागृती करणे आणि ती समूळ नष्ट करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.                                                       ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/World-Day-Against-Child-Labour-2026_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="World Day Against Child Labour June 12 History Significance Ilo 2026"     /></figure><ul data-path-to-node="3">
<li><span data-path-to-node="3,0,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,0,0" data-index-in-node="0">बालपणीचा संघर्ष संपवण्याचा निर्धार</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,1,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,1,0" data-index-in-node="0">अंधाराकडून प्रकाशाकडे</b></span></li>
<li><span data-path-to-node="3,2,0" class="bullet-text"><b class="" data-path-to-node="3,2,0" data-index-in-node="0">नागरिकांची जबाबदारी</b></span></li>
</ul>
<p data-path-to-node="7"><strong>World Day Against Child Labour 2026 :</strong> लहान मुलांचे हसणे, खेळणे आणि शाळेत जाणे हे कोण देशाच्या सुदृढ आरोग्याचे लक्षण असते. मात्र, आजही आपल्या अवतीभवती अशी अनेक लहान मुले दिसतात, ज्यांच्या हातात पाटी-पेन्सिल ऐवजी चहाची किटली, विटा किंवा हॉटेलमधील खरकटी भांडी असतात. ही केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून संपूर्ण समाजासाठी चिंतेची बाब आहे. याच क्रूर बालकामगार प्रथेविरुद्ध जगभरात जनजागृती करण्यासाठी आणि ती मुळापासून उखडून टाकण्यासाठी दरवर्षी १२ जून रोजी &#8216;जागतिक बालकामगार विरोधी दिन&#8217; (<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/navarashtra-special-story">World Day Against Child Labour</a></span>) पाळला जातो. हे लहान हात देशाचे भविष्य घडवणार आहेत, त्यामुळे त्यांना अंधाऱ्या कोठडीतून बाहेर काढून प्रकाशाच्या वाटेवर आणणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.</p>
<h3 data-path-to-node="8"><b data-path-to-node="8" data-index-in-node="0">बालपण हिरावून घेणारी मुख्य कारणे कोणती?</b></h3>
<p data-path-to-node="9">कोणत्याही मुलाला स्वेच्छेने आपले खेळायचे दिवस सोडून काम करण्याची इच्छा नसते. या मागे अनेक सामाजिक आणि आर्थिक घटक कारणीभूत आहेत. आपल्या देशात आणि जगभरात &#8216;गरिबी&#8217; हे बालकामगार प्रथेचे सर्वात मोठे कारण मानले जाते. ज्या घरात दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असते, तिथे लहान मुलांनाही कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी हातभार लावावा लागतो. याशिवाय पालकांमधील निरक्षरता आणि अज्ञान यामुळे शिक्षणाचे महत्त्व समजत नाही, पर्यायाने मुले शाळेपासून दुरावतात. सामाजिक विषमता आणि आर्थिक असुरक्षितता यामुळे अनेक अनाथ किंवा गरजू मुलांना सक्तीने मजुरीच्या खाईत लोटले जाते, ज्यामुळे त्यांचे मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक नुकसान होते.</p>
<p data-path-to-node="9"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/special-coverage/mount-everest-old-name-peak-xv-history-sir-george-everest-tibet-nepal-1249510.html">Mount Everest: एव्हरेस्ट नाही तर ‘हे’ होते जगातील सर्वोच्च शिखराचे जुने नाव; एका ब्रिटीश अधिकाऱ्याने कसा बदलला जगाचा इतिहास?</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="10"><b data-path-to-node="10" data-index-in-node="0">आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि या दिवसाचा रंजक इतिहास</b></h3>
<p data-path-to-node="11">बालकामगारांची ही जागतिक समस्या किती गंभीर आहे, हे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने (ILO) २००२ मध्ये पहिल्यांदा &#8216;जागतिक बालकामगार विरोधी दिन&#8217; साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी १२ जून हा दिवस एक नवी उमेद आणि संकल्प घेऊन येतो. या दिवशी जगभरातील सरकारे, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना (NGOs) आणि संयुक्त राष्ट्र एकत्र येतात. मुलांच्या हक्कांचे संरक्षण कसे करता येईल, त्यांना मोफत आणि दर्जेदार शिक्षण कसे मिळेल, यासाठी विविध कायदे आणि धोरणांवर या दिवशी विशेष भर दिला जातो. गेल्या दोन दशकांत या मोहिमेमुळे लाखो मुलांना बालमजुरीतून मुक्त करण्यात यश आले असले, तरी अजूनही मोठा पल्ला गाठायचा बाकी आहे.</p>
<h3 data-path-to-node="12"><b data-path-to-node="12" data-index-in-node="0">शिक्षण आणि सुरक्षित संगोपन: प्रत्येक लहान मुलाचा जन्मसिद्ध हक्क</b></h3>
<p data-path-to-node="13">आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की, सुशिक्षित आणि आनंदी बालपण हाच एका सक्षम राष्ट्राचा आणि उज्ज्वल भविष्याचा पाया असतो. जोपर्यंत देशातील प्रत्येक मुलाला शाळेची पायरी चढता येत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने प्रगती करू शकत नाही. शिक्षण हे केवळ अक्षरांची ओळख करून देत नाही, तर ते मुलांना त्यांचे आयुष्य सन्मानाने जगण्याची ताकद देते. शासनाने बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) लागू केला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी तळागाळातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवणे ही प्रशासनासोबतच आपलीही सामूहिक जबाबदारी आहे.</p>
<p data-path-to-node="13"><strong>जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/special-coverage/ancient-hindu-temples-history-vedic-period-worship-evolution-architecture-science-1247340.html">Ancient Temples : घंटा वाजवण्यापासून ते प्रदक्षिणेपर्यंत; प्राचीन मंदिरांमधील प्रत्येक विधीमागे आहे ‘हे’ वैज्ञानिक कारण</a></span></strong></p>
<h3 data-path-to-node="14"><b data-path-to-node="14" data-index-in-node="0">एक सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य काय?</b></h3>
<p data-path-to-node="15">बालकामगार विरोधी दिन हा केवळ एक दिवसाचा उत्सव किंवा सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याचा विषय नाही. आपल्या दैनंदिन जीवनात जेव्हा कधी आपल्याला एखाद्या हॉटेलमध्ये, गॅरेजमध्ये किंवा कारखान्यात लहान मूल काम करताना दिसेल, तेव्हा तिथे मज्जाव करणे हे आपले कर्तव्य आहे. बालमजुरीला प्रोत्साहन देणाऱ्या घटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आपण प्रशासनाला मदत केली पाहिजे. बालकामगारांविरुद्ध आवाज उठवणे आणि प्रत्येक मुलासाठी सुरक्षित, आनंदी वातावरण निर्माण करणे ही केवळ कायद्याची सक्ती न राहता आपली सामाजिक बांधिलकी बनली पाहिजे, तरच हा दिवस साजरा करणे खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>US Iran Peace Deal : ट्रम्प यांचा पुन्हा शांततेचा दावा; अमेरिका-इराण युद्ध थांबणार? होर्मुझबाबतही मोठे संकेत</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/us-iran-peace-deal-trump-claims-war-may-end-soon-hints-on-hormuz-reopening-1251187.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 09:29:28 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 09:49:06 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Donald-Trump-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Donald Trump]]></category>
		<category><![CDATA[Strait of Hormuz]]></category>
		<category><![CDATA[US-Iran Ceasefire]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251187</guid>

					<description><![CDATA[US-Iran Peace Deal Update : ट्रम्प यांनी पुन्हा एकदा होर्मुझबाबत मोठे संकेत दिले आहे. तसेच येत्या आठवड्याच्या अखरेसी इराणसोबत शांतता कराराची शक्यता वर्तवली आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या कराराकडे लागले आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Donald-Trump-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Us Iran Peace Deal Trump Claims War May End Soon Hints On Hormuz Reopening"     /></figure><ul>
<li>अमेरिका-इराण युद्ध थांबणार?</li>
<li>ट्रम्प-यांच्याकडून होर्मुझबाबतही मोठे विधान</li>
<li>या आठवड्याच्या शेवटी होणार करार</li>
</ul><span class="bullet-text">US-Iran Peace Deal News in Marathi : वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेत गेल्या १०० दिवसांहून अधिक काळ तणावाचे वातावरण आहे. अमेरिका-इराणमधील संघर्ष (<strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/us-iran-ceasefire">US-Iran Conflict</a></span></strong>) काही थांबण्याचे नाव घेईना. गेल्या दोन दिवसांपूर्वी पुन्हा दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ले-प्रतिहल्ले करण्यात आले होते. यामुळे प्रचंड अस्थिरता निर्माण झाली होती. पण पुन्हा एकदा ट्रम्प यांनी संघर्ष संपुष्टात येणार असल्याचा दावा केला आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीही पुन्हा सुरु होईल असे संकेत त्यांनी दिले आहेत.</span><p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/donald-trumps-statement-has-shaken-the-world-he-said-the-biggest-attack-on-iran-will-take-place-tonight-1251117.html">Donald Trump on Iran: डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जग हादरले! म्हणाले– ‘आज रात्री इराणवर होणार सर्वात मोठा हल्ला’</a></span></strong></p>
<p>ट्रम्प यांच्या मते, येत्या आठवड्याच्या शेवटी युरोपमध्ये दोन्ही देशांमध्ये शांतता कराराला अंतिम रुप देण्यात येईल. दोन्ही देशांमध्ये पडद्यामागे कराराच्या मसुद्यावर सकारात्मक चर्चा सुरु आहे. या चर्चेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेंस देखील सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माध्यमांशी संवादा साधताना डोनाल्ड ट्रम्प (<strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/donald-trump">Donald Trump</a></span></strong>) यांनी म्हटले की, हा करार केवळ अमेरिका-इराणसाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी दिलासादायक ठरेल.</p>
<h3>होर्मुझबाबतही मोठे विधान</h3>
<p>या करारातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा मध्ये होर्मुझ (<strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/strait-of-hormuz">Hormuz</a></span></strong>) सामुद्रधुनी पुन्हा खुली होण्याची शक्यता आहे. इराणने अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यामुळे जगातिक व्यापार वाहतूकीसाठी महत्त्वाचा मानला जाणार सागरी मार्ग होर्मुझ बंद केला हता. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल पुरवठा विस्कळीत होऊन मोठे इंधन संकट निर्माण झाले होते. ट्रम्प यांच्या मते, दोन्ही देशांत करार झाल्यास इंधन दर पुन्हा सामान्य होतील. होर्मुझ मार्ग खुला होईल आणि जहाजांची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरु होईल असा दावा त्यांनी केला आहे.</p>
<h3>इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर आक्रमक भूमिका</h3>
<p>दरम्यान ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केले की, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (<strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/benjamin-netanyahu">Benjamin Netanhyahu</a></span></strong>) यांच्याशी चर्चा केली आहे. इस्रायलच्या सुरक्षेचे आश्वासन त्यांनी दिले आहे. तसेच इराणच्या अणुकार्यक्रमांवर निर्बंध, क्षेपणास्त्र उत्पादनावर नियंत्रण आणि प्रादेशिक गचटांना मिळणाऱ्या मदतीवर बंदी घालण्याच्या अटी करारत असतील. इराणला कोणत्याही प्रकारचे धोकादायक शस्त्र बाळगू दिले जाणार हे त्यांनी स्पष्ट केले.</p>
<h3><span style="color: #000000;">इराणच्या नौदल-लष्कर ताकदीबाबतही मोठा दावा</span></h3>
<p>याशिवाय ट्रम्प यांनी इराणची नौदल आणि लष्करी ताकद पूर्णपणे निकामी झाल्याचा दावा केला. त्यांनी म्हटले की, इराण (<strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/iran">Iran</a></span></strong>) आता कोणतेही प्रत्युत्तर देण्यास सक्षम नाही. यामुळे इराणविरोधी कारवाया स्थगित केल्याचेही त्यांनी म्हटले. सध्या ट्रम्प यांच्या या विधानांनतर संपूर्ण जगाचे लक्ष शांतता करारकडे लागले आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/trump-claims-pakistan-requested-time-for-iran-amid-middle-east-crisis-1250461.html">Middle East Crisis : पाकिस्तानच्या विनंतीवर नरमले ट्रम्प? इराणला वेळ दिल्याचा दावा, होर्मुझमधून कोटींचे तेल सुरक्षित बाहेर</a></span></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Dinyar Tirandaz Passes Away: &#8216;जबान संभाल के&#8217; फेम अभिनेते दिनयार तिरंदाज काळाच्या पडद्याआड, 69 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/actor-dinyar-tirandaz-has-passed-away-at-the-age-of-69-1251204.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 09:15:29 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 09:15:29 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/death-1-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[बॉलीवूड]]></category>
		<category><![CDATA[Actor]]></category>
		<category><![CDATA[bollywood movies]]></category>
		<category><![CDATA[Death]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251204</guid>

					<description><![CDATA[‘जबान संभाल के’ फेम अभिनेते दिनयार तिरंदाज यांचे 69 व्या वर्षी निधन झाले आहे. टीव्ही आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/death-1-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Actor Dinyar Tirandaz Has Passed Away At The Age Of 69"     /></figure><p>ज्येष्ठ अभिनेते दिनयार तिरंदाज यांचे निधन झाले आहे. गुरुवारी सोशल मीडियावर ही बातमी पसरताच त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले. या दिग्गज अभिनेत्याच्या निधनाची बातमी एका पारसी झोरोस्ट्रियन फेसबुक पेजवरून शेअर करण्यात आली.</p>
<p>गुरुवारी, पारसी झोरोस्ट्रियन वर्ल्डवाइड फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आले की, &#8220;कै. रुस्तम तिराद यांचे बंधू श्री. दिनयार तिरंदाज यांचे निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ३:४५ वाजता मुंबईतील वाडिया बंगलो येथे होईल.&#8221; या पोस्टवर चाहत्यांनीही अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.</p>
<p><strong>या लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांमध्ये केले होते काम</strong></p>
<p>दिनयार तिरंदाज अनेक दशकांपासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय होते. त्यांनी १९८४ साली प्रदर्शित झालेल्या &#8216;दुनिया&#8217; या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी &#8216;नुक्कड&#8217; आणि &#8216;ब्योमकेश बक्षी&#8217; यांसारख्या गाजलेल्या दूरदर्शन मालिकांमध्येही काम केले होते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="‘३७० ची बिर्याणी’ विवाद नडला! प्रणित मोरे आणि हिमांशूला राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स; डीजीपींना कडक कारवाईचे आदेश" href="https://www.navarashtra.com/entertainment/article-370-biryani-controversy-backfires-national-commission-for-women-summons-pranit-more-and-himanshu-1251036.html"> ‘३७० ची बिर्याणी’ विवाद नडला! प्रणित मोरे आणि हिमांशूला राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स; डीजीपींना कडक कारवाईचे आदेश </a></strong></span></p>
<p><strong>&#8216;जुबान संभल के&#8217; या विनोदी मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले.</strong></p>
<p>दिनयार तिरंदाज यांची एक चरित्र अभिनेता म्हणून मोठी ख्याती होती. १९९० च्या दशकात, त्यांनी &#8216;जुबान संभाल के&#8217; या सुपरहिट टीव्ही सिटकॉममध्ये &#8216;मिस्टर केकी दारूवाला&#8217; यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे दिन्यार यांनी अनेक प्रेक्षकांची मने जिंकली.</p>
<p>दूरदर्शन व्यतिरिक्त, या ज्येष्ठ अभिनेत्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले होते. दिनयार तिरंदाज यांनी &#8216;हॅलो ब्रदर&#8217;, &#8216;अलबेला&#8217;, &#8216;चलते चलते&#8217;, &#8216;मैने प्यार क्यूँ किया&#8217;, &#8216;क्या कहना&#8217;, &#8216;दिल है के मानता नहीं&#8217; आणि &#8216;कमाल धमाल मालामाल&#8217; यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील कलावंतांचा राष्ट्रीय गौरव" href="https://www.navarashtra.com/entertainment/sangeet-natak-akademi-awards-announced-1250973.html"> संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील कलावंतांचा राष्ट्रीय गौरव </a></strong></span></p>
<p>बॉलिवूड सेलिब्रिटींनीही दिनयार तिरंदाज यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि विनोदी कलाकार सुरेश मेनन यांनी पोस्टवर &#8220;ओम शांती&#8221; असे लिहून प्रतिक्रिया दिली. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगने हात जोडलेला इमोजी शेअर केला.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>West Bengal Politics : तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का; &#8216;या&#8217; खासदाराने सोडली ममतांची साथ</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/prakash-chik-baraik-has-resigned-as-a-rajya-sabha-mp-1251190.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 09:09:45 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 08:54:24 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/04/Mamata-Banerjee-news_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[Mamata Banerjee]]></category>
		<category><![CDATA[Prakash Chik Baraik]]></category>
		<category><![CDATA[TMC. Political News]]></category>
		<category><![CDATA[West Bengal Politics]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251190</guid>

					<description><![CDATA[राज्यसभा सदस्य सुष्मिता देव यांनीही संसद आणि पक्षातून राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी दिल्लीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतली, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय योजनांबद्दलच्या अटकळांना उधाण आले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/04/Mamata-Banerjee-news_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Prakash Chik Baraik Has Resigned As A Rajya Sabha Mp"     /></figure><p><strong>नवी दिल्ली :</strong> गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. अनेक नेतेमंडळी माजी मुख्यमंत्री<span style="color: #3366ff;"> <a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/mamata-banerjee">ममता बॅनर्जी</a> </span>यांची साथ सोडून तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडत आहेत. त्यातच आता तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा सदस्य प्रकाश चिक बराइक यांनी गुरुवारी पक्ष तसेच राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपला दिलेल्या जनादेशाच्या पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.</p>
<p>सुखेंदू शेखर रॉय आणि सुष्मिता देव यांच्यानंतर या आठवड्यात पक्ष सोडणारे बराइक हे तिसरे तृणमूल खासदार आहेत. सूत्रांनुसार, बराइक यांनी राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला. नंतर, भाजपचे नेते निशिकांत दुबे यांच्या निवासस्थानाबाहेर पत्रकारांशी बोलताना बराईक म्हणाले, पश्चिम बंगालच्या जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. तृणमूल काँग्रेसला जनतेचा पाठिंबा मिळाला नाही. पश्चिम बंगालच्या जनतेने दिलेल्या कौलाचा आदर करत मी पक्षाचा राजीनामा देत आहे. आपल्या राजीनामा पत्रात, बराइक यांनी लिहिले, मी राज्यसभेचा राजीनामा देत आहे. कृपया माझा राजीनामा तात्काळ प्रभावाने स्वीकारावा.</p>
<p>दरम्यान, तृणमूल काँग्रेसमधून नेत्यांच्या मोठ्या संख्येने होणाऱ्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा राजीनामा आला आहे. सोमवारी, राज्यसभा सदस्य सुखेंदू शेखर रॉय यांनी वरिष्ठ सभागृहाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या नेतृत्वाशी मतभेद असल्याचे सांगून तृणमूल काँग्रेस सोडण्याचा आपला निर्णय जाहीर केला.</p>
<p><strong>खासदारांकडून दिला जात आहे राजीनामा</strong></p>
<p>बुधवारी, राज्यसभा सदस्य सुष्मिता देव यांनीही संसद आणि पक्षातून राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी दिल्लीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांची भेट घेतली, ज्यामुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय योजनांबद्दलच्या अटकळांना उधाण आले आहे.</p>
<p><strong>शत्रुघ्न सिन्हा ममतादीदींसोबत</strong></p>
<p>तृणमूल काँग्रेसमधून (TMC) होणाऱ्या नेत्यांच्या गळतीदरम्यान, खासदार शत्रुघ्न सिन्हा हे देखील बंडखोरी करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली होती. ते पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती, मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी स्वतःच स्पष्ट केले आहे की ते तृणमूल काँग्रेस सोडणार नाहीत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/india/tmc-rajya-sabha-strength-reduced-third-resignation-mamata-banerjee-1250797.html"><strong>West Bengal Politics : राज्यसभेत ममता बॅनर्जींना मोठा धक्का? तिसऱ्या राजीनाम्यानंतर TMC ची संख्या १० वर</strong></a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>अक्षय कुमार बॉलिवूडमधून निवृत्त होणार? रिटायरमेंटवर मांडले मत, म्हणाला, &#8216;रोज पहाटे ४ वाजता..&#8217;</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/akshay-kumar-to-retire-from-bollywood-shares-his-views-on-retirement-says-1251189.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 08:52:03 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 08:52:03 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/akshay-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[बॉलीवूड]]></category>
		<category><![CDATA[Akshay Kumar]]></category>
		<category><![CDATA[bollywood movies]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251189</guid>

					<description><![CDATA[अक्षय कुमारच्या रिटायरमेंटच्या चर्चांवर मोठं वक्तव्य समोर आलं आहे. नेमकं तो काय म्हणाला आहे जाणून घेऊया...]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/akshay-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Akshay Kumar To Retire From Bollywood Shares His Views On Retirement Says"     /></figure><p>बॉलिवूडच्या सर्वात प्रतिष्ठित फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागाचा, &#8216;वेलकम टू द जंगल&#8217;चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अक्षय कुमार, सुनील शेट्टी, परेश रावल, रविना टंडन आणि लारा दत्ता यांच्यासह ३० प्रमुख बॉलिवूड कलाकार आहेत. गुरुवारी मुंबईत चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, जिथे कलाकारांनी माध्यमांशी संवाद साधला.</p>
<p>कार्यक्रमादरम्यान, अक्षय कुमारने &#8216;वेलकम टू द जंगल&#8217; या चित्रपटाची कथा लिहिणारे दिवंगत लेखक-अभिनेते नीरज वोहरा यांची आठवण काढली. त्याला त्याच्या मानधनाबद्दलही विचारण्यात आले. अक्षयने या चित्रपटातील कामासाठी १.७ कोटी रुपये घेतल्याचे वृत्त आहे.</p>
<p>यावर अक्षय म्हणाला, &#8220;ज्या कोणी तुम्हाला सांगितले की मी या चित्रपटात काम करण्यासाठी १.७ कोटी रुपये घेतले, त्यांना मी सांगू इच्छितो की मी तेवढेही घेतले नाही. हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता कारण त्याची कथा नीरज वोहरा यांनी लिहिली होती. मी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, मी माझी बरीचशी विनोदबुद्धी प्रियदर्शन साहेब, राजकुमार संतोषी आणि नीरज वोहरा यांच्याकडून शिकलो. नीरजने मला खूप काही शिकवले. मी फिरोज नाडियाडवाला यांनाही ३६ वर्षांपासून ओळखतो. माझ्या संघर्षाच्या दिवसांमध्ये मी त्यांच्याकडे जायचो.&#8221;</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Krushnai chya Leki : आता होणार कहर…! ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री; साकारणार ‘हे’ महत्वाचं पात्र" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/ekta-labde-will-play-the-role-of-sharada-in-the-marathi-serial-krushnai-chya-leki-1250950.html"> <span class="color-red">Krushnai chya Leki </span>: आता होणार कहर…! ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री; साकारणार ‘हे’ महत्वाचं पात्र </a></strong></span></p>
<p>या संभाषणादरम्यान<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Akshay-Kumar"> अक्षय कुमार</a></span>ला त्याच्या निवृत्तीच्या योजनांबद्दलही विचारण्यात आले. अभिनेत्याने कोणताही संकोच न बाळगता मनमोकळेपणाने सांगितले, &#8220;कधीकधी मला निवृत्त व्हावेसे वाटते. पहाटे ४ वाजता जाग आल्यावर हा विचार मनात येतो. पण पाच सेकंदांनंतर मला आठवते की मला शूटिंगवर जायचे आहे, जिथे ३०० लोक माझी वाट पाहत आहेत. मग मी स्वतःला सांगतो की निवृत्तीचा विचार दुसऱ्या दिवशी करेन.&#8221; असे करत ३६ वर्षे झाली आहेत.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील कलावंतांचा राष्ट्रीय गौरव" href="https://www.navarashtra.com/entertainment/sangeet-natak-akademi-awards-announced-1250973.html"> संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील कलावंतांचा राष्ट्रीय गौरव </a></span></strong></p>
<p>&#8220;मी निवृत्त झालो तर काय? मी इलेक्ट्रीशियन, डॉग वॉकर, माळी, हे सगळं होईन. त्यामुळे मला वाटते की निवृत्त होण्यापेक्षा काम करत राहणेच चांगले आहे. मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो. पण मग, दुसऱ्याच दिवशी ते मला विचारतात, &#8216;तुम्ही कामावर कधी परत जाणार?&#8217; मला &#8216;निवृत्ती&#8217; हा शब्द खूप चुकीचा वाटतो. माणसाने तेव्हा निवृत्त व्हावे जेव्हा त्याच्या मरणाला फक्त पाच सेकंद उरले असतील. जर तुम्हाला दीर्घायुष्य हवे असेल, तर काम करत राहा.&#8221;</p>
<p>अक्षयच्या &#8216;वेलकम टू द जंगल&#8217; या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, तो २६ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. याचे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले असून, आतापर्यंत त्यांची बॉक्स ऑफिस कामगिरी फारशी प्रभावी ठरलेली नाही. अक्षयचा हा मल्टी-स्टारर चित्रपट चांगली कामगिरी करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील मोठा पक्ष राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होणार, दिल्लीत घडामोडींना वेग</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/12th-june2026-live-breaking-news-marathi-maharashtra-politics-national-international-war-politics-sports-2-1251192.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[anuradha sagar]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 08:44:32 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 08:49:12 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/02/live-blog-1-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[मुंबई]]></category>
		<category><![CDATA[India news]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra Politics]]></category>
		<category><![CDATA[Mumbai News]]></category>
		<category><![CDATA[pune news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251192</guid>

					<description><![CDATA[Maharashtra Breaking News- याच पार्श्वभूमीवर काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि या मोठ्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तातडीने दिल्लीला बोलावून घेतले होते.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/02/live-blog-1-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="12th June2026 Live Breaking News Marathi Maharashtra Politics National International War Politics Sports 2"     /></figure><h2><strong>Maharashtra to National And International Breaking News:</strong></h2>
<h2 data-path-to-node="2"></h2>
<p data-path-to-node="3"><b data-path-to-node="3" data-index-in-node="0">मुंबई/नवी दिल्ली  </b> देशातील बहुतांश राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांना शह देत सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला आगामी काळात रोखण्यासाठी विरोधी गोटात अत्यंत मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा थेट मूळ काँग्रेस पक्षात विलीन करण्याच्या चर्चेने सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात प्रचंड जोर धरला आहे. शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये या विलीनीकरणाबाबत अतिशय गांभीर्याने विचारमंथन सुरू असल्याची खात्रीशीर माहिती समोर येत आहे.</p>
<p data-path-to-node="3">
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>मीनाक्षी नटराजन यांच्या राज्यसभा उमेदवारीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी</title>
		<link>https://www.navarashtra.com/india/hearing-in-the-supreme-court-today-regarding-meenakshi-natarajans-rajya-sabha-candidature-1251179.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 08:37:19 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 08:37:19 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/04/Supreme-Court-Expresses-Strong-Displeasure-Over-Gherao-of-Judge-in-Malda-During-Protest_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[Meenakshi Natarajan]]></category>
		<category><![CDATA[political news]]></category>
		<category><![CDATA[Supreme Court]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251179</guid>

					<description><![CDATA[सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रकरणांमधील पूर्वनिश्चित कायद्यांचा हवाला देत याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आणि हे प्रकरण शुक्रवारसाठी सूचीबद्ध केले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/04/Supreme-Court-Expresses-Strong-Displeasure-Over-Gherao-of-Judge-in-Malda-During-Protest_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Hearing In The Supreme Court Today Regarding Meenakshi Natarajans Rajya Sabha Candidature"     /></figure><p><strong>भोपाळ :</strong> मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक अधिकारी किंवा निवडणूक आयोगाने आपली उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयावर कोणतीही सुनावणी घेतली नाही. त्यामुळे <a href="https://www.navarashtra.com/topic/congress"><span style="color: #3366ff;">काँग्रेस</span></a>च्या राज्यसभा उमेदवार मीनाक्षी नटराजन गुरुवारी पहाटे सर्वोच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर हजर झाल्या. आपल्या याचिकेत नटराजन यांनी ११ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याचे कारण देत निकाल जाहीर करण्यावर स्थगिती देण्याची विनंती केली.</p>
<p>सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रकरणांमधील पूर्वनिश्चित कायद्यांचा हवाला देत याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आणि हे प्रकरण शुक्रवारसाठी सूचीबद्ध केले. नटराजन यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी असा युक्तिवाद केला की, या प्रकरणावर आजच सुनावणी होणे आवश्यक आहे. कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर निवडणूक अधिकारी निवडणूक बिनविरोध घोषित करण्याची शक्यता आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं…’ अजित पवार विमान अपघातप्रकरणी रोहित पवार संतापले" href="https://www.navarashtra.com/politics/rohit-pawar-tweet-over-ajit-pawar-plane-crash-1250672.html"><strong>‘ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं…’ अजित पवार विमान अपघातप्रकरणी रोहित पवार संतापले</strong></a></span></p>
<p><strong>आतापर्यंतची घडामोड</strong></p>
<p>&#8211; २०२२-२०२५ : त्या महिलेने विविध स्तरांवर तक्रारी आणि याचिका दाखल केल्या. हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.<br />
&#8211; जून २०२६ : राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. काँग्रेसने मीनाक्षी नटराजन यांना मध्य प्रदेशातून उमेदवारी दिली.</p>
<p>&#8211; ८ जून : मीनाक्षी नटराजन यांनी भोपाळमधील राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.</p>
<p>&#8211; ९ जून : भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवला.<br />
&#8211; ९ जून : निवडणूक अधिकाऱ्यांनी मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला.</p>
<p>&#8211; १० जून : काँग्रेसने निवडणूक आयोगासमोर या निर्णयाला आव्हान दिले.<br />
&#8211; ११ जून : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी याचिकेवर सुनावणी घेणार असल्याचे सांगितले.</p>
<p><strong>कोण आहेत मीनाक्षी नटराजन?</strong></p>
<p>मीनाक्षी नटराजन या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत. त्यांनी राष्ट्रीय राजकारण आणि संघटनेत दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांचा जन्म २३ जुलै १९७३ रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील नागदा येथील बिरलाग्राममध्ये एका तमिळ कुटुंबात झाला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/politics/sunil-tatkare-comments-on-chhagan-bhujbal-1250916.html"><strong>सुनील तटकरेंची सुनेत्रा पवारांसमोरच भुजबळांवर आगपाखड; ‘छगन भुजबळ शिवसेनेत असताना…’</strong></a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Dinvishesh : मराठी साहित्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १२ जूनचा इतिहास</title>
		<link>https://www.navarashtra.com/special-coverage/dinvishesh-12-june-pu-la-deshpande-death-anniversary-marathi-1251177.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 08:35:00 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 08:37:00 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Dinvishesh-10_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[नवराष्ट्र विशेष]]></category>
		<category><![CDATA[dinvishesh]]></category>
		<category><![CDATA[Dinvishesh news]]></category>
		<category><![CDATA[marathi dinvishesh]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251177</guid>

					<description><![CDATA[Dinvishesh : आज १२ जून, आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडून गेल्या आहेत. आजच्या दिवशी मराठी साहित्यविश्वातील लोकप्रिय व्यक्तीमत्त्व पु. ल. देशांपांडे यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांच्या जाण्याने मराठी साहित्यविश्वाला मोठा धक्का बसला होता.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Dinvishesh-10_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Dinvishesh 12 June Pu La Deshpande Death Anniversary Marathi"     /></figure><p>Dinvishesh : आज मराठी साहित्यविश्वातीवल अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे पु. ल. देशपांडे म्हणजेच पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांची पुण्यतिथी आहे. त्यांना भाई किंवा पुल या नावानेही ओळखले जायचे. ते लेखक, विनोदीकार, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक आणि संगतीकार अशा विविक्ष क्षेत्रांत पारंगत होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. त्यांनी आपल्या विनोदी शैलीनै आणि जिवंत व्यक्तिचित्रांनी मराठी रसिकांना वेड लागवेल. दूरदर्शनच्या काळात पंडित जवाहरलाल नेहरु यांची पहिली मुलाखत घेण्याचा मान त्यांना मिळाला होता. व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ या त्यांच्या साहित्यकृती आजही लोकप्रिय आहेत. त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.</p>
<p><strong>12 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना</strong></p>
<ul>
<li>1896 : जे.टी. हर्न प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 100 बळी घेणारा पहिला खेळाडू ठरला.</li>
<li>1898 : फिलीपिन्सने स्पेनपासून स्वातंत्र्य घोषित केले.</li>
<li>1905 : गोपाळकृष्ण गोखले यांनी सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली.</li>
<li>1913 : जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म रिलीज़ झाली.</li>
<li>1940 : दुसरे महायुद्ध – 13,000 ब्रिटिश आणि फ्रेंच सैनिकांनी मेजर जनरल रोमेलला शरणागती पत्करली.</li>
<li>1944 : दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने वापरलेला पहिला फ्लाइंग बॉब लंडनला धडकला.</li>
<li>1964 : वर्णभेद विरोधी नेते नेल्सन मंडेला यांना जन्मठेपेची शिक्षा झाली.</li>
<li>1975 : अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द केली आणि त्यांना 6 वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घातली.</li>
<li>1993 : पृथ्वीक्षेपणास्त्राची 11 वी चाचणी यशस्वी.</li>
<li>1996 : भारताचे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत आपले बहुमत सिद्ध केले.</li>
<li>2001 : कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.</li>
<li>2002 : जागतिक बालकामगार विरोधी दिनाला सुरुवात झाली.</li>
</ul><span class="bullet-text"><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/special-coverage/dinvishesh-sane-guruji-death-anniversary-11-june-history-1250290.html">Dinvishesh : भारतीय स्वातंत्र सेनानी पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांची पुण्यतिथी; जाणून घ्या ११ जूनचा इतिहास</a></span></strong></span><p><strong>12 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)</strong></p>
<ul>
<li>499 : 499 ई.पुर्व : ‘आर्यभट्ट’ – भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ यांचा जन्म.</li>
<li>1894 : ‘पुरुषोत्तम बापट’ – बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 1991)</li>
<li>1917 : ‘भालचंद्र दत्तात्रय खेर’ – लेखक व पत्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 2012)</li>
<li>1924 : ‘जॉर्ज बुश’ – अमेरिकेचे 41 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.</li>
<li>1917 : ‘भालचंद्र दत्तात्रय खेर’ लेखक पत्रकार यांचा जन्म.</li>
<li>1957 : ‘जावेद मियाँदाद’ – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक यांचा जन्म.</li>
<li>1972 : ‘भालचंद्र कदम’ – लोकप्रिय महाराष्ट्रीयन मराठी हास्य विनोदी रंगमंच कलाकार व चित्रपट अभिनेता यांचा जन्म.</li>
<li>1985 : ‘ब्लॅक रॉस’ – मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक यांचा जन्म.</li>
</ul><span class="bullet-text"><strong>12 जून रोजी मृत्यू दिनविशेष</strong></span><ul>
<li>1964 : ‘कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी’ – मराठी भाषेचे गाढे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1892 – इस्लामपूर, सांगली)</li>
<li>1976 : ‘गोपीनाथ कविराज’ – भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान यांचे निधन.</li>
<li>1978: ‘गुओ मोरुओ’ – चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार यांचे निधन.</li>
<li>1981 : ‘प्र. बा. गजेंद्रगडकर’ – भारताचे 7 वे सरन्यायाधीश यांचे निधन. (जन्म: 16 मार्च 1901)</li>
<li>1983 : ‘नॉर्मा शिअरर’ – कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1902)</li>
<li>2000 : ‘पु.ल. देशपांडे’ – मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता यांचे निधन. (जन्म: 8 नोव्हेंबर 1919)</li>
<li>2003 : ‘ग्रेगरी पेक’ – हॉलीवूड अभिनेता यांचे निधन. (जन्म: 5 एप्रिल 1916)</li>
<li>2015 : ‘नेकचंद सैनी’ – भारतीय मूर्तिकार यांचे निधन.(जन्म: 15 डिसेंबर 1924)</li>
</ul>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Share Market Today: शेअर बाजारात &#8216;ग्रीन ओपनिंग&#8217;ची शक्यता! जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत, या स्टॉक्सवर ठेवा लक्ष</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/sensex-nifty-likely-to-open-higher-as-trump-halts-iran-strike-plan-experts-recommend-these-stocks-1251180.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा जाधव]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 08:32:17 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 08:32:17 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/share-market-at-12-june_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[share market]]></category>
		<category><![CDATA[Share Market Today]]></category>
		<category><![CDATA[Share Market Update]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251180</guid>

					<description><![CDATA[Share Market Update: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित हल्ले रद्द केल्याच्या वृत्तानंतर जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार आज तेजीसह उघडण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांचे लक्ष तज्ज्ञांनी सुचवलेल्या शेअर्सकडे लागले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/share-market-at-12-june_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Sensex Nifty Likely To Open Higher As Trump Halts Iran Strike Plan Experts Recommend These Stocks"     /></figure><ul>
<li>ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित हल्ले रद्द केल्याने जागतिक बाजारात सकारात्मक संकेत निर्माण झाले आहेत.</li>
<li>गिफ्ट निफ्टी 323 पॉइंट्सच्या प्रीमियमवर व्यवहार करत असल्याने सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह उघडण्याची शक्यता आहे.</li>
<li>तज्ज्ञांनी इंडिया सिमेंट्स, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, अजंता फार्मा आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल) यांसारख्या शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.</li>
</ul><span class="bullet-text"><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/share-market">India Share Market Update: </a></strong></span>राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नियोजित हल्ले रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर अमेरिका-इराण शांतता कराराच्या आशा निर्माण झाल्या आहेत. या परिस्थितीचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक बाजारांमधून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांमुळे, आज १२ जून रोजी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, तेजीत उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी गॅप-अप सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास ३२३ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,५२३ च्या पातळीवर ट्रेड करत होता.</span><p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Todays Gold-Silver Price: मुंबई-पुण्यात सोन्याचे दर वाढले; 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार इतके रुपये" href="https://www.navarashtra.com/business/gold-prices-remain-above-1-lakh-45-rupees-check-latest-rates-in-major-cities-1251169.html"><strong> <span class="color-red">Todays Gold-Silver Price</span>: मुंबई-पुण्यात सोन्याचे दर वाढले; 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार इतके रुपये</strong> </a></span></p>
<p>गुरुवारी, मध्य पूर्वेतील तणाव वाढल्याने भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला आणि बेंचमार्क निफ्टी ५० २३,२०० च्या पातळीखाली स्थिरावला. सेन्सेक्स १५०.६३ अंकांनी, म्हणजेच ०.२० टक्क्यांनी घसरून ७३,८३२.५५ वर बंद झाला, तर निफ्टी ५० ५३.३५ अंकांनी, म्हणजेच ०.२३ टक्क्यांनी घसरून २३,१६१.६० वर स्थिरावला. गुरुवारी बँक निफ्टी निर्देशांक ७६.४५ अंकांनी, म्हणजेच ०.१४ टक्क्यांनी वाढून ५५,१७६.७५ वर बंद झाला. <strong>(फोटो सौजन्य – Pinterest)</strong></p>
<p>चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी आजच्या व्यवहारात इंट्राडे ट्रेडिंगसाठी खरेदी आणि विक्री करण्याकरिता सात स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या शेअर्समध्ये इंडिया सिमेंट्स लिमिटेड, टॉरेंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL), महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (M&amp;M), एयू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड आणि संधार टेक्नॉलॉजीज लिमिटेड यांचा समावेश आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Mango Export: नेपाळमध्ये भारतीय आंबे विकले जाणार की नाही" href="https://www.navarashtra.com/business/nepal-government-statement-on-indian-mango-export-and-ban-rumors-marathi-news-1251006.html"><strong> <span class="color-red">Mango Export</span>: नेपाळमध्ये भारतीय आंबे विकले जाणार की नाही? अखेर सरकारने स्पष्टच सांगत केला खुलासा…</strong> </a></span></p>
<p>चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज गुंतवणूकदारांना जिंदाल पॉली फिल्म्स, एसआयएस, अजंता फार्मा, आयसीआयसीआय बँक आणि निओजेन केमिकल्स हे पाच ब्रेकआउट स्टॉक्स खरेदी करण्याच सल्ला दिला आहे. रेलिगेअर ब्रोकिंगचे संशोधन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार बायोकॉन, फोर्टिस हेल्थकेअर, भारत इलेक्ट्रॉनिक्स (बीईएल) हे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.</p>
<h3>(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)</h3>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Todays Gold-Silver Price: मुंबई-पुण्यात सोन्याचे दर वाढले; 24 कॅरेटसाठी मोजावे लागणार इतके रुपये</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/gold-prices-remain-above-1-lakh-45-rupees-check-latest-rates-in-major-cities-1251169.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[हर्षदा जाधव]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 08:02:25 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 08:02:25 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/gold-rate-at-12-june_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Gold Rate]]></category>
		<category><![CDATA[Gold Rate Today]]></category>
		<category><![CDATA[Gold-Silver Rate]]></category>
		<category><![CDATA[Today's Gold Rate]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251169</guid>

					<description><![CDATA[Today's Gold Rate: सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळत असून 12 जून रोजीही सोन्याचे भाव उच्च पातळीवर कायम आहेत. सोने खरेदी किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर आजचे ताजे दर जाणून घेणे महत्त्वाचे ठरू शकते.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/gold-rate-at-12-june_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Gold Prices Remain Above 1 Lakh 45 Rupees Check Latest Rates In Major Cities"     /></figure><ul>
<li>भारतात आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,45,630 रुपये तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,33,490 रुपये आहे.</li>
<li>चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,47,270 रुपये असून प्रमुख शहरांमध्ये हा सर्वाधिक दर आहे.</li>
<li>चांदीचा भाव आज प्रति किलो 2,49,900 रुपये असून मागील काही दिवसांपासून दर स्थिर आहेत.</li>
</ul><span class="bullet-text"><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/gold-rate-today">Gold Rate Today</a>: </strong></span>भारतात 12 जून रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,563 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,349 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,922 रुपये आहे. भारतात 12 जून रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,490 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,630 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,220 रुपये आहे. भारतात 12 जून रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 249.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,49,900 रुपये आहे.</span><p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Mango Export: नेपाळमध्ये भारतीय आंबे विकले जाणार की नाही" href="https://www.navarashtra.com/business/nepal-government-statement-on-indian-mango-export-and-ban-rumors-marathi-news-1251006.html"><strong> <span class="color-red">Mango Export</span>: नेपाळमध्ये भारतीय आंबे विकले जाणार की नाही? अखेर सरकारने स्पष्टच सांगत केला खुलासा…</strong> </a></span></p>
<p>चेन्नई शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,34,990 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,47,270 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,090 रुपये आहे. सुरत शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,540 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,680 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,270 रुपये आहे. नाशिक शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,520 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,660 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,250 रुपये आहे. <strong>(फोटो सौजन्य – AI Created)</strong></p>
<p>दिल्ली शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,640 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,780 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,370 रुपये आहे. मुंबई आणि पुणे शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,490 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,630 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,220 रुपये आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="आता याचेही दर वाढले… केस कापणं, दाढी करणं महागलं, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुपयांनी वाढ" href="https://www.navarashtra.com/business/salon-services-rates-hike-haircut-and-shaving-prices-increased-marathi-news-1250967.html"><strong> आता याचेही दर वाढले… केस कापणं, दाढी करणं महागलं, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुपयांनी वाढ</strong> </a></span></p>
<p>पटणा शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,540 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,680 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,270 रुपये आहे. नागपूर शहरात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,33,490 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,45,630 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,09,220 रुपये आहे.</p>
<div class="responsive-table"><table style="width: 100%; border: 1px solid #000; border-collapse: collapse;">
<thead>
<tr>
<th style="border: 1px solid #000; padding: 5px;">शहरं</th>
<th style="border: 1px solid #000; padding: 5px;">22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर</th>
<th style="border: 1px solid #000; padding: 5px;">24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर</th>
<th style="border: 1px solid #000; padding: 5px;">18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर</th>
</tr>
</thead>
<tbody>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">मुंबई</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,33,490</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,45,630</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,09,220</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">पुणे</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,33,490</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,45,630</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,09,220</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">केरळ</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,33,490</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,45,630</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,09,220</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">कोलकाता</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,33,490</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,45,630</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,09,220</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">नागपूर</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,33,490</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,45,630</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,09,220</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">बंगळुरु</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,33,490</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,45,630</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,09,220</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">हैद्राबाद</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,33,490</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,45,630</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,09,220</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">दिल्ली</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,33,640</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,45,780</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,09,370</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">चंदीगड</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,33,640</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,45,780</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,09,370</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">लखनौ</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,33,640</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,45,780</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,09,370</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">जयपूर</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,33,640</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,45,780</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,09,370</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">नाशिक</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,33,520</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,45,660</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,09,250</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">सुरत</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,33,540</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,45,680</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,09,270</td>
</tr>
<tr>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">चेन्नई</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,34,990</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,47,270</td>
<td style="border: 1px solid #000; padding: 5px;">₹1,13,090</td>
</tr>
</tbody>
</table></div>
<h3><strong>टीप: वरील सोन्याच्या दरात जीएसटी, टीसीएस आणि इतर कर समाविष्ट नाहीत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलर्सशी संपर्क साधा.</strong></h3>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>सकाळच्या नाश्त्यासाठी पौष्टिक पर्याय! मुगडाळ आणि पालकचा वापर करून बनवा हेल्दी हिरवी इडली, खोबऱ्याच्या चटणीसोबत लागेल चविष्ट</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/make-healthy-green-idli-using-moong-dal-and-spinach-simple-breakfast-recipe-spinach-benefits-1250420.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[सुरुची कदम]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 08:00:47 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 11:39:21 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-11-7_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[cooking tips]]></category>
		<category><![CDATA[easy food recipes]]></category>
		<category><![CDATA[food recipe]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250420</guid>

					<description><![CDATA[लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं इडली खायला खूप जास्त आवडते. पण नेहमीच साधी इडली खाऊन कंत्राला आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही मुगडाळ पालक इडली बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-11-7_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Make Healthy Green Idli Using Moong Dal And Spinach Simple Breakfast Recipe Spinach Benefits"     /></figure><p>सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता करणे ही सवय शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. नाश्ता केल्यामुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. सकाळच्या वेळी उपाशी पोटी राहिल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण झपाट्याने होते आणि शरीराला धोका निर्माण होतो. त्यामुळे कायमच पौष्टिक नाश्ता करणे फार आवश्यक आहे. सकाळच्या नाश्त्यात चहा बिस्कीट किंवा ब्रेड खाण्यापेक्षा घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला मुगडाळ पालक इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. तेलकट तिखट पदार्थ खाण्याऐवजी इडली हा पर्याय अतिशय उत्तम आहे. त्यामुळे नाश्त्यात वडा खाण्याऐवजी इडली किंवा डोसा खावा. लहान मुलं पालेभाज्या खायला खूप कंटाळा करतात, अशावेळी मुलांना तुम्ही पालेभाज्यांचा वापर करून वेगवेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि शरीराला सुद्धा फायदे होतात. चला तर जाणून घेऊया मुगडाळ पालक इडली बनवण्याची सोपी रेसिपी.<strong>(फोटो सौजन्य – pinterest)</strong></p>
<p><a title="Recipe : फणसाचं चटकदार लोणचं तुम्ही कधी खाल्लं आहे का" href="https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-make-raw-pineapple-pickle-at-home-recipe-in-marathi-1250310.html"><strong><span class="color-red">Recipe </span>: फणसाचं चटकदार लोणचं तुम्ही कधी खाल्लं आहे का? एकदाच बनवा आणि वर्षभर याचा आनंद लुटा</strong></a></p>
<h3>साहित्य:</h3>
<ul>
<li>पालक</li>
<li>मुगडाळ</li>
<li>मीठ</li>
<li>तेल</li>
<li>हिरव्या मिरच्या</li>
<li>आलं</li>
<li>दही</li>
<li>रवा</li>
<li>इनो</li>
<li>तेल</li>
</ul><span class="bullet-text"><a title="सीफूड प्रेमींसाठी खास रेसिपी! झटपट घरी बनवा तोंडाला पाणी आणणारी चविष्ट क्रीमी गार्लिक प्रॉन्स, नोट करा पदार्थ" href="https://www.navarashtra.com/lifestyle/a-special-recipe-for-seafood-lovers-quickly-make-delicious-mouth-watering-creamy-garlic-prawns-at-home-1249537.html"><strong> सीफूड प्रेमींसाठी खास रेसिपी! झटपट घरी बनवा तोंडाला पाणी आणणारी चविष्ट क्रीमी गार्लिक प्रॉन्स, नोट करा पदार्थ</strong> </a></span><h3>कृती:</h3>
<ul>
<li>मुगडाळ पालक इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, मुगडाळ पाण्यात काहीवेळ भिजत ठेवा. ३ ते ४ ठेवून नंतर त्यातील पाणी काढून टाका.</li>
<li>मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मुगडाळ टाकून त्यात चिरलेला पालक, हिरव्या मिरच्या, आले, जिरे आणि दही घालून पेस्ट बनवा. पेस्ट तयार करताना त्यात पाणी घालू नये.</li>
<li>मोठ्या वाटीमध्ये तयार केलेले हिरवे वाटण घालून त्यात वाटीभर रवा चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.</li>
<li>१० ते १५ मिनिट रवा फुलण्यासाठी तसाच ठेवून द्या. त्यानंतर त्यात इनो घालून व्यवस्थित मिक्स करा.</li>
<li>इडलीचे भांड गरम करण्यासाठी ठेवा. इडली पात्राला तेल लावून त्यात तयार केलेले मिश्रण घालून इडली वाफवण्यासाठी ठेवा.</li>
<li>१० ते १५ मिनिटं इडली शिजल्यानंतर गॅस बंद करून भांड्यात वाफ गेल्यानंतर इडली काढून ठेवा.</li>
<li>तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली चमचमीत हिरवी इडली.</li>
</ul>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>सांगलीत पुन्हा गुंडाराज ! हमाल पंचायतच्या नेत्याला संपवण्याचा कट; सापडले नाहीत म्हणून थेट नातवावर गोळीबार</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/a-boy-shot-dead-over-contract-dispute-incident-in-sangli-1251170.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 07:47:36 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 07:47:36 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Crime_Sangli_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[crime news]]></category>
		<category><![CDATA[Murder Case]]></category>
		<category><![CDATA[Sangli Crime]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251170</guid>

					<description><![CDATA[संशयित निलेश गडदे याच्यावर यापूर्वीही खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असून, तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर शहरात प्रवेशबंदी असतानाही तो साथीदारांसह सांगलीत पोहोचल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Crime_Sangli_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="A Boy Shot Dead Over Contract Dispute Incident In Sangli"     /></figure><p><strong>सांगली :</strong> शहरातील <a href="https://www.navarashtra.com/topic/crime"><span style="color: #3366ff;">गुन्हेगारी</span></a>ने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून हमाल पंचायतचे नेते बाळासाहेब बंडगर यांना ठार मारण्यासाठी आलेल्या संशयितांनी ते हाती न लागल्याने त्यांच्या अवघ्या १४ वर्षीय नातवावर गोळी झाडून त्याचा निर्घृण खून केला. या थरारक घटनेमुळे सांगली शहर हादरून गेले असून कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.</p>
<p>अभयनगर येथील एसटी कॉलनी परिसरात बुधवारी (दि.10) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. वेदांत मारुती बंडगर हा घराच्या पोर्चमध्ये मोबाईल पाहत बसला असताना संशयित निलेश गडदे व त्याचे साथीदार तेथे आले. हातात पिस्तूल घेऊन आलेल्या गडदेने बाळासाहेब बंडगर यांचा शोध घेतला. मात्र, ते समोर न आल्याने संतापाच्या भरात त्याने निष्पाप वेदांतवर पिस्तूल रोखून त्याच्या उजव्या डोळ्यात गोळी झाडली. गोळी लागताच वेदांत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/crime/pathardi-armed-robbery-kharwandi-kasar-two-families-looted-1250922.html"><strong>Ahilyanagar Crime : पाथर्डीत सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन कुटुंबांना मारहाण करत साडेचार लाखांची लूट</strong></a></span></p>
<p>गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय धावत बाहेर आले. गंभीर जखमी झालेल्या वेदांतला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. एका निष्पाप बालकाचा गोळी झाडून खून झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.</p>
<p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या मालधक्का ठेक्यावरून दोन गटांत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून संशयित गडदे याने संबंधित ठेकेदाराला धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर हमाल पंचायतचे नेते बाळासाहेब बंडगर यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केल्याचा राग मनात धरून गडदेने त्यांना लक्ष्य केल्याची माहिती समोर येत आहे.</p>
<p><strong>खुनाचा गुन्हा यापूर्वीही होता दाखल</strong></p>
<p>विशेष म्हणजे संशयित निलेश गडदे याच्यावर यापूर्वीही खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असून, तो नुकताच जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर शहरात प्रवेशबंदी असतानाही तो साथीदारांसह सांगलीत पोहोचल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.</p>
<p><strong>गुंडाराज संपवण्यासाठी कठोर कारवाई करा</strong></p>
<p>घटनेनंतर संशयित फरार झाले असून, त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. निष्पाप वेदांतच्या मृत्यूने बंडगर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे. &#8220;गुंडाराज संपविण्यासाठी कठोर कारवाई करा,&#8221; अशी मागणी नागरिकांतून होत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या रेल्वेवर दगडफेक; हल्लेखोरांनी E-1 ला केले लक्ष्य</title>
		<link>https://www.navarashtra.com/india/stones-pelted-at-the-train-carrying-rss-sarsanghchalak-mohan-bhagwat-1251160.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[कृपादान आवळे]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 07:18:16 +05:30</pubDate>
<modifiedDate>Fri, 12 Jun 2026 07:26:07 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Train-Attack_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[देश]]></category>
		<category><![CDATA[mohan bhagwat]]></category>
		<category><![CDATA[Rashtriya Swayamsevak Sangh]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251160</guid>

					<description><![CDATA[लखनौ ते दिल्ली धावणाऱ्या शताब्दी एक्सप्रेस या हाय-स्पीड ट्रेनवर माखनपूर आणि फिरोजाबाद रेल्वे स्थानकांदरम्यान काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Train-Attack_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Stones Pelted At The Train Carrying Rss Sarsanghchalak Mohan Bhagwat"     /></figure><p><strong>नवी दिल्ली :</strong> राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे<span style="color: #3366ff;"> <a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/rss-chief-mohan-bhagwat">सरसंघचालक मोहन भागवत</a> </span>हे ज्या शताब्दी एक्सप्रेसने जात होते, त्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. शताब्दी एक्सप्रेसच्या एक्झिक्युटिव्ह क्लास ई-१ बोगीतून ते प्रवास करत होते. ही ट्रेन माखनपूर-फिरोजाबाद दरम्यान जात होती. त्यादरम्यानच डब्यावर अचानक दगडफेक झाली. दगड थेट आरएसएस प्रमुख प्रवास करत असलेल्या डब्यावर आदळला, ज्यामुळे खिडकीची काच फुटली.</p>
<p>गुरुवारी संध्याकाळी लखनौ ते दिल्ली धावणाऱ्या शताब्दी एक्सप्रेस या हाय-स्पीड ट्रेनवर माखनपूर आणि फिरोजाबाद रेल्वे स्थानकांदरम्यान काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली. या घटनेमुळे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत हे देखील त्याच ट्रेनमधून प्रवास करत होते. सुदैवाने, दगडफेकीत आरएसएस प्रमुखांना कोणतीही इजा झाली नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a class="title" style="color: #3366ff;" title="राज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ" href="https://www.navarashtra.com/maharashtra/ct-pet-ct-scan-mri-projects-maharashtra-healthcare-upgrade-hasan-mushrif-review-meeting-1251063.html"><span class="color-red">राज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार </span>: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ</a></strong></span></p>
<p><strong>मोहन भागवत ई-१ डब्यात होते</strong></p>
<p>आरएसएस प्रमुख मोहन भागवत शताब्दी एक्सप्रेसच्या एक्झिक्युटिव्ह क्लास ई-१ डब्यातून प्रवास करत होते. माखनपूर आणि फिरोजाबाद दरम्यान ट्रेन जात असताना, डब्यावर अचानक दगडफेक झाली. ज्या डब्यात आरएसएस प्रमुख उपस्थित होते, त्या डब्यावर थेट दगड आदळला, ज्यामुळे खिडकीची काच फुटली. सुदैवाने, मोहन भागवत दुसऱ्या बाजूला बसले होते. दगडाने खिडकीची काच फोडली. सुरक्षेच्या कारणास्तव, ट्रेन मध्येच थांबवण्यात आली नाही आणि तिचा प्रवास पुढे सुरू ठेवण्यात आला.</p>
<p><strong>रेल्वे यंत्रणा अलर्टवर</strong></p>
<p>घटनेची माहिती मिळताच, रेल्वे संरक्षण दल आणि सरकारी रेल्वे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना टुंडला जंक्शनवर मोठ्या फौजफाट्यासह तैनात करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी ७:३४ वाजता शताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर येताच, सुरक्षा यंत्रणा अधिक कडक करण्यात आली.</p>
<p><strong>सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी सुरु</strong></p>
<p>टुंडला जंक्शनवर सुरक्षा तपासणी आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, ट्रेन सायंकाळी ७:४१ वाजता दिल्लीसाठी रवाना झाली. हे अत्यंत संवेदनशील प्रकरण गांभीर्याने घेत, आरपीएफ आणि जीआरपीच्या संयुक्त पथकांनी माखनपूर-फिरोजाबाद रेल्वे विभागाच्या आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/cockroach-janta-party-protest-at-pune-1251113.html"><strong>Pune : कॉक्रोचेसच्या ५ मोठ्या मागण्या; छ. शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा नकाशा NCERT च्या पुस्तकात समाविष्ट करा</strong></a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>कडाक्याच्या गर्मीमध्ये हार्ट अटॅक येतो का? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये &#8216;का&#8217; वाढतो हार्ट अटॅकचा धोका, जाणून घ्या यामागील कारण</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/can-extreme-heat-trigger-a-heart-attack-why-does-the-risk-of-heart-attacks-increase-during-summer-find-out-the-reasons-behind-this-1250635.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[सुरुची कदम]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 05:30:18 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 14:31:40 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-14-7_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[Health Care Tips]]></category>
		<category><![CDATA[heart attack]]></category>
		<category><![CDATA[Heart attack prevention]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250635</guid>

					<description><![CDATA[उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे हृदयविकारचा झटका किंवा हार्ट स्टोक येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात बाहेर जाताना शरीराची काळजी घेणे फार आवश्यकता आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-14-7_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Can Extreme Heat Trigger A Heart Attack Why Does The Risk Of Heart Attacks Increase During Summer Find Out The Reasons Behind This"     /></figure><p>जगभरात <span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/topic/health-care-tips">हार्ट अटॅक</a></span>सारख्या गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक येऊन मृत्यू सुद्धा होऊ शकतो. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरसंबंधित अनेक समस्या उद्भवतात. उष्माघात, डिहाड्रेशन तर काहीवेळा हृद्यासंबंधित समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. उन्हाळ्याच्या दिसवांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडून जाते. शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होऊन रक्ताच्या गुठळ्या, अतालता, कमी रक्तदाब आणि हृदयविकाराचा झटका येऊन कोणत्याही क्षणी मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा किडनीच्या आजारांनी ग्रस्त व्यक्तींनी हार्ट अटॅक येण्याची शक्यता खूप जास्त असते.<strong>(फोटो सौजन्य – istock)</strong></p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="रक्तदान करायला भीती वाटते" href="https://www.navarashtra.com/lifestyle/afraid-to-donate-blood-learn-about-common-misconceptions-and-the-reality-behind-them-discover-detailed-information-provided-by-experts-1250444.html"><strong> रक्तदान करायला भीती वाटते? जाणून घ्या सामान्य गैरसमज आणि त्यामागील वास्तव, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली सविस्तर माहिती</strong> </a></span></p>
<p>हार्ट अटॅक येण्याच्या प्रमुख कारण केवळ रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल नसून शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे, बिघडलेली इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर पडतो. त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हृदयावर जास्तीचा तणाव येतो आणि रक्तप्रवाहात अनेक अडथळे निर्माण होतात. चला तर जाणून घेऊया कडाक्याच्या उष्णतेचा हृदयाच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो आणि यामागील कारणे.</p>
<p>मानवी शरीराचे तापमान स्थिर राहण्यासाठी अंतर्गत अनेक शारीरिक हालचाली होतात. जेव्हा बाहेरील तापमानामध्ये वाढ होते, तेव्हा शरीर त्वचा आणि घामाच्या माध्यमातून उष्णता बाहेर टाकण्यास सुरुवात करते. यामुळे त्वचेवरील रक्तवाहिन्या रुंदावतात आणि तिथला रक्तप्रवाहाचा वेग वाढतो. यामुळे हृदयाला जास्तीची हालचाल करावी लागते. हृदयावर आलेला जास्तीचा तणाव निरोगी व्यक्ती सहन करते पण वाढलेले वय आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींना हा तणाव सहन होत नाही. त्यामुळे वाढत्या उन्हाळ्यात शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.</p>
<h3>डिहायड्रेशन आणि रक्ताच्या गुठळ्या:</h3>
<p>उष्णता वाढल्यामुळे घामावाटे शरीरातील पाणी आणि सोडियम-पोटॅशियमसारखे अतिशय महत्वाचे घटक बाहेर पडून जातात. यामुळे शरीरात डिहायड्रेशनचा धोका वाढण्याची शक्यता असते. वाढत्या डिहायड्रेशनचा थेट हद्य आणि रक्तवाहिन्यावर होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानंतर रक्ताची पातळीसुद्धा कमी होऊन जाते. रक्त नेहमीपेक्षा जास्त घट्ट किंवा जाड होते ज्यामुळे रक्त पंप करण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात. या प्रक्रियेमुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. तयार झालेल्या गुठळ्या हृदयाच्या धमन्यांमध्ये अडकल्या तर हार्ट अटॅक किंवा मेंदूमध्ये स्ट्रोक येण्याची जास्त शक्याता असते.</p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="रक्तात वाढलेल्या साखरेमुळे अंगाला सतत खाज येते" href="https://www.navarashtra.com/lifestyle/does-high-blood-sugar-cause-constant-itching-include-these-fruits-in-your-diet-to-reduce-the-risk-of-diabetes-1250259.html"><strong> रक्तात वाढलेल्या साखरेमुळे अंगाला सतत खाज येते? मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश</strong> </a></span></p>
<h3>अतिउष्णतेमुळे हृदय निकामी होण्याची कारणे:</h3>
<p>डिहायड्रेशन आणि रक्तवाहिन्या रुंदावल्यामुळे शरीराचा रक्तदाब अचानक कमी होऊन जातो. यामुळे हृदयाला आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा होत नाही. घामावाटे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स पातळी कमी होऊन जाते, ज्यामुळे हृदयाची विद्युत यंत्रणा बिघडून शरीराला धोका निर्माण होतो. त्यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यात बाहेर जाणे टाळावे. हृदयविकार किंवा हाय बीपीसाठी दिल्या जाणाऱ्या डायुरेटिक्स गोळ्या शरीरातील पाण्याची पातळी कमी करून टाकतात. यामुळे उष्णतेचा धोका वाढतो.</p>
<h3>टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.</h3>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>प्रवेश वाढवण्यासाठी शिक्षण संस्था &#8216;हायटेक&#8217;; शाळा-कॉलेजांकडून सोशल मिडियावर जोरदार ब्रँडिंग</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/schools-and-colleges-branding-on-social-media-for-students-admissions-educationa-and-career-news-1250835.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 02:35:08 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 16:40:27 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T163552.847_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[Admission Process]]></category>
		<category><![CDATA[Career News]]></category>
		<category><![CDATA[education news]]></category>
		<category><![CDATA[pune news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250835</guid>

					<description><![CDATA[काही संस्थांनी आपल्या नियंत्रणातील सर्व शाळा-महाविद्यालयांचे स्वतंत्र व्हिडिओ करून ते प्रसारित केले. काही ठरावीक शिक्षण संस्था या प्रयोगात आघाडीवर आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T163552.847_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Schools And Colleges Branding On Social Media For Students Admissions Educationa And Career News"     /></figure><p><strong>शाळा-कॉलेजांचा सोशल मीडियावर डंका</strong><br />
<strong>नवीन प्रवेशांसाठी विविध उपक्रमांचे ब्रँडिंग</strong><br />
<strong>विविध उपक्रमांची सोशल मीडियावर प्रसिद्धी सुरू</strong></p>
<p><strong>सोनाजी गाढवे/ पुणे:  </strong>यंदा प्रथमच राज्यभरातील विविध <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/education">शिक्षण संस्थां</a></strong></span>नी आपल्या शाळा-कॉलेजांच्या विविध उपक्रमांची सोशल मीडियावर प्रसिद्धी सुरू केली असून, काही नामांकीत शिक्षण संस्थांच्या कल्पना लक्ष वेधून घेत आहेत. नवीन प्रवेशांसाठी विविध उपक्रमांचे ब्रँडिंग केले जात असले, तरी या निमित्ताने विविध शिक्षक सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.</p>
<p>नवीन शैक्षणिक (<span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/career">Career</a></strong></span>) वर्षाचा प्रारंभ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. राज्यातील बहुतांश शाळांची सुरुवात येत्या १५ जूनला होणार आहे; तर काही शाळा-महाविद्यालये १ जून व ८ जूनलाच सुरू झाली आहेत. मात्र, गेल्या महिन्याभरापासून अनेक शैक्षणिक संस्थांनी प्रवेशासाठी गेल्या वर्षभरात राबविलेल्या उपक्रमांचे ब्रँडिंग करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. काहींनी रील्स केल्या, तर काहींनी विविध विषय शिक्षकांच्या मुलाखती घेऊन त्या प्रसारित केल्या. काही संस्थांनी आपल्या नियंत्रणातील सर्व शाळा-महाविद्यालयांचे स्वतंत्र व्हिडिओ करून ते प्रसारित केले. काही ठरावीक शिक्षण संस्था या प्रयोगात आघाडीवर आहेत. हा प्रयोग अनेक पालकांनाही भावल्याचे व त्याचा शाळा प्रवेशांवर चांगला परिणाम झाल्याचेही दिसते आहे.</p>
<p><strong>पुणे शहरातील आघाडीच्या शिक्षणसंस्था</strong></p>
<p>-फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे</p>
<p>-खडकी शिक्षण संस्था, खडकी</p>
<p>-झील एज्युकेशन सोसायटी, नऱ्हे</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/what-is-ugc-how-university-grants-commission-works-funding-marathi-news-1250600.html">उच्च शिक्षणाचा ‘रिमोट कंट्रोल’ असणारी UGC संस्था नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या नव्या गाइडलाईन्स आणि विद्यापीठ मान्यता प्रक्रिया!</a></strong></span></p>
<p>“आजच्या डिजिटल युगात शिक्षण संस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे.  प्रदेशातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही फर्ग्युसन महाविद्यालयची माहिती, संधी आणि वैशिष्ट्ये समजतात. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना दिशा मिळते. वाढत्या स्पर्धेच्या काळात संस्थेची ओळख, गुणवत्ता आणि उपक्रम प्रभावीपणे मांडण्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.”</p>
<p>प्रा. डॉ. रुपाली शिंदे सांस्कृतिक विभागप्रमुख,<br />
फर्ग्युसन महाविद्यालय ( प्राध्यापक मराठी विभाग )</p>
<p>आम्ही आमच्या संस्थेच्या सर्व शाळा-महाविद्यालयांत दरवर्षी विविध उपक्रम राबवत असतो. मात्र, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नव्हती. यंदा त्यासाठी सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांची मदत घेतल्याने शिक्षकांचा उत्साह वाढला आहे. आपण केलेल्या कामांचे कौतुक झालेले कोणाला आवडत नाही?</p>
<p>-गिरीश ननावरे, कलाशिक्षक खडकी शिक्षण संस्था</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/mumbai-abhishek-vaishya-becomes-successful-ca-abroad-success-story-marathi-news-1250451.html">Success Story: कधी वडिलांसोबत पहाटे ३ वाजता भाजी विकायचा, आज परदेशात झाला CA; मुंबईच्या अभिषेकची थक्क करणारा प्रवास एकदा वाचाच!</a></strong></span></p>
<p>आमच्या संस्थेत शैक्षणिक उपक्रमांबरोबरच अनेक सांस्कृतिक, क्रीडा, कला आदी उपक्रमही सातत्याने घेतले जातात. त्याची माहिती सोशल मीडियावरून अधिक प्रभावी पद्धतीने जात असल्याने आम्ही त्याचाही आधार घेतला. याद्वारे पालकांपर्यंत पोहोचणे अधिक सोयीचे आहे.</p>
<p>&#8211; -प्रा. श्रद्धा आदेवार,झील एज्युकेशन सोसायटी</p>
<p>सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे बॅनर, पोस्टर बनविण्याचे व त्याद्वारे शाळाप्रवेशासाठी आवाहन करण्याचे दिवस संपले आहेत. पालकांच्या व मुलांच्याही हाती मोबाइल व पर्यायाने सोशल मीडिया सहज उपलब्ध झाल्याने शैक्षणिक संस्थांनी त्याचा आधार घेणे काही गैर नाही. त्यातून त्यांच्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळतेच, शिवाय शिक्षकांनाही कॅमेऱ्यासमोर बोलण्याचे धाडस निर्माण होते.</p>
<p>-उत्तमकुमार इंदोरे, सोशल मीडिया अभ्यासक</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>दौंडच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस; बळीराजा सुखवला! खरीप हंगामातील शेती कामांना वेग</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/farmers-have-expressed-happiness-due-to-the-heavy-rainfall-in-the-eastern-part-of-daund-1250826.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
<pubDate>Fri, 12 Jun 2026 00:30:15 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 16:18:51 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/rain-news_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[Farmers]]></category>
		<category><![CDATA[maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Rain News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250826</guid>

					<description><![CDATA[गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अखेर निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/rain-news_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Farmers Have Expressed Happiness Due To The Heavy Rainfall In The Eastern Part Of Daund"     /></figure><p><strong>राजेगाव</strong> : गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या <a href="https://www.navarashtra.com/topic/daund">दौंड</a> तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अखेर निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण, वाटलूज, नायगाव, राजेगाव, खानवटे, स्वामी चिंचोली आणि खडकी परिसरात वरुणराजाने दमदार एन्ट्री केली आहे. तब्बल तीन तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. या पहिल्याच मोठ्या आणि समाधानकारक पावसामुळे शेतकरी राजा कमालीचा आनंदी झाला असून, सुखावलेल्या बळीराजाने रखडलेल्या शेतीच्या कामांना आता जोमाने सुरुवात केली आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p>दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील राजेगाव आणि परिसरातील गावांमध्ये दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला. दुपारपर्यंत असलेल्या कडक उन्हानंतर अचानक ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाचा जोर इतका वाढला की, सलग तीन तास पावसाने संपूर्ण परिसराला झोडपून काढले. या जोरदार पावसामुळे गावातील आणि परिसरातील ओढे, नाले ओसंडून वाहू लागले.</p>
<p><strong>उभ्या पिकांना मिळाली नवसंजीवनी</strong></p>
<p>हा पाऊस पूर्व भागातील कोरड्या पडत चाललेल्या शेतीसाठी अत्यंत अमृतमय ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत ग्रासला होता. वाढत्या उन्हामुळे उभ्या पिकांना पाण्याचा मोठा ताण जाणवू लागला होता, तसेच विहिरी आणि कूपनलिकांच्या (बोअरवेल) पाण्याच्या पातळीतही कमालीची घट झाली होती. परंतु, या तीन तासांच्या दमदार पावसाने पिकांना जणू नवसंजीवनी दिली आहे. उन्हाने करपू लागलेल्या ऊस, चारा पिके आणि इतर फळबागांना या पावसाचा मोठा आधार मिळाला असून पिके पुन्हा एकदा टवटवीत झाली आहेत.</p>
<p><strong>खरीप पेरण्यांना येणार वेग; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद</strong></p>
<p>पावसामुळे जमिनीतील ओल वाढली असून, हवामान पिकांसाठी अत्यंत पोषक बनले आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, या पावसामुळे येत्या पुढील काही दिवसांत परिसरातील खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे. बहुतांश शेतकरी मशागतीची कामे आटोपून पावसाची चातकासारखी वाट पाहत होते.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/a-horrific-accident-has-occurred-involving-the-car-of-devotees-returning-from-pandharpur-1250588.html">हे सुद्धा वाचा : पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांच्या कारला भीषण धडक; पाच जण गंभीर जखमी</a></p>
<p><strong>नागरिकांना उकाड्यापासून सुटका</strong></p>
<p>या जोरदार पावसामुळे केवळ शेतीलाच फायदा झाला नाही, तर गेल्या अनेक दिवसांपासून असह्य उकाड्याचा सामना करणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या आगमनाने वातावरणात छान गारवा निर्माण झाला असून निसर्गाचे रूपही बदलले आहे. एकंदरीत, दौंड तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या या दमदार पावसाने सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. आता पुढील काळातही पाऊस असाच समाधानकारक राहावा, अशी प्रार्थना बळीराजा करत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>वारसा, इतिहास आणि ओळखीवरील हल्ला! &#8216;सांस्कृतिक दहशतवाद&#8217; ही संकल्पना नेमकी काय आहे?</title>
		<link>https://www.navarashtra.com/india/concept-of-cultural-terrorism-1251141.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 22:38:54 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 22:38:54 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-90_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[देश]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251141</guid>

					<description><![CDATA[अलीकडच्या काळात "सांस्कृतिक दहशतवाद" हा शब्दप्रयोग चर्चेत येत आहे. दहशतवाद म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर हिंसा, बॉम्बस्फोट किंवा युद्धाची चित्रे उभी राहतात. मात्र, एखाद्या समाजाची संस्कृती, इतिहास, परंपरा, श्रद्धास्थाने, भाषा आणि सामूहिक ओळख यांच्यावर जाणीवपूर्वक केलेला हल्ला हा देखील दहशतवादाचाच एक प्रकार असू शकतो. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-90_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Concept Of Cultural Terrorism"     /></figure><p>अलीकडच्या काळात &#8220;सांस्कृतिक दहशतवाद&#8221; हा शब्दप्रयोग चर्चेत येत आहे. दहशतवाद म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर हिंसा, बॉम्बस्फोट किंवा युद्धाची चित्रे उभी राहतात. मात्र, एखाद्या समाजाची संस्कृती, इतिहास, परंपरा, श्रद्धास्थाने, भाषा आणि सामूहिक ओळख यांच्यावर जाणीवपूर्वक केलेला हल्ला हा देखील दहशतवादाचाच एक प्रकार असू शकतो. यालाच सांस्कृतिक दहशतवाद असे म्हणतात.</p>
<p>संस्कृती म्हणजे एखाद्या समाजाची जीवनपद्धती. त्यात त्या समाजाची भाषा, धर्म, परंपरा, कला, साहित्य, संगीत, शिक्षण, ज्ञानव्यवस्था आणि ऐतिहासिक स्मृती यांचा समावेश असतो. या सर्व गोष्टी एखाद्या समुदायाची ओळख निर्माण करतात. जेव्हा या ओळखीवर योजनाबद्ध पद्धतीने आघात केला जातो, तेव्हा सांस्कृतिक दहशतवादाचा जन्म होतो.</p>
<p><a title="Mahabharat Katha: अहंकार, अपमान आणि प्रतिशोधाची गाथा; द्रोणाचार्य आणि द्रुपदच्या मैत्री आणि शत्रुत्वाची कहाणी" href="https://www.navarashtra.com/religion/mahabharat-katha-dronacharya-and-drupad-friendship-and-enemy-1249660.html"> <span class="color-red">Mahabharat Katha</span>: अहंकार, अपमान आणि प्रतिशोधाची गाथा; द्रोणाचार्य आणि द्रुपदच्या मैत्री आणि शत्रुत्वाची कहाणी </a></p>
<p>सांस्कृतिक दहशतवादाचा मुख्य उद्देश एखाद्या समाजाचे मनोधैर्य खच्ची करणे, त्याच्या <a href="https://www.navarashtra.com/topic/history">इतिहासा</a>विषयी न्यूनगंड निर्माण करणे आणि त्याच्या सांस्कृतिक अस्तित्वालाच आव्हान देणे हा असतो. त्यामुळे वारसास्थळांचा विध्वंस, धार्मिक स्थळांवरील हल्ले, इतिहासाचे विकृतीकरण, सांस्कृतिक प्रतीकांचे अवमूल्यन, भाषांचे दमन आणि शिक्षणव्यवस्थेतील हस्तक्षेप हे त्याचे प्रमुख प्रकार मानले जातात.</p>
<p>जागतिक स्तरावर पाहिले तर अफगाणिस्तानातील बामियान बुद्धमूर्तींचा तालिबानने केलेला विध्वंस किंवा युरोपमधील युद्धकाळात सांस्कृतिक वारशावर झालेले हल्ले ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. या घटनांमधून केवळ वास्तूंचाच नाश झाला नाही, तर त्या समाजांच्या ऐतिहासिक स्मृतींनाही धक्का बसला.</p>
<p>भारतीय संदर्भात पाहिले तर परकीय आक्रमणे, मंदिरांचा विध्वंस, विद्यापीठे आणि ग्रंथालयांचा नाश, वसाहतवादी शिक्षणधोरणे आणि इतिहासाचे विशिष्ट दृष्टिकोनातून झालेले लेखन यांचा उल्लेख सांस्कृतिक दहशतवादाच्या उदाहरणांमध्ये केला जातो. नालंदा विद्यापीठाचा विनाश असो किंवा स्थानिक ज्ञानपरंपरांचा ऱ्हास, या घटनांनी भारतीय सांस्कृतिक वारशावर खोल परिणाम घडवले.</p>
<p><a title="मंगळसूत्रात काळ्या मण्यांचा समावेश का केला जातो" href="https://www.navarashtra.com/religion/why-are-black-beads-included-in-the-mangalsutra-learn-about-the-religious-and-traditional-reasons-behind-this-1249290.html"> मंगळसूत्रात काळ्या मण्यांचा समावेश का केला जातो? जाणून घ्या त्यामागील धार्मिक आणि पारंपरिक कारणे </a></p>
<p>आजच्या डिजिटल युगातही सांस्कृतिक <a href="https://www.navarashtra.com/topic/war">दहशतवाद</a> नवीन स्वरूपात दिसून येतो. चित्रपट, वेब सिरीज, माध्यमे आणि सोशल मीडियाद्वारे चुकीच्या प्रतिमा, पूर्वग्रहदूषित मांडणी आणि सांस्कृतिक मूल्यांचे अवमूल्यन घडू शकते. त्यामुळे हा विषय केवळ इतिहासापुरता मर्यादित राहत नाही, तर वर्तमानातही तितकाच महत्त्वाचा ठरतो.</p>
<p>एकूणच, सांस्कृतिक दहशतवाद हा एखाद्या समाजाच्या अस्तित्वावर, आत्मसन्मानावर आणि सामूहिक स्मृतीवर होणारा गंभीर आघात आहे. त्याला रोखण्यासाठी स्वतःच्या संस्कृतीचा अभ्यास, इतिहासाचे चिकित्सक आकलन आणि सांस्कृतिक वारशाबद्दल जागरूक अभिमान बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>काय आहे वेद-पुराणांमधील अश्वमेध यज्ञ? या पौराणिक आणि ऐतिहासिक विधीमागील सत्य जाणून घ्या!</title>
		<link>https://www.navarashtra.com/religion/mythological-story-of-ashwmedh-yadnya-1251132.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 22:17:49 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 22:17:49 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-89_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[धर्म]]></category>
		<category><![CDATA[History]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251132</guid>

					<description><![CDATA[वेद, पुराणे आणि विविध धर्मशास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या अश्वमेध यज्ञाबद्दल आपण अनेकदा ऐकतो. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय इतिहासात या यज्ञाचे अनेक संदर्भ आढळतात. नेमका हा यज्ञ काय होता? तो का केला जात असे?]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-89_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mythological Story Of Ashwmedh Yadnya"     /></figure><p>वेद, पुराणे आणि विविध धर्मशास्त्रांमध्ये वर्णन केलेल्या अश्वमेध यज्ञाबद्दल आपण अनेकदा ऐकतो. प्राचीन आणि मध्ययुगीन भारतीय इतिहासात या यज्ञाचे अनेक संदर्भ आढळतात. नेमका हा यज्ञ काय होता? तो का केला जात असे? इतर यज्ञांपेक्षा त्याचे वैशिष्ट्य काय होते? तसेच अश्वमेध यज्ञाबाबत प्रचलित असलेल्या समजुती आणि ऐतिहासिक वास्तव यांचा आढावा घेणे आवश्यक आहे.</p>
<p>भारतीय संस्कृतीवर वैदिक परंपरेचा मोठा प्रभाव आहे. अनेक प्रथा, परंपरा आणि धार्मिक विधी वेद, पुराणे आणि धर्मशास्त्रांतून उदयास आले आहेत. तथापि, कालांतराने अनेक ग्रंथांचे विविध प्रकारे अर्थ लावले गेले आणि काही ठिकाणी मूळ आशयाबाबत वाद निर्माण झाले. अश्वमेध यज्ञ हे त्याचे एक प्रमुख उदाहरण मानले जाते.</p>
<p>अश्वमेध यज्ञ प्रामुख्याने मोठ्या आणि सामर्थ्यशाली राजांकडून केला जात असे. हा यज्ञ केवळ राजे आणि राजघराण्यांनाच करण्याचा अधिकार होता. आपल्या राज्याची सार्वभौमता, सामर्थ्य आणि प्रतिष्ठा सिद्ध करण्यासाठी तसेच राज्यातील समृद्धी आणि कल्याणासाठी हा यज्ञ केला जाई.</p>
<p><a title="Wedding Card Tips : लग्नाच्या पत्रिकेत ‘या’ गोष्टी नसाव्यात! असल्या तर समजून जा ‘कुछ तो अनहोनी जरूर होगी!’" href="https://www.navarashtra.com/religion/wedding-card-tips-dont-add-these-things-in-card-1251083.html"> <span class="color-red">Wedding Card Tips </span>: लग्नाच्या पत्रिकेत ‘या’ गोष्टी नसाव्यात! असल्या तर समजून जा ‘कुछ तो अनहोनी जरूर होगी!’ </a></p>
<p>या यज्ञाची सुरुवात एका शुभ्र अश्वाला मुक्त सोडण्याने होत असे. त्या घोड्याबरोबर राजाचे सैन्यही असे. घोडा ज्या-ज्या प्रदेशांतून फिरत असे, तेथील राजांना दोन पर्याय असत—घोड्याचा मार्ग स्वीकारून त्या सम्राटाचे वर्चस्व मान्य करणे किंवा घोडा अडवून युद्ध करणे. जर एक वर्ष पूर्ण होईपर्यंत घोड्याला कोणी अडवले नाही, तर तो यज्ञासाठी योग्य मानला जाई.</p>
<p>यानंतर विविध वैदिक विधी, दानधर्म आणि यज्ञकर्म पार पाडले जात. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये या यज्ञात घोड्यासह इतर प्राण्यांच्या बळींचा उल्लेख आढळतो. या वर्णनांच्या अचूकतेबाबत आणि त्यांच्या प्रतीकात्मक अर्थांबाबत विद्वानांमध्ये आजही मतभेद आहेत.</p>
<p>इतिहासात अनेक राजांनी अश्वमेध यज्ञ केल्याचे उल्लेख आहेत. महाभारतात युधिष्ठिराने, रामायणात राजा दशरथाने, तसेच गुप्त, सातवाहन, चालुक्य, चोल आणि इतर अनेक राजवंशांतील राजांनी हा यज्ञ केल्याचे संदर्भ उपलब्ध आहेत. गुप्त सम्राट समुद्रगुप्त आणि कुमारगुप्त यांच्या नाण्यांवरही अश्वमेध यज्ञाचे उल्लेख आढळतात.</p>
<p><a title="Mahabharat Katha: अहंकार, अपमान आणि प्रतिशोधाची गाथा; द्रोणाचार्य आणि द्रुपदच्या मैत्री आणि शत्रुत्वाची कहाणी" href="https://www.navarashtra.com/religion/mahabharat-katha-dronacharya-and-drupad-friendship-and-enemy-1249660.html"> <span class="color-red">Mahabharat Katha</span>: अहंकार, अपमान आणि प्रतिशोधाची गाथा; द्रोणाचार्य आणि द्रुपदच्या मैत्री आणि शत्रुत्वाची कहाणी </a></p>
<p>एकोणिसाव्या शतकात स्वामी दयानंद सरस्वती आणि आर्य समाजाच्या विचारवंतांनी अश्वमेध यज्ञातील पशुबळींचे वर्णन प्रतीकात्मक असल्याचे प्रतिपादन केले. त्यांच्या मते, वैदिक ग्रंथांतील अनेक उल्लेखांचा शब्दशः अर्थ न घेता त्यामागील तात्त्विक आशय समजून घेणे आवश्यक आहे.</p>
<p>याच विचारधारेतून पुढे आचार्य श्रीराम शर्मा आणि गायत्री परिवाराने आधुनिक अश्वमेध यज्ञाची संकल्पना विकसित केली. या स्वरूपात कोणत्याही प्राण्याचा बळी दिला जात नाही. त्याऐवजी घोड्याची प्रतिमा किंवा प्रतीकात्मक स्वरूप वापरून सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>यूपीईएस गुगलच्या भागीदारीत ‘एआय कॅम्पस’ सुरू करणार, जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्रांच्या माध्यमातून एआय-फर्स्ट शिक्षण</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/upes-launch-ai-campus-in-partnership-with-google-1251129.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 22:13:04 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 22:13:04 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T221203.416_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251129</guid>

					<description><![CDATA[भविष्याभिमुख शिक्षणासाठी भारतातील अग्रगण्य बहुविषयक विद्यापीठांपैकी एक असलेल्या यूपीईएसने आज गुगल क्लाउडसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीअंतर्गत विद्यापीठ ‘एआय कॅम्पस’ सुरू करणार आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T221203.416_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Upes Launch Ai Campus In Partnership With Google"     /></figure><p>भविष्याभिमुख शिक्षणासाठी भारतातील अग्रगण्य बहुविषयक विद्यापीठांपैकी एक असलेल्या यूपीईएसने आज गुगल क्लाउडसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीअंतर्गत विद्यापीठ ‘एआय कॅम्पस’ सुरू करणार आहे. हा एक परिवर्तनशील उपक्रम असून, अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, व्यवस्थापन, विधी, डिझाइन, आरोग्य विज्ञान, लिबरल स्टडीज आणि मीडिया यांसारख्या विविध विषयांमध्ये अध्यापन, अध्ययन, संशोधन आणि नवोपक्रमासोबत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), क्लाउड तंत्रज्ञान आणि बुद्धिमान स्वयंचलन यांचे एकत्रीकरण करण्याचा त्याचा उद्देश आहे.</p>
<p>हा उपक्रम यूपीईएसच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ टुमॉरो’ या दृष्टीकोनाशी सुसंगत असून, ‘एआय-फर्स्ट युनिव्हर्सिटी’ बनण्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. यूपीईएसमध्ये एआयला शैक्षणिक परिसंस्थेच्या केंद्रस्थानी स्थान दिले जात आहे. अभ्यासक्रम निर्मिती, अध्यापन पद्धती, संशोधन, नवोपक्रम आणि उद्योग सहभाग अशा संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेत एआयचे एकत्रीकरण केले जात आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना वेगाने बदलणाऱ्या जगासाठी सक्षम बनवता येईल. प्रगत तांत्रिक पायाभूत सुविधा, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, अनुभवाधारित शिक्षण आणि जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना एआय-आधारित अर्थव्यवस्थेसाठी तयार करण्याच्या दिशेने हे सहकार्य महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.</p>
<p>या उपक्रमांतर्गत यूपीईएस संपूर्ण विद्यापीठ परिसरात गुगल वर्कस्पेस फॉर एज्युकेशन प्लस लागू करणार असून, त्याचा लाभ १९,००० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी घेतील. यामुळे अध्यापन, संशोधन, सहकार्य आणि नवोपक्रमासाठी मजबूत डिजिटल पाया तयार होईल. याशिवाय, १०,००० हून अधिक विद्यार्थ्यांना जेमिनी एंटरप्राइज फॉर एज्युकेशनची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे ते त्यांच्या शैक्षणिक प्रवासात प्रगत जनरेटिव्ह एआय क्षमतांचा उपयोग करू शकतील. जेमिनी एंटरप्राइजच्या माध्यमातून एआय-आधारित संशोधन सहाय्यक, स्मार्ट शिक्षण साधने, स्वयंचलित कार्यप्रवाह आणि प्रगत शैक्षणिक सहाय्य प्रणाली विकसित करणे शक्य होईल. यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापकांना जगभरातील उद्योगांमध्ये वेगाने बदल घडवून आणणाऱ्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.</p>
<p>या भागीदारीचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे उद्योग-संलग्न बी.टेक. कार्यक्रम, ज्यामध्ये गुगल क्लाउडच्या सहकार्याने विकसित चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम असेल. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना क्लाउड कॉम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा व्यावहारिक अनुभव मिळेल. तसेच विद्यार्थ्यांना चार गुगल क्लाउड प्रमाणपत्रे, GEAR क्रेडेन्शियल्स आणि डीपमाइंड एआय अभ्यासक्रमातील विशेष मॉड्यूल्सही प्राप्त होतील.</p>
<p>अनुभवाधारित शिक्षण आणि नवोपक्रम अधिक बळकट करण्यासाठी यूपीईएस आणि गुगल क्लाउड संयुक्तपणे परिसरात एक समर्पित गुगल सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) स्थापन करणार आहेत. हे केंद्र लाईव्ह लॅब्स, उद्योग-नेतृत्वाखालील प्रकल्प, हॅकाथॉन, प्रगत संशोधन सहकार्य आणि इमर्सिव्ह लर्निंग अनुभवांची सुविधा उपलब्ध करून देईल. तसेच गुगल तंत्रज्ञान आणि नेटिव्ह डेटा कनेक्टर्सच्या साहाय्याने वास्तविक जीवनातील एआय अनुप्रयोगांचा शोध घेणे आणि एजेंटिक एआय वापर प्रकरणे विकसित करण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे व्यासपीठ ठरेल.</p>
<p>डॉ. अभिषेक सिन्हा, प्रो व्हाइस-चान्सलर (स्टुडंट सक्सेस), यूपीईएस, म्हणाले, “गुगलच्या पाठबळाने सुरू होणारा एआय कॅम्पस हा आमच्या तांत्रिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जेमिनी एंटरप्राइजपासून डीपमाइंड एआय अभ्यासक्रमापर्यंत गुगलच्या परिसंस्थेचा थेट आमच्या शैक्षणिक आराखड्यात समावेश करून आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की आमचे विद्यार्थी केवळ तंत्रज्ञान आणि एआयचे वापरकर्ते राहणार नाहीत, तर त्याचे निर्मातेही बनतील. ही भागीदारी आमच्या पदवीधरांना जागतिक एआय-आधारित कार्यक्षेत्रातील सर्वाधिक मागणी असलेल्या व्यावसायिकांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.”</p>
<p>वैभव कुमार श्रीवास्तव, इंडिया हेड – एडटेक्स अँड एज्युकेशन, गुगल इंडिया, म्हणाले, “यूपीईएससोबत सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे आणि डिजिटल कॅम्पस ऑन गुगल क्लाउड (DCGC 4.0) अंतर्गत उत्तर भारतातील सुरुवातीच्या संस्थांपैकी एक म्हणून त्यांचे स्वागत करत आहोत. या सहकार्याद्वारे विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनाही एआय कौशल्यांनी सक्षम बनवणे हा आमचा उद्देश आहे. यूपीईएससोबत मिळून ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि या सहकार्याला दीर्घकालीन यश मिळवून देण्यास उत्सुक आहोत.”</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="एएम/एनएस इंडिया आणि बिट्स पिलानीच्या सहकार्याने पहिल्या एमबीए बॅचचा पदवीदान समारंभ; क्षमता विकासाला नवी दिशा" href="https://www.navarashtra.com/career/convocation-ceremony-of-the-first-mba-batch-in-collaboration-with-amns-india-and-bits-pilani-1251022.html"><strong> एएम/एनएस इंडिया आणि बिट्स पिलानीच्या सहकार्याने पहिल्या एमबीए बॅचचा पदवीदान समारंभ; क्षमता विकासाला नवी दिशा</strong> </a></span></p>
<p>या सहकार्याच्या माध्यमातून यूपीईएस एआयसाठी सज्ज अशा नव्या पिढीतील पदवीधरांना तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे, जे तंत्रज्ञान-आधारित जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक कौशल्ये, दृष्टीकोन आणि व्यावहारिक अनुभवाने सुसज्ज असतील. प्रगत एआय साधने, उद्योगमान्य प्रमाणपत्रे, अनुभवाधारित शिक्षण आणि सखोल उद्योग सहभाग यांचा संगम घडवून आणत हा उपक्रम विद्यार्थ्यांना नवोपक्रम, अत्याधुनिक संशोधन, उद्योजकता आणि भविष्यातील कार्यविश्वात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी सक्षम करेल.</p>
<p>एआय कॅम्पसच्या शुभारंभासह यूपीईएस आपल्या जागतिक तंत्रज्ञान भागीदारीचे जाळे अधिक विस्तारत असून, एआय-सक्षम भविष्याकरिता नवोपक्रमक, उद्योजक, संशोधक आणि तंत्रज्ञान नेत्यांची पुढील पिढी घडविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या विद्यापीठ म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="कोटक एज्युकेशन फाउंडेशनची ‘फ्युचर का गोल्डन टिकीट’ कोटक ज्युनियर स्कॉलरशिप योजना जाहीर" href="https://www.navarashtra.com/career/kotak-education-foundation-announces-future-ka-golden-ticket-kotak-junior-scholarship-scheme-1251058.html"> कोटक एज्युकेशन फाउंडेशनची ‘फ्युचर का गोल्डन टिकीट’ कोटक ज्युनियर स्कॉलरशिप योजना जाहीर </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Donald Trump on Iran: डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जग हादरले! म्हणाले– &#8216;आज रात्री इराणवर होणार सर्वात मोठा हल्ला&#8217;</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/donald-trumps-statement-has-shaken-the-world-he-said-the-biggest-attack-on-iran-will-take-place-tonight-1251117.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 22:00:50 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 22:00:50 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T215258.147_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Donald Trump]]></category>
		<category><![CDATA[iran]]></category>
		<category><![CDATA[Iran Vs America]]></category>
		<category><![CDATA[World War 3]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251117</guid>

					<description><![CDATA[Donald Trump on Iran News: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. कठोर कारवाईचा इशारा देत, त्यांनी आज खार्ग बेट आणि इराणच्या तेल व्यापारावर ताबा मिळवण्याबाबत भाष्य केले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T215258.147_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Donald Trumps Statement Has Shaken The World He Said The Biggest Attack On Iran Will Take Place Tonight"     /></figure><ul>
<li>आज रात्री मोठा हल्ला होणार!</li>
<li>अमेरिका-इराण युद्धाच्या भडक्यात डोनाल्ड ट्रम्प यांची थेट शत्रूला मोठी धमकी</li>
<li>एका विधानाने जग हादरले</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Donald Trump Iran Warning: </strong>अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Donald-trump">डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump)</a> </span>यांनी इराणबाबत एक गंभीर इशारा दिला असून, अमेरिका आज रात्री त्या देशाविरुद्ध कठोर कारवाई करेल असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिका <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Iran">इराणचे</a></span> तेल निर्यातीचे प्रमुख केंद्र असलेल्या &#8216;खार्ग बेटा&#8217;चा (Kharg Island) तसेच तिथल्या तेल आणि वायू प्रकल्पांचा ताबा घेईल. या विधानामुळे मध्यपूर्वेतील तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या &#8216;ट्रुथ सोशल&#8217; या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिताना ट्रम्प म्हणाले, &#8220;अमेरिका आज रात्री इराणवर मोठा हल्ला करेल.&#8221; त्यांनी असा दावा केला की, इराणचे नौदल, हवाई दल, रडार यंत्रणा, विमान-विरोधी संरक्षण यंत्रणा आणि त्यांची बहुतांश आक्रमक लष्करी क्षमता यापूर्वीच निकामी करण्यात आली आहे.</span><h3>खार्ग बेटाबाबत गंभीर इशारा</h3>
<p>ट्रम्प यांनी जाहीर केले की, अमेरिका इराणचे तेल निर्यातीचे मुख्य केंद्र असलेल्या खार्ग बेटाचा आणि इतर तेल सुविधांचा ताबा घेईल. त्यांनी पुढे असाही दावा केला की, व्हेनेझुएलाच्या बाबतीत अवलंबलेल्या धोरणाप्रमाणेच अमेरिका इराणच्या तेल आणि वायू बाजारावर पूर्ण नियंत्रण मिळवेल. अमेरिका आणि इराण यांच्यात हवाई हल्ल्यांची देवाणघेवाण सुरू असतानाच हे विधान आले आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी तेहरानला इशारा दिला होता की, जर त्यांनी प्रस्तावित शांतता कराराच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर आणखी हल्ले केले जाऊ शकतात. दुसरीकडे, इराणने आपल्याविरुद्ध बळाचा वापर झाल्यास जोरदार प्रत्युत्तर देण्याचा संकल्प केला आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">&#8220;The United States will be hitting Iran (Whose Navy, Air Force, Radar, Anti Aircraft, and all other forms of Defense, together with most of its offensive capability, are GONE!), VERY HARD TONIGHT&#8230;&#8221; &#8211; President Donald J. Trump <a href="https://t.co/9enjml7gkw">pic.twitter.com/9enjml7gkw</a></p>
<p>— The White House (@WhiteHouse) <a href="https://x.com/WhiteHouse/status/2065051375868776850">June 11, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p><a title="Hormuz Attack : तीन दिवसांत तिसरा मोठा हल्ला! होर्मुझमध्ये जहाज MT Jalveer ला लक्ष्य; २० भारतीय नाविक धोक्यात" href="https://www.navarashtra.com/world/hormuz-attack-3-major-strike-in-3-days-mt-jalveer-targeted-indian-sailors-at-risk-1250668.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Hormuz Attack </span>: तीन दिवसांत तिसरा मोठा हल्ला! होर्मुझमध्ये जहाज MT Jalveer ला लक्ष्य; २० भारतीय नाविक धोक्यात?</span> </a></p>
<h3>खार्ग बेट महत्त्वाचे का आहे?</h3>
<p>खार्ग बेट हे इराणच्या अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानले जाते; कारण देशातील सुमारे ९०% कच्च्या तेलाची निर्यात येथूनच होते. इराणच्या किनारपट्टीजवळ वसलेले हे छोटेसे बेट देशाच्या तेल व्यापाराचे मुख्य केंद्र आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी यापूर्वी याचे वर्णन &#8220;इराणच्या तेल पुरवठ्याचे मुख्य केंद्र&#8221; असे केले आहे. या बेटाभोवती असलेल्या खोल पाण्यामुळे येथे मोठे तेल टँकर्स येऊ शकतात, ज्यामुळे तेल निर्यातीच्या दृष्टीने हे बेट धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे ठरते. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, खार्ग बेटाचा ताबा घेतल्यास इराणच्या &#8216;इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स&#8217;ला (IRGC) मोठा आर्थिक फटका बसेल. विशेष म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प अनेक दशकांपासून खार्ग बेटाबाबत आपली मते मांडत आले आहेत. १९८८ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, जर अमेरिकन सैन्य किंवा जहाजांवर हल्ला झाला, तर ते खार्ग बेटाचा ताबा घेतील.</p>
<h3>खार्ग बेटावर कडक सुरक्षा</h3>
<p>धोरणात्मक महत्त्वामुळे खार्ग बेटावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या बेटावर &#8216;इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स&#8217;ची (IRGC) देखरेख असते आणि तिथे नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध आहेत. वृत्तानुसार, अमेरिकेने यापूर्वी खार्ग बेटावर लष्करी कारवाई करण्याच्या योजनांचा विचार केला होता, परंतु ८ एप्रिल रोजी झालेल्या युद्धविरामानंतर ही योजना पुढे सरकली नाही. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते, अशा कारवाईत त्यांच्या सैनिकांची मोठी जीवितहानी होऊ शकली असती, कारण हा परिसर इराणी क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात येतो. दरम्यान, संभाव्य कारवाई रोखण्यासाठी इराणने या बेटावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केल्याचेही वृत्त होते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Middle East Crisis : पाकिस्तानच्या विनंतीवर नरमले ट्रम्प" href="https://www.navarashtra.com/world/trump-claims-pakistan-requested-time-for-iran-amid-middle-east-crisis-1250461.html"> <span class="color-red">Middle East Crisis </span>: पाकिस्तानच्या विनंतीवर नरमले ट्रम्प? इराणला वेळ दिल्याचा दावा, होर्मुझमधून कोटींचे तेल सुरक्षित बाहेर </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>पवारांच्या तंबूत भगदाड! धैर्यशील मोहिते-पाटलांचा ‘अदृश्य हात’ ठरला निष्प्रभ; तीन आमदार महायुतीच्या दारात</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/ncp-sharad-pawar-three-mlas-attends-mahayuti-meeting-before-soapur-vidhan-parishad-election-1251119.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 21:59:30 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 21:59:30 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T215817.769_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[NCP Sharad Pawar]]></category>
		<category><![CDATA[Solapur News]]></category>
		<category><![CDATA[Vidhan Parishad Election]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251119</guid>

					<description><![CDATA[भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील चारपैकी तब्बल तीन आमदारांनी थेट महायुतीच्या बैठकीत हजेरी लावत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे संकेत स्पष्ट केले आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T215817.769_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ncp Sharad Pawar Three Mlas Attends Mahayuti Meeting Before Soapur Vidhan Parishad Election"     /></figure><p><strong>शिवाजी हळणवर/पंढरपूर :</strong> सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजपला आव्हान देण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील चारपैकी तब्बल तीन आमदारांनी थेट महायुतीच्या बैठकीत हजेरी लावत भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे संकेत स्पष्ट केले आहेत.</p>
<p>भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत सोलापूर शहरात झालेल्या महायुतीच्या बैठकीत माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडीचा भाग असलेल्या या नेत्यांची उपस्थिती म्हणजे पवार गटातील अंतर्गत नाराजी उघड झाल्याचे मानले जात आहे.</p>
<p>भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीने महाविकास आघाडीच्या एकजुटीवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विशेष म्हणजे सांगोल्याचे शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख आणि काँग्रेसचे माजी आमदार धनाजी साठे यांचीही उपस्थिती महायुतीच्या रणनीतीला अधिक बळ देणारी ठरली.</p>
<p>करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी यापूर्वीच राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला होता, तर डॉ. बाबासाहेब देशमुख हे राऊत यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करतानाही उपस्थित होते. त्यामुळे प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने राजकीय आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.</p>
<p>दरम्यान, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्या उमेदवारीबाबत नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="नाशिक विधानपरिषदेच्या तिढा संपला ! अखेर गोकुळ गीतेंनी घेतला मोठा निर्णय" href="https://www.navarashtra.com/politics/gokul-gite-supports-narendra-darade-for-nashik-vidhan-parishad-election-1250754.html"><strong> नाशिक विधानपरिषदेच्या तिढा संपला ! अखेर गोकुळ गीतेंनी घेतला मोठा निर्णय</strong> </a></span></p>
<p>विशेष म्हणजे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दौऱ्यात झालेल्या या बैठकीने धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या राजकीय दाव्यांनाच धक्का दिल्याची चर्चा जिल्हाभर रंगली आहे. &#8220;महायुतीच्या उमेदवारामागे अदृश्य शक्ती काम करत आहे&#8221; असा आरोप करणाऱ्यांच्या गोटातच आता अस्वस्थता वाढल्याचे दिसत आहे.</p>
<p>पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काही दिवसांपूर्वीच राजेंद्र राऊत हे ५०० पेक्षा अधिक मतांनी विजयी होतील असा दावा केला होता. आता विरोधी गोटातील नेत्यांची वाढती साथ पाहता तो दावा वास्तवात उतरण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. एकीकडे मोहिते-पाटलांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, दुसरीकडे जयकुमार गोरे यांनी महाविकास आघाडीच्या गोटातच राजकीय सुरूंग लावल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात जोर धरत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="सुनील तटकरेंची सुनेत्रा पवारांसमोरच भुजबळांवर आगपाखड; ‘छगन भुजबळ शिवसेनेत असताना…’" href="https://www.navarashtra.com/politics/sunil-tatkare-comments-on-chhagan-bhujbal-1250916.html"> सुनील तटकरेंची सुनेत्रा पवारांसमोरच भुजबळांवर आगपाखड; ‘छगन भुजबळ शिवसेनेत असताना…’ </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी उपाय; इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी महत्त्वाच्या टिप्स!</title>
		<link>https://www.navarashtra.com/latest-news/electric-vehicle-battery-care-tips-1251120.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 21:59:03 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 22:00:31 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-88_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[ताज्या बातम्या]]></category>
		<category><![CDATA[EV]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251120</guid>

					<description><![CDATA[इलेक्ट्रिक वाहनातील सर्वात महत्त्वाचा आणि महागडा घटक म्हणजे त्याची बॅटरी. वाहनाच्या एकूण किमतीत बॅटरीचा मोठा वाटा असल्याने तिचे आयुष्य वाढवणे अत्यंत आवश्यक ठरते.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-88_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Electric Vehicle Battery Care Tips"     /></figure><p>भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर झपाट्याने वाढत आहे. <a href="https://www.navarashtra.com/topic/petrol-diesel-price-today">पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती</a> आणि पर्यावरणपूरक वाहतुकीच्या गरजेमुळे अनेक ग्राहक ई-स्कूटर, <a href="https://www.navarashtra.com/topic/electric-vehicles">ई-बाईक</a> आणि इलेक्ट्रिक कारकडे वळत आहेत. मात्र, इलेक्ट्रिक वाहनातील सर्वात महत्त्वाचा आणि महागडा घटक म्हणजे त्याची बॅटरी. वाहनाच्या एकूण किमतीत बॅटरीचा मोठा वाटा असल्याने तिचे आयुष्य वाढवणे अत्यंत आवश्यक ठरते.</p>
<p>सर्वप्रथम, बॅटरी नेहमी योग्य चार्जिंग पातळीवर ठेवणे गरजेचे आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते, बॅटरी पूर्णपणे 0 टक्क्यांपर्यंत डिस्चार्ज होऊ देऊ नये आणि सतत 100 टक्के चार्ज करून ठेवणेही टाळावे. साधारणतः 20 ते 80 टक्के चार्जिंग रेंजमध्ये वाहन वापरल्यास बॅटरीचे आयुष्य अधिक वाढते.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/mahindra-marketing-campaign-unlimiit-bharat-auto-sector-1248188.html">महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम</a></p>
<p>फास्ट चार्जिंगचा वापर आवश्यकतेनुसारच करावा. वारंवार डीसी फास्ट चार्जर वापरल्यास बॅटरीचे तापमान वाढते आणि दीर्घकालीन कार्यक्षमता कमी होऊ शकते. दैनंदिन वापरासाठी सामान्य एसी चार्जिंग अधिक फायदेशीर मानले जाते.</p>
<p>उन्हाळ्यात किंवा अतिउष्ण वातावरणात वाहन दीर्घकाळ उभे ठेवणे टाळावे. जास्त तापमान हे लिथियम-आयन बॅटरीचे मोठे शत्रू मानले जाते. शक्य असल्यास वाहन सावलीत किंवा बंद पार्किंगमध्ये ठेवावे. त्याचप्रमाणे अतिथंड हवामानातही बॅटरीची कार्यक्षमता कमी होऊ शकते.</p>
<p>वाहन दीर्घकाळ वापरणार नसल्यास बॅटरी 40 ते 60 टक्के चार्ज ठेवणे योग्य ठरते. पूर्ण चार्ज किंवा पूर्ण रिकामी बॅटरी दीर्घकाळ ठेवणे नुकसानकारक ठरू शकते. तसेच वाहन उत्पादकाने दिलेल्या सॉफ्टवेअर अपडेट्स वेळोवेळी इन्स्टॉल कराव्यात, कारण अनेकदा बॅटरी व्यवस्थापन प्रणाली (BMS) सुधारण्यासाठी अपडेट्स दिले जातात.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/range-extender-electric-vehicle-reev-cars-explained-hybrid-difference-range-marathi-news-1184729.html">बॅटरी संपण्याचं नो-टेंशन! चालता-चालता स्वतःला चार्ज करतात Electric Car; जाणून घ्या काय आहे REEV टेक्नॉलॉजी?</a></p>
<p>अचानक वेग वाढवणे, सतत उच्च वेगाने वाहन चालवणे आणि वारंवार जड भार वाहून नेणे यामुळेही बॅटरीवर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे संतुलित आणि नियोजित ड्रायव्हिंग पद्धतीचा अवलंब करणे फायदेशीर ठरते.</p>
<p>एकंदरीत, योग्य चार्जिंग सवयी, तापमानाचे व्यवस्थापन आणि नियमित देखभाल यांमुळे इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी अनेक वर्षे चांगली कार्यक्षमता देऊ शकते. त्यामुळे वाहनमालकांचा खर्च कमी होतो आणि इलेक्ट्रिक मोबिलिटीचा अनुभव अधिक विश्वासार्ह बनतो.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Pune: कॉक्रोचेसच्या ५ मोठ्या मागण्या; छ. शिवाजी महाराजांच्या साम्राज्याचा नकाशा NCERT च्या पुस्तकात समाविष्ट करा</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/cockroach-janta-party-protest-at-pune-1251113.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 21:45:48 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 21:45:48 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T214457.188_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Cockroach Janata Party]]></category>
		<category><![CDATA[Cockroach Janta Party]]></category>
		<category><![CDATA[Protest]]></category>
		<category><![CDATA[pune news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251113</guid>

					<description><![CDATA[कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज (गुरुवार, ११ जून) पुण्यात अंदोलन करण्यात आले. कथित NEET पेपरफुटीवरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात आंदोलन सुरु झाले]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T214457.188_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Cockroach Janta Party Protest At Pune"     /></figure><p>कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने आज (गुरुवार, ११ जून) पुण्यात अंदोलन करण्यात आले. कथित NEET पेपरफुटीवरून विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात आंदोलन सुरु झाले. यावेळी, CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह प्रसिद्ध वैज्ञानिक सोनम वांगचुक हेदेखील उपस्थित होते. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी CJP कडून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह पाच मोठ्या मागण्या ठेवण्यात आल्या.</p>
<p>सोशल मीडियावर सुरु झालेल्या या आंदोलनाला प्रत्यक्षातदेखील हजारो तरुणांनी पाठिंबा दर्शवत आंदोलनस्थळी गर्दी केली. याआधी दिल्लीतील जंतर मंतर, आणि आता पुण्यात या आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनात विद्यार्थी आणि युवकांसह मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकही सहभागी झाले होते.</p>
<h3>&#8216;कॉक्रोचेस&#8217; च्या प्रमुख ५ मागण्या कोणत्या?</h3>
<p>आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालयासमोर खालीलप्रमाणे प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत:</p>
<ul>
<li>जर कोणत्याही परैक्षेचा पेपर फुटला, तर प्रभावित झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला १० हजार रुपयांची भरपाई मिळावी.</li>
<li>परीक्षा आयोजित करण्याआधी टेंडर घेणाऱ्या कंपन्यांचे ऑडिट करण्यात यावे. मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीस हे टेंडर मिळू नये.</li>
<li>परीक्षेचा निकाल ठराविक मुदतीचा व्हायला हवा.</li>
<li>विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी लागणारा वाहतूक खर्च सरकारने द्यावा.</li>
<li>NCERT च्या पाठयपुस्तकांमधून वगळलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा नकाशा पुन्हा पाठ्यपुस्तकात सामील करावा.</li>
</ul><span class="bullet-text"><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल, ‘गोकुळ’विरोधातील १८ दिवसांचे आंदोलन स्थगित; ‘या’ तारखेपर्यंत खात्यात पैसे जमा होणार" href="https://www.navarashtra.com/maharashtra/solapur-gokul-sugar-factory-farmers-protest-called-off-after-mla-sachin-kalyanshetti-mediates-1251086.html"><strong> सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल, ‘गोकुळ’विरोधातील १८ दिवसांचे आंदोलन स्थगित; ‘या’ तारखेपर्यंत खात्यात पैसे जमा होणार</strong> </a></span></span><h3>धार्मिक राजकारणाला CJP चा विरोध</h3>
<p>कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने यावेळी धार्मिक राजकारणावरून सरकारवर प्रश्न उपस्थित केले. &#8216;यापुढे तरुण पिढी कोणत्याही हिंदू मुस्लिम किंवा धार्मिक राजकारणाला बाली पडणार नसल्याचं आश्वासन सर्वांनी दिल पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. सरकारच हिंदू-मुस्लिम राजकारण यापुढे चालणार नाही, असा इशारा CJP कडून देण्यात आला.</p>
<h3>अभिजित दीपकेंची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका</h3>
<p>यावेळी अभिजित दीपकेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, &#8220;मुख्यमंत्री म्हणतात कि या आंदोलनात सहभागी झालेले लोक समाजात अराजकता पसरवत आहेत. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे कि हक्कासाठी लढणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे म्हणजे अराजकता पसरवणे आहे का? मुख्यमंत्री टीका करतात कि आम्हाला संविधान माहित नाही. आम्ही फक्त पुस्तक हातात पकडले आहे. मला त्यांना उलट विचारायचं आहे कि चोरून पहाटेचा शपथविधी पार पाडणे कोणत्या संविधानात लिहिलं आहे, ते त्यांनी सांगावं,&#8221; असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a class="title" style="color: #3366ff;" title="राज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ" href="https://www.navarashtra.com/maharashtra/ct-pet-ct-scan-mri-projects-maharashtra-healthcare-upgrade-hasan-mushrif-review-meeting-1251063.html"> <span class="color-red">राज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार </span>: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>मे २०२६ मध्ये ई-स्कूटर विक्रीचा विक्रम; टीव्हीएस नंबर १, ओलाला फटका</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/may-2026-e-scooter-sales-auto-sector-1251109.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 21:38:55 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 21:38:55 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-87_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[scooter]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251109</guid>

					<description><![CDATA[इलेक्ट्रिक दुचाकी बाजारपेठेत मे २०२६ महिना अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. देशातील ई-स्कूटर विक्रीने नवा विक्रम प्रस्थापित करत तब्बल १.७० लाखांहून अधिक युनिट्सची विक्री नोंदवली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-87_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="May 2026 E Scooter Sales Auto Sector"     /></figure><p>इलेक्ट्रिक दुचाकी बाजारपेठेत मे २०२६ महिना अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. देशातील ई-स्कूटर विक्रीने नवा विक्रम प्रस्थापित करत तब्बल १.७० लाखांहून अधिक युनिट्सची विक्री नोंदवली. मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ ६२.७६ टक्के इतकी असून, ग्राहकांचा <a href="https://www.navarashtra.com/topic/electric-vehicles">इलेक्ट्रिक वाहनांकडे</a> वाढता कल स्पष्टपणे दिसून येत आहे. वाढती इंधनदर, पर्यावरणपूरक वाहतुकीची गरज आणि सरकारी प्रोत्साहन योजनांमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सातत्याने वाढत आहे.</p>
<p>या वाढत्या बाजारपेठेत <a href="https://www.navarashtra.com/topic/tvs">टीव्हीएस</a> मोटर कंपनीने सर्वाधिक विक्री करत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान कायम राखले आहे. कंपनीने मे महिन्यात ४२,४५९ ई-स्कूटर्सची विक्री केली. विश्वासार्ह सेवा, मजबूत नेटवर्क आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांचा टीव्हीएसवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.</p>
<p>दुसरीकडे, बजाज ऑटोनेही उल्लेखनीय कामगिरी करत बाजारपेठेत दुसरे स्थान पटकावले आहे. ‘बजाज चेतक’ या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरला ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत असून, तिच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे पारंपरिक वाहन उत्पादक कंपन्याही इलेक्ट्रिक क्षेत्रात प्रभावीपणे स्पर्धा करत असल्याचे चित्र दिसत आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/tvs-motor-company-has-launched-a-new-scooter-1220470.html">फक्त 4 तास चार्ज करा अन् 175 KM फिरा; TVSने आणलीये नवी इलेक्ट्रिक स्कूटर! किंमत…</a></p>
<p>ॲथर एनर्जीने देखील उत्कृष्ट वाढ नोंदवली आहे. मे २०२६ मध्ये कंपनीने २८,२४० युनिट्सची विक्री केली, तर मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या १४,१०१ इतकी होती. म्हणजेच कंपनीच्या विक्रीत तब्बल १००.२७ टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा बाजारातील हिस्सा १६.५४ टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटर विभागात ॲथरने आपली मजबूत उपस्थिती सिद्ध केली आहे.</p>
<p>हिरो मोटोकॉर्पची ‘विडा’ इलेक्ट्रिक स्कूटर देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. कंपनीने मे महिन्यात १९,०६७ युनिट्सची विक्री केली असून, मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ १५८.१९ टक्के इतकी आहे. त्यामुळे विडाचा बाजारातील हिस्सा ११.१७ टक्क्यांवर पोहोचला असून, ती प्रमुख स्पर्धकांना आव्हान देताना दिसत आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/ev-technology-update-2-minute-battery-swap-1240695.html"><span class="color-red">EV Technology Update </span>: EV चार्गिंजची कटकट संपली! आता फक्त २ मिनिटांत मिळणार फूल चार्ज बॅटरी; ‘या’ कंपनीचा मोठा धमाका</a></p>
<p>मात्र, बहुतेक कंपन्यांच्या विक्रीत वाढ होत असताना ओला इलेक्ट्रिकला काही प्रमाणात घसरणीचा सामना करावा लागला. कंपनीने मे २०२६ मध्ये १५,१४१ युनिट्सची विक्री केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत २०.१७ टक्के कमी आहे. तथापि, एप्रिल २०२६ च्या तुलनेत विक्रीत २४.४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तरीही कंपनीचा बाजारातील हिस्सा ८.८७ टक्क्यांवर घसरला असून, ओला पाचव्या स्थानावर पोहोचली आहे.</p>
<p>एकूणच, भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी बाजारपेठ वेगाने विस्तारत असून, ग्राहक आता केवळ नवीन तंत्रज्ञानाकडेच नव्हे तर विश्वासार्ह ब्रँड, उत्तम सेवा आणि दीर्घकालीन गुणवत्तेकडे अधिक लक्ष देत आहेत. आगामी काळात या क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र होण्याची शक्यता असून, भारतीय ऑटोमोबाईल उद्योगासाठी हा बदल महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Wai Accidenet: वाई-बावधन ओढ्याजवळ भीषण अपघात भरधाव ट्रक दुकानात घुसला, एक ठार, एक जखमी</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/satara-wai-pachwad-road-accident-drunk-truck-driver-crashes-into-grocery-shop-at-bawdhan-one-dead-1251104.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 21:36:12 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 21:36:12 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T213504.532_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Accident]]></category>
		<category><![CDATA[Accident News]]></category>
		<category><![CDATA[Wai News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251104</guid>

					<description><![CDATA[सातारा जिल्ह्यातील वाई-पाचवड मार्गावर बावधन येथे भीषण अपघात झाला आहे. एका मद्यधुंद ट्रकचालकाने नियंत्रण गमावून ट्रक थेट किराणा दुकानात घुसवल्याने ७२ वर्षीय बाळासाहेब पिसाळ यांचा मृत्यू झाला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T213504.532_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Satara Wai Pachwad Road Accident Drunk Truck Driver Crashes Into Grocery Shop At Bawdhan One Dead"     /></figure><ul>
<li>वाई हादरले!</li>
<li>मद्यधुंद ट्रकचालकाचा सुसाट ट्रक थेट किराणा दुकानात घुसला</li>
<li>७२ वर्षीय वृद्धाचा चिरडून मृत्यू, १ गंभीर</li>
</ul><span class="bullet-text"><strong>वाई :</strong> वाई-पाचवड मार्गावरील बावधन ओढा येथील पुलाशेजारी गुरुवारी झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालविण्यात येणारा टाटा कंपनीचा एपी २९ टीसी ०९७२ क्रमांकाचा १६१३ ट्रक अचानक नियंत्रण सुटून विरुद्ध दिशेने जाऊन &#8220;किराणा अँड स्नॅक्स सेंटर&#8221; या दुकानात घुसल्याने मोठी दुर्घटना घडली. या अपघातात बाळासाहेब लक्ष्मण पिसाळ (वय ७२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून बंडा मोहिते हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की दुकानासह परिसरातील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.</span><p>दुकानासमोर उभी असलेली एमएच ११ सीएफ ०७६७ क्रमांकाची होंडा शाईन दुचाकी, जी विश्वजीत अशोक शिंदे यांच्या मालकीची असून अजित आत्माराम शिंदे (रा. बावधन, ता. वाई) यांच्या दुकानासमोर उभी होती, तीही या अपघातात गंभीररीत्या नुकसानग्रस्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक नितीन कांबळे (रा. व्याहळी) हा वाईहून पाचवडकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण गमावून बसला. स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार चालकाने मद्यप्राशन केले असल्यानेच हा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.</p>
<p>अपघाताची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पीएसआय अमित सुर्वे, रुपेश जाधव (ट्रॅफिक हवालदार) तसेच गोरखनाथ दाभाडे विशाल येवले राम कोळी धीरज कुमार भोसले राहुल भोईर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, आपत्कालीन वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी ११२ क्रमांकावर संपर्क साधण्यात आला; मात्र वेळेवर शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला. अखेर पोलिसांनी मानवतेचे दर्शन घडवत जखमी चालकाला स्वतःच्या वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/wai-bhagyashree-pharande-agriculture-project-visit-1250205.html">एल निनो पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सिआरए तंत्रज्ञान वापर करावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे</a></p>
<p>त्यानंतर वरद आयसीयू हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेतून डॉ. शैलेंद्र धेंडे यांनी स्वतः ॲम्बुलन्स चालवून मृत व्यक्ती व जखमींना पुढील उपचार व शवविच्छेदनासाठी वाई येथे हलविण्यात आले. या भीषण अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून भरधाव आणि बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. तसेच आपत्कालीन सेवांची अपुरी उपलब्धता हा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. निष्काळजी वाहनचालकांमुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने संबंधितांवर कठोर गुन्हे दाखल करून कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.</p>
<p>वाई पाचवड रस्त्याला बावधन ग्रामपंचायतीने बावधन गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याच्या त्या रस्त्याला गतिरोधक टाका म्हणून वारंवार मागणी केली होती परंतु त्याकडे दुर्लक्ष केले आहे अनेक वेळा मोठमोठे अपघात घडले आहेत याशिवारामध्ये मोठ्या प्रमाणात शेती असल्याकारणाने लोकांची ये जा रस्ता ओलांडणे रस्त्याच्या शेजारी वस्ती असल्याकारणाने रहदारी मोठ्या प्रमाणात असते तरी ताबडतोब या रस्त्याला गतिरोधक टाकावे व होणारे अपघात टाळावे अशी विनंती युवा नेते विजयसिंह शशिकांत पिसाळ यांनी केली आहे</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/mini-kumbhmela-in-wai-besides-krushna-river-1234923.html">वाईतील लघु कुंभमेळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कृष्णाघाट परिसर भक्तिमय</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Satara News : &#8216;देवस्थान इनाम जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करा&#8217; आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी; शासनाविरोधात घोषणाबाजी</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/satara-news-transfer-devasthan-inam-lands-to-the-farmers-names-1251103.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिवेश चव्हाण]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 21:32:17 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 21:32:17 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T213114.843_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Satara]]></category>
		<category><![CDATA[Satara News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251103</guid>

					<description><![CDATA[देवस्थान इनाम जमिनींच्या मालकी हक्कासाठी साताऱ्यात किसान सभेने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या आदेशाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T213114.843_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Satara News Transfer Devasthan Inam Lands To The Farmers Names"     /></figure><p><strong>सातारा :</strong> देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रस्तावित देवस्थान इनाम जमीन निर्मूलन कायदा 2026 मागे घेण्याच्या हालचालींविरोधात अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाच्या आदेशाची प्रतीकात्मक होळी करून निषेध नोंदविण्यात आला. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Satara News: झेडपीच्या रुग्णवाहिका वाहनांचा ‘स्पेशल ऑडिट’ होणार" href="https://www.navarashtra.com/maharashtra/satara-news-zilla-parishad-ambulances-undergo-a-special-audit-1251080.html"><span class="color-red">Satara News</span>: झेडपीच्या रुग्णवाहिका वाहनांचा ‘स्पेशल ऑडिट’ होणार?</a></span></h3>
<p>किसान सभेने दिलेल्या निवेदनानुसार, देवस्थान इनाम जमिनी अनेक वर्षांपासून कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क मिळावा, यासाठी संघटना सातत्याने लढा देत आहे. यापूर्वी हजारो शेतकऱ्यांनी पालघर ते मुंबई लाँग मार्च काढून सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने देवस्थान इनाम जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करण्यासाठी कायदा आणण्याचे आश्वासन दिले होते.</p>
<p>या अनुषंगाने कायद्याचा मसुदा जाहीर करण्यात आला होता. 5 मे ते 5 जून 2025 या कालावधीत हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळूनही काही देवस्थान ट्रस्ट समित्यांच्या दबावामुळे सरकारने हा कायदा स्थगित केल्याचा आरोप किसान सभेने केला आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे मालकी हक्काचे स्वप्न पुन्हा अधांतरी राहिल्याची भावना व्यक्त करण्यात आली.</p>
<p>संघटनेच्या मते, सरकारने दिलेले आश्वासन पाळून देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर तातडीने करण्यासाठी कायदा लागू करावा. तसेच प्रस्तावित कायदा रद्द करण्याच्या हालचाली थांबवून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी करण्यात आली.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="सावखेड भोई ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; १५ दिवसांत कारवाईचे आश्वासन, उपोषणाची सांगता" href="https://www.navarashtra.com/maharashtra/case-regarding-alleged-financial-irregularities-in-the-savkhed-bhoi-gram-panchayat-1251092.html">सावखेड भोई ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; १५ दिवसांत कारवाईचे आश्वासन, उपोषणाची सांगता</a></span></h3>
<p>या आंदोलनात कॉ. माणिक आवाडे, विशाल जाधव, श्रीकांत मोरे, चंद्रकांत मोरे, रामभाऊ सावळे, राजेंद्र माने, संजय मोरे, नुरुल मुल्ला, दीपक काळे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान शासनाच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणी सरकार कोणता निर्णय घेते, याकडे आता राज्यातील देवस्थान इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>CJP Pune Protest: &#8216;&#8230;दिल्लीत देशव्यापी आंदोलन छेडणार&#8217;; पुण्यातून अभिजीत दिपकेंचा इशारा</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/abhijeet-dipke-warn-to-modi-govet-dharmendra-pradhan-resign-eet-paper-leak-pune-protest-1251088.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 21:27:48 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 21:27:48 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T211546.898_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[abhijeet dipke]]></category>
		<category><![CDATA[CJP]]></category>
		<category><![CDATA[pune news]]></category>
		<category><![CDATA[Pune University]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251088</guid>

					<description><![CDATA[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॉक्रोज जनता पर्टीचे आंदोलन झाले त्यावेळी सोनम वांगचुक, विद्यापीठातील आंबेडकरी संघटनेचे प्रतिनिधी, ऑड. असिम सरोदे, नितीन अंधळे, राहुल डंबाळे आणि विविध संघटनेचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T211546.898_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Abhijeet Dipke Warn To Modi Govet Dharmendra Pradhan Resign Eet Paper Leak Pune Protest"     /></figure><p><strong>शिक्षणमत्र्यांनी राजीनामा न दिल्यास पुन्हा जंतरमंतर</strong><br />
<strong>विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले</strong><br />
<strong>आंदोलनादरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण</strong><br />
<strong><br />
पुणे:</strong> परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवस्था, पेपरफुटी, निकालातील विलंब आणि भरती प्रक्रियेतील अडचणी याविरोधात विद्यार्थ्यांनी आता रस्त्यावर उतरून आवाज उठविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच शुक्रवारपर्यंत राजीनामा न झाल्यास २० जून रोजी दिल्लीत देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/cockroach-janta-party">कॉक्रोज जनता पार्टी</a></strong></span>चे संस्थापक <strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/abhijeet-dipke">अभिजीत दिपके</a></span></strong> यांनी दिला.</p>
<p>सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलन झाले त्यावेळी सोनम वांगचुक, विद्यापीठातील आंबेडकरी संघटनेचे प्रतिनिधी, ऑड. असिम सरोदे, नितीन अंधळे, राहुल डंबाळे आणि विविध संघटनेचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी, पालक उपस्थित होते.</p>
<p>दिपके म्हणाले, पेपरफुटीच्या घटनांवर बोलताना &#8220;पेपर फुटले, मात्र कोणीही राजीनामा द्यायला तयार नाही. देशातील एक कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे की एका मंत्र्याचे पद?&#8221; असा सवाल उपस्थित करण्यात आला. तसेच परीक्षा आणि भरती प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला.</p>
<p>सोनम वांगचुक म्हणाले, पुण्याचे पर्यावरण संवर्धनातील सहभागाचे कौतुक करताना त्यांनी शहरातील नदी संवर्धन, वृक्ष संरक्षण आणि पर्यावरणाशी संबंधित विविध जनआंदोलनांचा उल्लेख केला. पुणे आणि महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये सामाजिक प्रश्नांबाबत असलेली जागरूकता आशादायक आहे. शिक्षण व्यवस्थेतील आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी सत्याच्या मार्गाने संघर्ष करण्याची गरज आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/cockroach-janata-party-pune-protest-2026-abhijit-dipke-cjp-twitter-post-1248957.html">CJP Maharashtra Protest: पुण्यातील किती कॉकरोचेस सहभागी होणार?; CJPच्या महाराष्ट्रातील पहिल्या आंदोलनाची घोषणा</a></strong></span></p>
<p><strong>‘पंचसूत्री’ दिपक च्या मागण्या</strong></p>
<p>आंदोलनकर्त्यांनी जाहीर केलेल्या ‘पंचसूत्री’ मागण्यांमध्ये पेपरफुटी झाल्यास विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांची भरपाई, परीक्षा पुढे ढकलल्यास नुकसानभरपाई, निकाल उशिरा लागल्यास प्रतिमहिना आर्थिक मदत, भरती प्रक्रियेदरम्यान विशेष गाड्यांची व्यवस्था, ७२ तासांच्या आत पर्यायी परीक्षेची तारीख जाहीर करणे, उत्तरपत्रिका प्रत्यक्ष तपासणी, वयोमर्यादेत सवलत आणि परीक्षा व्यवस्थेचे स्वतंत्र ऑडिट आदी मागण्यांचा समावेश अभिजीत दिपके यांनी केला.</p>
<p><strong>संविधानाच्या बाजूने उभे राहणारे लोक अराजक कसे</strong></p>
<p>मुख्यमंत्री यांनी आंदोलनकर्त्यांना ‘अराजक तत्त्वे’ संबोधल्याच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया देण्यात, &#8220;डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणारे आणि संविधानाच्या बाजूने उभे राहणारे लोक अराजकवादी कसे असू शकतात?&#8221; असा प्रश्न दिपके यांनी उपस्थित केला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/abhijit-dipke-reacts-on-cm-fadnavis-comments-over-cjp-protest-1247356.html">जय भीमच्या घोषणा देणे, आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालणे हि अराजकता आहे का? फडणवीसांच्या टीकेवर CJP च्या अभिजित दीपकेंचा पलटवार</a></strong></span></p>
<p><strong>विद्यापीठ आंदोलनमय</strong></p>
<p>केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गुरुवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात कॉक्रोच जनता पार्टी (CJP)च्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र आंदोलनादरम्यान काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. या आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दिपके यांनी केले. विद्यापीठ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन पार पडले. विद्यापीठ प्रशासनाने काही अटी व शर्तींसह आंदोलनास परवानगी दिली होती. आंदोलनात मोठ्या संख्येने युवक-युवती, विद्यार्थी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलकांनी “नरेंद्र मोदी उत्तर द्या”, “विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आली होती.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल, &#8216;गोकुळ&#8217;विरोधातील १८ दिवसांचे आंदोलन स्थगित; &#8216;या&#8217; तारखेपर्यंत खात्यात पैसे जमा होणार</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/solapur-gokul-sugar-factory-farmers-protest-called-off-after-mla-sachin-kalyanshetti-mediates-1251086.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 21:23:40 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 21:23:40 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T212158.173_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Protest]]></category>
		<category><![CDATA[Solapur]]></category>
		<category><![CDATA[Solapur News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251086</guid>

					<description><![CDATA[सोलापूरमधील धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी सुरू असलेले १८ दिवसांचे शेतकरी आंदोलन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीनंतर १६ जूनपर्यंत २८०० रुपये प्रति टन जमा करण्याच्या आश्वासनावर स्थगित झाले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T212158.173_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Solapur Gokul Sugar Factory Farmers Protest Called Off After Mla Sachin Kalyanshetti Mediates"     /></figure><p>&nbsp;</p>
<ul>
<li>सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिल</li>
<li>&#8216;गोकुळ&#8217;विरोधातील १८ दिवसांचे आंदोलन स्थगित</li>
<li>&#8216;या&#8217; तारखेपर्यंत खात्यात पैसे जमा होणार</li>
</ul><span class="bullet-text"><strong>सोलापूर, शहर प्रतिनिधी:</strong> धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याकडून थकीत ऊस बिलाची रक्कम मिळावी, या प्रमुख मागणीसाठी गेल्या १८ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर पूनम गेट येथे सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर गुरुवारी (दि. ११ जून) तात्पुरते स्थगित करण्यात आले. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीनंतर येत्या १६ जूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रति टन २,८०० रुपये दराने थकीत ऊस बिल जमा केले जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.</span><p>‘गोकुळ थकीत ऊस बिल शेतकरी संघर्ष समिती’च्या वतीने सुरू असलेल्या या आंदोलनाने मागील काही दिवसांत तीव्र स्वरूप धारण केले होते. ४ जून रोजी शेकडो शेतकऱ्यांनी सोलापूर येथील साखर आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न आंदोलन केले होते. त्यानंतर १० जून रोजी कंबर तलाव येथे दीड ते दोन हजार शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.</p>
<p>आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी तसेच दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्या उपस्थितीत शेतकरी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस अरविंद घोडके, अमोल पाटील, बसवराज नरे, बाळासाहेब मोरे, नेताजी खंडागळे यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/solapur-municipal-corporation-employees-protest-against-tb-officer-dr-arundhati-haralkar-demand-transfer-1250085.html"><span class="color-red">Solapur News</span>: मनपा क्षयरोग विभागात खळबळ! डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी; कर्मचारी संघटनांचा कामबंदचा इशारा</a></span></p>
<p>बैठकीत १६ जूनपर्यंत थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून संघर्ष समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिलेल्या मुदतीत पैसे जमा न झाल्यास १७ जून रोजी दुपारपासून पूनम गेट येथे अधिक तीव्र स्वरूपाचे ठिय्या आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. आंदोलन स्थगित करताना आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांच्या हस्ते आंदोलक शेतकऱ्यांना ऊसाचा रस देण्यात आला.</p>
<h3>शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शंभर टक्के प्रयत्न</h3>
<blockquote><p>शेतकऱ्यांच्या ऊस बिलाच्या आंदोलनाकडे माझे पहिल्या दिवसापासून लक्ष होते. मात्र, ठोस तोडगा निघत नसल्याने मी आंदोलनस्थळी आलो नव्हतो. प्रशासन आणि संबंधित यंत्रणांशी सातत्याने चर्चा करून शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी माझे शंभर टक्के प्रयत्न आहेत. शेतकऱ्यांसोबत कायम उभा असून पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही. <em>-आमदार सचिन कल्याणशेट्टी </em></p></blockquote>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/solapur-municipal-corporation-agreement-for-free-technical-cooperation-signed-with-it-experts-1248344.html">सोलापूर महापालिकेच्या डिजिटल क्रांतीला वेग, आयटी तज्ज्ञांशी विनामूल्य करार, तब्बल 6 कोटींची बचत</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>सावखेड भोई ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरण; १५ दिवसांत कारवाईचे आश्वासन, उपोषणाची सांगता</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/case-regarding-alleged-financial-irregularities-in-the-savkhed-bhoi-gram-panchayat-1251092.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिवेश चव्हाण]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 21:22:41 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 21:22:41 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T211643.626_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[buldhana news]]></category>
		<category><![CDATA[Washim news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251092</guid>

					<description><![CDATA[सावखेड भोई ग्रामपंचायतीतील कथित निधी अपहार प्रकरणात कारवाईच्या मागणीसाठी प्रल्हाद हांडे यांनी केलेले उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे घेतले. चौकशी अहवालात 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T211643.626_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Case Regarding Alleged Financial Irregularities In The Savkhed Bhoi Gram Panchayat"     /></figure><p>सावखेड भोई ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि निधी अपहार प्रकरणात दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी दिव्यांग नागरिक प्रल्हाद नारायण हांडे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण मंगळवारी रात्री मागे घेतले. प्रशासनाकडून १५ दिवसांच्या आत आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषणाची सांगता केली. प्रल्हाद हांडे यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी सावखेड भोई ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या अहवालात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये अपहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकांनी अपहाराची रक्कम ग्रामपंचायत निधीत जमा केल्याचाही उल्लेख अहवालात करण्यात आला आहे.</p>
<p>शासनाच्या ४ जानेवारी २०१७ च्या परिपत्रकानुसार अपहार सिद्ध झाल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. मात्र चौकशीत अनियमितता स्पष्ट होऊनही अद्याप कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप हांडे यांनी केला होता. याशिवाय तक्रारीच्या चौकशीसाठी वारंवार पंचायत समिती कार्यालयात जावे लागल्याने मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="राज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ" href="https://www.navarashtra.com/maharashtra/ct-pet-ct-scan-mri-projects-maharashtra-healthcare-upgrade-hasan-mushrif-review-meeting-1251063.html"><span class="color-red">राज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार </span>: वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ</a></span></h3>
<p>चौकशी अहवालानुसार दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी त्यांनी सोमवारी उपोषण सुरू केले होते. शासन नियमानुसार तक्रारीची चौकशी एका महिन्याच्या आत पूर्ण होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात त्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागल्याचा आरोपही त्यांनी केला.</p>
<p>उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी गटविकास अधिकारी मुकेश माहोर, जिल्हा परिषद सहाय्यक गटविकास अधिकारी एस. डी. तायडे, शिवसेना नेते दीपक बोरकर, ग्रामसेवक एन. एस. राठोड आणि विठ्ठल माने यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. यावेळी चौकशी समितीच्या आदेशानुसार पुढील १५ दिवसांत आवश्यक कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर प्रल्हाद हांडे यांनी आपले उपोषण मागे घेतले.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="कोळेगांवच्या उपसरपंचपदी मंगल बेंदगुडे यांची बिनविरोध निवड" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mangal-bendgude-elected-unopposed-as-upsarpanch-of-kolegaon-1251050.html">कोळेगांवच्या उपसरपंचपदी मंगल बेंदगुडे यांची बिनविरोध निवड</a></span></h3>
<p>यावेळी गणेश हांडे, प्रवीण हांडे, बंडूराजे डोळस, नारायण जाधव, कांता हांडे, ज्ञानेश्वर टेकाळे, ज्ञानेश्वर माने, रविंद्र मगर, अमोल टेकाळे, वैभव ढोबळे, प्रवीण माने, यश पाटील, संतोष टेकाळे आदी उपस्थित होते. या प्रकरणातील पुढील कारवाईकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Wedding Card Tips : लग्नाच्या पत्रिकेत &#8216;या&#8217; गोष्टी नसाव्यात! असल्या तर समजून जा &#8216;कुछ तो अनहोनी जरूर होगी!&#8217;</title>
		<link>https://www.navarashtra.com/religion/wedding-card-tips-dont-add-these-things-in-card-1251083.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिवेश चव्हाण]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 21:07:08 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 21:07:08 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T210633.328_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[धर्म]]></category>
		<category><![CDATA[daily vastu tips]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251083</guid>

					<description><![CDATA[लग्नाची पत्रिका ही केवळ आमंत्रण नसून नव्या आयुष्याची शुभ सुरुवात मानली जाते. त्यामुळे तिचा रंग, आकार आणि डिझाइन निवडताना वास्तुशास्त्रातील काही नियम पाळण्याचा सल्ला दिला जातो.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T210633.328_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Wedding Card Tips Dont Add These Things In Card"     /></figure><p>लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि मंगल प्रसंग मानला जातो. त्यामुळे लग्नाच्या तयारीत पत्रिकेलाही विशेष महत्त्व दिले जाते. वास्तुशास्त्रानुसार लग्नाची पत्रिका ही केवळ पाहुण्यांना आमंत्रण देण्याचे साधन नसून नव्या आयुष्याची शुभ सुरुवात मानली जाते. त्यामुळे पत्रिकेचा रंग, आकार, डिझाइन आणि त्यावरील मजकूर यांची निवड करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Hindu – Muslim: 15 जूनला येणार हिंदू मुस्लीम एकत्र, ठरणार ‘खास’ दिवस; एक नाही तर 4 कारणं" href="https://www.navarashtra.com/religion/adhik-maas-end-amavasya-mithun-sankranti-and-mhuharrum-both-festivals-of-hindu-and-muslim-on-15th-june-1250512.html"><span class="color-red">Hindu – Muslim</span>: 15 जूनला येणार हिंदू मुस्लीम एकत्र, ठरणार ‘खास’ दिवस; एक नाही तर 4 कारणं</a></span></h3>
<p>वास्तुनुसार लग्नाच्या पत्रिकेसाठी लाल, पिवळा, केशरी, मॅरून किंवा सोनेरी रंग शुभ मानले जातात. लाल रंग प्रेम आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो, तर पिवळा आणि केशरी रंग सकारात्मक ऊर्जा व मंगलकार्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. याउलट काळा, गडद राखाडी किंवा अतिशय नकारात्मक छटा असलेले रंग टाळावेत, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.</p>
<p>पत्रिकेवर भगवान गणेश, स्वस्तिक, ॐ किंवा कलश यांसारखी शुभ चिन्हे असणेही महत्त्वाचे मानले जाते. विशेषतः श्रीगणेशाचे चित्र किंवा चिन्ह असल्यास विवाहातील अडथळे दूर होतात, अशी श्रद्धा आहे. मात्र देवतांची चित्रे अतिशय आधुनिक किंवा अस्पष्ट स्वरूपात छापणे टाळावे. पत्रिकेचा आकारही वास्तुनुसार महत्त्वाचा मानला जातो. आयताकृती किंवा चौकोनी आकाराच्या पत्रिका शुभ मानल्या जातात. अंडाकृती, गोल किंवा त्रिकोणी तसेच टोकदार कोपऱ्यांच्या डिझाइनला नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे मानले जाते. त्यामुळे अशा डिझाइनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Shakun Shastra: घराच्या मुख्य दारात कुत्रा बसणे शुभ की अशुभ संकेत" href="https://www.navarashtra.com/religion/shakun-shastra-dog-at-door-meaning-significance-hindu-beliefs-bhairav-symbolism-1250909.html"><span class="color-red">Shakun Shastra</span>: घराच्या मुख्य दारात कुत्रा बसणे शुभ की अशुभ संकेत? जाणून घ्या</a></span></h3>
<p>पत्रिकेतील मजकूर आदरयुक्त, स्पष्ट आणि वाचण्यास सोपा असावा. “ॐ श्री गणेशाय नमः” किंवा एखाद्या मंगल श्लोकाने सुरुवात करणे शुभ मानले जाते. अतिशय गुंतागुंतीचे किंवा वाचण्यास अवघड फॉन्ट वापरणे टाळावे. वास्तुशास्त्रानुसार लग्नाच्या पत्रिकेसाठी लेदर फिनिश किंवा रासायनिक चमक असलेला कागद वापरणे योग्य मानले जात नाही. त्याऐवजी पर्यावरणपूरक किंवा हँडमेड पेपर अधिक शुभ मानला जातो. पत्रिका छापल्यानंतर पहिली पत्रिका देवघरात गणपतीसमोर अर्पण करावी आणि त्यानंतर कुलदैवताच्या नावाने पत्रिका काढून मगच नातेवाईकांना वाटप सुरू करावे, अशी परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mansoon Car Care टिप्स: पावसाळ्यापूर्वी कारसाठी या पाच काळजी नक्की घ्या!</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/5-precautions-to-take-for-car-before-mansoon-1251081.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 21:06:22 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 21:06:22 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-86_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[Car]]></category>
		<category><![CDATA[mansoon]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251081</guid>

					<description><![CDATA[भारतात पावसाळा सुरू होताच वाहनचालकांसमोर अनेक आव्हाने उभी राहतात. रस्त्यांवरील पाणी साचणे, चिखल, कमी दृश्यमानता आणि ओलाव्यामुळे वाहनाच्या विविध भागांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी कारची योग्य तपासणी आणि देखभाल करणे अत्यंत आवश्यक असते. यामुळे वाहनाची सुरक्षितता वाढते तसेच अनपेक्षित बिघाडांपासून बचाव होतो.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-86_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="5 Precautions To Take For Car Before Mansoon"     /></figure><p>भारतात पावसाळा सुरू होताच वाहनचालकांसमोर अनेक आव्हाने उभी राहतात. रस्त्यांवरील पाणी साचणे, चिखल, कमी दृश्यमानता आणि ओलाव्यामुळे वाहनाच्या विविध भागांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे <a href="https://www.navarashtra.com/topic/mansoon">पावसाळा</a> सुरू होण्यापूर्वी कारची योग्य तपासणी आणि देखभाल करणे अत्यंत आवश्यक असते. यामुळे वाहनाची सुरक्षितता वाढते तसेच अनपेक्षित बिघाडांपासून बचाव होतो.</p>
<p><strong>१. टायर आणि ब्रेक्सची तपासणी करा</strong></p>
<p>पावसाळ्यात रस्ते निसरडे होतात. अशा वेळी टायरवरील ग्रिप चांगली असणे अत्यंत गरजेचे आहे. टायरची ट्रेड डेप्थ कमी झाल्यास वाहन घसरण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जुने किंवा झिजलेले टायर वेळेवर बदलणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ब्रेक पॅड, ब्रेक ऑइल आणि ब्रेकिंग सिस्टीमची तपासणी करून घ्यावी. पावसाळ्यात सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी प्रभावी ब्रेक्स महत्त्वाची भूमिका बजावतात.</p>
<p><strong>२. वायपर आणि विंडशील्डची काळजी घ्या</strong></p>
<p>पावसाच्या वेळी समोरील दृश्य स्पष्ट दिसणे गरजेचे असते. त्यामुळे वायपर ब्लेड खराब किंवा कडक झाले असल्यास ते बदलून घ्यावेत. विंडशील्ड वॉशरमध्ये पुरेसे द्रव आहे का याची खात्री करावी. स्वच्छ काच आणि कार्यक्षम वायपरमुळे पावसात वाहन चालविणे अधिक सुरक्षित होते.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/mahavitran-chhatrapati-sambhajinagar-pre-monsoon-maintenance-deadline-may-30-1223304.html">पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; ३० मे पर्यंत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश</a></p>
<p><strong>३. बॅटरी आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम तपासा</strong></p>
<p>ओलावा आणि पाण्यामुळे कारच्या <a href="https://www.navarashtra.com/topic/electric-vehicles">इलेक्ट्रिकल</a> सिस्टीमवर परिणाम होऊ शकतो. बॅटरी टर्मिनल्सवर गंज तर नाही ना याची तपासणी करावी. हेडलाईट्स, टेललाईट्स, इंडिकेटर्स आणि फॉग लॅम्प योग्य प्रकारे कार्यरत आहेत का हे पाहणे आवश्यक आहे. पावसाळ्यात दृश्यमानता कमी असल्याने लाईट्सची भूमिका अधिक महत्त्वाची ठरते.</p>
<p><strong>४. एसी आणि डिफॉगरची तपासणी करा</strong></p>
<p>पावसाळ्यात कारच्या काचांवर धुके जमा होण्याची समस्या सामान्य आहे. त्यामुळे एसी आणि डिफॉगर व्यवस्थित कार्यरत असणे आवश्यक आहे. हे उपकरण काचांवरील धुके दूर करून चालकाला स्पष्ट दृश्य मिळवून देतात. लांब प्रवासापूर्वी त्यांची तपासणी करून घेणे फायदेशीर ठरते.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/pre-monsoon-rain-wreaks-havoc-in-khandala-taluka-satara-heavy-damage-1233471.html">खंडाळ्यात मान्सूनपूर्व पावसाचे तांडव! कण्हेरी डोंगरावर ढगफुटीसदृश पाऊस, ओढ्यांना पूर अन् वीटभट्ट्यांचे लाखो रुपयांचे नुकसान</a></p>
<p><strong>५. रबर सील्स आणि अंडरबॉडी संरक्षण करा</strong></p>
<p>कारच्या दरवाज्यांभोवती असलेल्या रबर सील्स खराब झाल्यास पाणी आत शिरू शकते. त्यामुळे त्यांची तपासणी करून आवश्यक असल्यास बदल करावा. तसेच वाहनाच्या अंडरबॉडीवर अँटी-रस्ट कोटिंग केल्यास गंज लागण्याचा धोका कमी होतो. पावसाळ्यात चिखल आणि ओलाव्यामुळे गंज निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.</p>
<p>योग्य वेळी केलेली ही पाच काळजी वाहनाची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि आयुष्य वाढविण्यास मदत करते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या कारची संपूर्ण तपासणी करून सुरक्षित आणि निर्धास्त प्रवासाचा आनंद घ्यावा.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Satara News: झेडपीच्या रुग्णवाहिका वाहनांचा &#8216;स्पेशल ऑडिट&#8217; होणार?</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/satara-news-zilla-parishad-ambulances-undergo-a-special-audit-1251080.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 21:03:11 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 21:03:11 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/04/First-General-Body-Meeting-of-the-Satara-Zilla-Parishad-after-Dispute-Over-the-Presidents-Post_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Satara]]></category>
		<category><![CDATA[Satara Zilla Parishad]]></category>
		<category><![CDATA[Satara ZP]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251080</guid>

					<description><![CDATA[सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ताब्यातील १०२ रुग्णवाहिकांसह इतर वाहनांच्या वैध कागदपत्रांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/04/First-General-Body-Meeting-of-the-Satara-Zilla-Parishad-after-Dispute-Over-the-Presidents-Post_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Satara News Zilla Parishad Ambulances Undergo A Special Audit"     /></figure><p><strong>सातारा :</strong> सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ताब्यातील १०२ रुग्णवाहिकांसह इतर वाहनांच्या वैध कागदपत्रांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विमा, फिटनेस, पार्किंग, पीयुसी आणि इतर आवश्यक परवान्यांशिवाय वाहने रस्त्यावर धावत असल्याचा आरोप होताच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जिल्हा परिषद प्रशासनाला कठोर पत्र पाठविले आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई, जबाबदारी निश्चित करणे आणि सर्व विभागांचे विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडिट) करण्याची मागणी या पत्रातून पुढे आली आहे.</p>
<p>सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या ताब्यातील १०२ रुग्णवाहिका तसेच इतर वाहनांच्या कायदेशीर कागदपत्रांबाबत मोठी अनियमितता समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र संजयराव शेळके यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत प्रादेशिक परिवहन कार्यालय, सातारा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना पत्र पाठवून आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.</p>
<p>पत्रानुसार, जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अनेक रुग्णवाहिका व इतर वाहने विमा, फिटनेस प्रमाणपत्र, पीयुसी आणि इतर आवश्यक कागदपत्रांशिवाय सार्वजनिक रस्त्यांवर चालविली जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे. मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ५६ नुसार वैध फिटनेस प्रमाणपत्राशिवाय वाहन रस्त्यावर चालविणे कायद्याचे उल्लंघन मानले जाते. तसेच विमा व प्रदूषण नियंत्रण (पीयुसी) प्रमाणपत्र नसल्यासही संबंधित कायद्यांचे उल्लंघन होते.</p>
<p>आरटीओने पत्रात स्पष्ट केले आहे की, अशा वाहनांचा वापर केवळ कायद्याचा भंग नसून रुग्ण, प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण करणारा आहे. त्यामुळे कालबाह्य फिटनेस किंवा इतर कागदपत्रे असलेल्या वाहनांची तातडीने तपासणी करून त्यांचा वापर थांबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="ST workers protest : एसटी सेवा ठप्प होणार" href="https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-st-workers-joint-action-committee-indefinite-protest-chakka-jam-1250993.html"><strong> <span class="color-red">ST workers protest </span>: एसटी सेवा ठप्प होणार? प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीकडून बेमुदत आंदोलनाची घोषणा</strong> </a></span></p>
<p>यासोबतच जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांअंतर्गत असलेल्या रुग्णवाहिका आणि इतर वाहनांची विशेष मोहीम राबवून तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होईपर्यंत संबंधित वाहने सार्वजनिक रस्त्यांवर चालवू नयेत, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.</p>
<p>दरम्यान, या प्रकरणात जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याबरोबरच फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही पुढे आली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे &#8216;स्पेशल ऑडिट&#8217; करून वाहन व्यवस्थापनातील अनियमितता उघड करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.</p>
<p>या पत्रामुळे जिल्हा परिषदेच्या वाहन व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आगामी काळात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि दोषींवर कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a class="title" style="color: #3366ff;" title="कोरेगावच्या विकासाला नवे पंख; ३६ वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा शिक्का अखेर रद्द, पाच हजार मिळकतधारकांना मोठा दिलासा" href="https://www.navarashtra.com/maharashtra/thirty-six-year-old-city-development-plan-endorsement-finally-cancelled-in-koregaon-1250943.html"> कोरेगावच्या विकासाला नवे पंख; ३६ वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा शिक्का अखेर रद्द, पाच हजार मिळकतधारकांना मोठा दिलासा </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Daund Armed Robbery: खोरवडी व आलेगावात सशस्त्र दरोडा; मारहाण करून सव्वासात लाखांचा ऐवज लंपास</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/armed-dacoity-in-khorvadi-and-alegaon-valuables-worth-725-lakh-looted-after-assault-1251079.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 21:01:37 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 21:01:37 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T210022.304_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Daund]]></category>
		<category><![CDATA[Daund Crime]]></category>
		<category><![CDATA[Robbery]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251079</guid>

					<description><![CDATA[पुणे जिल्ह्यातील दौंड जवळील खोरवडी आणि आलेगाव परिसरात ५ ते ७ अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला आहे. महिला व वृद्धांना मारहाण करत ७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T210022.304_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Armed Dacoity In Khorvadi And Alegaon Valuables Worth 725 Lakh Looted After Assault"     /></figure><ul>
<li>दौंड हादरले!</li>
<li>मध्यरात्री वाड्या-वस्त्यांवर दरोडेखोरांचा सशस्त्र धुमाकूळ</li>
<li>महिला व वृद्धांना मारहाण करत ७ लाखांचा ऐवज लुटला</li>
</ul><span class="bullet-text"><strong>पाटस (प्रतिनिधी):</strong> दौंड शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या खोरवडी व आलेगाव गावांच्या हद्दीतील वाड्या-वस्त्यांवर बुधवारी (दि. 10) मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने धुमाकूळ घालत सशस्त्र दरोडा टाकला. चाकू, कोयता, लोखंडी गज, लोखंडी पाईप, लाकडी काठ्या व दगडांचा वापर करून घरातील सदस्यांना मारहाण, शिवीगाळ व दमदाटी करत सुमारे 7 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेण्यात आला.</span><p>मिळालेल्या माहितीनुसार, पाच ते सात जणांच्या टोळीने खोरवडी व आलेगाव परिसरातील विविध वाड्या-वस्त्यांवर धाड टाकली. दरोडेखोरांनी घरातील ज्येष्ठ नागरिक व महिलांना जीवे मारण्याची धमकी देत सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच मोटारसायकली लुटल्या.</p>
<p><a title="Ahilyanagar Crime : पाथर्डीत सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन कुटुंबांना मारहाण करत साडेचार लाखांची लूट" href="https://www.navarashtra.com/crime/pathardi-armed-robbery-kharwandi-kasar-two-families-looted-1250922.html"> <span class="color-red">Ahilyanagar Crime </span>: पाथर्डीत सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन कुटुंबांना मारहाण करत साडेचार लाखांची लूट </a></p>
<p>या दरोड्यात अवदेवस्ती येथील नागरिकांचे सोन्याचे टॉप्स, मनी-मंगळसूत्र, सोन्याची फुले, सोन्याचे बदाम, रोख रक्कम व मोबाईल फोन लुटण्यात आले. तसेच नकाबाई शिंदे यांच्या घरातील सोन्याचे गंठन, मंछली, नथी आणि इतर दागिन्यांसह मोठ्या प्रमाणावर ऐवज चोरट्यांनी पळविला. याशिवाय मुकिंदा चलवादी यांचा मोबाईल फोन व हिरो होंडा फॅशन प्लस मोटारसायकल, तसेच विनय कदम यांची होंडा युनिकॉर्न मोटारसायकलही चोरट्यांनी लंपास केली.</p>
<p>या सर्व घटनांमध्ये एकूण 7 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याची नोंद करण्यात आली आहे. दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत अनेकांना मारहाण केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, दौंड शहरालगत घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.</p>
<p><a title="Fraud News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा" href="https://www.navarashtra.com/crime/a-shocking-incident-has-occurred-where-a-young-woman-was-defrauded-under-the-pretext-of-a-job-offer-1250836.html"> <span class="color-red">Fraud News </span>: नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>भारतातील विद्युत वाहन क्रांतीची चालना! ‘पीएम ई-ड्राइव्ह योजना’ काय आहे? सविस्तरपणे जाणून घ्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/pm-e-drive-scheme-explained-in-detail-1251074.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 20:49:33 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 20:49:33 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-85_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<category><![CDATA[prime minister]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251074</guid>

					<description><![CDATA[भारत सरकारने देशातील हरित आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये पीएम ई-ड्राइव्ह योजना सुरू केली होती. या योजनेचा उद्देश विद्युत वाहनांच्या वापरात वाढ करणे, प्रदूषण कमी करणे आणि देशात ई-वाहनांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणे हा आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-85_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Pm E Drive Scheme Explained In Detail"     /></figure><p>भारत सरकारने देशातील हरित आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी सप्टेंबर २०२४ मध्ये पीएम ई-ड्राइव्ह (PM Electric Drive Revolution in Innovative Vehicle Enhancement) योजना सुरू केली होती. या योजनेचा उद्देश <a href="https://www.navarashtra.com/topic/electric-vehicles">विद्युत वाहनांच्या</a> वापरात वाढ करणे, प्रदूषण कमी करणे आणि देशात ई-वाहनांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणे हा आहे. केंद्र सरकारने या योजनेसाठी सुमारे १०,९०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.</p>
<p>यापूर्वी केंद्र सरकारने फेम (FAME) आणि ईएमपीएस-२०२४ यांसारख्या योजना राबवल्या होत्या. त्या योजनांमुळे देशात इलेक्ट्रिक दुचाकी आणि तिनचाकी वाहनांचा वापर वाढला. त्याच अनुभवाच्या आधारे पीएम ई-ड्राइव्ह योजना आणण्यात आली असून ती सध्या देशभरात राबविली जात आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/plug-in-hybrid-vehicles-phev-india-ev-transition-piyush-goyal-cii-summit-2026-1246251.html">100 किमीची रेंज अन् पेट्रोलचा बॅकअप! सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणार नवीन प्लग-इन Hybrid Cars; पियुष गोयल यांचा खुलासा</a></p>
<p>या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी, तिनचाकी, ई-रिक्शा, ई-कार्ट, इलेक्ट्रिक बस, ट्रक आणि रुग्णवाहिका यांना प्रोत्साहन दिले जात आहे. पात्र वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बॅटरी क्षमतेनुसार अनुदान दिले जाते. त्यामुळे वाहनांची खरेदी किंमत कमी होऊन ग्राहकांना आर्थिक लाभ मिळतो. यामुळे अनेक नागरिकांनी पारंपरिक इंधनावरील वाहनांऐवजी विद्युत वाहनांचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.</p>
<p>योजनेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे देशभरात सार्वजनिक <a href="https://www.navarashtra.com/topic/electric-vehicles">ईव्ही</a> चार्जिंग स्टेशन उभारणे. यापूर्वी चार्जिंग सुविधांच्या अभावामुळे अनेक ग्राहक ई-वाहने खरेदी करण्यास संकोच करत होते. मात्र, आता सरकार चार्जिंग नेटवर्क वाढवत असल्याने ई-वाहनांचा वापर अधिक सुलभ होत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठीही ही योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. भारतीय वाहन उत्पादक कंपन्या नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स विकसित करत आहेत, तर बॅटरी उत्पादन आणि संबंधित उद्योगांमध्येही गुंतवणूक वाढत आहे. परिणामी रोजगारनिर्मितीला चालना मिळत आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/jioev-aries-74-kw-pro-ev-charger-launched-read-features-and-price-in-details-1236151.html">JioEV चा नवा धमाका! 4G, Wi-Fi आणि RFID फीचर्ससह स्मार्ट EV चार्जर लाँच; जाणून घ्या किंमत</a></p>
<p>एकूणच, पीएम ई-ड्राइव्ह योजना ही भारताच्या स्वच्छ ऊर्जा आणि हरित वाहतूक धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा ठरत असून भविष्यात देशातील विद्युत वाहन बाजाराला अधिक बळकटी देण्याची क्षमता या योजनेत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>राज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/ct-pet-ct-scan-mri-projects-maharashtra-healthcare-upgrade-hasan-mushrif-review-meeting-1251063.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 20:28:23 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 20:28:23 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/hasan-mushrif_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Hasan Mushrif]]></category>
		<category><![CDATA[Medical]]></category>
		<category><![CDATA[Medical Equipment]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251063</guid>

					<description><![CDATA[Hasan Mushrif वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या एमआरआय, सीटी स्कॅन आणि पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक निदान सुविधा वेळेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी मुंबई आणि नागपूर क्लस्टरमधील प्रलंबित प्रश्न ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/hasan-mushrif_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ct Pet Ct Scan Mri Projects Maharashtra Healthcare Upgrade Hasan Mushrif Review Meeting"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>राज्यातील वैद्यकीय विभागाची आढावा बैठक</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">
<strong>मुंबई</strong> : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या एमआरआय, सीटी स्कॅन आणि पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांच्या प्रगतीचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सविस्तर आढावा घेतला. मुंबई आणि नागपूर क्लस्टरमधील विविध प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना रुग्णांना दर्जेदार व अत्याधुनिक निदान सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.</span><p><a class="title" title="आंबेगाव तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई, लिंकिंग पद्धतीमुळे शेतकरी दुहेरी कचाट्यात; दोषींवर कारवाईची मागणी" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/farmers-in-ambegaon-taluka-are-facing-difficulties-due-to-a-shortage-of-urea-fertilizer-1250972.html"><span style="color: #3366ff;"> आंबेगाव तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई, लिंकिंग पद्धतीमुळे शेतकरी दुहेरी कचाट्यात; दोषींवर कारवाईची मागणी</span> </a></p>
<p style="text-align: justify;">एमआरआय, सीटी स्कॅन आणि पीईटी सीटी स्कॅनबाबत मंत्रालयात आढावा बैठक (मुंबई क्लस्टर, नागपूर क्लस्टर) झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, दूरदृष्य प्रणालीद्वारे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, छत्रपती संभाजीनगर, मिरज, कोल्हापूर, बारामती, पुणे, नांदेड, लातूर, <a href="https://www.navarashtra.com/topic/solapur-news">सोलापूर</a>, चंद्रपूर, अंबाजोगाई, सिंधुदुर्ग, नागपूर, यवतमाळ, अकोलाचे अधिष्ठाता उपस्थित होते.</p>
<p style="text-align: justify;">
वैद्यकीय शिक्षण मंत्री <a href="https://www.navarashtra.com/topic/hasan-mushrif">हसन मुश्रीफ</a> म्हणाले की, एमआरआय, सीटी स्कॅन आणि पीईटी सीटी स्कॅन या सुविधा रुग्णांच्या अचूक व वेळेवर निदानासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी शासन आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे. रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सुविधा विस्तार, देखभाल आणि कार्यक्षम अंमलबजावणी यावर विशेष भर देण्यात येत आहे,</p>
<p style="text-align: justify;">राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक निदान सुविधा उभारण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार असून, सर्वसामान्य रुग्णांना गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवा उपलब्ध होतील, असा विश्वासही मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="ST workers protest : एसटी सेवा ठप्प होणार" href="https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-st-workers-joint-action-committee-indefinite-protest-chakka-jam-1250993.html"> <span class="color-red">ST workers protest </span>: एसटी सेवा ठप्प होणार? प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीकडून बेमुदत आंदोलनाची घोषणा </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>सॅमसंगकडून ‘द बिग बीस्पोक एआय फेस्ट&#8217;ची घोषणा;  होम अप्लायन्सेस श्रेणीवर आकर्षक समर ऑफर्स!</title>
		<link>https://www.navarashtra.com/technology/samsung-india-announces-the-big-bespoke-ai-fest-tech-sector-1250975.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 20:27:28 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 20:27:28 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-84_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विज्ञान तंत्रज्ञान]]></category>
		<category><![CDATA[offers]]></category>
		<category><![CDATA[samsung]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250975</guid>

					<description><![CDATA[सॅमसंग इंडियाने आज द बिग बीस्पोक एआय फेस्टची घोषणा केली आहे. हा फेस्ट १२ जून ते १९ जुलै २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. या फेस्‍टदरम्‍यान कंपनीच्या बीस्पोक एआय होम अप्लायन्सेस पोर्टफोलिओवर आकर्षक समर डील्स उपलब्ध असतील.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-84_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Samsung India Announces The Big Bespoke Ai Fest Tech Sector"     /></figure><p>मुंबई, ११ जून २०२६: <a href="https://www.navarashtra.com/topic/samsung">सॅमसंग</a> इंडियाने आज द बिग बीस्पोक एआय फेस्टची घोषणा केली आहे. हा फेस्ट १२ जून ते १९ जुलै २०२६ या कालावधीत सुरू राहणार आहे. या फेस्&#x200d;टदरम्&#x200d;यान कंपनीच्या बीस्पोक एआय होम अप्लायन्सेस पोर्टफोलिओवर आकर्षक समर डील्स उपलब्ध असतील. या उन्हाळ्यात एआय-सज्ज आधुनिक जीवनशैलीचा आनंद घेणे ग्राहकांसाठी अधिक सुलभ व्हावे, यासाठी निवडक बीस्पोक एआय रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, एअर कंडिशनर्स आणि इतर होम अप्&#x200d;लायन्&#x200d;सेसवर ग्राहक २०,००० रूपयांपर्यंत कॅशबॅक आणि विस्तारित वॉरंटी फायद्यांचा आनंद घेऊ शकतात.</p>
<p>या ऑफरसाठी पात्र असलेले रेफ्रिजरेटर्स आणि वॉशिंग मशिन्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एक वर्षाच्या विस्तारित वॉरंटीचे पैसे भरून सॅमसंग केअर+ च्या माध्यमातून अतिरिक्त दोन वर्षांची वॉरंटी मोफत मिळू शकते. तसेच, सिंगल डोअर रेफ्रिजरेटर्ससाठी ग्राहक फक्त ९९ रूपयांमध्ये एक वर्षाची विस्तारित वॉरंटी मिळवू शकतात.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/business/personal-finance-how-to-claim-bank-account-balance-epf-insurance-money-after-death-guide-see-more-details-1219907.html">नातेवाईकाच्या मृत्यूनंतर Bank, EPF आणि विम्याचे पैसे कसे मिळवायचे? जाणून घ्या संपूर्ण कायदेशीर प्रोसेस</a></p>
<p>ग्राहकांना निवडक टॉप लोड वॉशिंग मशिन्सच्या इन्स्टॉलेशनसोबत एक मोफत फिल्टर देखील मिळेल. हा फिल्टर मशिनचे धूळ आणि गंज लागण्यापासून संरक्षण करतो, ज्यामुळे मशिनचा टिकाऊपणा वाढतो. याव्यतिरिक्त, सॅमसंग <a href="https://www.navarashtra.com/topic/finance">फायनान्स</a>+ वापरणाऱ्या ग्राहकांसाठी या ऑफरमध्ये १,००० रूपयांपर्यंतच्या कॅशबॅकचा समावेश आहे. सॅमसंग फायनान्स+ ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी आणि सॅमसंग अप्&#x200d;लायन्&#x200d;सेस खरेदी करण्यासाठी सुलभ पर्याय उपलब्ध करून देण्याकरिता पूर्णपणे डिजिटल आणि कागदविरहित प्रक्रिया प्रदान करते.</p>
<p>तसेच, ग्राहक एअर कंडिशनर्सवर ५ वर्षांच्या सर्वसमावेशक वॉरंटीचा लाभ घेऊ शकतात, ज्यामधून दीर्घकालीन विश्वासार्हता आणि मनःशांती मिळते. द बिग बीस्पोक एआय फेस्टच्या या ऑफर्स सॅमसंग डॉटकॉम, प्रमुख ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर आणि भारतातील निवडक रिटेल आउटलेट्समध्&#x200d;ये उपलब्ध आहेत.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/business/money-management-tips-india-save-money-budgeting-emergency-fund-financial-planning-guide-marathi-news-1189560.html">रिकामे खिसे आणि प्रचंड मानसिक ताण? तुमची ‘Financial Health’ सुधारण्याचे खात्रीशीर उपाय, वाचा सविस्तर</a></p>
<p>प्रगत एआय आणि स्मार्ट कनेक्टिव्हिटीवर आधारित सॅमसंगची बीस्पोक एआय अप्&#x200d;लायन्&#x200d;सेस अधिक स्मार्ट, सुलभ आणि ऊर्जा-कार्यक्षम पर्याय देतात. बीस्पोक एआय एअर कंडिशनर्स जलद कूलिंग देतात आणि सातत्यपूर्ण आरामासाठी हवेचा प्रवाह आपोआप समायोजित करतात. स्मार्टथिंग्स होम केअरशी जोडलेले हे एसी कामगिरीवर सक्रियपणे लक्ष ठेवतात, गॅसची कमतरता किंवा फिल्टर साफ करणे यांसारख्या समस्या शोधतात आणि वापरकर्त्यांना आगाऊ सूचित करतात.</p>
<p>किचनमध्&#x200d;ये, बीस्पोक एआय रेफ्रिजरेटर्स सॅमसंगच्या कनेक्टेड परिसंस्&#x200d;थेद्वारे एआय-सज्ज सोयीस्करता आणि विनासायास होम मॅनेजमेंट प्रदान करतात. दुसरीकडे, बीस्पोक एआय वॉशिंग मशिन्स कार्यक्षम आणि प्रभावी स्वच्छतेसाठी कपडे धुण्याची प्रक्रिया (वॉश सायकल्&#x200d;स) अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी एआयचा वापर करतात.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>BAN Vs AUS Live: ऑस्ट्रेलियाचा सुपडासाफ; बांग्लादेशने सामना जिंकत मालिकेवर केला कब्जा</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/bangladesh-team-beat-austrelia-by-5-wickets-and-win-series-1251054.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 20:24:00 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 20:24:00 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T202301.207_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[Australia Team]]></category>
		<category><![CDATA[Bangladesh Cricket]]></category>
		<category><![CDATA[ODI Series]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251054</guid>

					<description><![CDATA[ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशला 188 रन्सचे टार्गेट दिले होते. त्या रन्सचा पाठलाग करण्यासाठी तन्झिद हसन तमीम आणि सौम्य सरकारने बांग्लादेशच्या डावाची सुरुवात केली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T202301.207_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Bangladesh Team Beat Austrelia By 5 Wickets And Win Series"     /></figure><p><strong>बांगलादेशचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजय</strong><br />
<strong>ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने केली मात </strong><br />
<strong>सौम्य सरकारची महत्वाची खेळी</strong></p>
<p><strong>Bangladesh Vs Austrelia:</strong> आज <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/bangladesh-cricket">बांग्लादेश</a> </strong></span>आणि <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/team-australia">ऑस्ट्रेलिया</a> </strong></span>यांच्यात तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दूसरा सामना पार पडला. या सामन्यात बांग्लादेशच्या संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासोबत बांग्लादेशने 2-0 ने मालिका आपल्या खिशात घातली आहे. दरम्यान सौम्य सरकारने बांग्लादेशकडून सर्वाधिक रन्स केल्या. डीएलएस सिस्टिमने बांग्लादेशचा विजय झाला आहे.</p>
<p><strong>बांग्लादेशची फलंदाजी</strong></p>
<p>ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशला 188 रन्सचे टार्गेट दिले होते. त्या रन्सचा पाठलाग करण्यासाठी तन्झिद हसन तमीम आणि सौम्य सरकारने बांग्लादेशच्या डावाची सुरुवात केली. मात्र तन्झिद हसन तमीम शून्यावर आउट झाला. तर सौम्य सरकारने 42 रन्सची शानदार खेळी केली.  नजमुल हुसेन शांतोने देखील 41 रन्सची खेळी केली. लिटन दासने 21 रन्सची खेळी केली. तौहीदने 40 रन्सची खेळी करत बांग्लादेशचा विजयाचा मार्ग सुकर केला.</p>
<p><strong>ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज शून्यावर आउट<br />
</strong></p>
<p>दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय एकदम चुकीचा ठरला, दुसऱ्या सामन्यात  ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने अशाच एका थक्क करणाऱ्या आणि ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज शून्यावर आउट झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला तीन फलंदाज शून्यावर आउट झाले असताना मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी शानदार खेळी करत सांनीयचे चित्र बदलून टाकले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/bangladesh-team-out-three-australia-batsman-in-zero-odi-series-1250859.html">AUS Vs BAN Live: धडाधड कोसळली! ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज शून्यावर आउट; बांग्लादेशचा कहर</a></strong></span></p>
<p>मॅथ्यू शॉर्ट, कुपर कोनोली, मॅट रेनशॉ हे तीन फलंदाज शून्यावर आउट झाले. एकही रन स्कोअरबोर्डवर नसताना ऑस्ट्रेलियाचे तीन प्रमुख फलंदाज आउट झाले. तर कॅमेरून ग्रीन 21 रन्सकरून आउट झाला. अलेक्स कॅरीने 24 रन्स केल्या. मिडल ऑर्डरच्या खेळीमुळे 187 रन्सपर्यन्त मजल मारली आहे. आता बांग्लादेशला जिंकण्यासाठी 188 रन्सची गरज असणार आहे. ऑस्ट्रेलियाची सुरुवात एका भीषण स्वरूपाची झाली. तीन फलंदाज शून्यावर आउट झाले. बांग्लादेशच्या गोलंदाजांनी मैदानावर भेदक गोलंदाजीने धुमाकूळ घातला.</p>
<p>या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी ७ व्या क्रमांकावर किंवा त्याहून खाली खेळणाऱ्या दोन फलंदाजांनी अर्धशतक खेळी केली आहे. ७ व्या क्रमांकावरील बार्टलेटने ५० आणि त्याच्यासोबत भागीदारी करणाऱ्या लोअर ऑर्डरच्या या लढ्याने ऑस्ट्रेलियाच्या त्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली, जेव्हा मायकेल बेवन, अँडी बिशेल किंवा शेन वॉर्न यांसारखे खेळाडू तळाला येऊन संघाला संकटातून बाहेर काढत असत.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>कोटक एज्युकेशन फाउंडेशनची &#8216;फ्युचर का गोल्डन टिकीट&#8217; कोटक ज्युनियर स्कॉलरशिप योजना जाहीर</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/kotak-education-foundation-announces-future-ka-golden-ticket-kotak-junior-scholarship-scheme-1251058.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 20:17:44 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 20:17:44 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T201646.391_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[Kotak]]></category>
		<category><![CDATA[Kotak Education Foundation]]></category>
		<category><![CDATA[Scholarship Exam]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251058</guid>

					<description><![CDATA[“Future Ka Ticket.” ही योजना मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील १००० बुद्धिमान विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी रचली गेली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T201646.391_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Kotak Education Foundation Announces Future Ka Golden Ticket Kotak Junior Scholarship Scheme"     /></figure><p>कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF) – कोटक महिंद्रा ग्रुपचा CSR कार्यान्वयन संस्था – घेऊन आली आहे कोटक ज्युनियर स्कॉलरशिप, ज्याला KEF प्रेमाने म्हणते “Future Ka Ticket.” ही योजना मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील १००० बुद्धिमान विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी रचली गेली आहे. ही शिष्यवृत्ती केवळ आर्थिक मदत देत नाही, तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक विकासासाठी सर्वंकष पाठबळ देते,तरुण प्रतिभेला उंच भरारी घेण्यासाठी.</p>
<p>या शिष्यवृत्तीद्वारे विद्यार्थ्यांना २१ महिन्यांच्या कालावधीत एकूण ₹७३,५०० आर्थिक मदत दिली जाते, जी इयत्ता ११ आणि १२ साठी आहे. केवळ आर्थिक मदतीपुरते मर्यादित न राहता, या कार्यक्रमात वैयक्तिक मार्गदर्शन, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा तयारी, होम व्हिजिट्स आणि इतर सर्वांगीण विकासासाठी मदत दिली जाते. या उपक्रमातून केवळ शिक्षणच नव्हे, तर उद्याचे व्यावसायिक, उद्योजक आणि समाजनेते घडवले जात आहेत.</p>
<p>गेल्या १८+ वर्षांमध्ये KEF च्या शिष्यवृत्ती उपक्रमाने ६,००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला आहे, ज्यापैकी १,८०० पेक्षा जास्त विद्यार्थी आता यशस्वी माजी विद्यार्थी म्हणून उभे आहेत.</p>
<p>“KEF मध्ये आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला मोठं स्वप्न पाहण्याच आणि ते पूर्ण करण्याची संधी मिळायला हवी. ‘Future Ka Ticket’ ही केवळ शिष्यवृत्ती नाही, तर तरुण परिवर्तनकर्त्यांच्या प्रवासात त्यांच्या सोबत चालण्याची आमची बांधिलकी आहे,” असे कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या कार्यकारिणी सदस्या आणि शिष्यवृत्ती प्रमुख सौ. आरती कौलगुड यांनी सांगितले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="M.Tech Scholarship 2026: M.Tech विद्यार्थ्यांसाठी UGC ची मोठी भेट; दरमहा ७,८०० रुपयांसह दरवर्षी मिळणार अतिरिक्त आर्थिक मदत!" href="https://www.navarashtra.com/career/mtech-scholarship-schemes-2026-aicte-pg-scholarship-ugc-marathi-news-1250877.html"><strong> <span class="color-red">M.Tech Scholarship 2026</span>: M.Tech विद्यार्थ्यांसाठी UGC ची मोठी भेट; दरमहा ७,८०० रुपयांसह दरवर्षी मिळणार अतिरिक्त आर्थिक मदत!</strong> </a></span></p>
<h3>कोटक ज्युनियर स्कॉलरशिप अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा :</h3>
<p>इयत्ता ११ आणि १२ साठी दरमहा ₹३,५०० (२१ महिन्यांमध्ये एकूण ₹७३,५००)</p>
<p>एक-ते-एक वैयक्तिक मार्गदर्शन व शैक्षणिक सहाय्य</p>
<p>करिअर मार्गदर्शन व शैक्षणिक क्षेत्रातले अनुभवभेटी</p>
<p>स्पर्धा परीक्षांसाठी तयारी</p>
<p>नियमित होम व्हिजिट्स</p>
<h3>पात्रता निकष:</h3>
<p>SSC/CBSE/ICSE इयत्ता १० बोर्ड परीक्षेत ८५% पेक्षा जास्त गुण</p>
<p>मुंबईतील महाविद्यालयात इयत्ता ११ मध्ये प्रवेश घेतलेला असावा</p>
<p>वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹३,२०,००० पेक्षा कमी</p>
<p>मुंबई महानगर प्रदेश (MMR) मधील रहिवासी असावा</p>
<p>कोटक कर्मा ही कोटक महिंद्रा ग्रुपची CSR ओळख आहे, जी शाश्वत आणि समावेशी समाजविकासाच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="एएम/एनएस इंडिया आणि बिट्स पिलानीच्या सहकार्याने पहिल्या एमबीए बॅचचा पदवीदान समारंभ; क्षमता विकासाला नवी दिशा" href="https://www.navarashtra.com/career/convocation-ceremony-of-the-first-mba-batch-in-collaboration-with-amns-india-and-bits-pilani-1251022.html"> एएम/एनएस इंडिया आणि बिट्स पिलानीच्या सहकार्याने पहिल्या एमबीए बॅचचा पदवीदान समारंभ; क्षमता विकासाला नवी दिशा </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>रोज वापरली जाणारी टॅल्कम पावडर वाढवेल गंभीर आजाराला धोका, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/talcum-powder-health-risks-experts-warn-about-long-term-side-effects-lifestyle-news-in-marathi-1250583.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नुपूर भगत]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 20:15:55 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 13:35:02 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/image-8-7_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[cancer]]></category>
		<category><![CDATA[Health Tips]]></category>
		<category><![CDATA[lifestyle news]]></category>
		<category><![CDATA[lifestyle tips]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250583</guid>

					<description><![CDATA[Talcum Powder : दररोज त्वचेवर वापरली जाणारी टाल्कम पावडर अनेक आजारांचा धोका वाढवू शकते. डाॅक्टर लहान मुलांवर या पावडरचा वापर न करण्याचा सल्ला देतता. टाल्कम पावडरमुळे कोणते आजार वाढू शकतात ते जाणून घ्या.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/image-8-7_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Talcum Powder Health Risks Experts Warn About Long Term Side Effects Lifestyle News In Marathi"     /></figure><ul>
<li>रोजच्या वापरातील एका लोकप्रिय उत्पादनाबाबत तज्ज्ञांनी आरोग्यविषयक चिंता व्यक्त केली आहे.</li>
<li>काही सौंदर्यप्रसाधने आणि वैयक्तिक निगा उत्पादनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांवर सध्या चर्चा सुरू आहे.</li>
<li>विशेषतः लहान मुले आणि संवेदनशील त्वचा असलेल्या व्यक्तींनी काही गोष्टींची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.</li>
</ul><span class="bullet-text">रोजच्या वापरात अनेकजण टॅल्कम पावडरचा वापर करतात पण तुम्हाला माहितीये का"color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" href="https://www.navarashtra.com/topic/cancer">कॅन्सरचा</a> </span>धोका अनेक पटींनी वाढतो. याचा वापर फुफ्फुसे आणि त्वचेच्या रोगाचाही धोका वाढवू शकतात. विशेषत: लहान मुलांसाठी या पावडरने चुकूनही वापर करु नये. फक्त सामान्य पावडर नाही तर अनेक ब्यूटी प्रोडक्टसमध्येही टाल्कम पावडरचा वापर केला जातो ज्यामुळे असे प्रोडक्ट्स रोजच्या जीवनात वापरु नये. त्यांचा अतिवापर कमी करावा. टाल्कम पावडरचा सतत वापर शरीरातील नैसर्गिक तेल पटकन शोषून घेतो ज्यामुळे चेहरा ड्राय पडू लागतो.</span><p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="वीजेचे बिल शून्याच्या जवळ आणायचंय" href="https://www.navarashtra.com/lifestyle/solar-panel-installation-mistakes-to-avoid-for-lower-electricity-bills-1249546.html"><strong> वीजेचे बिल शून्याच्या जवळ आणायचंय? मग Solar Panel बसवताना या 4 चूका अजिबात करु नका</strong> </a></span></p>
<p><strong>टॅल्क म्हणजे काय? </strong></p>
<p>टॅल्क ही साधारणपणे नैसर्गिकरित्या आढळणारी चिकणमाती आहे जी मॅग्नेशियम सिलिकेटपासून बनवली जाते. यात मॅग्नेशीयम, ऑक्सीजन आणि सिलिकाॅनसारखे घटक मसळलेले असतात. पृथ्वीवरील सर्वात मऊ खनिज मानले जाते जे बारीक करुन त्याच्यापासून टॅल्कम पावडर तयार केली जाते. टॅल्क हा सामान्यपणे धोकादायक नसतो. ब्यूटी प्रोडक्ट्समध्येही याचा वापर सुरक्षित मानला जातो परंतु टॅल्कमध्ये एस्बेस्टॉस देखील असतो जो कर्करोगाचे एक प्रमुख कारण आहे. तो टॅल्कच्या जवळच्या परिसरात आढळतो. टॅल्कसोबतच त्याचेही उत्खनन केले जाते.</p>
<p>टॅल्कम पावडर आणि टॅल्कयुक्त मेकअप उत्पादने काही तज्ज्ञांच्या मते संभाव्यतः असुरक्षित मानली जातात, कारण टॅल्क पूर्णपणे ॲस्बेस्टॉस-मुक्त आहे की नाही किंवा त्यापासून तयार केलेले उत्पादन वापरण्यास सुरक्षित आहे की नाही, हे निश्चितपणे ठरवण्यासाठी एकसमान आणि सार्वत्रिक मानके उपलब्ध नाहीत.</p>
<p><strong>कोणत्या ब्यूटी प्रोडक्समध्ये टॅल्कचा वापर होतो?</strong></p>
<p>ब्लश, आय शॅडो, कॉम्पॅक्ट पावडर आणि इतर मॅटिफायिंग मेकअप प्रोडक्ट्स. याशिवाय बेबी प्रोडक्ट्समध्येही याचा वापर होतो. प्लास्टिक आणि रबरी वस्तूंची टिकाऊपणा वाढवण्यासाठी, पेंट, सिरॅमिक आणि कागद बनवण्यासाठीही याचा वापर केला जातो.</p>
<p><strong>शरीराला काय धोका होतो?</strong></p>
<p>टॅल्कम पावडरचे नुकसान लगेच दिसून येत नाही. पण जर तुम्ही अधिक काळापासून या पावडरचा वापर करत असाल तर काळासोबत तुमच्या त्वचेच तुम्हाला काही बदल झालेले दिसून येतील.</p>
<p><strong>त्वचेची छिद्रे बंद होणे आणि मुरुमे</strong></p>
<p>जेव्हा सतत किंवा दररोज टॅल्कम पावडरचा वापर केला जातो तेव्हा याचे कण त्वचेवर साचून हळूहळू त्वचेची छिद्रे बंद करतात. यामुळे त्वचेवरील घाण आणि तेल दूर करता येत नाही. परिणामी त्वचेवर मुरुमांची समस्या जाणवू लागते.</p>
<p><strong>संवेदनशील त्वचा</strong></p>
<p>टॅल्क फार वेगाने त्वचेतील ओलावा शोषून घेते ज्यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते. टॅल्कच्या सततच्या वापरामुळे त्वचा संवेदनशील होऊ शकते. त्वचेवरील ओलावा दूर केल्यामुळे टॅल्क त्वचेवरील संरक्षण थर कमकुवत करतो. यामुळे त्वचेला खाज सुटते आणि पुरळ होण्याची समस्या जाणवू लागते.</p>
<p><strong>लहान मुलांसाठी हानिकारक</strong></p>
<p>बालरोगतज्ञ कधीही मुलांवर टॅल्कम पावडरचा वापर न करण्याचा सल्ला देतात. अनेकदा लहान मुलांच्या गुप्तांगावर पावडरचा वापर केला जातो. टॅल्कमुळे त्या भागात खाज सुटु शकते आणि संवेदनशिलता येऊ शकते. तसेच, श्वासावाटे ही पावडर शरीराच्या आत गेल्यास फुफ्फुसांनाही धोका निर्माण होऊ शकतो.</p>
<p><span style="color: #0000ff;"><a style="color: #0000ff;" title="दर आठवड्याला २ ते ३ महिलांमध्ये आढळतात रक्तस्त्रावासंबंधी विकारांची लक्षणे; वेळीच निदान आणि जनजागृतीची अत्यावश्यकता" href="https://www.navarashtra.com/lifestyle/symptoms-of-bleeding-disorders-found-in-2-to-3-women-every-week-urgent-need-for-timely-diagnosis-and-public-awareness-1250499.html"><strong> दर आठवड्याला २ ते ३ महिलांमध्ये आढळतात रक्तस्त्रावासंबंधी विकारांची लक्षणे; वेळीच निदान आणि जनजागृतीची अत्यावश्यकता</strong> </a></span></p>
<p><strong>शरीराला नुकसान</strong></p>
<p>टॅल्कमध्ये ॲस्बेस्टॉस असल्याने जर ते नाकावाटे फुफ्फुसांमध्ये गेले तर यामुळे आजाराचा धोका वाढू शकतो. यामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोकाही वाढू शकतो. महिलांमध्ये यामुळे ओव्हरीयन कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>नेमकं चाललंय काय? चीन करतंय पोती भरुन सोन्याची खरेदी, सुरु झाले जगावर आर्थिक संकट येण्याचे संकेत?</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/why-is-china-buying-massive-gold-worth-3-4-lakh-crore-global-economic-crisis-rumors-see-more-details-1251021.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Ankita Karangutkar]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 20:12:30 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 19:41:22 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T193947.190_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[China]]></category>
		<category><![CDATA[Gold]]></category>
		<category><![CDATA[Gold mine]]></category>
		<category><![CDATA[Gold Price]]></category>
		<category><![CDATA[gold prices today]]></category>
		<category><![CDATA[Gold Rate]]></category>
		<category><![CDATA[Indian]]></category>
		<category><![CDATA[Inflation]]></category>
		<category><![CDATA[Iran Israel Conflict]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251021</guid>

					<description><![CDATA[सध्याच्या जागतिक परिस्थिती बरीच बिकट होत आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम होत असून, भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, इतर देशांच्या हालचालींकडेही बारकाईने लक्ष दिले जात आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T193947.190_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Why Is China Buying Massive Gold Worth 3 4 Lakh Crore Global Economic Crisis Rumors See More Details"     /></figure><p style="text-align: justify;">सध्याच्या जागतिक परिस्थिती बरीच बिकट होत आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे जगभरातील अर्थव्यवस्थांवर परिणाम होत असून, भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, इतर देशांच्या हालचालींकडेही बारकाईने लक्ष दिले जात आहे. उदाहरणार्थ, चीनने अलीकडेच मोठ्या प्रमाणात सोने साठवण्यास सुरुवात केली आहे. पण चीननं हे पाऊल का उचललंय? समजून घेऊयात</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="आता याचेही दर वाढले… केस कापणं, दाढी करणं महागलं, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुपयांनी वाढ" href="https://www.navarashtra.com/business/salon-services-rates-hike-haircut-and-shaving-prices-increased-marathi-news-1250967.html"> आता याचेही दर वाढले… केस कापणं, दाढी करणं महागलं, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुपयांनी वाढ </a></span></p>
<h3 style="text-align: justify;">चीनकडून सोन्याचा साठा</h3>
<p style="text-align: justify;">चीनची मध्यवर्ती बँक, &#8216;पीपल्स बँक ऑफ चायना&#8217; (PBoC), सलग १९ महिन्यांपासून आपल्या <a href="https://www.navarashtra.com/topic/gold-rate-today">सोन्या</a>च्या साठ्यात वाढ करत आहे. मे २०२४ मध्ये या बँकेने सुमारे १० टन सोने खरेदी केले, ज्यामुळे चीनचा एकूण अधिकृत सोन्याचा साठा २,३३१.५ टनांवर पोहोचला आहे. याव्यतिरिक्त, चीनचा परकीय चलन साठा ३.४४ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला आहे. जो एप्रिलच्या तुलनेत ३१.७ अब्ज डॉलर्सने अधिक आहे. नोव्हेंबर २०१५ नंतरची ही परकीय चलन साठ्याची सर्वोच्च पातळी आहे. गेल्या १० महिन्यांपासून चीनचा परकीय चलन साठा सातत्याने ३.३ ट्रिलियन डॉलर्सच्या वर राहिला आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">चीनचा परकीय चलन साठा का वाढत आहे?</h3>
<p style="text-align: justify;">चीनच्या परकीय चलन नियामक संस्थेच्या (SAFE) मते, अमेरिकन डॉलरचे बळकट मूल्य आणि जागतिक स्तरावर मालमत्तेच्या किमतीत झालेली वाढ यांमुळे ही वाढ झाली आहे. चीनची दमदार निर्यात हा देखील परकीय चलन साठा वाढण्यामागचा एक प्रमुख घटक आहे. जानेवारी ते एप्रिल २०२६ या काळात, चीनच्या एकूण परकीय व्यापारात सुमारे १५% वाढ होऊन तो २.३९ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचला.<br />
तरीही, चीनमध्ये सोन्याच्या मागणीत घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या महिन्यात १४ गोल्ड ईटीएफ (Gold ETFs) मधून सुमारे १.४८ अब्ज डॉलर्स काढून घेण्यात आले आहेत. किमती कमी असताना सोने खरेदी करण्याची रणनीती यापूर्वी गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय होती, परंतु किमतींमधील अस्थिरतेमुळे आता या दृष्टिकोनाबाबत मते विभागली जात आहेत.</p>
<h3 style="text-align: justify;">शेअरच्या किमतीत मोठी घसरण</h3>
<p style="text-align: justify;">याव्यतिरिक्त, हाँगकाँगमध्ये सूचीबद्ध असलेल्या अनेक चिनी सुवर्ण कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. दरम्यान, शांघाय गोल्ड एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात सोन्याचा उठाव (withdrawals) ६३.५ टनांपर्यंत खाली आला—ही फेब्रुवारी २०२० नंतरची सर्वात नीचांकी पातळी आहे आणि मार्चमध्ये नोंदवलेल्या प्रमाणाच्या तुलनेत ती साधारणपणे निम्मी आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">आर्थिक संकट ओढवणार का?</h3>
<p style="text-align: justify;">चीनच्या या पावलावरून असे दिसून येते की, आगामी काळ काहीसा आव्हानात्मक असू शकतो. मध्य पूर्वेतील तणावामुळे महागाई आधीच वाढत असताना, चीनच्या या निर्णयामुळे आर्थिक संकटही ओढवू शकते असे संकेत मिळत आहेत आणि देश कदाचित याचीच तयारी करत असल्याचे दिसते. यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नसली, तरी सध्याच्या परिस्थितीमुळे अशा प्रकारचा अंदाज लावला जात आहे.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="मोठी लॉटरी! Tata आणि Adani ग्रुपकडून बंपर डिव्हिडंड, जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या शेअर्सने होणार बंफर फायदा" href="https://www.navarashtra.com/business/tata-and-adani-group-stocks-announces-bumper-dividend-payout-list-see-more-details-1250643.html"> मोठी लॉटरी! Tata आणि Adani ग्रुपकडून बंपर डिव्हिडंड, जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या शेअर्सने होणार बंफर फायदा </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>JioHotstar वरील TADKA ने गाठला 100 दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा; मायक्रो-कंटेंट मनोरंजनाची लोकप्रियता वाढली</title>
		<link>https://www.navarashtra.com/movies/tadka-on-jiohotstar-hits-the-100-million-user-milestone-1251051.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिवेश चव्हाण]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 20:10:21 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 20:10:21 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T200943.601_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[सिनेमा]]></category>
		<category><![CDATA[JioHotstar]]></category>
		<category><![CDATA[latest movies]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251051</guid>

					<description><![CDATA[JioHotstar वरील TADKA या मायक्रो-कंटेंट प्लॅटफॉर्मने 100 दशलक्ष (10 कोटी) वापरकर्त्यांचा टप्पा पार करत डिजिटल मनोरंजन क्षेत्रात नवा विक्रम नोंदवला आहे. लॉन्चनंतर प्रत्येक प्रेक्षकाचा दैनंदिन वॉचटाइम पाचपट वाढल्याने या फॉरमॅटला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T200943.601_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Tadka On Jiohotstar Hits The 100 Million User Milestone"     /></figure><p>भारतातील डिजिटल मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठत JioHotstar वरील TADKA या मायक्रो-कंटेंट प्लॅटफॉर्मने 100 दशलक्ष (10 कोटी) वापरकर्त्यांचा आकडा पार केला आहे. या यशामुळे प्रीमियम मायक्रो-कंटेंट हा स्वतंत्र आणि मुख्य प्रवाहातील मनोरंजनाचा प्रकार म्हणून उदयास आल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाइल-फर्स्ट प्रेक्षकांमध्ये लघु स्वरूपातील कंटेंटची वाढती लोकप्रियता आणि बदलत्या मनोरंजन सवयींचे हे मोठे उदाहरण मानले जात आहे.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Aamchya Ladkya Naik Bai : ‘अभी तो शूटिंग सुरु हुई है’ झाला हो श्रीगणेशा! ऐश्वर्या नारकरची नवी मालिका, मुहूर्त पडला पार" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/aamchya-ladkya-naik-bai-shooting-started-1250817.html"><span class="color-red">Aamchya Ladkya Naik Bai </span>: ‘अभी तो शूटिंग सुरु हुई है’ झाला हो श्रीगणेशा! ऐश्वर्या नारकरची नवी मालिका, मुहूर्त पडला पार</a></span></h3>
<p>कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, TADKA च्या प्रारंभिक टप्प्यापासून प्रत्येक प्रेक्षकाच्या दैनंदिन वॉचटाइममध्ये पाचपट वाढ झाली आहे. यावरून या फॉरमॅटला प्रेक्षकांकडून सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. विविध वयोगटांतील तसेच देशभरातील प्रेक्षकांनी या प्लॅटफॉर्मचा स्वीकार केल्याने मायक्रो-कंटेंटच्या वाढत्या प्रभावाची नोंद घेण्यात येत आहे.</p>
<p>TADKA च्या प्रेक्षकवर्गात तरुणांचा मोठा वाटा आहे. एकूण प्रेक्षकांपैकी 42 टक्क्यांहून अधिक प्रेक्षकांचे वय 24 वर्षांखालील आहे. तसेच महानगरांमधील आणि टियर-2 शहरांमधील प्रेक्षक प्रत्येकी सुमारे 40 टक्के वॉचटाइममध्ये योगदान देत आहेत. यामुळे प्रीमियम, मोबाइल-केंद्रित आणि जलद मनोरंजनाच्या स्वरूपाला देशभरातून पसंती मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.</p>
<p>मायक्रो-कंटेंटची वाढती मागणी कंटेंट निर्मितीच्या पद्धतीतही बदल घडवून आणत आहे. पारंपरिक मनोरंजन केंद्रांपलीकडे जाऊन आता मुंबई, दिल्ली, लखनौ, इंदूर, हैदराबाद, बेंगळुरू आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीकरण सुरू आहे. त्यामुळे विविध भाषा, संस्कृती आणि प्रदेशांतील कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असून अधिक व्यापक आणि वैविध्यपूर्ण क्रिएटिव्ह इकोसिस्टम तयार होत आहे.</p>
<p>JioHotstar प्लॅटफॉर्मवर सुरू करण्यात आलेल्या TADKA मध्ये 100 हून अधिक मूळ (ओरिजिनल) शीर्षकांचा समावेश आहे. 30 ते 60 सेकंदांच्या उभ्या (व्हर्टिकल) आणि भागांमध्ये विभागलेल्या कथा मोबाइल वापरकर्त्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत. दैनंदिन भावना, नातेसंबंध, महत्त्वाकांक्षा आणि आधुनिक भारतीय जीवनशैली यांवर आधारित कथानकांमुळे या कंटेंटला मोठी पसंती मिळत आहे. रोमांस, ड्रामा, थ्रिलर, कॉमेडी, क्रीडा आणि युवा-केंद्रित कथा अशा विविध प्रकारांचा समावेश या प्लॅटफॉर्मवर करण्यात आला आहे. हिंदी, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये हा कंटेंट उपलब्ध आहे.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Krushnai chya Leki : आता होणार कहर…! ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री; साकारणार ‘हे’ महत्वाचं पात्र" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/ekta-labde-will-play-the-role-of-sharada-in-the-marathi-serial-krushnai-chya-leki-1250950.html"><span class="color-red">Krushnai chya Leki </span>: आता होणार कहर…! ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री; साकारणार ‘हे’ महत्वाचं पात्र</a></span></h3>
<p>या यशाबाबत प्रतिक्रिया देताना JioStar चे मायक्रो-कंटेंट विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष अंबुज कश्यप यांनी सांगितले की, &#8220;100 दशलक्ष वापरकर्त्यांचा टप्पा हा केवळ TADKA साठीच नव्हे, तर संपूर्ण स्ट्रीमिंग उद्योगासाठी महत्त्वाचा क्षण आहे. प्रेक्षकांच्या पाहण्याच्या सवयी बदलत असून, दिवसातील विविध क्षणांमध्ये सहज बसणाऱ्या कथाकथनासाठी नव्या संधी निर्माण होत आहेत. मायक्रो-कंटेंट हा आता एक स्वतंत्र आणि प्रभावी मनोरंजन प्रकार बनत आहे.&#8221;</p>
<p>JioHotstar च्या व्यापक मनोरंजन धोरणाचा TADKA हा एक महत्त्वाचा भाग आहे. बदलत्या ग्राहक सवयींनुसार प्लॅटफॉर्म सातत्याने नवनवीन अनुभव विकसित करत आहे. इंटरअॅक्टिव्ह कॉमर्स, सेकंड-स्क्रीन अनुभव आणि मायक्रो-कंटेंटसारख्या नवकल्पनांद्वारे प्रेक्षक आणि कथांमधील नाते अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.</p>
<p>सध्या 500 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्ते आणि 3 लाख तासांहून अधिक कंटेंट लायब्ररीसह JioHotstar हे जगातील सर्वात मोठ्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मपैकी एक मानले जाते. TADKA च्या यशामुळे भारतातील डिजिटल मनोरंजनाच्या नव्या पर्वाला अधिक गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;३७० ची बिर्याणी&#8217; विवाद नडला! प्रणित मोरे आणि हिमांशूला राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स; डीजीपींना कडक कारवाईचे आदेश</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/article-370-biryani-controversy-backfires-national-commission-for-women-summons-pranit-more-and-himanshu-1251036.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 20:05:16 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 20:05:16 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T200411.422_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[controversy]]></category>
		<category><![CDATA[Pranit More]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251036</guid>

					<description><![CDATA['३७० रुपयांची बिर्याणी' या टिप्पणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावरून वाद निर्माण झाला. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) आता प्रणित मोरे आणि ती टिप्पणी करणाऱ्या हिमांशू जांगरा यांना नोटीस बजावून आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T200411.422_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Article 370 Biryani Controversy Backfires National Commission For Women Summons Pranit More And Himanshu"     /></figure><ul>
<li>&#8216;३७० ची बिर्याणी&#8217; विवाद नडला!</li>
<li>प्रणित मोरे आणि हिमांशूला राष्ट्रीय महिला आयोगाचे समन्स</li>
<li>डीजीपींना कडक कारवाईचे आदेश</li>
</ul><span class="bullet-text"><strong>Pranit More Controversy:</strong> स्टँड-अप कॉमेडियन <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/pranit-more">प्रणित मोरे</a></span> एका शोदरम्यान महिलेबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे गंभीर अडचणीत सापडला आहे. &#8216;३७० रुपयांची बिर्याणी&#8217; या टिप्पणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणावरून वाद निर्माण झाला. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) आता प्रणित मोरे आणि ती टिप्पणी करणाऱ्या हिमांशू जांगरा यांना नोटीस बजावून आयोगासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.</span><blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">National Commission for Women (NCW) has taken suo motu cognizance of widely reported media coverage and viral video footage concerning an incident during a stand-up comedy show held in Gurugram, Haryana, where remarks allegedly glorifying sexual coercion and non-consensual… <a href="https://t.co/StKOSo1ax9">pic.twitter.com/StKOSo1ax9</a></p>
<p>— ANI (@ANI) <a href="https://x.com/ANI/status/2065043277095813365">June 11, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><br />
आयोगाने प्रणित मोरे आणि हिमांशू जांगरा यांना २२ जून रोजी सायंकाळी ४ वाजता हजर राहण्यास सांगितले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, NCW च्या अध्यक्षा विजया राहटकर यांनी हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना (DGP) पत्र लिहून एका निश्चित कालमर्यादेत त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. आयोगाने सात दिवसांच्या आत सविस्तर &#8216;केलेल्या कारवाईचा अहवाल&#8217; (ATR) सादर करण्यास सांगितले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/entertainment/malti-chahar-pranit-more-controversy-social-media-post-marathi-news-1250454.html"><span class="color-blue">Malti Chahar On Pranit More</span>:  प्रणित मोरेला मालती चहरने सुनावलं, ‘बिग बॉस 19’चा राग की आणखी काही? सोशल मीडियावर रंगली चर्चा</a></span></p>
<h3>आयोगाने मागवलेली माहिती</h3>
<p>आयोगाने भारतीय न्याय संहिता (BNS) आणि इतर लागू कायद्यांनुसार एफआयआर (FIR) नोंदवण्याच्या सद्यस्थितीबाबत, यात सहभागी असलेल्यांविरुद्ध केलेल्या कारवाईबाबत, व्हायरल व्हिडिओमधील पुराव्यांची पडताळणी आणि सत्यता तपासण्याबाबत, तसेच या घटनेत आयोजक, कलाकार आणि कार्यक्रमस्थळाचे व्यवस्थापन यांची भूमिका काय होती, याबद्दल माहिती मागवली आहे.</p>
<h3>नेमके प्रकरण काय आहे?</h3>
<p>गुरुग्राममध्ये प्रणित मोरेच्या स्टँड-अप कॉमेडी शोदरम्यान, हिमांशू नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या &#8216;डेटिंग लाईफ&#8217;बद्दल (डेटिंगच्या अनुभवांबद्दल) बोलताना एका घटनेचा उल्लेख केला, ज्यात तो एका महिलेला डेटवर घेऊन गेला होता. त्याने त्या महिलेसाठी बिर्याणीवर ३७० रुपये खर्च केल्याचे सांगितले. त्याने पुढे असेही म्हटले की, पैसे खर्च केल्यामुळे त्याच्या काही अपेक्षा होत्या. त्याने त्या महिलेच्या संमतीशिवाय तिला एका अंधाऱ्या उद्यानात नेल्याची कबुलीही दिली. शोचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हिमांशू आणि प्रणित वादाच्या भोवऱ्यात सापडले. शोदरम्यान त्या टिप्पणीला मध्येच थांबवणे किंवा त्यावर आक्षेप घेणे प्रणितला योग्य वाटले नाही आणि परिणामी, त्याला लोकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/entertainment/pranit-more-controversy-female-doctors-shocking-statement-on-joking-about-dead-bodies-private-parts-sparks-outrage-1250318.html"><span class="color-blue">Pranit More Controversy</span>: डेड बॉडीच्या Private Parts ची करायचे थट्टा, प्रणित मोरेच्या शोमध्ये महिला डॉक्टरचे धक्कादायक वक्तव्य</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>कोळेगांवच्या उपसरपंचपदी मंगल बेंदगुडे यांची बिनविरोध निवड</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/mangal-bendgude-elected-unopposed-as-upsarpanch-of-kolegaon-1251050.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 19:56:12 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 19:56:12 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T195459.803_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Malshiras]]></category>
		<category><![CDATA[Solapur]]></category>
		<category><![CDATA[Solapur News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251050</guid>

					<description><![CDATA[माळशिरस तालुक्यातील कोळेगांव येथील ग्रामपंचायत उपसरपंच सविता नागनाथ दुपडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मंगल गोपाळ बेंदगुडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T195459.803_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mangal Bendgude Elected Unopposed As Upsarpanch Of Kolegaon"     /></figure><p><strong>​पिलीव प्रतिनिधी :</strong> माळशिरस तालुक्यातील कोळेगांव येथील ग्रामपंचायत उपसरपंच सविता नागनाथ दुपडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मंगल गोपाळ बेंदगुडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया लोकनियुक्त सरपंच सुषमा धनंजय दुपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी बी. आर. बाबर आणि ग्राम महसूल अधिकारी ज्योस्ना लोखंडे यांनी काम पाहिले.<br />
​<br />
​या निवडीच्या विशेष सभेला गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने ​माजी उपसरपंच धनंजय दुपडे,​माजी सरपंच रंगनाथ बेंदगुडे,​अधिकराव सावंत,अनिल बेंदगुडे, कैलास दुपडे,​ॲड. धनंजय दुपडे, प्रसाद दुपडे, दत्तात्रेय बेंदगुडे, ​नागेश दुपडे, पांडुरंग माने,​ग्रामपंचायत सदस्य केशव सावंत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! जलपुरवठा यंत्रणा हायटेक करण्यासाठी पालिकेची उपाययोजना, नागरिकांना मिळणार शुद्ध हवा-पाणी" href="https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai/mumbai-water-supply-system-to-go-hi-tech-bmc-launches-major-upgrade-plan-1250409.html"><strong> मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! जलपुरवठा यंत्रणा हायटेक करण्यासाठी पालिकेची उपाययोजना, नागरिकांना मिळणार शुद्ध हवा-पाणी</strong> </a></span></p>
<p>बिनविरोध निवडीची घोषणा होताच कोळेगांव ग्रामस्थांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर नूतन उपसरपंच मंगल बेंदगुडे यांचा सत्कार सरपंच सुषमा दुपडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या निवडीबद्दल मंगल बेंदगुडे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a class="title" style="color: #3366ff;" title="कोरेगावच्या विकासाला नवे पंख; ३६ वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा शिक्का अखेर रद्द, पाच हजार मिळकतधारकांना मोठा दिलासा" href="https://www.navarashtra.com/maharashtra/thirty-six-year-old-city-development-plan-endorsement-finally-cancelled-in-koregaon-1250943.html"> कोरेगावच्या विकासाला नवे पंख; ३६ वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा शिक्का अखेर रद्द, पाच हजार मिळकतधारकांना मोठा दिलासा </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mango Export: नेपाळमध्ये भारतीय आंबे विकले जाणार की नाही? अखेर सरकारने स्पष्टच सांगत केला खुलासा&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/nepal-government-statement-on-indian-mango-export-and-ban-rumors-marathi-news-1251006.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Ankita Karangutkar]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 19:41:17 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 19:12:27 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T191104.973_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[mango festival]]></category>
		<category><![CDATA[Mango Market]]></category>
		<category><![CDATA[Mango Rate]]></category>
		<category><![CDATA[Marathi News]]></category>
		<category><![CDATA[nepal]]></category>
		<category><![CDATA[raw mango]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251006</guid>

					<description><![CDATA[भारतात उन्हाळ्याचा हंगाम हा केवळ उन्हाळा म्हणूनच नाही तर खास आंब्याचा सीझन म्हणून ओळखला जातो. 'फळांचा राजा' मानल्या जाणाऱ्या आंब्याचे महत्त्व इतके मोठे आहे की, परदेशातही त्याला मोठी मागणी असते. मात्र, अलीकडेच नेपाळमधून अशी एक बातमी समोर आली जिने आंबाप्रेमींची विशेषतः भारतात नव्हे, तर नेपाळमधल्या आंबाप्रेमींना निराश केलं. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T191104.973_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Nepal Government Statement On Indian Mango Export And Ban Rumors Marathi News"     /></figure><p style="text-align: justify;"><strong>Mango Export:</strong> भारतात <a href="https://www.navarashtra.com/topic/summer-care-tips">उन्हाळ्या</a>चा हंगाम हा केवळ उन्हाळा म्हणूनच नाही तर खास आंब्याचा सीझन म्हणून ओळखला जातो. &#8216;फळांचा राजा&#8217; मानल्या जाणाऱ्या आंब्याचे महत्त्व इतके मोठे आहे की, परदेशातही त्याला मोठी मागणी असते. मात्र, अलीकडेच नेपाळमधून अशी एक बातमी समोर आली जिने आंबाप्रेमींची विशेषतः भारतात नव्हे, तर नेपाळमध्ये राहणाऱ्या आंबाप्रेमींनाही निराश केलं. आता मात्र सरकारने या बातमीबाबत स्पष्टता देत विधान केलं आहे.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="रस्ते अपघातांना बसणार ब्रेक! हायवे सुरक्षेसाठी भारताचा मास्टरस्ट्रोक, ‘असा’ होणार AI तंत्रज्ञानाचा वापर" href="https://www.navarashtra.com/business/government-deploys-ai-powered-survey-vehicles-for-national-highways-maintenance-marathi-news-1250885.html"> रस्ते अपघातांना बसणार ब्रेक! हायवे सुरक्षेसाठी भारताचा मास्टरस्ट्रोक, ‘असा’ होणार AI तंत्रज्ञानाचा वापर </a></span></p>
<h3 style="text-align: justify;">नेपाळमध्ये भारतीय आंब्यांवर बंदी?</h3>
<p style="text-align: justify;">नेपाळमध्ये भारतीय आंब्यांवर बंदी घालण्यात आल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. जपाननंतर नेपाळनेही भारतातून होणाऱ्या आंब्यांच्या आयातीवर बंदी घातल्याचे वृत्त अवघ्या गेल्या मंगळवारी समोर आले होते. भारतीय आंब्यांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण अधिक असल्याने ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात, असे कारण यासाठी दिले गेले होते. मात्र, सरकारने आता या बातम्या फेटाळून लावल्या आहेत.</p>
<h3 style="text-align: justify;">नेपाळ आणि भारत सरकारची निवेदनं</h3>
<p style="text-align: justify;">या वृत्तांवर भारत आणि नेपाळ या दोन्ही सरकारांनी आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही बातमी पूर्णपणे दिशाभूल करणारी असल्याचे सांगत, केंद्र सरकारने बुधवारी स्पष्ट केले: &#8220;काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तांमध्ये असा दावा केला जात आहे की नेपाळने भारतीय आंब्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे; हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. विद्यमान नियमांनुसार &#8216;फायटो-सॅनिटरी&#8217; अटींची पूर्तता केली जात असल्यास, आयात सुरूच आहे.&#8221; अशा विधानात त्यांनी या बातमीवर स्पष्टता दिली. दरम्यान, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने आपल्या निवेदनात नमूद केले की, नेपाळच्या &#8216;प्लांट क्वारंटाईन अँड पेस्टिसाईड मॅनेजमेंट सेंटर&#8217;ने १० जून रोजीच हे स्पष्ट केले होते की भारतीय आंब्यांवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही.</p>
<h3 style="text-align: justify;">हा अहवाल कुठून आला?</h3>
<p style="text-align: justify;">नेपाळने अलीकडेच आपल्या आयात नियमांमध्ये बदल केले असून, फळे आणि इतर कृषी उत्पादनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विशिष्ट उपाययोजना करणे अनिवार्य केले आहे. या घडामोडीमुळे अफवांना उधाण आले आणि भारतीय शेतकरी तसेच नेपाळी व्यापारी यांच्यात बऱ्याच प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे, भारताने या वर्षी आतापर्यंत नेपाळला एकूण २,००५ टन वजनाचे आंब्याचे १४९ साठे निर्यात केले आहेत; त्यापैकी केवळ जून महिन्यातच २६६ टन वजनाचे १८ साठे निर्यात करण्यात आले आहेत.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार" href="https://www.navarashtra.com/business/iran-us-war-strait-of-hormuz-completely-closed-impact-on-petrol-diesel-prices-see-more-details-1250862.html"> पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Fitness Tips: जिम, रनिंग किंवा योगा&#8230;व्यायामापूर्वी वॉर्म-अप का गरजेचे? जाणून घ्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/importance-of-warm-up-exercises-fitness-tips-injury-prevention-workout-safety-1251027.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 19:31:30 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 19:31:30 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/fitness_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[Fitness]]></category>
		<category><![CDATA[Fitness Test]]></category>
		<category><![CDATA[Health Check Up]]></category>
		<category><![CDATA[yoga]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251027</guid>

					<description><![CDATA[Warm Up Before Workout: व्यायाम, योगा किंवा रनिंग करण्यापूर्वी वॉर्म-अप करणे का गरजेचे आहे, न केल्यास शरीरावर काय परिणाम होतो, जाणून घ्या. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/fitness_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Importance Of Warm Up Exercises Fitness Tips Injury Prevention Workout Safety"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>व्यायामापूर्वी वॉर्म-अप का गरजेचे?</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>वॉर्म-अपचे महत्त्वाचे फायदे</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>योग्य वॉर्म-अप कसा करावा?</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">आजकाल <a href="https://www.navarashtra.com/topic/fitness-secret">फिटनेसबाबत</a> जागरूकता वाढत असली तरी अनेक जण व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्म-अप करण्याकडे दुर्लक्ष करतात. वेळ वाचवण्याच्या घाईत थेट जिम, रनिंग किंवा इतर व्यायाम सुरू केल्याने शरीरावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, वॉर्म-अप हा कोणत्याही शारीरिक अॅक्टिव्हिटीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तो शरीराला व्यायामासाठी तयार करतो, स्नायूंमध्ये रक्तप्रवाह वाढवतो आणि दुखापतीचा धोका कमी करतो. योग्य प्रकारे वॉर्म-अप केल्यास व्यायामातील कामगिरीही सुधारते.</span><p><a title="Diabetes: डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचंय" href="https://www.navarashtra.com/lifestyle/diabetes-control-tips-daily-habits-blood-sugar-management-1251011.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Diabetes</span>: डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचंय? रोजच्या ‘या’ सवयी ठरतील वरदान, ब्लड शुगर राहील नियंत्रणात</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">वॉर्म-अपचे महत्त्वाचे फायदे</h3>
<p style="text-align: justify;">वॉर्म-अप हा कोणत्याही व्यायामाचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. वॉर्म-अपमुळे स्नायू अधिक लवचिक बनतात आणि सांध्यांची हालचाल सुधारते, त्यामुळे स्नायू ताणणे, लिगामेंटची दुखापत होणे किंवा व्यायामादरम्यान क्रॅम्प येण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. तसेच हलक्या शारीरिक हालचालींमुळे हृदयाचे ठोके हळूहळू वाढतात, ज्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंना अधिक प्रमाणात <a href="https://www.navarashtra.com/topic/oxygen">ऑक्सिजन</a> मिळतो. परिणामी शरीर मुख्य व्यायामासाठी अधिक चांगल्या प्रकारे तयार होते. याशिवाय, वॉर्म-अपमुळे शरीराची प्रतिक्रिया क्षमता, समन्वय आणि ताकद वाढण्यास मदत होते. त्यामुळे धावणे, वजन उचलणे किंवा कोणत्याही क्रीडा प्रकारात खेळाडूंना अधिक प्रभावी कामगिरी करता येते आणि त्यांचा परफॉर्मन्सही सुधारतो.</p>
<h3 style="text-align: justify;">योग्य वॉर्म-अप कसा करावा?</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">५ ते १० मिनिटे हलके चालणे किंवा जॉगिंग करा.</li>
<li style="text-align: justify;">हातांचे गोलाकार फिरवणे (Arm Circles) करा.</li>
<li style="text-align: justify;">पाय पुढे-मागे हलवणे (Leg Swings) करा.</li>
<li style="text-align: justify;">हलके स्क्वॅट्स आणि लंजेस करा.</li>
<li style="text-align: justify;">व्यायामाच्या प्रकारानुसार संबंधित स्नायू सक्रिय करणारे डायनॅमिक स्ट्रेचिंग करा.</li>
</ul>
<h3 style="text-align: justify;">वॉर्म-अप करताना या चुका टाळा</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">सुरुवातीलाच जास्त वेगाने व्यायाम करू नका.</li>
<li style="text-align: justify;">अचानक उड्या मारणे किंवा झटके देणाऱ्या हालचाली टाळा.</li>
<li style="text-align: justify;">वेदना जाणवल्यास जबरदस्ती करू नका.</li>
<li style="text-align: justify;">वॉर्म-अपशिवाय थेट तीव्र व्यायाम सुरू करू नका.</li>
</ul>
<h3 style="text-align: justify;">लवचिकता आणि हालचालींची क्षमता वाढते</h3><span style="text-align: justify;" class="bullet-text">नियमित वॉर्म-अप केल्याने स्नायू, सांधे आणि लिगामेंट्स अधिक सक्रिय होतात. त्यामुळे शरीराची लवचिकता वाढते आणि हालचाली अधिक सहजपणे करता येतात. धावणे, उडी मारणे, वजन उचलणे किंवा इतर कोणताही व्यायाम करताना शरीरावर कमी ताण येतो. यामुळे हालचालींचा वेग आणि समतोल सुधारतो तसेच व्यायामानंतर होणारा स्नायूंचा कडकपणाही कमी होण्यास मदत होते. अवघ्या काही मिनिटांच्या वॉर्म-अपमुळे शरीर व्यायामासाठी सज्ज होते, कामगिरी सुधारते आणि दुखापतीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे पुढच्या वेळी जिम, रनिंग किंवा कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी वॉर्म-अप करायला विसरू नका.</span><p><strong>टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.</strong></p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Foods For Mental Health: मूड सुधारण्यासाठी ‘हे’  पदार्थ ठरतील फायदेशीर; मानसिक आरोग्यही राहील उत्तम" href="https://www.navarashtra.com/lifestyle/foods-for-mental-health-stress-relief-happy-hormones-mood-boosting-diet-1251002.html"> <span class="color-red">Foods For Mental Health</span>: मूड सुधारण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर; मानसिक आरोग्यही राहील उत्तम </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>&#8216;द हिट मॅन शो&#8217;! Rohit Sharma मोडणार 37 वर्षांचा &#8216;हा&#8217; रेकॉर्ड; अफगणिस्तानविरुद्ध भिडणार टीम इंडिया</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/team-india-rohit-sharma-break-37-years-mohindar-amarnath-record-afghanistan-odi-series-1251014.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 19:31:28 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 19:33:39 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T192607.632_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[IND vs AFG]]></category>
		<category><![CDATA[ODI Series]]></category>
		<category><![CDATA[Rohit Sharma]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251014</guid>

					<description><![CDATA[भारतीय संघ आतापासूनच आयसीसी पुरुष विश्वचषक 2027 च्या तयारीला लागला आहे. या मोहिमेची सुरुवात येत्या १३ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपासून  होणार आहे.  ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T192607.632_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Team India Rohit Sharma Break 37 Years Mohindar Amarnath Record Afghanistan Odi Series"     /></figure><p><strong>अफगणिस्तानविरुद्ध रोहित शर्मा नवा रेकॉर्ड रचणार</strong><br />
<strong>रोहित शर्माने पार केली फिटनेस टेस्ट </strong><br />
<strong>मोहिंदर अमरनाथचा रेकॉर्ड मोडण्याची संधी</strong></p>
<p><strong>India Vs Afghanistan ODI Series:</strong> 13 जूनपासून भारत आणि अफगणिस्तान यांच्यात एकदिवसीय सिरिज सुरू होणार आहे. एकमेव कसोटी सामन्यात अफगणिस्तानवर भारताने एक डाव 300 रन्सने विजय मिळवला आहे. दरम्यान वनडे सिरिजमध्ये भारत अफगणिस्तानविरुद्ध भिडणार आहे. <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/rohit-sharma">रोहित शर्मा</a></strong></span> देखील या सिरिजमध्ये खेळणार आहे. त्याने फिटनेस टेस्ट पार केली. मात्र रोहित शर्मा या सिरिजमध्यी खेळून एक रेकॉर्ड आपल्या नावावर करणार आहे.</p>
<p>भारतीय संघ आतापासूनच आयसीसी पुरुष विश्वचषक 2027 च्या (<span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/world-cup">ICC World Cup</a></strong></span>) तयारीला लागला आहे. या मोहिमेची सुरुवात येत्या १३ जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपासून  होणार आहे.  भारताचा अनुभवी खेळाडू आणि पूर्व कर्णधार रोहित शर्मा याने फिटनेस टेस्ट पास केली असून तो या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.</p>
<p>रोहित शर्मा या सिरिजमध्ये रन्सचा पाऊस पाडण्यासाठी उत्सुक असणार आहे. मात्र तो या सिरिजमध्ये एका रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनी वयाच्या 38 व्या वर्षी भारतासाठी वन-डे क्रिकेट खेळताना एक मोठा टप्पा गाठला होता. रोहित शर्मा आता जवळपास 39 वर्षांचा होत आला आहे. जर रोहितने या मालिकेत शानदार कामगिरी केली, तर तो भारतासाठी वयाच्या ३९ व्या वर्षी वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय खेळाडू होणार आहे.</p>
<p><strong>नेट्समध्ये दिसला रोहित शर्माचा धमाका</p>
<p></strong>भारतीय संघाच्या सराव सत्राला १० जून रोजी मोहाली येथील आयएस बिंद्रा स्टेडियमवर सुरुवात झाली. सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर होत्या. बऱ्याच कालावधीनंतर रोहित नेटमध्ये फलंदाजीसाठी मैदानात उतरला. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहितने खूप घाम गाळून आपली तयारी दाखवून दिली. गेल्या काही दिवसांपासून रोहित शर्मा तंदुरुस्तीच्या कारणास्तव खेळापासून दूर होता. मात्र या मालिकेत तो भारतीय टीमकडून मैदानावर उतरणार आहे. यावेळी रोहितने मैदानात नेट्स प्रॅक्टिस केली आणि सर्वांचे मन जिंकले. दमदार प्रदर्शन करत त्याने आपण खेळण्यासाठी सज्ज आहोत हे दाखवून दिले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/rohit-sharma-joined-net-practice-in-mohali-ahead-of-india-vs-afghanistan-odi-series-2026-1250441.html">IND vs AFG: नेट्समध्ये दिसला रोहित शर्माचा धमाका, अफगाणिस्तान सिरीजपूर्वी मैदानात गाळला घाम; खेळण्यासाठी सज्ज</a></strong></span></p>
<p>भारतीय संघाच्या शिबिरात यावेळी अनेक तरुण चेहरे आहेत. नवीन टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर, यशस्वी जैस्वाल, गुरनूर ब्रार आणि प्रिन्स यादव यांसारखे खेळाडूही सराव करत होते, पण रोहित शर्माने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या तंदुरुस्तीबद्दल सतत चर्चा सुरू होती आणि त्याच्या मोहालीतील पुनरागमनाने या सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिला.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>एएम/एनएस इंडिया आणि बिट्स पिलानीच्या सहकार्याने पहिल्या एमबीए बॅचचा पदवीदान समारंभ; क्षमता विकासाला नवी दिशा</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/convocation-ceremony-of-the-first-mba-batch-in-collaboration-with-amns-india-and-bits-pilani-1251022.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिवेश चव्हाण]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 19:29:17 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 19:29:17 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T192821.014_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[Bachelors Degree job]]></category>
		<category><![CDATA[Degree]]></category>
		<category><![CDATA[MBA]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251022</guid>

					<description><![CDATA[एएम/एनएस इंडिया आणि बिट्स पिलानी यांच्या संयुक्त पुढाकारातून मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटमधील एमबीए कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचचा पदवीदान समारंभ पार पडला आहे. या उपक्रमामुळे उद्योग क्षेत्रासाठी सक्षम नेतृत्व निर्माण करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T192821.014_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Convocation Ceremony Of The First Mba Batch In Collaboration With Amns India And Bits Pilani"     /></figure><p>पोलाद क्षेत्रातील आघाडीची कंपनी एएम/एनएस इंडिया आणि बिट्स पिलानी यांच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात आलेल्या मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटमधील एमबीए कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचचा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. या उपक्रमामुळे उद्योग क्षेत्रासाठी सक्षम नेतृत्व निर्माण करण्याच्या प्रक्रियेला चालना मिळाली असून क्षमता विकासाच्या दिशेने कंपनीने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार" href="https://www.navarashtra.com/business/iran-us-war-strait-of-hormuz-completely-closed-impact-on-petrol-diesel-prices-see-more-details-1250862.html">पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?</a></span></h3>
<p>जगातील आघाडीच्या दोन पोलाद उत्पादक कंपन्यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या एएम/एनएस इंडियाने कौशल्य विकास आणि सातत्यपूर्ण शिक्षणाला प्राधान्य देत बिट्स पिलानीसोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. यापूर्वी प्रोसेस इंजिनिअरिंगमधील बी.टेक. कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवल्यानंतर कंपनीने आता मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटमधील एमबीए कार्यक्रमाद्वारे कर्मचाऱ्यांच्या नेतृत्व क्षमतांना अधिक बळकटी दिली आहे. हा दीक्षांत समारंभ एएम/एनएस इंडियाच्या गुजरातमधील हजीरा प्रकल्पात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सुरतचे पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी अनुपम सिंह गहलोत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी पदवीधरांचे अभिनंदन करत व्यावसायिक जबाबदाऱ्यांसोबत उच्च शिक्षण पूर्ण करणे हे शिस्त, मेहनत आणि दृढनिश्चयाचे उदाहरण असल्याचे सांगितले.</p>
<p>एएम/एनएस इंडियाने वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम्स (WILP) च्या माध्यमातून उद्योग आणि शिक्षण यांचा प्रभावी संगम घडवून आणला आहे. कंपनीतील विविध विभागांतील कर्मचाऱ्यांना नोकरी करतानाच उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शैक्षणिक ज्ञानाचा थेट कामकाजात उपयोग करता आला आणि व्यावसायिक कौशल्यांमध्येही वाढ झाली. मॅन्युफॅक्चरिंग मॅनेजमेंटमधील हा एमबीए कार्यक्रम पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा वेगळा असून आधुनिक पोलाद उद्योगातील आव्हाने लक्षात घेऊन तयार करण्यात आला होता. पुरवठा साखळी व्यवस्थापन, धोरणात्मक वित्त, संस्थात्मक नेतृत्व, डिजिटल परिवर्तन, शाश्वत उत्पादन पद्धती आणि माहिती-आधारित निर्णयप्रक्रिया यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा त्यात समावेश करण्यात आला होता.</p>
<p>या कार्यक्रमाच्या लवचिक आणि बहुआयामी अध्यापन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांनी आपल्या दैनंदिन जबाबदाऱ्यांसोबत शिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण केले. यामुळे संस्थेमध्ये सातत्यपूर्ण शिक्षण, कौशल्यविकास आणि उत्कृष्ट कामगिरीची संस्कृती अधिक मजबूत झाली आहे. या पहिल्या पदवीधर बॅचमधील कर्मचाऱ्यांनी विविध विभागांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कॅपस्टोन प्रकल्पांमधून उत्पादन प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी उपाय सुचविण्यात आले, कार्यक्षमतेत वाढ करण्यात मदत झाली आणि व्यवसाय प्रक्रियांमध्ये सुधारणा घडवून आणण्यात यश मिळाले. त्यामुळे कंपनीच्या विविध विभागांमध्ये परिणामकारकता वाढल्याचे दिसून आले आहे.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="रस्ते अपघातांना बसणार ब्रेक! हायवे सुरक्षेसाठी भारताचा मास्टरस्ट्रोक, ‘असा’ होणार AI तंत्रज्ञानाचा वापर" href="https://www.navarashtra.com/business/government-deploys-ai-powered-survey-vehicles-for-national-highways-maintenance-marathi-news-1250885.html">रस्ते अपघातांना बसणार ब्रेक! हायवे सुरक्षेसाठी भारताचा मास्टरस्ट्रोक, ‘असा’ होणार AI तंत्रज्ञानाचा वापर</a></span></h3>
<p>एएम/एनएस इंडियाचे संचालक आणि उपाध्यक्ष (मानव संसाधन व प्रशासन) आशुतोष तेलंग यांनी सांगितले की, सातत्यपूर्ण शिक्षण हा कंपनीच्या क्षमता विकास धोरणाचा केंद्रबिंदू आहे. बिट्स पिलानीसोबतच्या सहकार्यामुळे भविष्यासाठी सज्ज नेतृत्व तयार होत असून नवकल्पना आणि उत्कृष्टतेला चालना मिळत आहे. बिट्स पिलानीचे उपसंचालक प्रा. एस. गुरुनारायणन यांनीही या भागीदारीचे कौतुक करत उद्योग आणि शिक्षण यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, आजच्या औद्योगिक वातावरणात नेतृत्वासाठी व्यवस्थापन कौशल्यांसोबत तांत्रिक आणि शाश्वत विकासाची समज असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. एएम/एनएस इंडिया आणि बिट्स पिलानी यांचा हा उपक्रम उद्योग क्षेत्रासाठी सक्षम, प्रशिक्षित आणि भविष्यासाठी सज्ज नेतृत्व निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>सुनील तटकरेंची सुनेत्रा पवारांसमोरच भुजबळांवर आगपाखड; &#8216;छगन भुजबळ शिवसेनेत असताना&#8230;&#8217;</title>
		<link>https://www.navarashtra.com/politics/sunil-tatkare-comments-on-chhagan-bhujbal-1250916.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 19:22:13 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 19:22:13 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T192134.494_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[राजकारण]]></category>
		<category><![CDATA[Chhagan Bhujbal]]></category>
		<category><![CDATA[NCP News]]></category>
		<category><![CDATA[Sunetra Pawar]]></category>
		<category><![CDATA[sunil tatkare]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250916</guid>

					<description><![CDATA[गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत होते. पुण्यातील राज्यसभेच्या जागेवरून मंत्री छगन भुजबळ आणि इतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद उफाळून आल्याचे दिसत आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T192134.494_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Sunil Tatkare Comments On Chhagan Bhujbal"     /></figure><p>गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत होते. पुण्यातील राज्यसभेच्या जागेवरून मंत्री छगन भुजबळ आणि इतर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये वाद उफाळून आल्याचे दिसत आहे. छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यात काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहेत. छगन भुजबळांना राज्यसभा सदस्यत्व आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद या त्यांच्या मागणीला मान्यता न मिळाल्याने त्यांनी आपण कबड्डीचा खेळाडू असून बुद्धिबळाचा खेळाडू नसल्याचे विधान केले होते. आता यावरूनच सुनील तटकरेंनी भुजबळांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्तच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरच भुजबळांच्या विधानाचा समाचार घेतला.</p>
<p>यावेळी सुनील तटकरे म्हणाले, &#8220;पक्षाचा १९९९ ते २०२६ हा कार्यकाळ झाला आहे, पण आपलं लाडकं नेतृत्व नाहीये. राज्यातील प्रत्येक नागरिकाला दादांची आठवण येते. दादाचे विचार हीच माची ऊर्जा आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. आता भाजप हा राज्यातील एक नंबरचा पक्ष आहे पण, २००४ साली राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष राहिला होता. अजित पवार यांनी खूप काम केलं म्हणून आपला पक्ष हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे,&#8221; असे ते यावेळी म्हणाले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं…’ अजित पवार विमान अपघातप्रकरणी रोहित पवार संतापले" href="https://www.navarashtra.com/politics/rohit-pawar-tweet-over-ajit-pawar-plane-crash-1250672.html"><strong> ‘ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं…’ अजित पवार विमान अपघातप्रकरणी रोहित पवार संतापले</strong> </a></span></p>
<p>छगन भुजबळ यांच्याबाबत बोलताना तटकरे पुढे म्हणाले, &#8220;छगन भुजबळ हे कबड्डीचे खेळाडू आहेत. ते सिनेकलाकार आणि निर्माते आहेत. छगन भुजबळ यांनी कबड्डीमध्ये एक-एक खेळाडू बाद केले आहेत. एका वेळेस सर्व खेळाडूंना ते बाद करतात. छगन भुजबळ शिवसेनेत असताना त्यांनी दोन वेळा महापौरपद मिळवलं. मग तेव्हा त्यांनी कोणाला चेकमेट केलं? आपल्या पक्षात सर्व प्रकारचे खेळाडू आहेत आणि हे सर्व खेळाडू अजितदादांनी तयार केलेले आहेत,&#8221; असे ते यावेळी म्हणाले.</p>
<p>तटकरे यावेळी म्हणाले, &#8220;२००४ साली काँग्रेसकडून जागा सोडवून घेण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि अजित दादांनी त्यावेळेस काँग्रेससोबत कटुता घेतली होती. २००४ साली विदर्भातून आपण सर्वात जास्त जागा मिळवल्या होत्या. ज्याच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या ज्याच्या सर्वात जास्त जागा निवडून आल्या त्यांचा मुख्यमंत्री असं जर २००४ ला ठरलं असत तर आपला मुख्यमंत्री बसला असता. २०१४ साली राज्यात ध्रुवीकरण झालं. २०१९ चा शपथविधी म्हणजे हा पहाटेचा शपथविधी नव्हता. पण तेव्हा सोबत असतो तर काही काळानंतर पुढे गेलो असतो,&#8221; असे ते यावेळी म्हणाले.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Maharashtra Politics : राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज; म्हणाले, ‘काही जण कष्ट न करताच…’" href="https://www.navarashtra.com/politics/some-people-get-ahead-without-putting-in-any-effort-says-chhagan-bhujbal-1250270.html"> <span class="color-red">Maharashtra Politics </span>: राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज; म्हणाले, ‘काही जण कष्ट न करताच…’ </a></span></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Diabetes: डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचंय? रोजच्या &#8216;या&#8217; सवयी ठरतील वरदान, ब्लड शुगर राहील नियंत्रणात</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/diabetes-control-tips-daily-habits-blood-sugar-management-1251011.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 19:07:51 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 19:07:51 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/diabetes-2_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[diabetes]]></category>
		<category><![CDATA[Health Care Tips]]></category>
		<category><![CDATA[home remedies for Diabetes]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251011</guid>

					<description><![CDATA[Diabetes Control Habits: मधुमेह हा केवळ रक्तातील साखरेचा आजार नसून तो हृदय, किडनी आणि डोळ्यांसह शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम करू शकतो. परंतु, काही सोप्या आणि नियमित सवयी अंगीकारल्यास ब्लड शुगर नियंत्रणात ठेवता येते. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/diabetes-2_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Diabetes Control Tips Daily Habits Blood Sugar Management"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचंय?</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>रोजच्या &#8216;या&#8217; सवयी ठरतील वरदान</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>ब्लड शुगर राहील नियंत्रणात</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">भारतासह जगभरात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. ही केवळ रक्तातील साखरेची समस्या नसून हृदय, किडनी, डोळे आणि मज्जासंस्थेवरही परिणाम करणारा दीर्घकालीन आजार आहे. त्यामुळे केवळ औषधे घेणे पुरेसे नसून <a href="https://www.navarashtra.com/topic/lifestyle-tips">जीवनशैलीत</a> योग्य बदल करणेही अत्यंत आवश्यक ठरते. तज्ज्ञांच्या मते, काही साध्या पण प्रभावी सवयी अंगीकारल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहू शकते आणि भविष्यातील गंभीर आरोग्याच्या समस्या टाळता येऊ शकतात. डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, जाणून घ्या.</span><p><a title="Foods For Mental Health: मूड सुधारण्यासाठी ‘हे’  पदार्थ ठरतील फायदेशीर; मानसिक आरोग्यही राहील उत्तम" href="https://www.navarashtra.com/lifestyle/foods-for-mental-health-stress-relief-happy-hormones-mood-boosting-diet-1251002.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Foods For Mental Health</span>: मूड सुधारण्यासाठी ‘हे’ पदार्थ ठरतील फायदेशीर; मानसिक आरोग्यही राहील उत्तम</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">संतुलित आहार घ्या</h3>
<p style="text-align: justify;">मधुमेह व्यवस्थापनात आहाराची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली जाते. संपूर्ण धान्ये, हिरव्या भाज्या, प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. प्रक्रिया केलेले पदार्थ, साखरयुक्त पेये आणि <a href="https://www.navarashtra.com/topic/food-issue">जंक फूड</a> टाळणे गरजेचे आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी जेवण घेतल्यास रक्तातील साखरेतील चढ-उतार कमी होतात.</p>
<h3 style="text-align: justify;">नियमित व्यायाम करा</h3>
<p style="text-align: justify;">दररोज किमान ३० मिनिटे चालणे, सायकलिंग, योगा किंवा इतर शारीरिक हालचाली केल्याने शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते. व्यायामामुळे अतिरिक्त ग्लुकोजचा वापर होतो आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.</p>
<h3 style="text-align: justify;">नियमित ब्लड शुगर टेस्ट करा</h3>
<p style="text-align: justify;">ब्लड शुगरचे नियमित निरीक्षण केल्याने शरीराची स्थिती समजते आणि उपचारांमध्ये आवश्यक बदल करणे सोपे जाते. वेळोवेळी तपासणी केल्याने संभाव्य धोके ओळखून त्यावर योग्य वेळी उपाय करता येतात.</p>
<h3 style="text-align: justify;">पुरेशी झोप आणि तणाव नियंत्रण</h3>
<p style="text-align: justify;">अपुरी झोप आणि सततचा तणाव यामुळे इन्सुलिन प्रतिकार वाढू शकतो. दररोज ७ ते ८ तासांची चांगली झोप आणि ध्यान, प्राणायाम यांसारख्या तणावमुक्तीच्या उपायांचा अवलंब केल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवणे अधिक सोपे होते.</p>
<h3 style="text-align: justify;">औषधे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन</h3>
<p style="text-align: justify;">डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. औषधे चुकवणे किंवा स्वतःहून उपचारांमध्ये बदल करणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच उपचार सुरू ठेवावेत.</p>
<p style="text-align: justify;">मधुमेह हा आजार बरा होणार नसला तरी योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणाव नियंत्रण आणि वेळेवर उपचार यांच्या मदतीने तो नियंत्रणात ठेवता येतो.</p>
<p><strong>टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.</strong></p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Women’s Health: वयाच्या 35 शी नंतर महिलांनी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ सुपरफूड्स; आरोग्य राहील तंदुरुस्त" href="https://www.navarashtra.com/lifestyle/superfoods-for-women-after-35-healthy-diet-nutrition-tips-1250191.html"> <span class="color-red">Women’s Health</span>: वयाच्या 35 शी नंतर महिलांनी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ सुपरफूड्स; आरोग्य राहील तंदुरुस्त </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Pandharpur News: नरेंद्र मोदींचा ४३९९ दिवसांचा ऐतिहासिक महाविक्रम! पंढरपूरच्या प्रसिद्ध सूर्यनारायण मंदिरात भव्य महाआरती</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pm-modi-completes-4399-days-grand-maharati-at-surya-narayan-temple-pandharpur-1251010.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 19:06:17 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 19:06:17 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T190353.192_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[pandharpur]]></category>
		<category><![CDATA[Pandharpur News]]></category>
		<category><![CDATA[PM Narendra Modi]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251010</guid>

					<description><![CDATA[PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची १२ वर्षे आणि सलग ४३९९ दिवस पूर्ण केल्याबद्दल पंढरपूरच्या नारायण चिंचोली येथील प्रसिद्ध सूर्यनारायण मंदिरात भव्य महाआरती करण्यात आली.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T190353.192_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Pm Modi Completes 4399 Days Grand Maharati At Surya Narayan Temple Pandharpur"     /></figure><ul>
<li>नरेंद्र मोदींचा ४३९९ दिवसांचा ऐतिहासिक महाविक्रम!</li>
<li>पंढरपूरच्या प्रसिद्ध सूर्यनारायण मंदिरात भव्य महाआरती</li>
</ul><span class="bullet-text"><strong>पंढरपूर प्रतिनिधी:</strong> देशाच्या विकासाला नवी दिशा देणारे <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/PM-Narendra-modi">पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)</a></span> यांनी पंतप्रधानपदाची बारा वर्षे पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि आगामी वाटचालीसाठी करकंब मंडल भाजपच्या वतीने नारायण चिंचोली येथील महाराष्ट्रातील प्रसिद्ध सूर्यनारायण मंदिरात विशेष महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण धनवडे यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली. यावेळी उपस्थितांनी सूर्यनारायण देवाच्या चरणी प्रार्थना करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभावे, तसेच देशहितासाठी त्यांचे नेतृत्व अधिक सक्षम व्हावे, अशी भावना व्यक्त केली.</span><p>यावेळी बोलताना लक्ष्मण धनवडे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकास, पायाभूत सुविधा, आत्मनिर्भरता आणि जागतिक स्तरावरील प्रतिष्ठा यामध्ये उल्लेखनीय प्रगती साधली आहे. त्यांच्या कार्याला सूर्यनारायण देवाचा आशीर्वाद लाभला असून देशाच्या प्रगतीसाठी त्यांना अधिक बळ मिळो, हीच प्रार्थना आहे.” ग्रामस्थांनीही मोदी यांनी गेल्या बारा वर्षांत विकासाभिमुख धोरणांद्वारे देशाला नवी उंची दिल्याचे सांगत, भविष्यातही त्यांना देशसेवेची संधी मिळावी आणि भारताच्या विकासाचा प्रवास अधिक वेगाने सुरू राहावा, अशी प्रार्थना केली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/congress-leader-harshvardhan-sapkal-has-criticized-the-modi-government-2-1250429.html">नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला, मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही अन्…; हर्षवर्धन सपकाळांची टीका</a></span></p>
<p>कार्यक्रमास भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, गहिनीनाथ चव्हाण, नानासो सरवळे, लक्ष्मण कोले, पोपट पाटील, आप्पासो वाघमोडे, हरिभाऊ माने, विठ्ठल माने, बळवंत धनवडे, विष्णूपंत माने, शिवाजी वसेकर, श्रीधर कोळेकर, चंद्रकांत पाटील, नारायण गुंड, मुकुंद घाडगे, बाळू बनसोडे, रमेश कोले, भाऊसाहेब माने, साधू नलवडे, सुनील माने, संदीप हिंगमिरे, ज्ञानेश्वर वाघमोडे यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>
<blockquote><p>भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदी सलग ४३९९ दिवस पूर्ण करून एक उल्लेखनीय विक्रम आपल्या नावावर केला आहे. या ऐतिहासिक क्षणानिमित्त महाराष्ट्रातील एकमेव असलेल्या श्री सूर्यनारायण मंदिरात चरणी लीन होऊन सूर्यनारायण देवाकडे ,देशाला सक्षम, दूरदर्शी आणि विकासाभिमुख नेतृत्व देणारे मोदीजी यांनी यापुढील काळातही भारताचे नेतृत्व करावे, देशाला प्रगतीच्या नव्या शिखरांवर घेऊन जावे.त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्त्यांला काम करण्याचे भाग्य लाभले आहे, याचा अभिमान वाटतो. सूर्यनारायण देवाच्या कृपेने मोदीजींना दीर्घायुष्य, उत्तम स्वास्थ्य आणि अखंड राष्ट्रसेवेची शक्ती लाभो. <em>मा. माऊली हळणवर प्रदेश सचिव, भाजप किसान मोर्चा</em></p></blockquote>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/india/pm-narendra-modi-address-nation-on-completing-12-years-says-country-fate-changed-after-2014-1250188.html">२०१४ नंतर बदलली देशाची अस्मिता आणि…’, कार्यकाळाचे १२ वर्षे पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशाला मोठे संबोधन</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>आता याचेही दर वाढले&#8230; केस कापणं, दाढी करणं महागलं, जाणून घ्या कोणत्या राज्यात किती रुपयांनी वाढ</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/salon-services-rates-hike-haircut-and-shaving-prices-increased-marathi-news-1250967.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Ankita Karangutkar]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 19:06:12 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:39:44 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T183655.525_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[GST Rates]]></category>
		<category><![CDATA[Marathi News]]></category>
		<category><![CDATA[Salons]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250967</guid>

					<description><![CDATA[वाढत्या महागाईमुळे लोकांचे जीवन कठीण झाले आहे. जर तुम्ही केस कापण्यासाठी महिन्यातून दोन-तीनदा सलूनमध्ये जात असाल, तर तुम्हाला या महागाईचा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात आता सर्वसामान्यांना सलूनमधील सेवांसाठी पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतील. राज्यातील न्हावी संघटनेने केस कापणे, दाढी करणे आणि इतर सेवांचे दर वाढवले आहेत. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T183655.525_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Salon Services Rates Hike Haircut And Shaving Prices Increased Marathi News"     /></figure><p style="text-align: justify;"><strong>Salon Rates Hike:</strong> वाढत्या महागाईमुळे लोकांचे जीवन कठीण झाले आहे. जर तुम्ही केस कापण्यासाठी महिन्यातून दोन-तीनदा सलूनमध्ये जात असाल, तर तुम्हाला या महागाईचा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात आता सर्वसामान्यांना सलूनमधील सेवांसाठी पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतील. राज्यातील न्हावी संघटनेने केस कापणे, दाढी करणे आणि इतर सेवांचे दर सुमारे २० टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. ही दरवाढ शनिवारपासून लागू होत असून, त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="रस्ते अपघातांना बसणार ब्रेक! हायवे सुरक्षेसाठी भारताचा मास्टरस्ट्रोक, ‘असा’ होणार AI तंत्रज्ञानाचा वापर" href="https://www.navarashtra.com/business/government-deploys-ai-powered-survey-vehicles-for-national-highways-maintenance-marathi-news-1250885.html"> रस्ते अपघातांना बसणार ब्रेक! हायवे सुरक्षेसाठी भारताचा मास्टरस्ट्रोक, ‘असा’ होणार AI तंत्रज्ञानाचा वापर </a></span></p>
<h3 style="text-align: justify;">दरवाढ का झाली?</h3>
<p style="text-align: justify;">संस्थेच्या म्हणण्यानुसार, वाढता खर्च आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक अनिश्चितता विशेषतः मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ यांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन दर खालीलप्रमाणे आहेत:</p>
<p style="text-align: justify;"><strong>हेअरकट: ₹१८०</strong><br />
<strong>शेव्ह: ₹१२०</strong><br />
<strong>दाढी ट्रिमिंग: ₹१५०</strong><br />
<strong>हेड मसाज: ₹१८०</strong><br />
<strong>हेअर वॉश: ₹१२०</strong><br />
<strong>फेशियल: किमान ₹७००</strong><br />
<strong>हेअर स्पा: ₹६००</strong></p>
<h3 style="text-align: justify;">दर दोन वर्षांनी आढावा, संघटनेचा दावा</h3>
<p style="text-align: justify;">महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे पदाधिकारी श्याम अस्कारकर यांनी सांगितले की, साधारणपणे दर दोन वर्षांनी दरांचा आढावा घेऊन त्यात बदल केला जातो; मात्र यावेळी उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीमुळे नियोजित कालावधीपूर्वीच दर वाढवणे भाग पडले. तेल, क्रीम, ब्लेड्स आणि इतर आवश्यक साहित्यांच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीचा थेट फटका लघु-व्यावसायिकांना बसत असल्याचे संघटनेने निदर्शनास आणून दिले आहे.</p>
<p style="text-align: justify;">महाराष्ट्रात एक लाखांहून अधिक न्हाव्यांची दुकाने आहेत. ही दरवाढ प्रामुख्याने पारंपरिक सलूनसाठी लागू असून, आलिशान सलूनना यातून वगळण्यात आले आहे. परिणामी, या दरवाढीचा फटका सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार" href="https://www.navarashtra.com/business/iran-us-war-strait-of-hormuz-completely-closed-impact-on-petrol-diesel-prices-see-more-details-1250862.html"> पुन्हा उफाळला… इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार? </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Foods For Mental Health: मूड सुधारण्यासाठी ‘हे’  पदार्थ ठरतील फायदेशीर; मानसिक आरोग्यही राहील उत्तम</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/foods-for-mental-health-stress-relief-happy-hormones-mood-boosting-diet-1251002.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:48:56 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:48:56 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/food-3_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[Healthy Foods]]></category>
		<category><![CDATA[healthyfood]]></category>
		<category><![CDATA[mental health]]></category>
		<category><![CDATA[mental stress]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1251002</guid>

					<description><![CDATA[Healthy Food For Better Mood: आजच्या ताणतणावपूर्ण जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असून, चिंता, चिडचिड आणि मूड खराब होण्याच्या समस्या वाढत आहेत. परंतु, काही आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तणाव कमी होतो आणि हॅप्पी हार्मोन्स वाढतात.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/food-3_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Foods For Mental Health Stress Relief Happy Hormones Mood Boosting Diet"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>चिडचिड,अस्वस्थता आणि मूड खराब </strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>‘हे’ ७ पदार्थ ठरतील फायदेशीर</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>मानसिक आरोग्यही राहील उत्तम</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण, वाढत्या जबाबदाऱ्या आणि सततची धकाधकीची जीवनशैली याचा परिणाम केवळ शारीरिक आरोग्यावरच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही होत आहे. अनेकांना चिडचिड, अस्वस्थता, चिंता आणि मूड खराब होण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी औषधांपेक्षा योग्य आहार मोठी भूमिका बजावू शकतो. काही नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थ मेंदूचे कार्य सुधारण्यास, तणाव कमी करण्यास आणि हॅप्पी हार्मोन्सचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्यास मानसिक आरोग्य अधिक चांगले राहू शकते.</span><p><a title="Oily Skin: ऑयली स्किनला म्हणा बाय-बाय! महागडे स्किनकेअर नको, फक्त करा ‘हा’ घरगुती उपाय" href="https://www.navarashtra.com/lifestyle/oily-skin-home-remedies-natural-rice-flour-face-pack-1250179.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Oily Skin</span>: ऑयली स्किनला म्हणा बाय-बाय! महागडे स्किनकेअर नको, फक्त करा ‘हा’ घरगुती उपाय</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">दही</h3>
<p style="text-align: justify;">दही हे प्रोबायोटिक्सने समृद्ध असते. ते आतड्यांचे <a href="https://www.navarashtra.com/topic/health">आरोग्य</a> सुधारते आणि मानसिक स्वास्थ्यालाही सकारात्मक पाठबळ देते. नियमित दही खाल्ल्याने चिंता वाढवणाऱ्या हानिकारक जीवाणूंचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळू शकते.</p>
<h3 style="text-align: justify;">हिरव्या पालेभाज्या</h3>
<p style="text-align: justify;">पालक, मेथी आणि इतर <a href="https://www.navarashtra.com/topic/green-leafy-vegetables">पालेभाज्यांमध्ये</a> मॅग्नेशियम, फायबर आणि बी जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. हे घटक तणाव नियंत्रित ठेवण्यास आणि शरीराला दिवसभर ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात.</p>
<h3 style="text-align: justify;">बदाम आणि अक्रोड</h3>
<p style="text-align: justify;">बदामातील मॅग्नेशियम आणि अक्रोडातील ओमेगा-३ फॅटी अॅसिड मेंदूच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात. यामुळे सेरोटोनिनचे प्रमाण संतुलित राहते आणि मूड सुधारण्यास मदत होते.</p>
<h3 style="text-align: justify;">हळद</h3>
<p style="text-align: justify;">हळदीतील कर्क्युमिन हा घटक शरीरातील सूज आणि तणावाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करतो. काळी मिरीसोबत हळदीचे सेवन केल्यास त्याचे फायदे अधिक वाढतात.</p>
<h3 style="text-align: justify;">आवळा</h3>
<p style="text-align: justify;">व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने परिपूर्ण असलेला आवळा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करण्यात मदत करतो. त्यामुळे शरीरासह मनही अधिक ताजेतवाने राहते.</p>
<h3 style="text-align: justify;">मूग डाळ</h3>
<p style="text-align: justify;">मूग डाळीत ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो अॅसिड असते, जे सेरोटोनिन तयार होण्यास मदत करते. त्यामुळे मूगाच्या डाळीचे सेवन केल्याने मन शांत राहण्यास मदत होते.</p>
<h3 style="text-align: justify;">केळी, संत्री आणि पेरू</h3>
<p style="text-align: justify;">ही फळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतात आणि शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे पुरवतात. त्यामुळे ऊर्जा वाढते आणि मूडही चांगला राहतो.</p>
<p style="text-align: justify;">मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी केवळ व्यायाम आणि झोपच नव्हे, तर संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. दही, पालेभाज्या, सुका मेवा, हळद, आवळा, मूग डाळ आणि फळे यांसारखे पदार्थ रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास तणाव कमी होण्यास, मन प्रसन्न राहण्यास आणि एकूणच जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होऊ शकते.</p>
<p><strong>टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.</strong></p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Women’s Health: वयाच्या 35 शी नंतर महिलांनी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ सुपरफूड्स; आरोग्य राहील तंदुरुस्त" href="https://www.navarashtra.com/lifestyle/superfoods-for-women-after-35-healthy-diet-nutrition-tips-1250191.html"> <span class="color-red">Women’s Health</span>: वयाच्या 35 शी नंतर महिलांनी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ सुपरफूड्स; आरोग्य राहील तंदुरुस्त </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>विद्यार्थ्याची तक्रार अन् रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा! थेट १५ जुलैला लाँच करणार IRCTC ची नवीन वेबसाईट</title>
		<link>https://www.navarashtra.com/technology/railway-minister-ashwini-vaishnaw-announces-new-irctc-website-on-15-july-after-student-complaint-1250987.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:42:59 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:42:59 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/kjkj_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विज्ञान तंत्रज्ञान]]></category>
		<category><![CDATA[Ashwini Vaishnav]]></category>
		<category><![CDATA[Indian Railway]]></category>
		<category><![CDATA[IRCTC]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250987</guid>

					<description><![CDATA[New IRCTC Website News: विद्यार्थ्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी आयआरसीटीसीच्या बाबत येत असलेल्या समस्यांविषयी चर्चा केली; त्यानंतर, मंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले की आयआरसीटीसीची नवीन वेबसाइट १५ जुलै रोजी सुरू केली जाईल.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/kjkj_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Railway Minister Ashwini Vaishnaw Announces New Irctc Website On 15 July After Student Complaint"     /></figure><p>&nbsp;</p>
<ul>
<li>विद्यार्थ्याची तक्रार अन् रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा!</li>
<li>थेट १५ जुलैला लाँच करणार IRCTC ची नवीन वेबसाईट</li>
<li>जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे&#8230;</li>
</ul><span class="bullet-text"><strong>New IRCTC Website:</strong> जयपूरमधील मालवीय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MNIT) येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना रेल्वे, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/indian-railway">भारतीय रेल्वेची</a></span> तिकीट बुकिंग प्रणाली अधिक सुधारण्यासाठी १५ जुलैपर्यंत एक नवीन IRCTC वेबसाइट सुरू केली जाईल. ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/IRCTC">IRCTC</a></span> वेबसाइट अनेकदा हँग होते आणि त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते, अशी थेट तक्रार एका विद्यार्थ्याने केल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.</span><h3>त्वरित नवीन वेबसाइट तयार करण्याचे आदेश</h3>
<p>विद्यार्थ्याची तक्रार ऐकल्यानंतर मंत्री अश्विनी वैष्णव यांनी IRCTC च्या संचालकांना बोलावले आणि त्वरित नवीन वेबसाइट तयार करण्याचे आदेश दिले. नवीन वेबसाइट अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. रेल्वे डिजिटल सेवा सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे आणि प्रवाशांना अखंड व जलद सेवा देणे हे सरकारचे प्राधान्य आहे, असे त्यांनी नमूद केले. या संवादादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फीही काढले आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="hi">देखें: केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णव ने छात्रों की मांग पर घोषणा की है कि नई IRCTC वेबसाइट 15 जुलाई तक लॉन्च कर दी जाएगी।</p>
<p>(स्रोत: रेलवे) <a href="https://t.co/kJyF7sj8QV">pic.twitter.com/kJyF7sj8QV</a></p>
<p>— IANS Hindi (@IANSKhabar) <a href="https://x.com/IANSKhabar/status/2065041154564084195">June 11, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/business/which-is-best-app-for-train-ticket-booking-irctc-vs-railone-know-the-key-differences-1242038.html"><span class="color-red">IRCTC vs RailOne</span>: का होते आहे दोन्ही App ची तुलना? तिकिट बुकिंगसाठी कोणते आहे उत्तम</a></span></p>
<h3>कोचच्या रचनेबाबत विद्यार्थ्यांना दिलेली माहिती</h3>
<p>MNIT मधील कार्यक्रमादरम्यान, अश्विनी वैष्णव यांनी आपल्या मोबाईल फोनचा वापर करून टीव्ही स्क्रीनवर &#8216;वंदे भारत&#8217; ट्रेनचा व्हिडिओ दाखवला आणि ट्रेनची अत्याधुनिक वैशिष्ट्ये व कोचच्या रचनेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच, रेल्वेमध्ये होत असलेले तांत्रिक बदल आणि डिजिटल नवोपक्रमांवरही त्यांनी चर्चा केली. याप्रसंगी, केंद्रीय मंत्र्यांनी MNIT जयपूर येथे सेमीकंडक्टर, क्वांटम तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांवर आधारित अत्याधुनिक प्रयोगशाळा विकसित करण्याची घोषणा केली. त्यांनी विवेकानंद लेक्चर थिएटर कॉम्प्लेक्समध्ये &#8216;मेकर्स लॅब&#8217;चे उद्घाटन केले आणि विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केले.</p>
<h3>भारतात सेमीकंडक्टरचे उत्पादन</h3>
<p>विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी नॅनो-सिम (nano-SIM) आणि सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारले आणि आता भारतातच नॅनो-सिमचे उत्पादन होत असल्याचे नमूद केले. सेमीकंडक्टर उद्योग भविष्यात रोजगाराचे सर्वात मोठे क्षेत्र बनणार आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना या दिशेने स्वतःला तयार करण्याचे आवाहन केले.</p>
<h3>मंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आव्हान</h3>
<p>अश्विनी वैष्णव यांनी विद्यार्थ्यांना &#8216;चिप डिझायनिंग&#8217;चे काम हाती घेण्याचे आव्हानही दिले. त्यांनी सांगितले की, संस्थेमध्ये सिम्युलेशन प्रणाली विकसित केली जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर डिझाइन आणि फॅब्रिकेशनचे प्रत्यक्ष प्रशिक्षण घेता येईल. त्यांनी पुढे नमूद केले की, सेमीकंडक्टर आणि चिप डिझाइनला चालना देण्यासाठी देशातील ३२३ महाविद्यालयांमध्ये अशाच प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/technology/decode-5-smart-irctc-tatkal-ticket-booking-tricks-to-increase-confirm-train-ticket-chances-see-fore-more-details-1208029.html">सण-उत्सवाच्या गर्दीतही मिळेल Confirm Tatkal Ticket ! या 5 खास ट्रिक्स आणि बुकिंग होईल सुपरफास्ट!</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>India A Vs AFG A Live: पावसाने हिरावला भारताचा विजय; DLS  नियमामुळे अफगाणिस्तानचा 4 रन्सने विजय</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/afghanistan-a-team-beat-india-a-team-by-4-runs-because-rain-and-dls-system-1250982.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:37:20 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:37:20 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T183429.609_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[DLS method]]></category>
		<category><![CDATA[IND vs AFG]]></category>
		<category><![CDATA[Vaibhav Sooryavanshi]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250982</guid>

					<description><![CDATA[अफगणिस्तान कडून इम्रान मीरने सर्वाधिक 84 रन्सची आक्रमक खेळी केली. तर बाहिर शाहने 51 रन्सची अर्धशतकी खेळी केली. मात्र पावसामुळे ओव्हर्स कमी करण्यात आल्या आणि अफगणिस्तानचा विजय झाला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T183429.609_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Afghanistan A Team Beat India A Team By 4 Runs Because Rain And Dls System"     /></figure><p><strong>अफगणिस्तान अ संघाचा भारत अ संघावर विजय</strong><br />
<strong>डीएलएस फॉर्मटमुळे अफगणिस्तानचा विजय </strong><br />
<strong>ट्राय सिरिजमध्ये भारताचा पहिला पराभव</strong></p>
<p><strong>Tri Series/<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/dls-method">DLS System</a></span>:</strong> आज ट्राय सिरिजमध्ये भारताचा दूसरा सामना पार पडला. आज भारत आणि अफगणिस्तान आमनेसामने आले होते.<span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/indian-cricket-team"> भारता</a></strong></span>ने प्रथम फलंदाजी करताना अफगणिस्तानला 350 रन्सचे टार्गेट दिले होते. वैभव सूर्यवंशी आणि प्रभसिमरन सिंहच्या खेळीने भारताने 350 पर्यन्त मजल मारली होती. मात्र अखेर या सामन्यात पावसामुळे अफगणिस्तानचा विजय झाला आहे. 4 रन्सचे अफगणिस्तानने भारतावर विजय मिळवला आहे.</p>
<p>भारताने अफगणिस्तानला 350 रन्सचे टार्गेट दिले होते. अफगणिस्तान फलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा काही कालावधीनंतर पाऊस सुरु झाला. मात्र त्यानंतर त्यामुळे ओव्हर्सची संख्या कमी करण्यात आली. या सामन्यात डीएलएस मेथडमुळे अफगणिस्तानने भारतावर 4 रन्सने विजय प्राप्त केला आहे.</p>
<p><strong>अफगणिस्तानची फलंदाजी</strong></p>
<p>अफगणिस्तान कडून इम्रान मीरने सर्वाधिक 84 रन्सची आक्रमक खेळी केली. तर बाहिर शाहने 51 रन्सची अर्धशतकी खेळी केली. मात्र पावसामुळे ओव्हर्स कमी करण्यात आल्या आणि अफगणिस्तानचा विजय झाला आहे. भारताकडून अरशद खान आणि अनुकूल रॉयने प्रत्येकी एक एक विकेट घेतली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/india-a-vaibhav-sooryavanshi-44-runs-against-afghanistan-a-tri-series-1250636.html">IND A Vs AFG A: आया रे तूफान! Vaibhav Sooryavanshi ची आक्रमक खेळी; अफगणिस्तानला 350 रन्सचे टार्गेट</a></strong></span></p>
<p><strong>भारताची फलंदाजी<br />
</strong>अफगणिस्तानविरुद्ध आज वैभव सूर्यवंशीने लहानशी पण आक्रमक खेळी केली आहे. त्याने 22 बॉलमध्ये 44 रन्सची तुफानी खेळी केली. त्याला प्रभसिमरन सिंहने 84 रन्सची चांगली साथ दिली आहे. वैभव सूर्यवंशी चांगली खेळी करत होता. मात्र त्याच्या खेळीचे तो अर्धशतकी खेळीत रूपांतर करू शकला नाही. मागील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध वैभव सूर्यवंशी 14 रन्सवर आउट झाला होता. दुसऱ्या सामन्यात त्याने 44 रन्सची आक्रमक खेळी केली आहे. आज वैभव सूर्यवंशीने अत्यंत संयमी आणि महत्वाची खेळी केली. वैभव आउट झाला तेव्हा भारताने चांगली सुरुवात केली होती. वैभव सूर्यवंशी आउट झाला तेव्हा भारताचा स्कोअर 74 रन्सवर होता. मागील सामन्यात चांगली खेळी करणाऱ्या ऋतुराज गायकवाडने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने 66 रन्सची खेळी केली. सुयश शेडगेने 40 रन्सची खेळी केली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/michael-clarke-statement-about-shubhman-gill-team-india-captaincy-1249911.html">‘Shubhman Gill च्या हातात टीम इंडियाचे भविष्य…’; Michael Clarke चे धक्कादायक विधान</a></strong></span></p>
<p><strong>भारत अ संघ:</strong> प्रभसिमरन सिंग, वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, अनुज रावत, रियान पराग, आयुष बदोनी, रमनदीप सिंग, नितीश कुमार रेड्डी, मानव सुथार, ऋतिक शौकीन, राहुल चहर , हर्षित राणा, यश दयाल, वैशाख विजयकुमार.</p>
<p><strong>अफगाणिस्तान अ: </strong> झुबैद अकबरी, सेदीकुल्लाह अटल, दरविश रसूली, मोहम्मद इसाक, शराफुद्दीन अश्रफ , शाहिदुल्लाह कमाल, करीम जनत, अल्लाह गझनफर, कैस अहमद, फझलहक फारूकी, बिलाल सामी.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>ST workers protest : एसटी सेवा ठप्प होणार? प्रलंबित मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीकडून बेमुदत आंदोलनाची घोषणा</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/maharashtra-st-workers-joint-action-committee-indefinite-protest-chakka-jam-1250993.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:31:58 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:32:50 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ST-workers-protest_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[msrtc]]></category>
		<category><![CDATA[st bus]]></category>
		<category><![CDATA[ST workers protest]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250993</guid>

					<description><![CDATA[महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेत ९ जून २०२६ पासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन आणि चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनामुळे राज्यातील एसटी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असून, कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे...]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ST-workers-protest_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Maharashtra St Workers Joint Action Committee Indefinite Protest Chakka Jam"     /></figure><p><strong>ST workers protest :</strong> महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवरून महारा<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/st-workers">ष्ट्र एसटी कामगार</a></span> संयुक्त कृती समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे. समितीच्या वतीने ९ जून २०२६ पासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p>
<p>मुंबई येथे महाराष्ट्रातील बहुसंख्य एसटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्री महोदययांच्या सोबत पार पडली. या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक व कामगार हिताच्या प्रश्नांवर तीव्र आंदोलन उभारण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर २९ जून २०२६ पासून मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालय, सर्व विभागीय कार्यालये तसेच सर्व मध्यवर्ती कार्यशाळांवर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रश्न तातडीने सोडवावेत, अशी जोरदार मागणी कृती समितीने केली आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/st-workers-salary-fund-row-maharashtra-government-controversy-news-marathi-1249549.html">‘एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीत खंजीर’, निधी नाकारल्याने राज्यभर संताप; राज्य सरकारच्या भूमिकेवर कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा</a></span></p>
<h3>काय आहेत मागण्या?</h3>
<ol>
<li>एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे.</li>
<li>२०१६-२०२० या वेतनकराराच्या पॅकेजदरम्यान १% ने कमी करण्यात आलेला वार्षिक वेतनवाढीचा दर २०१६ पासून मान्य केल्याप्रमाणे</li>
<li>पुन्हा ३% करण्यात यावा.</li>
<li>मा औद्योगिक न्यायालयाच्या निर्ण्यानुसार २०१८ पासूनची महागाई भत्त्याची थकबाकी तातडीने अदा करावी.</li>
<li>राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५८% महागाई भत्ता लागू करावा.</li>
<li>एसटी महामंडळासाठी शासनाने स्वतंत्र बजेट तरतूद करावी.</li>
<li>मध्यवर्ती कार्यशाळांना नवीन बसबांधणीसाठी चॅसिस उपलब्ध करून स्वमालकीच्या बसेस तयार कराव्यात.</li>
<li>कामगार विरोधी चारही कामगार कायदे रद्द करावेत.</li>
<li>एसटी कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिक्लेम सुविधा लागू करावी.</li>
<li>कंत्राटी भरती बंद करावी.</li>
<li>महामंडळाच्या जागा PPP खासगीकरणाऐवजी महामंडळानेच विकसित कराव्यात.</li>
<li>भाडेतत्त्वावरील ई-बसेसऐवजी स्वमालकीच्या ई-बसेस घ्याव्यात.</li>
<li>उन्नत प्रवर्गातील क. अधीका-यांना वर्ग २ कनिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणे न्याय्य वेतन लागू करावे.</li>
</ol>
<h3>आंदोलनाचे तीन टप्पे जाहीर</h3><span class="bullet-text"><strong>१५ जून २०२६ रोजी</strong></span><p>राज्यातील सर्व आगार, विभागीय कार्यालये, कार्यशाळा व मध्यवर्ती कार्यालय येथे घंटानाद व महाआरती आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार.</p>
<p><strong>२२ जून २०२६ रोजी</strong></p>
<p>महाराष्ट्रातील प्रत्येक युनिटसमोर प्रचंड द्वार सभा आयोजित करण्यात येणार.</p>
<p><strong>२९ जून २०२६ पासून</strong></p>
<p>मुंबईसह राज्यभरातील सर्व विभागीय कार्यालये, मध्यवर्ती कार्यशाळा व मध्यवर्ती कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन होणार……!</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/fund-of-rs-100-crores-approved-immediately-for-outstanding-installments-of-st-employees-transport-minister-assures-1150032.html">मोठी बातमी! एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत हप्त्यांसाठी १०० कोटींचा निधी तातडीने मंजूर; परिवहन मंत्र्यांनी दिली ग्वाही</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>रस्ते अपघातांना बसणार ब्रेक! हायवे सुरक्षेसाठी भारताचा मास्टरस्ट्रोक, &#8216;असा&#8217; होणार AI तंत्रज्ञानाचा वापर</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/government-deploys-ai-powered-survey-vehicles-for-national-highways-maintenance-marathi-news-1250885.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Ankita Karangutkar]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:20:17 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 17:52:12 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T175016.908_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Artificial intelligence]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[Court]]></category>
		<category><![CDATA[Government]]></category>
		<category><![CDATA[Marathi News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250885</guid>

					<description><![CDATA[रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी देशभरात लेझर-आधारित तंत्रज्ञानाने सज्ज असलेली प्रगत 'नेटवर्क सर्व्हे वाहने' तैनात केली आहेत. भारताच्या राष्ट्रीय महामार्ग जाळ्यासाठी माहितीवर आधारित (डेटा-ड्रिव्हन) आणि सक्रिय देखभाल प्रणाली उभारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T175016.908_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Government Deploys Ai Powered Survey Vehicles For National Highways Maintenance Marathi News"     /></figure><p style="text-align: justify;">रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी देशभरात लेझर-आधारित तंत्रज्ञानाने सज्ज असलेली प्रगत &#8216;नेटवर्क सर्व्हे वाहने&#8217; तैनात केली आहेत. भारताच्या राष्ट्रीय महामार्ग जाळ्यासाठी माहितीवर आधारित आणि सक्रिय देखभाल प्रणाली उभारण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.ही अत्याधुनिक वाहने लेझर प्रोफायलर्स, <a href="https://www.navarashtra.com/topic/gps">GPS</a> प्रणाली, उच्च-रिझोल्यूशन कॅमेरे आणि प्रगत लेझर सेन्सर्सनी सुसज्ज आहेत.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="RBI ची मोठी कारवाई, 135 NBFC चं रजिस्ट्रेशन करण्यात आलं रद्द, सर्वाधिक संख्या बंगालमध्ये, नेमकं प्रकरण काय" href="https://www.navarashtra.com/business/rbi-cancels-registration-certificates-of-135-nbfcs-west-bengal-hit-hardest-see-more-details-1250735.html"> RBI ची मोठी कारवाई, 135 NBFC चं रजिस्ट्रेशन करण्यात आलं रद्द, सर्वाधिक संख्या बंगालमध्ये, नेमकं प्रकरण काय? </a></span></p>
<h3 style="text-align: justify;">याचा उपयोग काय?</h3>
<p style="text-align: justify;">महामार्गांचे सर्वेक्षण करणे आणि रस्त्यांच्या स्थितीचे तपशीलवार डिजिटल नकाशे तयार करणे यासाठी ही यंत्रणा डिझाइन करण्यात आली आहे.ही प्रणाली खड्डे, भेगा, पॅचवर्क आणि पृष्ठभागावरील अनियमितता यांसारखे दोष ओळखू शकते, ज्यामुळे संबंधित यंत्रणांना वेळेवर सुधारणात्मक उपाययोजना करणे शक्य होते.</p>
<h3 style="text-align: justify;">मंत्रालयाचं म्हणणं काय?</h3>
<p style="text-align: justify;">मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या उपक्रमाचा उद्देश देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवासाचा अनुभव सुधारणे आणि रस्ते सुरक्षा अधिक बळकट करणे हा आहे.अनेक राष्ट्रीय महामार्ग कॉरिडॉर्सवर ही NSV वाहने आधीच तैनात करण्यात आली आहेत आणि या तंत्रज्ञानामुळे रस्ते-संबंधित पायाभूत सुविधांच्या देखरेखीमध्ये आणि व्यवस्थापनामध्ये मोठी क्रांती घडण्याची अपेक्षा आहे.पारंपारिक सर्वेक्षण पद्धतींद्वारे दिवसाला केवळ २० ते ८० किलोमीटर रस्त्याची तपासणी करणे शक्य होत असे, तर नवीन पिढीची ही वाहने दररोज ३०० किलोमीटरपर्यंतचे सर्वेक्षण करण्यास सक्षम आहेत.</p>
<h3 style="text-align: justify;">दोष जलद गतीने शोधणे शक्य</h3>
<p style="text-align: justify;">मंत्रालयाने नमूद केले की, या वाढीव क्षमतेमुळे रस्त्यांवरील दोष जलद गतीने शोधणे शक्य होईल आणि दुरुस्तीच्या कामासाठी लागणारा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.मंत्रालयाच्या माहितीनुसार, या तंत्रज्ञानामुळे डेटा प्रक्रिया आणि अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेतही मोठी सुधारणा झाली आहे; वाहनांद्वारे गोळा केलेला कच्चा सर्वेक्षण डेटा एनक्रिप्ट केला जातो आणि ४८ तासांच्या आत केंद्रीय NSV हबकडे पाठविला जातो.त्यानंतर, पाच क्षेत्रांमध्ये तैनात असलेली तज्ज्ञ पथके या माहितीचे विश्लेषण करून अहवाल तयार करतात. पूर्वी या संपूर्ण प्रक्रियेसाठी ४ ते ६ महिने लागत असत, परंतु आता ती केवळ १० दिवसांत पूर्ण होऊ शकते. माहितीची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी, मंजुरीपूर्वी प्रत्येक अहवालाला कठोर गुणवत्ता तपासणी प्रक्रियेतून जावे लागते.</p>
<h3 style="text-align: justify;">मानवी हस्तक्षेप कमी होईल</h3>
<p style="text-align: justify;">अहवालाची पडताळणी झाल्यानंतर, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे संबंधित शेअर्स होल्डर्सना नोटिसेस पाठवल्या जातील. यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होईल आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल.या नवीन प्रणालीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे &#8216;नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया&#8217;च्या (NHAI) &#8216;एआय-आधारित डेटा लेक पोर्टल&#8217;शी (<a href="https://www.navarashtra.com/topic/artificial-intelligence">AI-</a>based data lake portal) तिचे केलेले एकत्रीकरण. सर्वेक्षणाशी संबंधित सर्व माहिती थेट या प्लॅटफॉर्मवर अपलोड केली जाईल, ज्यामुळे तज्ज्ञांना रस्त्यांच्या स्थितीचे रिअल-टाइम विश्लेषण करणे आणि देखभाल व दुरुस्तीबाबत वस्तुस्थितीवर आधारित निर्णय घेणे शक्य होईल.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="अमेरिकेतही महागाई फोफावली, दर 4 % च्या पार; भारतीय Share Market आणि RBI वर काय होणार परिणाम" href="https://www.navarashtra.com/business/us-inflation-surpasses-4-percent-impact-on-indian-stock-market-and-rbi-marathi-news-1250550.html"> अमेरिकेतही महागाई फोफावली, दर 4 % च्या पार; भारतीय Share Market आणि RBI वर काय होणार परिणाम? </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Vastu Tips: भाग्य उजळेल! घरात ठेवा हे ‘मनी मॅग्नेट’ रोप; वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?</title>
		<link>https://www.navarashtra.com/religion/money-magnet-crassula-plant-vastu-benefits-right-direction-for-wealth-and-prosperity-1250956.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:18:26 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:18:44 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/jade-plant_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[धर्म]]></category>
		<category><![CDATA[daily vastu tips]]></category>
		<category><![CDATA[religion news]]></category>
		<category><![CDATA[Tree]]></category>
		<category><![CDATA[Vastu Shastra]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250956</guid>

					<description><![CDATA[Crassula Jade Plant known as Money Magnet: घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही रोपांना विशेष महत्त्व आहे, ज्यात ‘मनी मॅग्नेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रॅसुला किंवा जेड प्लांटचा समावेश होतो. वास्तुशास्त्रानुसार, हे रोप योग्य दिशेत आणि ठिकाणी ठेवल्यास आर्थिक स्थिती मजबूत होते आणि घरात प्रगतीचे वातावरण तयार होते.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/jade-plant_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Money Magnet Crassula Plant Vastu Benefits Right Direction For Wealth And Prosperity"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>घरात ठेवा हे ‘मनी मॅग्नेट’ रोप</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>भाग्य उजळेल</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">घरात हिरवळ असावी आणि वातावरण प्रसन्न राहावे यासाठी अनेकजण विविध शोभेच्या प्लांट लावतात. मात्र काही रोप केवळ सौंदर्यवृद्धीसाठीच नव्हे तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीनेही महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे क्रॅसुला किंवा जेड प्लांट. याला मनी ट्री म्हणूनही ओळखले जाते. वास्तुशास्त्रानुसार ‘मनी मॅग्नेट’ हे रोप घरात सकारात्मक ऊर्जा, आर्थिक स्थिती मजबूत आणि प्रगतीचे वातावरण निर्माण करण्यास मदत करते. परंतु तिचे शुभ परिणाम तेव्हाच मिळतात, जेव्हा ती योग्य दिशेत आणि योग्य ठिकाणी ठेवली जाते. चला तर मग, क्रॅसुला वनस्पती ठेवण्याची योग्य दिशा जाणून घेऊया.</span><p><a title="Shakun Shastra: घराच्या मुख्य दारात कुत्रा बसणे शुभ की अशुभ संकेत" href="https://www.navarashtra.com/religion/shakun-shastra-dog-at-door-meaning-significance-hindu-beliefs-bhairav-symbolism-1250909.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Shakun Shastra</span>: घराच्या मुख्य दारात कुत्रा बसणे शुभ की अशुभ संकेत? जाणून घ्या</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">क्रॅसुला प्लांटला ‘मनी मॅग्नेट’ का म्हणतात?</h3>
<p style="text-align: justify;">क्रॅसुलाच्या गोलसर, हिरव्या आणि चमकदार पानांना नाण्यांचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हे रोप संपन्नता, वाढ आणि आर्थिक प्रगतीशी जोडली जाते. वास्तुशास्त्रात ती सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी रोप मानले जाते. विशेषतः व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा करिअरमध्ये प्रगतीची अपेक्षा असणाऱ्यांसाठी ती शुभ मानली जाते.</p>
<h3 style="text-align: justify;">कोणती दिशा मानली जाते सर्वात शुभ?</h3>
<p style="text-align: justify;">वास्तु तज्ज्ञांच्या मते क्रॅसुला प्लांट घराच्या किंवा <a href="https://www.navarashtra.com/topic/office-work">कार्यालयाच्या</a> आग्नेय दिशेला ठेवणे लाभदायक ठरते. ही दिशा धन आणि सुख-समृद्धीशी जोडली जाते. मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूसही हे रोप ठेवता येते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वावरते. वास्तुशास्त्रानुसार, उत्तर दिशा ही संपत्तीचे देवता कुबेराशी संबंधित आहे. या दिशेत क्रॅसुलाचे रोप लावल्याने करिअरमध्ये प्रगतीच्या संधी मिळतात आणि व्यवसाय व नोकरीमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतात. पूर्व दिशेला क्रॅसुला ठेवल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. यामुळे कुटुंबात शांतता आणि आनंद वाढतो.</p>
<h3 style="text-align: justify;">व्यवसाय आणि करिअरमध्ये कसा होतो फायदा?</h3>
<p style="text-align: justify;">अनेक मान्यतांनुसार योग्य ठिकाणी ठेवलेला क्रॅसुला प्लांट आर्थिक निर्णयांमध्ये स्थिरता, व्यवसायात नवीन संधी आणि कामात प्रगती आणण्यास मदत करते. तसेच, नोकरी करणाऱ्या व्यक्तींना <a href="https://www.navarashtra.com/topic/career">करिअरमध्ये</a> प्रगती आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, अशी धारणा आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">क्रॅसुला प्लांटची काळजी कशी घ्यावी?</h3>
<ul>
<li style="text-align: justify;">रोपाला अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.</li>
<li style="text-align: justify;">जास्त पाणी देणे टाळा; माती कोरडी झाल्यावरच पाणी द्या.</li>
<li style="text-align: justify;">सुकलेली किंवा खराब पाने वेळोवेळी काढून टाका.</li>
<li style="text-align: justify;">स्वच्छ आणि हवेशीर जागा निवडा.</li>
<li style="text-align: justify;">या ठिकाणी क्रॅसुला रोप ठेवू नका</li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">वास्तुशास्त्रानुसार, क्रॅसुला रोप बेडरूम, बाथरूम, शौचालय, स्वयंपाकघर किंवा घरातील इतर कोणत्याही अंधाऱ्या जागेत ठेवू नये. अशा ठिकाणी रोप ठेवल्याने सकारात्मक परिणाम मिळत नाहीत. तसेच, यामुळे आर्थिक नुकसान आणि मानसिक तणाव वाढतो, असेही मानले जाते.</span><p style="text-align: justify;"><strong>(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)</strong></p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Hindu – Muslim: 15 जूनला येणार हिंदू मुस्लीम एकत्र, ठरणार ‘खास’ दिवस; एक नाही तर 4 कारणं" href="https://www.navarashtra.com/religion/adhik-maas-end-amavasya-mithun-sankranti-and-mhuharrum-both-festivals-of-hindu-and-muslim-on-15th-june-1250512.html"><span class="color-red">Hindu – Muslim</span>: 15 जूनला येणार हिंदू मुस्लीम एकत्र, ठरणार ‘खास’ दिवस; एक नाही तर 4 कारणं</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर; अशोक पत्की, आनंद भाटे, अरुण नलावडे यांच्यासह महाराष्ट्रातील कलावंतांचा राष्ट्रीय गौरव</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/sangeet-natak-akademi-awards-announced-1250973.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिवेश चव्हाण]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:17:39 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:17:39 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T181704.107_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[ashok chavhan]]></category>
		<category><![CDATA[Indian Classical Music]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250973</guid>

					<description><![CDATA[संगीत नाटक अकादमीने 2024 आणि 2025 वर्षांसाठीचे प्रतिष्ठित अकादमी पुरस्कार आणि उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार जाहीर केले आहेत. या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ आणि युवा कलावंतांचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T181704.107_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Sangeet Natak Akademi Awards Announced"     /></figure><p>भारतीय संगीत, नृत्य, नाट्य आणि लोककला क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या संगीत नाटक अकादमीच्या वतीने वर्ष 2024 आणि 2025 साठीचे प्रतिष्ठित ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ तसेच ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. यंदाच्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ आणि युवा कलावंतांनी राष्ट्रीय स्तरावर मानाचा सन्मान मिळवत राज्याच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव वाढविला आहे. संगीत नाटक अकादमी ही देशातील सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था मानली जाते. संगीत, नृत्य, नाट्य, लोककला आणि पारंपरिक कलांच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कलाकारांना या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. यावर्षीच्या यादीत महाराष्ट्रातील विविध कला क्षेत्रांतील मान्यवर कलाकारांचा समावेश आहे.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘मर्दिनी’मधून अहमद खान यांचं मराठीत पदार्पण; आदर्श शिंदेंच्या दमदार आवाजात उमटणार स्त्रीशक्तीचा जयघोष" href="https://www.navarashtra.com/entertainment/ahmed-khan-makes-his-marathi-debut-with-mardini-adarsh-shindes-powerful-voice-to-celebrate-the-spirit-of-women-empowerment-1250781.html">‘मर्दिनी’मधून अहमद खान यांचं मराठीत पदार्पण; आदर्श शिंदेंच्या दमदार आवाजात उमटणार स्त्रीशक्तीचा जयघोष</a></span></h3>
<p>वर्ष 2024 साठी जाहीर करण्यात आलेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर आणि अभंग गायनासाठी प्रसिद्ध असलेले आनंद भाटे यांची निवड करण्यात आली आहे. अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अभिनेते अरुण नलावडे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. पारंपरिक रंगभूमी क्षेत्रातील कार्यासाठी मुकुंद मराठे, लोकनृत्य क्षेत्रासाठी सुभाष नारायण नकाशे आणि नृत्य संशोधन व अभ्यासपूर्ण कार्यासाठी शुभदा वरदकर यांनाही या सन्मानाने गौरविण्यात आले आहे. याचबरोबर ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’ 2024 अंतर्गत हिंदुस्तानी गायनासाठी कृष्ण बोंगाणे आणि अंकिता जोशी यांची निवड झाली आहे. भारूड या लोकसंगीत प्रकारासाठी भावार्थ रामचंद्र देखणे, बाहुलीनाट्य या दुर्मिळ लोककलेसाठी बाळकृष्ण गणपत मसगे आणि लोकनृत्य व लोकसंगीत क्षेत्रातील योगदानासाठी चेतन वामन खेडेकर यांना युवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.</p>
<p>वर्ष 2025 साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील आणखी काही दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. शहनाई वादन क्षेत्रातील योगदानासाठी शैलेश भागवत, नाट्य दिग्दर्शन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रमोद डी. पवार आणि नाट्यसंगीत क्षेत्रातील दीर्घकालीन योगदानासाठी ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांची निवड करण्यात आली आहे. कथक नृत्य क्षेत्रातील विशेष योगदानासाठी मनीषा साठे यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.</p>
<p>तसेच 2025 च्या ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कारां’मध्ये हार्मोनियम वादनातील प्रभुत्वासाठी तन्मय देवचके आणि महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील जागर या लोकसंगीत प्रकारासाठी प्रवीण प्रताप जाधव यांची निवड करण्यात आली आहे. युवा कलाकारांच्या या सन्मानामुळे पारंपरिक कला प्रकारांना नवी ऊर्जा आणि प्रोत्साहन मिळणार असल्याचे मानले जात आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे स्वरूप अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. पुरस्कार विजेत्यांना एक लाख रुपये रोख रक्कम, ताम्रपट आणि शाल देऊन गौरविण्यात येते. तर ‘उस्ताद बिस्मिल्ला खाँ युवा पुरस्कार’ अंतर्गत 25 हजार रुपये, ताम्रपट आणि शाल प्रदान केली जाते. या पुरस्कारांद्वारे ज्येष्ठ कलाकारांच्या योगदानाचा गौरव केला जातो, तसेच नवोदित आणि युवा कलाकारांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली जाते.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Aamchya Ladkya Naik Bai : ‘अभी तो शूटिंग सुरु हुई है’ झाला हो श्रीगणेशा! ऐश्वर्या नारकरची नवी मालिका, मुहूर्त पडला पार" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/aamchya-ladkya-naik-bai-shooting-started-1250817.html"><span class="color-red">Aamchya Ladkya Naik Bai </span>: ‘अभी तो शूटिंग सुरु हुई है’ झाला हो श्रीगणेशा! ऐश्वर्या नारकरची नवी मालिका, मुहूर्त पडला पार</a></span></h3>
<p>अकादमीच्या माहितीनुसार, हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील कलावंतांनी राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या यशामुळे राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला नव्या उंचीवर नेणारा हा गौरव मानला जात आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>आंबेगाव तालुक्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई, लिंकिंग पद्धतीमुळे शेतकरी दुहेरी कचाट्यात; दोषींवर कारवाईची मागणी</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/farmers-in-ambegaon-taluka-are-facing-difficulties-due-to-a-shortage-of-urea-fertilizer-1250972.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:16:50 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:16:50 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ambegaon-n_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[Ambegaon]]></category>
		<category><![CDATA[Ambegaon taluka]]></category>
		<category><![CDATA[CM Devedra Fadnavis]]></category>
		<category><![CDATA[Farmers]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250972</guid>

					<description><![CDATA[आंबेगव तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असून, काही ठिकाणी खताचा साठा, उपलब्धता व दर याबाबतची माहिती दर्शविणारे फलकही लावलेले नसल्याचे निदर्शनास येत आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ambegaon-n_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Farmers In Ambegaon Taluka Are Facing Difficulties Due To A Shortage Of Urea Fertilizer"     /></figure><p><strong>महाळुंगे पडवळ</strong> : खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच <a href="https://www.navarashtra.com/topic/ambegaon">आंबेगाव</a> तालुक्यात युरिया खताची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. पिकांच्या वाढीसाठी अत्यावश्यक असलेले युरिया वेळेवर उपलब्ध न झाल्यास उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया उपलब्ध नसल्याचे सांगितले जात असून, काही ठिकाणी खताचा साठा, उपलब्धता व दर याबाबतची माहिती दर्शविणारे फलकही लावलेले नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खतासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.</p>
<p>&nbsp;</p>
<p>सध्या तालुक्यात मका, आले, टोमॅटो, ऊस तसेच विविध पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. डिंभे धरणाच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये बारमाही पाणी उपलब्ध असल्याने नगदी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कांदा पिकातील नुकसानीनंतर अनेक शेतकरी पर्यायी पिकांमधून उत्पन्न मिळविण्याच्या आशेवर आहेत. मात्र या पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र युरियामधून सुमारे ४६ टक्के प्रमाणात मिळत असल्याने त्याची मागणी वाढली आहे.</p>
<p>दरम्यान, काही कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया उपलब्ध असला तरी ‘लिंकिंग पद्धती’चा अवलंब करून शेतकऱ्यांना इतर खते किंवा कृषी साहित्य खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याशिवाय अनेक विक्रेते खत विक्रीची पावती देत नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.</p>
<p><strong>शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यात अडथळे</strong></p>
<p>कृषी विभागाकडे तक्रार करताना खरेदीची बिले सादर करणे आवश्यक असते. मात्र बिलेच न मिळाल्याने शेतकऱ्यांना लेखी तक्रार करणे कठीण जात असून, न्याय मिळविण्यात अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे शेतकरी दुहेरी कचाट्यात सापडले आहेत. काही ठिकाणी युरियाचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण केल्याची चर्चा असून, याबाबत तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/congress-leader-harshvardhan-sapkal-has-criticized-the-modi-government-2-1250429.html">हे सुद्धा वाचा : नरेंद्र मोदींनी 12 वर्षात देश चुकीच्या दिशेला नेला, मोदी सरकारमध्ये ‘राम’ नाही अन्…; हर्षवर्धन सपकाळांची टीका</a></p>
<p><strong>बफर स्टॉक खुला करण्याचे आश्वासन</strong></p>
<p>या संदर्भात आंबेगाव तालुका कृषी विभागाशी संपर्क साधला असता, युरियाचा बफर स्टॉक लवकरच खुला करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. मात्र याबाबतची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, या गंभीर परिस्थितीत शेतकरी संघटना किंवा राजकीय पक्षांकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. युरिया खताचा पुरवठा सुरळीत करणे, साठेबाजी व काळाबाजार रोखणे, तसेच लिंकिंग पद्धतीवर तातडीने बंदी घालून दोषी विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>कोरेगावच्या विकासाला नवे पंख; ३६ वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा शिक्का अखेर रद्द, पाच हजार मिळकतधारकांना मोठा दिलासा</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/thirty-six-year-old-city-development-plan-endorsement-finally-cancelled-in-koregaon-1250943.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:13:26 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:13:26 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T181221.670_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[koregaon news]]></category>
		<category><![CDATA[Mahesh Shinde]]></category>
		<category><![CDATA[Satara News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250943</guid>

					<description><![CDATA[कोरेगाव शहरासाठी १९८९ मध्ये तयार करण्यात आलेली आणि केवळ कागदावर अस्तित्वात असलेली विकास योजना कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शहर विकास आराखडा आरक्षित या शिक्क्यामुळे बाधित असलेल्या सुमारे पाच हजार मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T181221.670_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Thirty Six Year Old City Development Plan Endorsement Finally Cancelled In Koregaon"     /></figure><p><strong>कोरेगाव (प्रतिनिधी) :</strong> कोरेगाव शहराला भविष्यात स्मार्ट सिटी म्हणून ओळख मिळणार असून सातारा जिल्ह्याच्या मुख्यालयाची ‘शॅडो सिटी’ म्हणून शहर वेगाने विकसित होत आहे. शहरासाठी १९८९ मध्ये तयार करण्यात आलेली आणि केवळ कागदावर अस्तित्वात असलेली विकास योजना कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शहर विकास आराखडा आरक्षित या शिक्क्यामुळे बाधित असलेल्या सुमारे पाच हजार मिळकतधारकांना मोठा दिलासा मिळाला असून यापुढे एकाही सातबारा उताऱ्यावर हा शिक्का दिसणार नाही, असे प्रतिपादन आमदार महेश शिंदे यांनी केले.</p>
<p>कोरेगाव औद्योगिक वसाहतीतील प्रियांका मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित कृतज्ञता सोहळा तसेच सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांच्या पहिल्या नागरी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार महेश शिंदे साहेब विचार मंच, विविध कॉलनी परिसरातील नागरिक व शेतकरी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे, माजी नगरसेवक सचिनभैय्या बर्गे, ज्येष्ठ विधीज्ञ चंद्रशेखर बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, नगरसेवक सागर विरकर, परशुराम बर्गे, अजित विलासराव बर्गे, नगरसेविका शीतल बर्गे, माजी नगरसेवक ॲड. अमोल भुतकर, माजी नगरसेविका रेश्मा महादेव जाधव, सोनेरी ग्रुपचे संस्थापक संतोष नलावडे, संतोषमामा कदम, प्रणव बर्गे, संजय दुबळे, श्रेयस काणे, महेश डोईफोडे, रमेश पाटील, सचिन गायकवाड, मदन दळवी, अधिक बर्गे, प्रकाश चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.</p>
<p>आमदार शिंदे पुढे म्हणाले, १९८९ साली नगरविकास विभागामार्फत कोरेगाव शहरासाठी विकास योजना लागू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शहरातील सुमारे दीड हजार एकर क्षेत्रावर ३३ प्रकारची आरक्षणे टाकण्यात आली होती. त्याची नोंद शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर असल्याने जमीन खरेदी-विक्री, कर्जप्रकरणे तसेच इतर व्यवहार करताना नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. अनेक व्यवहार वर्षानुवर्षे रखडले होते.</p>
<p>ही बाब माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांनी आपल्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून ही विकास योजना रद्द करण्यात आली. त्यानुसार सातबारा उताऱ्यांवरील आरक्षणाचे शिक्केही हटविण्यात आले असून शहरवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>यावेळी आमदार शिंदे यांनी सुनील दादा बर्गे यांच्या कार्याचे कौतुक केले. नगरपंचायत निवडणुकीनंतर त्यांच्यावर उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या बळकटीसाठी घेतलेले परिश्रम उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.</p>
<p>जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या, कोरेगाव शहराने नेहमीच आमदार महेश शिंदे यांना भक्कम पाठबळ दिले आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये शहरवासीयांनी भरघोस मतदान करून विश्वास दाखविला. त्याच विश्वासाला प्रतिसाद देत शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली असून जिल्हा परिषद आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भविष्यातही आवश्यक ते सहकार्य केले जाईल.</p>
<p>सुनीलदादा बर्गे यांनी सांगितले की, आमदार महेश शिंदे, डॉ. प्रियाताई शिंदे आणि डॉ. अरुणाताई विजय बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव शहराचा कायापालट झाला आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांचे ट्रीमिक्स काँक्रिटीकरण, बंदिस्त गटारे आणि विविध विकासकामांमुळे शहर स्वच्छ व सुबक बनले आहे. सातबारा उताऱ्यावरील ‘शहर विकास आराखडा आरक्षित’ हा शिक्का नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला होता. मात्र आमदार महेश शिंदे यांनी तातडीने पाठपुरावा करून हा प्रश्न निकाली काढला. त्यामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.</p>
<p>कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांचा कोरेगावकरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.</p>
<p>प्रारंभी संतोष नलावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संजय दुबळे, महेश डोईफोडे आणि रमेश पाटील सर यांनी मनोगत व्यक्त करताना सातबारा उताऱ्यावरील आरक्षणाच्या शिक्क्यामुळे नागरिकांना झालेल्या अडचणींचा आढावा घेतला. श्रेयस काणे यांनी आभार मानले. डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे यांचा पहिला नागरी सत्कार असल्याने शहरातील महिला हजारोंच्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होत्या.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="ST workers DA : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा" href="https://www.navarashtra.com/maharashtra/st-employees-da-hike-58-percent-pratap-sarnaik-house-rent-allowance-1250884.html"><strong> <span class="color-red">ST workers DA </span>: एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा</strong> </a></span></p>
<h3>आमदार महेश शिंदे यांची दूरदृष्टी; शहराच्या विकासाचे प्रवेशद्वार खुले</h3>
<p>सुनीलदादा बर्गे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत शहर विकास आराखडा आरक्षित हा शिक्का हटविल्यानंतर सातबारा वितरणाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यावेळी तांत्रिक सर्व्हर अडचणीमुळे कार्यक्रम होऊ शकला नव्हता. आता सातबारा वितरण करून तो निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणण्यात आला आहे. या निर्णयाचा सुमारे पाच हजार शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना थेट लाभ होणार आहे. जमीन खरेदी-विक्री, बँकिंग व्यवहार आणि गुंतवणूक प्रक्रियेला गती मिळणार असून कोरेगाव शहराच्या आर्थिक आणि भौतिक विकासासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a class="title" style="color: #3366ff;" title="Karad News: मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येण्यापूर्वीच काळाचा घाला! उरीत कर्तव्य बजावताना शहापूरचे सुपुत्र अर्जुन जाधव हुतात्मा" href="https://www.navarashtra.com/maharashtra/karad-soldier-arjun-jadhav-and-airoli-soldier-vikram-chavan-martyred-in-uri-blast-jammu-kashmir-1250886.html"> <span class="color-red">Karad News</span>: मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येण्यापूर्वीच काळाचा घाला! उरीत कर्तव्य बजावताना शहापूरचे सुपुत्र अर्जुन जाधव हुतात्मा </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>ICC ODI World Cup 2027 च्या तारखा जाहीर? कुठे आणि कधी होणार? दक्षिण आफ्रिकेत तब्बल&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/know-the-icc-mens-odi-world-cup-dates-venue-south-africa-sports-news-1250915.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:07:19 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:11:27 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T180347.849_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[ICC]]></category>
		<category><![CDATA[ICC World Cup]]></category>
		<category><![CDATA[South Africa]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250915</guid>

					<description><![CDATA['आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. याच्या तारखांबाबत माहिती समोर आली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T180347.849_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Know The Icc Mens Odi World Cup Dates Venue South Africa Sports News"     /></figure><p><strong>2027 मध्ये होणार आयसीसी एकदिवसीय वर्ल्ड कप </strong><br />
<strong>ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात होऊ शकते स्पर्धा </strong><br />
<strong>तीन देशांमध्ये खेळवला जाणार वर्ल्ड कप</strong></p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/icc-world-cup">ICC ODI World Cup</a></span> 2027:</strong> सध्या उद्यापासून आयसीसी महिला विश्वचषक 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. भारताचा संघ 14 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध अपला पहिला सामना खेळणार आहे. महिला वर्ल्ड कपची उत्सुकता असतानाच आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे. आयसीसी ओडीआय वर्ल्ड कप 2027 मध्ये होणार आहे. त्याबाबत आधी माहिती जाणून घेऊयात.</p>
<p>क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजेच &#8216;<span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/icc">आयसीसी</a> </strong></span>एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक&#8217; च्या तारखांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. हा महासंग्राम दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबिया या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली खेळवला जाणार आहे. याच्या तारखांबाबत माहिती समोर आली आहे.</p>
<p>आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2027 मध्ये होणार आहे. मात्र त्याच्या तारखा अद्याप समोर आल्या नव्हत्या. दरम्यान आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 4 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत होण्याची शक्यता आहे. लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तीन देशांमध्ये हा वर्ल्ड कप होणार असला तरी सर्वाधिक वाटा हा दक्षिण आफ्रिकेचा असणार आहे. 54 पैकी 41 सामने एकट्या दक्षिण आफ्रिकेत होणार आहेत. झिम्बाब्वेमध्ये 8 ते 10 सामने होऊ शकतात. तर तब्बल 24 वर्षांनी आफ्रिका खंडात पुरुष वन-डे विश्वचषकाचे आयोजन करण्यात येणार आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/icc-womens-t20-world-cup-2026-team-india-chance-to-win-world-cup-harmanpreet-kaur-captain-news-1250681.html">ICC Women’s T20 World Cup 2026: मिशन वर्ल्ड कप! ‘या’ ताकदीच्या जोरावर टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार?</a></strong></span></p>
<p><strong>टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकणार?</strong></p>
<p>उद्या म्हणजेच 12 जूनपासून आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धा सुरू होणार आहे. सुरुवातीचा पहिला सामना इंग्लंड आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. तर भारताचा संघ 14 जून रोजी आपला पहिला सामना खेळणार आहे. भारत आणि पाकिस्तान 14 जून रोजी आमनेसामने येणार आहेत. दरम्यान यंदाचा वर्ल्डकप भारत जिंकण्याची प्रबळ कारणे जाणून घेऊयात.</p>
<p>फलंदाजी – भारतीय महिला संघ आपल्या आक्रमक आणि संयमी फलंदाजीसाठी ओळखला जातो. शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत. इंग्लंडमध्ये दोन्ही खेळाडूंचा परफॉर्मन्स चांगला आहे. जेमिमा रोड्रिग्स मिडल ऑर्डरमध्ये खेळण्यासाठी ओळखली जाते. तर रिचा घोष आणि कर्णधार हरमनप्रीत कौर चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहेत.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/england-beat-india-by-5-runs-richa-ghosha-practise-match-icc-womens-t-20-world-cup-2026-1250194.html">IND Vs ENG: रिचा घोषची झुंजार खेळी व्यर्थ; अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडचा भारतावर 5 रन्सने विजय</a></strong></span></p>
<p>रिचा घोष: रिचा घोष ही भारतीय फलंदाजीचा मुख्य कणा समजला जात आहे. कालच्या सराव सामन्यात देखील रिचा घोषने 68 रन्सची शानदार खेळी केली होती. टी 20 फॉर्मटमध्ये रिचा घोष अत्यंत आक्रमक खेळीसाठी ओळखली जाते.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Krushnai chya Leki : आता होणार कहर&#8230;! &#8216;कृष्णाईच्या लेकी&#8217; मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री; साकारणार &#8216;हे&#8217; महत्वाचं पात्र</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/ekta-labde-will-play-the-role-of-sharada-in-the-marathi-serial-krushnai-chya-leki-1250950.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिवेश चव्हाण]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:06:58 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:06:58 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T180625.968_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[Marathi Serial]]></category>
		<category><![CDATA[zee marathi]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250950</guid>

					<description><![CDATA[Zee Marathi वर 15 जूनपासून 'कृष्णाईच्या लेकी' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत Nivedita Saraf स्वाभिमानी आईची भूमिका साकारत असून तिच्या तीन मुलींची कथा दाखवण्यात येणार आहे.Zशारदा, गौरी आणि मिनी या भूमिकांमध्ये अनुक्रमे एकता लब्दे, ट्विंकल यादव आणि नारायणी वर्णे झळकणार आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T180625.968_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ekta Labde Will Play The Role Of Sharada In The Marathi Serial Krushnai Chya Leki"     /></figure><ul>
<li>15 जूनपासून Zee Marathi वाहिनेवर प्रसारित करण्यात येणार आहे.</li>
<li>अभिनेत्री एकता लब्देची निवड करण्यात आली आहे.</li>
<li>मालिकेचे प्रसारण Prime Time ला दररोज सध्यांकाळी 7 वाजता होणार आहे.</li>
</ul><span class="bullet-text">Zee Marathi वाहिनेवर प्रेक्षकांना एका नव्या मालिकेचा आनंद घेता येणार आहे. &#8216;कृष्णाईच्या लेकी&#8217; मालिकेचे नाव असून मालिकेत मुख्य भूमिकेत जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ झळकणार आहेत. मालिकेत निवेदिता सराफ यांनी एका स्वाभिमानी आईची भूमिका साकारली आहे. मुळात, त्यांची भूमिका फार खास आहे. एका नवऱ्याने सोडलेली बाई, तिच्या तीन मुलींना स्वाभिमानाने कसे वाढवते"color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Icchadhari Naagin : Zee आणि Star मध्ये स्पर्धा" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/the-shooting-started-of-marathi-serial-icchadhari-naagin-1250764.html"><span class="color-red">Icchadhari Naagin </span>: Zee आणि Star मध्ये स्पर्धा? ‘मी कात टाकली’ नंतर मनोरंजन करण्यासाठी आणखीन एक Naagin आधारित मालिका सज्ज</a></span></h3>
<p><strong>मालिकेत &#8216;या&#8217; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची एंट्री!</strong></p>
<p>&#8216;कृष्णाईच्या लेकी&#8217; या मालिकेत निवेदिता सराफ यांच्या तीन मुली दाखवण्यात आल्या आहेत. त्या तिन्ही मुलींचे नावे शारदा, गौरी आणि मिनी असे आहे. गौरी या पात्रासाठी अभिनेत्री Twinkal Yadav ची निवड करण्यात आली आहे. तर मिनी या पात्रासाठी अभिनेत्री नारायणी वर्णेची निवड करण्यात आली आहे. तर मोठी बहीण शारदाची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री एकता लब्देची निवड करण्यात आली आहे.</p>
<p>एकंदरीत, &#8216;कृष्णाईच्या लेकी&#8217; या मालिकेचे मुख्य भूमिका जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री एकता लब्दे, अभिनेत्री ट्विंकल यादव तसेच अभिनेत्री नारायणी वर्णे यांची निवड करण्यात आली आहे. 15 जूनपासून ही मालिका प्रसारित करण्यात येणार आहे. मालिकेचे प्रसारण Prime Time ला दररोज सध्यांकाळी 7 वाजता होणार आहे.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="‘मर्दिनी’मधून अहमद खान यांचं मराठीत पदार्पण; आदर्श शिंदेंच्या दमदार आवाजात उमटणार स्त्रीशक्तीचा जयघोष" href="https://www.navarashtra.com/entertainment/ahmed-khan-makes-his-marathi-debut-with-mardini-adarsh-shindes-powerful-voice-to-celebrate-the-spirit-of-women-empowerment-1250781.html">‘मर्दिनी’मधून अहमद खान यांचं मराठीत पदार्पण; आदर्श शिंदेंच्या दमदार आवाजात उमटणार स्त्रीशक्तीचा जयघोष</a></span></h3>
<p><strong>&#8216;कृष्णाईच्या लेकी&#8217; ही मालिका एक रिमेक!</strong></p>
<p>&#8216;कृष्णाईच्या लेकी&#8217; ही मालिका मूळ मराठी भाषेतील नसून ती एका हिंदी तसेच तेलगू मालिकेचा रिमेक आहे. काही वर्षांपूर्वी &#8216;राधाम्मा कुथुरु&#8217; नावाची तेलगू मालिका प्रसारित केली जात होती. तसेच हिंदी मालिका &#8216;गंगा माई की बेटियां&#8217;देखील मालिका चाहत्यांमध्ये प्रसिद्ध होता. यांचं मालिकांचा रिमेक Zee Marathi वाहिनेची आगामी मालिका &#8216;कृष्णाईच्या लेकी&#8217; आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>वाहतूक कोंडीवरील तातडीच्या उपाययोजनांना प्राधान्य द्या; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे निर्देश</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/divisional-commissioner-sheetal-teli-ugle-has-directed-officials-to-reduce-traffic-congestion-1250949.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:05:56 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:06:26 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/teli-ugle_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[CM Devedra Fadnavis]]></category>
		<category><![CDATA[maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Traffic News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250949</guid>

					<description><![CDATA[सध्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तात्काळ राबविता येतील अशा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी प्राधान्याने करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/teli-ugle_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Divisional Commissioner Sheetal Teli Ugle Has Directed Officials To Reduce Traffic Congestion"     /></figure><p><strong>पुणे</strong> : <a href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune">पुणे</a> शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशातील वाहतुकीचे दीर्घकालीन एकात्मिक नियोजन सुरू असतानाच सध्याची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तात्काळ राबविता येतील अशा उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी प्राधान्याने करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित &#8216;पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण&#8217; (UMTA) समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.</p>
<p>&nbsp;</p>
<p>बैठकीला महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त मंजुलक्ष्मी के., पुणे महापालिकेच्या अपर आयुक्त पवनीत कौर, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.</p>
<p>श्रीमती तेली-उगले म्हणाल्या की, पुणे शहरातील प्रस्तावित बोगद्यांचे जाळे अर्थात &#8216;पाताळ लोक प्रकल्प&#8217;, उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) आणि अंतर्गत वर्तुळाकार मार्ग यांसारख्या दीर्घकालीन प्रकल्पांसाठी विशेष प्रयोजन वाहन (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी कालावधी लागणार असल्याने त्यांचे नियोजन, आरेखन आणि विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची आवश्यकता आहे.</p>
<p>त्याचबरोबर सध्या उपलब्ध असलेल्या वाहतूक पायाभूत सुविधांचा पूर्ण क्षमतेने वापर करून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी महापालिका, पोलीस, रेल्वे, महामेट्रो, पीएमपीएमएल, एसटी आणि परिवहन विभाग यांची संयुक्त उपसमिती स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या उपसमितीने केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण पुढील बैठकीत करण्यासही सांगितले. मेट्रो आणि रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी &#8216;लास्ट माईल कनेक्टिव्हिटी&#8217; सक्षम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यासाठी संबंधित ठिकाणी पीएमपीएमएल बस सेवा, रिक्षा थांबे आणि पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.</p>
<p>महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी बोगद्यांचे नियोजन करताना केवळ खासगी वाहनांपुरते मर्यादित न ठेवता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही प्रवेश देण्यात यावा, अशी सूचना केली. त्यामुळे वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. पीएमआरडीएचे आयुक्त अभिजीत चौधरी यांनी वाहतूक कोंडीच्या प्रमुख ठिकाणांना प्राधान्य देऊन प्रकल्पांची आखणी करण्याची गरज व्यक्त केली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांसह संपूर्ण महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था एकात्मिक पद्धतीने गतिमान होण्यासाठी समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p>अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी वाहतूक विभागाच्या उपाययोजनांबाबत सादरीकरण करताना विविध अंमलबजावणी यंत्रणांनी परस्परांमध्ये सांख्यिकी माहिती आणि डेटा सामायिक केल्यास वाहतूक कोंडीवर अधिक प्रभावीपणे उपाययोजना करता येतील, असे सांगितले. बैठकीत पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्ताराबाबतही माहिती देण्यात आली. त्यानुसार, पुणे रेल्वे स्थानकावर नवीन सहा फलाट उभारण्याबरोबरच विद्यमान सहा फलाटांची लांबी वाढविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सादरीकरणात नमूद केले.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/agriculture-minister-dattatray-bharne-is-facing-criticism-from-the-opposition-due-to-a-viral-video-1250931.html">हे सुद्धा वाचा : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादाच्या भोवऱ्यात, शेतकऱ्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांकडून टीकेची झोड</a></p>
<p>यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, रेल्वे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, पुणे महानगर परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नगररचना विभाग, वाहतूक व परिवहन विभागाचे अधिकारी तसेच मोनार्च कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>आता अमराठी चालकही बोलणार मराठी! परिवहन मंत्र्यांचं संपादकांना खुलं पत्र; सहकार्यासाठी माध्यमांना घातली साद</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/transport-minister-pratap-sarnaik-open-letter-to-editors-urging-non-marathi-drivers-to-learn-marathi-1250948.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Ankita Karangutkar]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:05:23 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:06:03 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T175542.240_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Bus Transport]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra Road Transport]]></category>
		<category><![CDATA[Marathi News]]></category>
		<category><![CDATA[Pratap Saranaik]]></category>
		<category><![CDATA[Public Transport]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250948</guid>

					<description><![CDATA[मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची, अस्मितेची आणि सामाजिक एकात्मतेची ओळख आहे. या भाषेचा सन्मान आणि संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T175542.240_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Transport Minister Pratap Sarnaik Open Letter To Editors Urging Non Marathi Drivers To Learn Marathi"     /></figure><p style="text-align: justify;">मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीची, अस्मितेची आणि सामाजिक एकात्मतेची ओळख आहे. या भाषेचा सन्मान आणि संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहतूक चालकांनी व्यवहारिक मराठी शिकावी आणि प्रवाशांशी मराठीत संवाद साधावा, या उपक्रमाला व्यापक लोकसमर्थन मिळावे यासाठी त्यांनी सर्व मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना खुले पत्र लिहून सहकार्याचे आवाहन केले आहे.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादाच्या भोवऱ्यात, शेतकऱ्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांकडून टीकेची झोड" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/agriculture-minister-dattatray-bharne-is-facing-criticism-from-the-opposition-due-to-a-viral-video-1250931.html"> कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादाच्या भोवऱ्यात, शेतकऱ्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांकडून टीकेची झोड </a></span></p>
<h3 style="text-align: justify;">पत्रात सरनाईक काय म्हणाले?</h3>
<p style="text-align: justify;">आपल्या पत्रात सरनाईक यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यावसायिक प्रवासी वाहन चालकाला व्यवहारिक मराठीचे ज्ञान असणे ही काळाची गरज आहे. प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचा वापर वाढल्यास केवळ भाषेचे संवर्धन होणार नाही, तर समाजातील परस्पर संवाद अधिक सुसंवादी, आत्मीय आणि परिणामकारक बनेल.</p>
<h3 style="text-align: justify;">भाषा संस्कृतीची वाहक</h3>
<p style="text-align: justify;">मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी नमूद केले की, भाषा ही केवळ शब्दांची देवाणघेवाण नसून ती संस्कृतीची वाहक असते. एखाद्या समाजाची परंपरा, मूल्ये आणि भावविश्व भाषेतूनच जपले जाते. त्यामुळे मराठी भाषेतून संवाद होणे आणि तो दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग बनणे आवश्यक आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">प्रवाशांशी मराठीत संवाद</h3>
<p style="text-align: justify;">मुंबई महानगर क्षेत्रासह राज्यातील विविध भागांत अनेक अमराठी चालक प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्याकडून अनेकदा हिंदी किंवा इतर भाषांमध्ये संवाद साधला जातो. मात्र आता हेच चालक मराठी शिकून प्रवाशांशी मराठीत संवाद साधू लागले, तर ते मराठी भाषेच्या सन्मानासाठी आणि सामाजिक समन्वयासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे <a href="https://www.navarashtra.com/topic/pratap-sarnaik">सरनाईक</a> यांनी पत्रात नमूद केले आहे. &#8220;आपण आपल्या राज्यात प्रवासी म्हणून किंवा नागरिक म्हणून वावरताना मराठी भाषेचा आग्रह धरणे स्वाभाविक आहे. मराठीचा अभिमान आणि तिचा वापर ही सवय प्रत्येकामध्ये रुजविण्याची वेळ आता आली आहे,&#8221; असेही त्यांनी स्पष्ट केले.</p>
<h3 style="text-align: justify;">माध्यमांच्या भूमिकेचा विशेष उल्लेख</h3>
<p style="text-align: justify;">माध्यमांच्या भूमिकेचा विशेष उल्लेख करताना सरनाईक यांनी म्हटले आहे की, समाजमन घडविण्यात प्रसारमाध्यमांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. या उपक्रमाला वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांतून प्रसिद्धी मिळाल्यास मराठी भाषा शिकण्याची चळवळ अधिक व्यापक आणि प्रभावी बनेल. माध्यमांच्या सहकार्यामुळे मराठी संवाद संस्कृतीला नवे बळ मिळेल आणि जनजागृतीचा हा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.</p>
<p style="text-align: justify;">मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राची अस्मिता यांचा सन्मान राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन परिवहन मंत्री<a href="https://www.navarashtra.com/topic/pratap-sarnaik"> प्रताप सरनाईक</a> यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून केले आहे.</p>
<p style="text-align: justify;"><a class="title" title="ST workers DA : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा" href="https://www.navarashtra.com/maharashtra/st-employees-da-hike-58-percent-pratap-sarnaik-house-rent-allowance-1250884.html"> <span class="color-red">ST workers DA </span>: एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा </a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Raj Thackeray: राज ठाकरेंची मनसैनिकांना मोठी साद; &#8216;वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका, पण&#8230;&#8217;, सोशल मीडियावरील पोस्ट Viral</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/mns-chief-raj-thackeray-emotional-social-media-post-urges-party-workers-not-to-meet-on-his-birthday-1250929.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:05:19 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:12:02 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/raj-thackeray_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[happy Birthday]]></category>
		<category><![CDATA[MNS]]></category>
		<category><![CDATA[Raj Thackeary]]></category>
		<category><![CDATA[Social Media]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250929</guid>

					<description><![CDATA[Raj Thackeray Emotional Message: राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी आहे, परंतु त्यांनी सोशल मीडियावर आधीच एक भावूक संदेश लिहिला आहे. या संदेशाद्वारे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/raj-thackeray_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mns Chief Raj Thackeray Emotional Social Media Post Urges Party Workers Not To Meet On His Birthday"     /></figure><ul>
<li>राज ठाकरेंची मनसैनिकांना मोठी साद</li>
<li>&#8220;वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला येऊ नका, पण&#8230;&#8221;</li>
<li>सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल</li>
</ul><span class="bullet-text"><strong>मुंबई:</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/MNS">महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे)</a></span> प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस १४ जून रोजी असतो. दरवर्षी त्यांच्या समर्थकांमध्ये या दिवशी मोठा उत्साह असतो आणि मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची व कार्यकर्त्यांची वर्दळ असते. मात्र, यंदा राज ठाकरे यांनी आपला वाढदिवस एका वेगळ्या आणि विशेष पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या &#8216;महाराष्ट्र सैनिकां&#8217;ना आणि हितचिंतकांना उद्देशून लिहिलेल्या एका भावपूर्ण व प्रेरणादायी संदेशात त्यांनी दिखाव्यापेक्षा पर्यावरण संवर्धनाला अधिक महत्त्व दिले आहे.</span><h3>काय म्हणाले राज ठाकरे?</h3>
<p>आपल्या संदेशात <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/Raj-Thackeray">राज ठाकरे</a></span> यांनी स्पष्ट केले की, यंदा १४ जून रोजी ते मुंबईत नसतील आणि त्यामुळे कोणालाही प्रत्यक्ष भेटू शकणार नाहीत. त्यांनी कार्यकर्त्यांना एक विशेष विनंती केली आहे: नेहमीप्रमाणे पुष्पगुच्छ, मिठाई आणि केक आणणे किंवा शहरात मोठे होर्डिंग्ज उभारणे यांऐवजी, त्यांनी जनहिताचे उपक्रम राबवून हा दिवस साजरा करावा. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या होर्डिंग्जनी शहर भरवून टाकण्यापेक्षा निसर्ग संवर्धनासाठी पावले उचलणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांचे मानणे आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="mr">माझ्या महाराष्ट्र सैनिकांना, हितचिंतकांना,</p>
<p>सस्नेह जय महाराष्ट्र,</p>
<p>१४ जून या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गेली अनेक वर्ष तुम्ही सगळे जणं मला उत्साहाने भेटायला येता, शुभेच्छा द्यायला येता, येताना पुष्पगुच्छ, मिठाई, केक घेऊन येता, राज्यभर होर्डिंग्स लावता . वाढदिवसाच्या दिवशी माझ्या…</p>
<p>— Raj Thackeray (@RajThackeray) <a href="https://x.com/RajThackeray/status/2064933749666840845">June 11, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<h3>&#8216;ऑपरेशन ग्रीन&#8217;: शाश्वत वृक्षारोपणावर भर</h3>
<p>राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना राज्यभर फळझाडे आणि फुलझाडे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. केवळ दिखाव्यासाठी रोपे लावू नका, कारण योग्य काळजी न घेतल्यास ती अनेकदा सुकून जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्याऐवजी, त्यांनी नर्सरीमधून मोठी आणि अधिक तग धरू शकणारी रोपे आणून ती अशा ठिकाणी लावण्यास सांगितले आहे जिथे त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश आणि पाणी मिळेल. भविष्यातील रस्ते रुंदीकरणाच्या प्रकल्पांमुळे नंतर तोडावी लागतील अशा ठिकाणी झाडे लावली जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तसेच, या मोहिमेत स्थानिक रहिवाशांना सहभागी करून घेण्याचे आणि त्यांच्यावर झाडांच्या देखभालीची जबाबदारी सोपवण्याचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/politics/mns-chief-raj-thackeray-criticizes-prime-minister-narendra-modi-appeal-1223900.html">पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’</a></p>
<h3>मुक्या पशू-पक्ष्यांची काळजी</h3>
<p>वाढते तापमान आणि अपुऱ्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन, राज ठाकरे यांनी पशू-पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्याचे आवाहनही केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना शहरे आणि जंगलांच्या सीमावर्ती भागात पाण्याच्या कुंड्या बांधण्यास सांगितले आहे आणि त्या नियमितपणे पाण्याने भरलेल्या राहतील याची खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चंद्रपूरचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना पाण्यासाठी भटकणाऱ्या प्राण्यांबद्दल समजले, तेव्हा त्यांनी त्वरित तिथे पाण्याच्या कुंड्या बांधण्याचे आदेश दिले होते.</p>
<h3>सरकारवर टीका आणि भविष्याबद्दल चिंता</h3>
<p>आपल्या संदेशात त्यांनी विद्यमान सरकारवरही टीका केली. सध्या झाडे तोडणाऱ्यांचे वर्चस्व असून, त्यांनी नैसर्गिक जंगलांची जागा &#8216;काँक्रीटच्या जंगलांनी&#8217; घेतली आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. आपण आताच झाडे वाचवली नाहीत, तर भविष्यातील पिढ्यांना झाड कसे असते हे पाहण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला.</p>
<h3>सोशल मीडियावरील &#8216;लाइक्स&#8217; नव्हे, तर आशीर्वाद मिळवा</h3>
<p>शेवटी, त्यांनी कार्यकर्त्यांना सक्त सूचना दिली की, या मोहिमेला केवळ एका दिवसापुरत्या फोटो काढण्याच्या कार्यक्रमापुरते मर्यादित ठेवू नये. सोशल मीडियावर &#8216;लाइक्स&#8217; आणि &#8216;व्ह्यूज&#8217; मिळवणे हा उद्देश नसून, निसर्ग आणि जनतेचे आशीर्वाद मिळवणे हा मुख्य उद्देश असावा, यावर त्यांनी भर दिला. राज ठाकरे यांचा हा संदेश केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक सूचना नाही, तर महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पर्यावरणाप्रती निर्माण झालेल्या एका नवीन संवेदनशीलतेचेही निदर्शक आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/raj-thackeray-angry-reaction-nasrapur-case-government-and-society-criticism-1219019.html"><span class="color-red">Raj Thackeray</span>: “आरोपीला तडफडून मारलं पाहिजे!” नसरापूर घटनेवर राज ठाकरेंचे तळतळाट; समाजाच्या मानसिकतेवर ओढले ताशेरे</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>घरात माणसं, मनात एकटेपणा! एकाकीपणाच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर!</title>
		<link>https://www.navarashtra.com/lifestyle/india-comes-on-2nd-number-of-lonliest-countries-1250934.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:04:31 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:04:31 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-83_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[लाइफ स्टाइल]]></category>
		<category><![CDATA[india]]></category>
		<category><![CDATA[mental health]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250934</guid>

					<description><![CDATA[जून २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक अभ्यासानुसार भारत हा जगातील दुसरा सर्वाधिक एकाकीपणा अनुभवणारा देश ठरला आहे. ३६ देशांमधील नागरिकांच्या भावनिक आरोग्य, सामाजिक संबंध आणि एकाकीपणाच्या अनुभवांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-83_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="India Comes On 2nd Number Of Lonliest Countries"     /></figure><p data-start="122" data-end="474">जून २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका जागतिक अभ्यासानुसार <a href="https://www.navarashtra.com/topic/india">भारत</a> हा जगातील दुसरा सर्वाधिक एकाकीपणा अनुभवणारा देश ठरला आहे. ३६ देशांमधील नागरिकांच्या भावनिक आरोग्य, सामाजिक संबंध आणि एकाकीपणाच्या अनुभवांचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. डिजिटल मनोरंजन मंच JB.com यांनी प्रसिद्ध केलेल्या या अहवालात तुर्की पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.</p>
<p data-start="476" data-end="759">अहवालानुसार भारताचा “लोनलीनेस स्कोअर” ८९ इतका नोंदवण्यात आला आहे. तुर्कीचा स्कोअर १०० असून त्यानंतर भारत आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो. भारतातील सुमारे ५८ टक्के नागरिकांनी आपण एकाकीपणाची भावना अनुभवत असल्याचे सांगितले, तर ३४ टक्के लोकांनी सामाजिकदृष्ट्या अलिप्त असल्याचे नमूद केले आहे.</p>
<p data-start="476" data-end="759"><a href="https://www.navarashtra.com/lifestyle/these-inspirational-thoughts-will-help-bring-calmness-to-your-mind-and-a-new-direction-to-life-1234472.html">आत्मसमाधान हीच खरी समृद्धी…! मन शांत आणि आयुष्याला नवी दिशा देण्यासाठी ‘हे’ प्रेरणादायी विचार नक्कीच ठरतील प्रभावी</a></p>
<p data-start="761" data-end="1052">विशेष म्हणजे भारतात संयुक्त कुटुंबपद्धती आणि कौटुंबिक नातेसंबंध अजूनही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत. देशातील केवळ ३.७ टक्के घरे ही एकट्या व्यक्तीची आहेत आणि सरासरी कुटुंबाचा आकार चारपेक्षा अधिक सदस्यांचा आहे. तरीही लोकांमध्ये एकाकीपणाची भावना वाढत असल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.</p>
<p data-start="1054" data-end="1347">अहवालात नमूद करण्यात आले आहे की भारतातील एकाकीपणा हा प्रामुख्याने शारीरिक नसून भावनिक स्वरूपाचा आहे. म्हणजेच अनेक लोक कुटुंबीयांसोबत किंवा इतर सदस्यांसोबत राहत असले तरी त्यांना भावनिक आधार, समजून घेणारे संबंध किंवा संवादाची कमतरता जाणवते. त्यामुळे गर्दीतही एकटे असल्याची भावना निर्माण होत आहे. याशिवाय भारतातील ३७ टक्के नागरिक वारंवार दुःखी असल्याचे आढळून आले आहे. हा आकडा पहिल्या पाच क्रमांकावरील देशांमध्ये सर्वाधिक आहे. यामुळे मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हाने आणि भावनिक ताणतणाव वाढत असल्याचे संकेत मिळतात.</p>
<p data-start="1054" data-end="1347"><a href="https://www.navarashtra.com/photos/these-unique-fruits-of-india-are-considered-to-be-great-for-diet-apart-from-taste-they-are-also-very-beneficial-for-the-body-1240403.html">डाएटसाठी उत्तम मानली जातात भारतातील ‘ही’ युनिक फळे, चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा आहेत खूप जास्त फायदेशीर</a></p>
<p data-start="1566" data-end="1858">दरम्यान, <a href="https://www.navarashtra.com/topic/turkey">तुर्कीमध्ये</a> ६१ टक्के लोकांनी एकाकीपणा जाणवत असल्याचे सांगितले असून ४५ टक्के लोक स्वतःला सामाजिकदृष्ट्या वेगळे समजतात. तेथे जवळपास प्रत्येक पाचपैकी एका घरात एकच व्यक्ती राहते. मात्र भारताच्या बाबतीत कुटुंबीयांसोबत राहूनही भावनिक तुटलेपणा वाढत असल्याची बाब अधिक चिंताजनक मानली जात आहे. हा अभ्यास आधुनिक जीवनशैली, डिजिटल संवाद, वाढती स्पर्धा आणि कमी होत चाललेले प्रत्यक्ष मानवी संबंध यामुळे मानसिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधतो. त्यामुळे भावनिक आरोग्य, संवाद आणि सामाजिक संबंध अधिक मजबूत करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Raigad News: शाळा प्रवेशावर संकट! जन्म दाखले न मिळाल्याने बालकांचे शिक्षण धोक्यात; जिल्हा परिषद आरोग्य विभागावर अनास्थेचा आरोप</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/raigad/raigad-birth-certificate-delay-school-admission-crisis-1250932.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 18:03:46 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:05:11 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/school-dakhvla_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[रायगड]]></category>
		<category><![CDATA[maharashtra]]></category>
		<category><![CDATA[raigad]]></category>
		<category><![CDATA[Zilla Parishad]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250932</guid>

					<description><![CDATA[Raigad Zilla Parishad : शाळा प्रवेशाच्या हंगामात रायगड जिल्ह्यात जन्म दाखले वेळेत न मिळाल्याने अनेक बालकांचे शाळा प्रवेश रखडल्याचा आरोप होत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कथित अनास्थेमुळे आणि शासनाच्या जन्म-मृत्यू नोंदणी पोर्टलमधील अडचणींमुळे अनेक मुलांचे शिक्षण धोक्यात आले आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/school-dakhvla_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Raigad Birth Certificate Delay School Admission Crisis"     /></figure><p><strong>शाळा प्रवेशावर संकट! </strong></p>
<p><strong>जन्म दाखले न मिळाल्याने बालकांचे शिक्षण धोक्यात</strong></p>
<p><strong>जिल्हा परिषद आरोग्य विभागावर अनास्थेचा आरोप</strong></p>
<p><strong>कर्जत :</strong> सध्या शाळा प्रवेशाचा हंगाम सुरू असून <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/raigad-news">रायगड जिल्हा</a></span> परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अनास्थेमुळे अनेकांना जन्माचे दाखले मिळेनासे झाले आहेत.जन्माचे दाखले मिळत नसल्याने अनेक बालकांचे शाळा प्रवेश रोखले गेले असून जिल्हा परिषदेच्या स उदासीन कारभारामुळे अनेक बालके शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.दरम्यान,शासनाच्या जन्म मृत्य नोंदी करणाऱ्या पोर्टलमुळे अनेक बालकांचे शाळा प्रवेशाचे स्वप्न भंग होण्याची शक्यता असून शाळा प्रवेश देखील संकटात आले आहेत.</p>
<p>शासनाने 2020 रोजी जन्माला आलेल्या बाळांना त्याच ठिकाणी जन्माचा दाखला ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घरी जन्म झाला असेल तर ग्रामपंचायत नगरपरिषद आणि महापालिका त्यांना जन्माचा दाखला देऊ शकते.मात्र एखाद्या सरकारी दवाखान्यात त्या बाळाचा जन्म झाला असेल तर मात्र त्या बालकाला त्याच सरकारी दवाखान्यातून जन्माचे दाखले देण्याचे नियोजन आहे.मागील सहा वर्षे होऊन देखील जन्म दाखला न मिळाल्यामुळे त्यांचे आधार कार्ड बनत नाही.यामुळे अनेक मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.या सर्व कार्य प्रणालीला जबाबदार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नेहरकर यांचेकडे या प्रश्नावर कोणतेही उत्तर नाही.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/karjat-news-water-crisis-in-summer-the-villagers-of-karjat-taluka-are-suffering-1236474.html"><span class="color-red">Karjat News </span>: ऐन उन्हाळ्यात पाणी संकट ; कर्जत तालुक्यातील गावकऱ्य़ांचे होतायत हाल</a></span></p>
<p>कर्जत तालुक्यातील राज्याच्या आरोग्य विभागाचे उपजिल्हा रुग्णालय कर्जत, ग्रामीण रुग्णालय कशेळे तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्राथमिक आरोग्य केंद्र नेरळ, कळंब,खांडस,आंबिवली,कडाव,मोहिली या प्राथमिक आरोग्य केंद्रात जन्मलेल्या बाळाच्या नोंदी २०२१ पासून सुरू आहेत.मात्र या जन्म नोंदी ऑनलाइन पोर्टल वर नसल्यामुळे मुलांना त्या मिळत नाही, शिक्षणाचे भविष्य असल्याचे दिसून येत आहे. जन्म नोंदी न मिळाल्यामुळे त्या बालकांचे आधार कार्ड बनवणे शक्य होत नाही. आधार कार्ड नसल्यामुळे मुलांना अंगणवाडीमध्ये त्यांची नोंद केली जात नाही.कर्जत तालुक्यातील एकट्या नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात २७ बालकांच्या यादीबद्दल संभ्रम असून त्यांना जन्माचे दाखले प्रशासन देई शकले नाही.तसेच तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कर्जत उपजिल्हा रुग्णालय तसेच कशेळे ग्रामीण रुग्णालय येथील यादी मोठी असून ही सर्व पालक आज आपल्या बालकाच्या जन्माच्या दाखल्यासाठी दारोदारी फिरत आहेत.अशा शेकडो बालकांना जन्म दाखले न मिळाल्यामुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.</p>
<p>माझ्या मुलाला सहा वर्षे होऊन गेली अजून पर्यंत जन्म दाखला न मिळाला नाही.त्यामुळे माझ्या मुलाला मला शाळेत टाकता येत नाही.ग्रामपंचायत नोंद करायला तयार नाही.त्यामुळे आधार कार्ड काढता येत नाही.शासनाच्या पोर्टल ची चुकीची शिक्षा माझ्या मुलाला मिळत आहे आणि शिक्षणापासून माझा मुलगा वंचित राहत आहे, अशी प्रतिक्रिया पालक हरिचंद्र भगत यांनी दिली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/raigad-news-the-wheel-of-a-running-bus-came-off-and-the-depot-manager-played-with-the-lives-of-the-passengers-1235505.html"><span class="color-red">Raigad News </span>: धावत्या बसचं चाक निखळलं अन्… आगार व्यवस्थापकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादाच्या भोवऱ्यात, शेतकऱ्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांकडून टीकेची झोड</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/pune/agriculture-minister-dattatray-bharne-is-facing-criticism-from-the-opposition-due-to-a-viral-video-1250931.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 17:55:48 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 17:56:10 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/bharne-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[पुणे]]></category>
		<category><![CDATA[Dattatray Bharne]]></category>
		<category><![CDATA[Farmers]]></category>
		<category><![CDATA[indapur news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250931</guid>

					<description><![CDATA[पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या पंचनाम्याची मागणी घेऊन आलेल्या शेतकऱ्याशी झालेल्या संवादामुळे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे नव्या वादात सापडले आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/bharne-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Agriculture Minister Dattatray Bharne Is Facing Criticism From The Opposition Due To A Viral Video"     /></figure><ul>
<li><strong>कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादाच्या भोवऱ्यात</strong></li>
<li><strong>शेतकऱ्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल</strong></li>
<li><strong>विरोधकांकडून टीकेची झोड</strong></li>
</ul><span class="bullet-text"><strong>इंदापूर</strong> : पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या पंचनाम्याची मागणी घेऊन आलेल्या शेतकऱ्याशी झालेल्या संवादामुळे राज्याचे कृषिमंत्री <a href="https://www.navarashtra.com/topic/dattatray-bharne">दत्तात्रय भरणे</a> नव्या वादात सापडले आहेत. भरणेवाडी येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, त्यामध्ये शेतकऱ्याची तक्रार ऐकून घेण्याऐवजी त्याला भेट नाकारल्याचा आरोप केला जात आहे.</span><p>&nbsp;</p>
<p>व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित शेतकरी पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्याची मागणी करताना दिसतो. यावेळी शेतकरी आपली व्यथा मांडत असताना कृषिमंत्री दत्तात्रय भरणे &#8220;माझ्याकडे काही नाही तुमचं&#8230; मी साधा माणूस आहे&#8230; गरीब माणूस आहे&#8230; तुम्ही मोठी माणसं आहात&#8230;&#8221; असे म्हणत शेतकऱ्याच्या बोलण्याची नक्कल करत असल्याचे दिसून येत आहे. यानंतर &#8220;तुम्ही मोठ्या माणसांचे ऐकून आंदोलन करता, ज्यांनी सांगितलं त्यांच्याकडे जा,&#8221; असेही ते म्हणाल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते.</p>
<p>दरम्यान, शेतकरी &#8220;मामा, तुम्ही सिंचन भवनमध्ये आम्हाला शब्द दिला होता,&#8221; असे सांगत आश्वासनाची आठवण करून देतो. त्यावर &#8220;मी तुम्हाला शब्द दिला नाही,&#8221; असे उत्तर मंत्री भरणे देताना दिसतात. तसेच &#8220;तुमचा आणि माझा काही शब्द नाही,&#8221; असेही ते म्हणाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. त्यानंतर मंत्री भरणे वाहनात बसून तेथून निघून जातात.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/st-employees-da-hike-58-percent-pratap-sarnaik-house-rent-allowance-1250884.html">हे सुद्धा वाचा : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा</a></p>
<p>विशेष म्हणजे, २५ मे रोजी खडकवासला कालव्याच्या पाण्यासाठी इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरच पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा शेतकरी करत आहेत. मात्र, त्यानंतरही पाणी न मिळाल्याने काही शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/significant-rainfall-in-the-eastern-part-of-daund-taluka-1250745.html">हे सुद्धा वाचा : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला, शेती कामांना वेग</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>खासदार श्रीकांत शिंदेंच्या मागणीची परिवहन मंत्री सरनाईकांकडून दखल, ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे निर्देश</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/shrikant-shinde-demands-to-action-against-app-based-taxi-services-transport-minister-pratap-sarnaik-took-notes-1250919.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[विवेक गायकवाड]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 17:49:27 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:16:02 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T174818.009_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Dr Shrikant shinde]]></category>
		<category><![CDATA[pratap sarnaik]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250919</guid>

					<description><![CDATA[ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांच्या माध्यमातून प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेत आर्थिक शोषण करण्याच्या प्रकारांविरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या मागणीची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ दखल घेतली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T174818.009_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Shrikant Shinde Demands To Action Against App Based Taxi Services Transport Minister Pratap Sarnaik Took Notes"     /></figure><p>ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांच्या माध्यमातून प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप मागणे, अतिरिक्त रकमेची सक्ती करणे तसेच प्रवाशांच्या अडचणीचा गैरफायदा घेत आर्थिक शोषण करण्याच्या प्रकारांविरोधात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मागणीची राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ दखल घेत संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना दिले आहेत.</p>
<p>गेल्या काही दिवसांपासून विविध ॲप-आधारित टॅक्सी सेवांबाबत प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर येत होत्या. प्रवास स्वीकारल्यानंतर अतिरिक्त टिप किंवा जादा रकमेची मागणी करणे, ती न मिळाल्यास प्रवास रद्द करणे अथवा प्रवाशांना मानसिक त्रास देणे असे प्रकार वाढल्याने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.</p>
<p>या मागणीची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप मागण्याचा प्रकार अन्यायकारक असल्याचे स्पष्ट केले. तसेच संबंधित कंपन्यांच्या कारभाराची चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांना देण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्याबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभारही व्यक्त केले. ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांचा मनमानी कारभार रोखण्यासाठी परिवहन विभागाकडून महत्त्वपूर्ण उपाययोजना राबविण्यात येणार असून या क्षेत्रासाठी लवकरच नवीन ॲग्रीगेटर धोरण जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="mr">ॲप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांवर जबरदस्तीने टिप मागणे हा प्रकार प्रवाशांसाठी अन्यायकारक आहे. याबाबत संबंधित कंपन्यांवर परिवहन आयुक्तांना त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ही बाब मा. खासदार <a href="https://x.com/DrSEShinde">@DrSEShinde</a> यांनी आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल त्यांचे… <a href="https://t.co/2Bs0Y50CMe">https://t.co/2Bs0Y50CMe</a></p>
<p>— Pratap Baburao Sarnaik (@PratapSarnaik) <a href="https://x.com/PratapSarnaik/status/2064962743103545427">June 11, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script></p>
<p>खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रवाशांच्या हितासाठी सातत्याने आवाज उठविला असून ग्राहकांना पारदर्शक, न्याय्य आणि सुरक्षित सेवा मिळावी यासाठी त्यांनी ही मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारने तात्काळ पावले उचलल्याने लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Maharashtra Politics : राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज; म्हणाले, ‘काही जण कष्ट न करताच…’" href="https://www.navarashtra.com/politics/some-people-get-ahead-without-putting-in-any-effort-says-chhagan-bhujbal-1250270.html"><strong> <span class="color-red">Maharashtra Politics </span>: राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज; म्हणाले, ‘काही जण कष्ट न करताच…’</strong> </a></span></p>
<h3>मागणी काय होती ?</h3>
<p>अॅप-आधारित टॅक्सी आणि राईड-हेलिंग सेवांकडून प्रवाशांवर लादल्या जाणाऱ्या या अन्यायकारक पद्धतीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना कठोर कारवाई करण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले होते. तर गरजेच्या वेळी प्रवाशांना वेठीस धरणे, त्यांची अडचण ओळखून आर्थिक शोषण करणे आणि जादा रक्कम देण्यास भाग पाडणे, हा प्रकार ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणारा आहे. ही केवळ चुकीची व्यावसायिक पद्धत नसून ग्राहकांना अक्षरशः ओलीस ठेवण्यासारखी बाब आहे. ग्राहकांकडून स्वेच्छेने मिळणारी टिप ही सेवेच्या गुणवत्तेची पावती असते; मात्र टिप किंवा अतिरिक्त शुल्कासाठी दबाव टाकणे, सेवा नाकारण्याची धमकी देणे किंवा ग्राहकांना मानसिक त्रास देणे हे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.ग्राहकांना पारदर्शक, न्याय्य आणि सुरक्षित सेवा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे अशा शोषणात्मक आणि ग्राहकविरोधी प्रकारांवर तातडीने अंकुश ठेवून संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार डॉ.शिंदे यांनी केली होती.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="‘ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं…’ अजित पवार विमान अपघातप्रकरणी रोहित पवार संतापले" href="https://www.navarashtra.com/politics/rohit-pawar-tweet-over-ajit-pawar-plane-crash-1250672.html"> ‘ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं…’ अजित पवार विमान अपघातप्रकरणी रोहित पवार संतापले </a></strong></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>पुन्हा उफाळला&#8230; इराण-अमेरिकेत युद्धाचा भडका! Hormuz पूर्णपणे बंद, आता तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/iran-us-war-strait-of-hormuz-completely-closed-impact-on-petrol-diesel-prices-see-more-details-1250862.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Ankita Karangutkar]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 17:42:58 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 17:52:34 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T170637.723_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[crude oil]]></category>
		<category><![CDATA[Diesel Petrol Price]]></category>
		<category><![CDATA[Ethanol Petrol]]></category>
		<category><![CDATA[hormuz]]></category>
		<category><![CDATA[Iran Israel Conflict]]></category>
		<category><![CDATA[LNG]]></category>
		<category><![CDATA[Marathi News]]></category>
		<category><![CDATA[Petrol and diesel]]></category>
		<category><![CDATA[Strait of Hormuz]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250862</guid>

					<description><![CDATA[इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ' पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली असून, त्यातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजावर गोळीबार केला जाईल, असा पावित्रा स्पष्ट केला आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणच्या अनेक ठिकाणांवर नव्याने हल्ले केले आहेत. इराणने त्वरित करारावर स्वाक्षरी न केल्यास हे हल्ले अधिक तीव्र करण्याचा ट्र्म्पने दिला आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T170637.723_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Iran Us War Strait Of Hormuz Completely Closed Impact On Petrol Diesel Prices See More Details"     /></figure><p style="text-align: justify;"><strong>Hormuz Crisis:</strong> इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. एप्रिलमध्ये झालेली युद्धबंदी आता मोडकळीस आल्याचे दिसत आहे. इराणने &#8216;स्ट्रेट ऑफ होर्मुझ&#8217; पूर्णपणे बंद करण्याची घोषणा केली असून, त्यातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही जहाजावर गोळीबार केला जाईल, असा पावित्रा स्पष्ट केला आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणच्या अनेक ठिकाणांवर नव्याने हल्ले केले आहेत. इराणने त्वरित करारावर स्वाक्षरी न केल्यास हे हल्ले अधिक तीव्र करण्याचा इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला आहे. पण या सगळ्याचा आपल्या खिशावर काय परिणाम होणार ?</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="RBI ची मोठी कारवाई, 135 NBFC चं रजिस्ट्रेशन करण्यात आलं रद्द, सर्वाधिक संख्या बंगालमध्ये, नेमकं प्रकरण काय" href="https://www.navarashtra.com/business/rbi-cancels-registration-certificates-of-135-nbfcs-west-bengal-hit-hardest-see-more-details-1250735.html"> RBI ची मोठी कारवाई, 135 NBFC चं रजिस्ट्रेशन करण्यात आलं रद्द, सर्वाधिक संख्या बंगालमध्ये, नेमकं प्रकरण काय? </a></span></p>
<h3 style="text-align: justify;">कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या</h3>
<p style="text-align: justify;">या वृत्तानंतर गुरुवारी सकाळी कच्च्या तेलाच्या किमतीत प्रति बॅरल सुमारे २ डॉलर्सची वाढ झाली, मात्र नंतर ही वाढ काहीशी ओसरली. &#8216;ब्रेंट क्रूड&#8217;चा भाव प्रति बॅरल ९३ डॉलर्सच्या वर, तर अमेरिकेच्या WTI क्रूडचा भाव ९० डॉलर्सच्या वर व्यवहार करत आहे. बाजारातील विश्लेषकांच्या मते, तेलाच्या किमतीतील ही वाढ टिकून न राहण्यामागे मुख्य कारण म्हणजे आतापर्यंत तेलाच्या पुरवठ्यात कोणताही प्रत्यक्ष व्यत्यय आलेला नाही; अमेरिकन लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी जहाजांची या सामुद्रधुनीतून ये-जा अजूनही सुरूच आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">भारतासाठी मोठी चिंतेची बाब ?</h3>
<p style="text-align: justify;">भारताच्या दृष्टीने &#8216;स्ट्रेट ऑफ होर्मुझ&#8217;चे धोरणात्मक महत्त्व आहे. भारताचा सुमारे दोन-तृतीयंश कच्चा तेल पुरवठा आणि निम्म्याहून अधिक LNG पुरवठा याच मार्गावरून होतो; परिणामी, जर हा मार्ग दीर्घकाळासाठी बंद राहिला, तर भारताला वाढत्या import bill चा सामना करावा लागेल, महागाई वाढेल आणि सरकारी तिजोरीवर ताण येईल.<br />
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, हा संघर्ष फेब्रुवारीच्या उत्तरार्धापासून सुरू आहे आणि भारत आधीच त्याचे परिणाम अनुभवत आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी &#8216;ब्रेंट क्रूड&#8217;चा भाव सुमारे ७३ डॉलर्स होता; त्यानंतर तो १२६ डॉलर्सपर्यंत वाढला आणि सध्या तो ९३ डॉलर्सच्या आसपास स्थिरावला आहे. ही पातळी युद्धापूर्वीच्या किमतींच्या तुलनेत अजूनही सुमारे २७ टक्क्यांनी अधिक आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">काही दिलासादायक बातम्याही</h3>
<p style="text-align: justify;">दरम्यान, भारतीय रिफायनरी कंपन्यांच्या सूत्रांनी गुरुवारी सांगितले की, त्यांच्याकडे किमान ऑगस्टपर्यंत पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध आहे; याचा अर्थ असा की, पुढील दोन ते अडीच महिने देशात तेलाची कमतरता भासणार नाही. अबू धाबीच्या &#8216;अॅडनॉक&#8217; (ृसह काही पुरवठादार आशियाई खरेदीदारांना यशस्वीपणे तेलाचा पुरवठा करत आहेत.<br />
तरीही, जागतिक पुरवठ्याची स्थिती कठीण होत चालली आहे. अमेरिकेतील कच्च्या तेलाचा साठा एका आठवड्यात ७२ लाख बॅरल्सनी घटला असून, युद्ध सुरू झाल्यापासून त्यात ७ कोटी ९० लाख बॅरल्सची घट झाली आहे. मे महिन्यात, ओपेक (OPEC) देशांमधील तेल उत्पादन दोन दशकांतील नीचांकी पातळीवर आले होते.</p>
<h3 style="text-align: justify;">पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचे काय?</h3>
<p style="text-align: justify;">सामान्यांसाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचे काय होणार. सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर प्रति लिटर सुमारे १०२ रुपये आहे. ग्राहकांवरील भार कमी करण्यासाठी सरकारने मार्चच्या अखेरीस पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर १० रुपयांची कपात केली असली, तरी तेल कंपन्यांना अजूनही दररोज सुमारे ७५० कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. जर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा १०० डॉलर्सच्या वर गेल्या, तर किमती वाढवण्याबाबत कंपन्यांवरील दबाव अधिक वाढेल.</p>
<h3 style="text-align: justify;">विमान भाडे आणि ATF वरील परिणाम</h3>
<p style="text-align: justify;">युद्धाचा सर्वात मोठा फटका विमान वाहतूक क्षेत्राला बसला आहे. एटीएफच्या वाढत्या खर्चामुळे विमान कंपन्यांनी आधीच भाडे वाढवले ​​आहे आणि अनेक मार्गांवर विमान फेऱ्यांची संख्या कमी केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात, एटीएफचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने १०,००० कोटी रुपयांपर्यंतच्या सहाय्य पॅकेजला मंजुरी दिली. जर तणाव आणखी वाढला, तर आखाती देशांकडे जाणाऱ्या विमान सेवांवर परिणाम होऊ शकतो; कारण विमान कंपन्यांना लांब आणि अधिक खर्चिक मार्गांचा अवलंब करावा लागेल.</p>
<h3 style="text-align: justify;">रुपया आणि बाजाराकडे लक्ष</h3>
<p style="text-align: justify;">युद्धामुळे रुपयावरही दबाव निर्माण झाला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाने ९२ चा टप्पा ओलांडला आहे आणि परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेत आहेत. रुपयाला स्थैर्य देण्यासाठी <a href="https://www.navarashtra.com/topic/rbi">RBI</a> आपल्या परकीय चलन साठ्यातून डॉलरची विक्री करत आहे. रुपया कमकुवत होण्याचा अर्थ असा की, भारतासाठी तेलाची प्रत्येक बॅरल अधिक महाग होत आहे.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="अमेरिकेतही महागाई फोफावली, दर 4 % च्या पार; भारतीय Share Market आणि RBI वर काय होणार परिणाम" href="https://www.navarashtra.com/business/us-inflation-surpasses-4-percent-impact-on-indian-stock-market-and-rbi-marathi-news-1250550.html"> अमेरिकेतही महागाई फोफावली, दर 4 % च्या पार; भारतीय Share Market आणि RBI वर काय होणार परिणाम? </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Shakun Shastra: घराच्या मुख्य दारात कुत्रा बसणे शुभ की अशुभ संकेत? जाणून घ्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/religion/shakun-shastra-dog-at-door-meaning-significance-hindu-beliefs-bhairav-symbolism-1250909.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 17:40:24 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 18:03:41 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/dog_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[धर्म]]></category>
		<category><![CDATA[Dog]]></category>
		<category><![CDATA[hindu religion]]></category>
		<category><![CDATA[religion news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250909</guid>

					<description><![CDATA[Shakun Shastra Dog Sitting At Home Entrance: घराच्या दारात किंवा उंबरठ्यावर कुत्रा बसणे ही सामान्य घटना असली तरी भारतीय परंपरा आणि शकुन शास्त्रात त्याला विशेष महत्त्व दिले जाते. हा प्रसंग कधी शुभ तर कधी अशुभ संकेत मानला जातो. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/dog_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Shakun Shastra Dog At Door Meaning Significance Hindu Beliefs Bhairav Symbolism"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>दाराशी येणारा श्वान शुभ की अशुभ?</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>श्रद्धेत दडलेले संकेत</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>जाणून घ्या अर्थ</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">घराच्या दारात किंवा उंबरठ्यावर एखादा कुत्रा येऊन बसलेला दिसणे ही अनेकांसाठी सामान्य घटना असू शकते. मात्र भारतीय परंपरा, धार्मिक श्रद्धा आणि शकुनशास्त्रात कुत्र्याला एक सामान्य प्राणी मानले जात नाही.त्याचा विशेषतः भगवान भैरवाचे वाहन म्हणून उल्लेख केला जातो. श्वान हा निष्ठा, सतर्कता आणि संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. अनेक परंपरांमध्ये, याचा संबंध घराची सुरक्षितता, नकारात्मक शक्तींपासून संरक्षण आणि येणाऱ्या संकटाचे चिन्ह म्हणून जोडला जातो. त्यामुळे घराच्या प्रवेशद्वारावर त्याचे आगमन काही संकेत देणारे मानले जाते. शकुन शास्त्रानुसार, घराच्या दारवर कुत्रा बसणे शुभ की अशुभ, जाणून घ्या.</span><p><a title="Hindu – Muslim: 15 जूनला येणार हिंदू मुस्लीम एकत्र, ठरणार ‘खास’ दिवस; एक नाही तर 4 कारणं" href="https://www.navarashtra.com/religion/adhik-maas-end-amavasya-mithun-sankranti-and-mhuharrum-both-festivals-of-hindu-and-muslim-on-15th-june-1250512.html"><span style="color: #3366ff;"> <span class="color-red">Hindu – Muslim</span>: 15 जूनला येणार हिंदू मुस्लीम एकत्र, ठरणार ‘खास’ दिवस; एक नाही तर 4 कारणं</span> </a></p>
<h3 style="text-align: justify;">घराच्या दारात कुत्रा बसणे काय दर्शवते?</h3>
<p style="text-align: justify;">शकुनशास्त्रानुसार एखादा कुत्रा वारंवार घराच्या दाराशी येत असेल किंवा बराच वेळ तिथे बसत असेल, तर तो मागील जन्मातील जवळच्या नातेवाईक, मित्र किंवा पूर्वजांच्या चेतनेशी जोडलेला असतो, असे मानले जाते; या व्यक्तीचे काही कारणास्तव कुटुंबाशी विशेष नाते असते. असे म्हटले जाते की, तो घराभोवती एक अदृश्य संरक्षक कवच तयार करून कुटुंबाची दुःखे, वेदना आणि ग्रहांचे नकारात्मक प्रभाव शोषून घेण्याचा प्रयत्न करतो. याच कारणामुळे, प्राचीन परंपरांमध्ये <a href="https://www.navarashtra.com/topic/dog">कुत्र्याला</a> खाऊ घालणे, पाणी पाजणे आणि त्याच्यावर दया दाखवणे हे अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. काळ्या कुत्र्याला, विशेषतः शनिवारी आणि भैरव पूजेच्या वेळी, भाकरी खाऊ घालण्याचाही सल्ला दिला जातो. मान्यतेनुसार, घराच्या उंबरठ्यावर येणारा श्वान पूर्वजांच्या कृपेचा किंवा त्यांच्या आशीर्वादाचा संकेत असू शकतो.</p>
<h3 style="text-align: justify;">धार्मिक दृष्टिकोनातून श्वानाचे महत्त्व</h3>
<p style="text-align: justify;"><a href="https://www.navarashtra.com/topic/hindu-religion">हिंदू</a> धर्मग्रंथांमध्ये श्वानाला विशेष स्थान देण्यात आले आहे. भगवान भैरव यांचे वाहन म्हणून त्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे श्वानाला अन्न-पाणी देणे हे पुण्यकारक कार्य मानले जाते. विशेषतः शनिवारी किंवा भैरव उपासनेच्या दिवशी श्वानाची सेवा केल्यास सकारात्मक फल मिळते, अशी श्रद्धा आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">महाभारतातील प्रेरणादायी संदर्भ</h3>
<p style="text-align: justify;">महाभारतात धर्मराज युधिष्ठिर यांच्या अखेरच्या प्रवासात एक श्वान शेवटपर्यंत त्यांच्या सोबत राहतो. त्याची निष्ठा आणि समर्पण पाहून त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. ही कथा निष्ठा, विश्वास आणि धर्मपालनाचे प्रतीक म्हणून सांगितली जाते.</p>
<h3 style="text-align: justify;">करुणाचा संदेश</h3>
<p style="text-align: justify;">घराच्या दारात येणाऱ्या श्वानाला त्रास न देता त्याला अन्न-पाणी देणे ही केवळ धार्मिक कृती नसून मानवतेचेही उत्तम उदाहरण ठरते.</p>
<p><strong>(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)</strong></p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Shukra Pushya Nakshatra Gochar: छप्परफाड होणार 6 राशीच्या व्यक्तींची कमाई, धनाचा देवता करणार ‘या’ नक्षत्रात प्रवेश" href="https://www.navarashtra.com/religion/shukra-pushya-nakshatra-gochar-2026-venus-transit-in-pushya-nakshatra-good-effect-on-6-zodiac-signs-1250371.html"> <span class="color-red">Shukra Pushya Nakshatra Gochar</span>: छप्परफाड होणार 6 राशीच्या व्यक्तींची कमाई, धनाचा देवता करणार ‘या’ नक्षत्रात प्रवेश </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Ahilyanagar Crime : पाथर्डीत सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन कुटुंबांना मारहाण करत साडेचार लाखांची लूट</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/pathardi-armed-robbery-kharwandi-kasar-two-families-looted-1250922.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 17:39:10 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 17:39:10 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ahilanagr_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Ahilyanagar]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<category><![CDATA[police]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250922</guid>

					<description><![CDATA[Ahilyanagar Crime News: पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात सशस्त्र दरोडेखोरांनी दोन कुटुंबांवर हल्ला करत मारहाण करून सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. ]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/ahilanagr_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Pathardi Armed Robbery Kharwandi Kasar Two Families Looted"     /></figure><p><strong>Ahilyanagar Crime News Marathi :</strong> पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार परिसरातील किर्तनवाडी येथे पहाटेच्या सुमारास एका सशस्त्र टोळीने दोन कुटुंबांवर थरारक दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात सात जणांच्या या टोळीने घरात घुसून दोन्ही कुटुंबांतील सदस्यांना चाकूचा धाक दाखवत लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. या घटनेत दरोडेखोरांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. घरात घुसलेल्या आरोपींनी थेट कपाटांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोकड शोधण्यास सुरुवात केली. यावेळी रावसाहेब किर्तने यांना जाग आली आणि त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी गज व धारदार हत्याराने हल्ला केला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Fraud News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा" href="https://www.navarashtra.com/crime/a-shocking-incident-has-occurred-where-a-young-woman-was-defrauded-under-the-pretext-of-a-job-offer-1250836.html"> <span class="color-red">Fraud News </span>: नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा </a></span></p>
<p>किर्तने यांच्या घरावर दरोडा टाकल्यानंतर याच टोळीने अवघ्या ८०० मीटर अंतरावर राहणाऱ्या बाबासाहेब दशरथ बटुळे यांच्या घरावर हल्ला केला. येथेही आरोपींनी बाबासाहेब बटुळे आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करत सुमारे १ लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. याशिवाय, परिसरातीलच भागवत बाबुराव बटुळे व शांताराम बप्पा बटुळे यांच्याही घरात चोरी करण्याचा प्रयत्न या टोळीने केला, मात्र तो अयशस्वी ठरला. या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या दरोड्याचा तातडीने छडा लावून आरोपींना तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.</p>
<p>घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक पोलिसांना सूचना दिल्या. पाथर्डीचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तपास करत आहे. दरम्यान, खरवंडी कासार परिसरात गेल्या काही महिन्यांपासून जबरी चोरी व दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="बलात्कारानंतर जीव वाचवण्यासाठी पीडिता नग्नावस्थेत धावली; 2020 च्या प्रकरणात नराधमाला कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा" href="https://www.navarashtra.com/crime/court-sentences-criminal-to-rigorous-imprisonment-in-2020-case-1250684.html"> बलात्कारानंतर जीव वाचवण्यासाठी पीडिता नग्नावस्थेत धावली; 2020 च्या प्रकरणात नराधमाला कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>ONGC कडून प्रोजील ग्रीन एनर्जीला 2,000 कोटी रुपयांहून अधिकचा पवन ऊर्जा प्रकल्प; IPO पूर्वी मोठी कामगिरी</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/ongc-awards-wind-energy-project-worth-over-2000-crore-to-prozeal-green-energy-1250904.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिवेश चव्हाण]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 17:30:58 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 17:30:58 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T173023.076_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[IPO]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250904</guid>

					<description><![CDATA[नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील Prozeal Green Energy ला Oil and Natural Gas Corporation (ONGC) कडून 2,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचा 250 मेगावॅट पवन ऊर्जा प्रकल्प मिळाला आहे. या प्रकल्पासाठी कंपनीला अधिकृत 'नोटिफिकेशन ऑफ अवॉर्ड' (NOA) प्राप्त झाले असून तो IPO पूर्वीचा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T173023.076_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ongc Awards Wind Energy Project Worth Over 2000 Crore To Prozeal Green Energy"     /></figure><p>नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील वेगाने प्रगती करणाऱ्या Prozeal Green Energy ला देशातील आघाडीची ऊर्जा कंपनी Oil and Natural Gas Corporation (ONGC) कडून 2,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याच्या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ONGC साठी भारतात 250 मेगावॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह आणि ISTS-कनेक्टेड पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम प्रोजील ग्रीन एनर्जीकडे सोपविण्यात आले आहे. या संदर्भात ONGC कडून कंपनीला अधिकृत &#8216;नोटिफिकेशन ऑफ अवॉर्ड&#8217; (NOA) प्राप्त झाले आहे. आगामी IPO च्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा मोठा प्रकल्प प्रोजील ग्रीन एनर्जीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. यामुळे कंपनीची भारतातील नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील उपस्थिती अधिक मजबूत होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, देशातील प्रमुख ऊर्जा क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमाने आपल्या नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्पासाठी प्रोजीलवर दाखवलेला विश्वास हा कंपनीच्या अभियांत्रिकी कौशल्य, प्रकल्प अंमलबजावणी क्षमता आणि उद्योगातील विश्वासार्हतेचा पुरावा आहे. या प्रकल्पामध्ये केवळ पवन ऊर्जा प्रकल्प उभारणीच नव्हे तर संपूर्ण अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (EPC) कामांचा समावेश आहे.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="अमेरिकेतही महागाई फोफावली, दर 4 % च्या पार; भारतीय Share Market आणि RBI वर काय होणार परिणाम" href="https://www.navarashtra.com/business/us-inflation-surpasses-4-percent-impact-on-indian-stock-market-and-rbi-marathi-news-1250550.html">अमेरिकेतही महागाई फोफावली, दर 4 % च्या पार; भारतीय Share Market आणि RBI वर काय होणार परिणाम?</a></span></h3>
<p>विशेष म्हणजे, हा प्रकल्प प्रोजील ग्रीन एनर्जीचा युटिलिटी-स्केल पवन ऊर्जा क्षेत्रातील पहिला मोठा प्रवेश ठरणार आहे. याआधी कंपनीने प्रामुख्याने सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. आता पवन ऊर्जा क्षेत्रातही कंपनीने पाऊल टाकल्याने तिच्या व्यवसायाच्या विस्ताराला नवे परिमाण मिळणार आहे. या कंत्राटामध्ये प्रकल्प उभारणीनंतर 10 वर्षांसाठी व्यापक ऑपरेशन आणि मेंटेनन्स (O&amp;M) सेवांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेची जबाबदारीही कंपनीकडे राहणार आहे. अशा प्रकारच्या दीर्घकालीन करारामुळे कंपनीला स्थिर महसूल मिळण्याची संधी निर्माण होणार आहे.</p>
<p>भारत सरकारने स्वच्छ ऊर्जा आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या उद्दिष्टांसाठी नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रावर विशेष भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्पांची संख्या वाढत असून मोठ्या उद्योगसमूहांकडूनही हरित ऊर्जेकडे कल वाढताना दिसत आहे. ONGC सारख्या ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज कंपनीकडून मिळालेला हा प्रकल्प देशाच्या हरित ऊर्जा संक्रमणाला गती देणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे. प्रोजील ग्रीन एनर्जीने या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना, “ऊर्जा सुरक्षित आणि पर्यावरणपूरक भारत घडविण्याच्या दिशेने हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक टर्बाइनसोबत अधिक हरित भविष्य घडविण्याचे आमचे ध्येय कायम राहील,” असे म्हटले आहे.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="मोठी लॉटरी! Tata आणि Adani ग्रुपकडून बंपर डिव्हिडंड, जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या शेअर्सने होणार बंफर फायदा" href="https://www.navarashtra.com/business/tata-and-adani-group-stocks-announces-bumper-dividend-payout-list-see-more-details-1250643.html">मोठी लॉटरी! Tata आणि Adani ग्रुपकडून बंपर डिव्हिडंड, जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या शेअर्सने होणार बंफर फायदा</a></span></h3>
<p>या करारामुळे कंपनीची ऑर्डर बुक मजबूत होण्यास मदत होणार असून, आगामी IPO पूर्वी गुंतवणूकदारांमध्ये कंपनीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, नूतनीकरणक्षम ऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधींचा फायदा घेण्यासाठी कंपनी सज्ज असल्याचेही या प्रकल्पातून स्पष्ट होत आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>M.Tech Scholarship 2026: M.Tech विद्यार्थ्यांसाठी UGC ची मोठी भेट; दरमहा ७,८०० रुपयांसह दरवर्षी मिळणार अतिरिक्त आर्थिक मदत!</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/mtech-scholarship-schemes-2026-aicte-pg-scholarship-ugc-marathi-news-1250877.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 17:25:00 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 17:25:00 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/6-18-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[Scholarship Exam]]></category>
		<category><![CDATA[tech updates]]></category>
		<category><![CDATA[technology]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250877</guid>

					<description><![CDATA[AICTE &#038; UGC M.Tech Scholarship: एम.टेक करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध शिष्यवृत्ती योजना. पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि रक्कमेबद्दल सविस्तर माहिती.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/6-18-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Mtech Scholarship Schemes 2026 Aicte Pg Scholarship Ugc Marathi News"     /></figure><p>M.Tech Scholarship: देशात तांत्रिक शिक्षणाला (Technical Education) चालना देण्यासाठी आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांद्वारे अनेक शिष्यवृत्ती योजना (Scholarship Schemes) राबवल्या जात आहेत. विशेषतः एम.टेक (M.Tech &#8211; मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी) चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अशा योजना उपलब्ध आहेत, ज्यांतर्गत दरमहा हजारो रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.</p>
<p>उच्च शिक्षणाचा वाढता खर्च पाहता या स्कॉलरशिप योजना विद्यार्थ्यांसाठी मोठी मदत ठरत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या परंतु, गुणवंत विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण, संशोधन (Research) आणि नवनवीन प्रयोगांच्या (Innovation) क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या योजनांचा मुख्य उद्देश आहे. एम.टेकच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक म्हणजे &#8216;ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन&#8217;ची (AICTE) पीजी स्कॉलरशिप योजना होय. या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना दरमहा १२,४०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.</p>
<h3>SC/ST विद्यार्थ्यांसाठी UGC ची विशेष योजना</h3>
<p>अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देखील एक विशेष शिष्यवृत्ती योजना राबवते. या योजनेअंतर्गत योग्य विद्यार्थ्यांना दरमहा ७,८०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. याशिवाय, दरवर्षी १५,००० रुपयांचे अतिरिक्त साहाय्य देखील उपलब्ध करून दिले जाते; ज्याचा वापर विद्यार्थी शैक्षणिक साहित्य, संशोधन कार्य आणि इतर शैक्षणिक गरजांसाठी करू शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असणे आणि मान्यताप्राप्त संस्थेत नियमित व फुल-टाईम एम.टेक अभ्यासक्रमात शिकत असणे अनिवार्य आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/ignou-phd-admission-2026-july-session-online-eligibility-marathi-news-1250856.html">IGNOU PhD Admission 2026: इग्नूमध्ये ३६ विषयांसाठी पीएचडी प्रवेश प्रक्रिया सुरू; या&#8217; विद्यार्थ्यांना थेट मुलाखतीची सुवर्णसंधी!</a></strong></span></p>
<h3>NSP पोर्टलवरून करता येणार अर्ज</h3>
<p>युजीसीच्या (UGC) या शिष्यवृत्तीसाठी &#8216;नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल&#8217;च्या (NSP) माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्ज प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना त्यांचे जातीचे प्रमाणपत्र (Caste Certificate), शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे आणि कॉलेजची माहिती जमा करावी लागते. ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठरवून दिलेल्या मुदतीतच आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/nda-cadets-training-stipend-7th-pay-commission-in-hand-salary-allowances-marathi-news-1250810.html">NDA Cadets Salary Details: एनडीए ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्सना किती पगार मिळतो? पहा एका क्लिकवर&#8230;</a></strong></span></p>
<h3>राज्य सरकारच्या योजनांचाही मिळतोय लाभ</h3>
<p>केंद्र सरकारशिवाय अनेक राज्य सरकारे देखील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवत आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक यांसह अनेक राज्यांमध्ये हुशार आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्कॉलरशिप आणि स्टायपेंड योजना चालवल्या जातात. काही राज्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांना १५,००० रुपयांपासून ते ५०,००० रुपयांपर्यंत मासिक मदत दिली जाते. अर्थात, या शिष्यवृत्तीची रक्कम आणि पात्रतेचे निकष प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे असू शकतात.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Karad News: मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येण्यापूर्वीच काळाचा घाला! उरीत कर्तव्य बजावताना शहापूरचे सुपुत्र अर्जुन जाधव हुतात्मा</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/karad-soldier-arjun-jadhav-and-airoli-soldier-vikram-chavan-martyred-in-uri-blast-jammu-kashmir-1250886.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[नितिन कुऱ्हे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 17:23:35 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 17:23:35 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T172124.100_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[Karad news]]></category>
		<category><![CDATA[Satara]]></category>
		<category><![CDATA[Satara News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250886</guid>

					<description><![CDATA[जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ गस्त घालताना झालेल्या भीषण स्फोटात कराडचे जवान अर्जुन राजेंद्र जाधव आणि ऐरोलीचे जवान विक्रम चव्हाण यांना वीरमरण आले आहे.
]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-2026-06-11T172124.100_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Karad Soldier Arjun Jadhav And Airoli Soldier Vikram Chavan Martyred In Uri Blast Jammu Kashmir"     /></figure><ul>
<li>मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला घरी येण्यापूर्वीच काळाचा घाला!</li>
<li>उरीत कर्तव्य बजावताना शहापूरचे सुपुत्र अर्जुन जाधव हुतात्मा</li>
</ul><span class="bullet-text"><strong>कराड/प्रतिनिधी :</strong> <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/jammu-kashmir">जम्मू-काश्मीरमधील</a></span> उरी सेक्टरमध्ये देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहापूर <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/karad">(ता. कराड)</a> </span>येथील जवान अर्जुन राजेंद्र जाधव (वय ३०) यांना वीरमरण आले. नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना झालेल्या हॅण्ड ग्रेनेडच्या भीषण स्फोटात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेने शहापूर गावासह संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे.</span><p>अर्जुन जाधव हे गेल्या नऊ वर्षांपासून भारतीय सैन्यात कार्यरत होते. लष्कराच्या बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे जवान असलेल्या अर्जुन यांची सध्या जम्मू-काश्मीरमधील ८ राष्ट्रीय रायफल्स (आरआर) युनिटमध्ये नियुक्ती होती. मंगळवारी उशिरा उरी सेक्टरमधील कमलकोट भागात नियंत्रण रेषेजवळ नियमित गस्तीदरम्यान अचानक भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अर्जुन जाधव यांच्यासह आणखी एका जवानाला वीरमरण आले.</p>
<p>स्फोटानंतर सहकाऱ्यांनी तत्काळ जखमी जवानांना श्रीनगर येथील बदामीबागमधील ९२ बेस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय पथकाने त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले; मात्र उपचार सुरू असतानाच अर्जुन यांनी अखेरचा श्वास घेतला. या दुर्घटनेत वीरमरण आलेले दुसरे जवान विक्रम चव्हाण हे ऐरोली (नवी मुंबई) येथील रहिवासी असल्याचे समजते.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/mp-udayanraje-bhosale-inspects-work-of-karad-flyover-1247371.html">कराड उड्डाणपुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाहणी, कामाला गती देण्याच्या सूचना</a></p>
<p>दरम्यान, हा स्फोट नेमका कशामुळे झाला, तो भूसुरुंगाचा होता की अन्य कोणत्या कारणामुळे, याचा तपास लष्कराकडून सुरू आहे. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोन्ही हुतात्मा जवानांचे पार्थिव लष्करी इतमामात त्यांच्या मूळगावी पाठविण्यात येणार आहे. अर्जुन जाधव यांचे पार्थिव शुक्रवारी (दि. १२) शहापूर येथे पोहोचण्याची शक्यता आहे.</p>
<p>अर्जुन यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील, भाऊ आणि बहिणी असा परिवार आहे. विशेष म्हणजे त्यांचे धाकटे बंधू ऋषी जाधव हे भारतीय नौदलात कार्यरत असून सध्या सुटीवर गावी आले आहेत. देशसेवेची परंपरा जपणाऱ्या या कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.</p>
<h3>वाढदिवसाच्या आनंदावर दुःखाची सावली</h3>
<p>२५ जून रोजी अर्जुन जाधव यांचा मुलगा सर्वेश याचा पहिला वाढदिवस साजरा होणार होता. त्या आनंदसोहळ्यासाठी अर्जुन यांनी १५ जूनपासून सुटी घेऊन गावी येण्याचे नियोजन केले होते. कुटुंबीयांनीही वाढदिवसाची तयारी सुरू केली होती. मात्र, त्यापूर्वीच उरीतील स्फोटात त्यांना वीरमरण आल्याने वाढदिवसाच्या उत्सवाचे स्वप्न कायमचे अपुरे राहिले. या घटनेमुळे जाधव कुटुंबासह संपूर्ण शहापूर गावावर शोककळा पसरली आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/balasaheb-chorekar-attacked-political-tension-in-umbraj-karad-police-update-1135920.html"><span class="color-red">Karad Political News</span>: बाळासाहेब चोरेकर यांना मारहाण; उंब्रज परिसरात तणाव, पोलिसांत परस्पर विरोधी तक्रारी दाखल</a></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>India Nepal Relations : नेपाळचे सूर बदलले! भारतासोबत सीमा वादावर चर्चेतून तोडगा काढण्यास तयार</title>
		<link>https://www.navarashtra.com/world/india-nepal-relations-nepal-ready-for-talks-to-resolve-border-dispute-with-india-1250848.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 17:17:22 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 17:17:22 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/India-Nepal-Relations-_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[विदेश]]></category>
		<category><![CDATA[Nepal News]]></category>
		<category><![CDATA[World news]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250848</guid>

					<description><![CDATA[India Nepal Relations : सीमावादावरुन नेपाळचे सूर बदलतानाचे चित्र दिसत आहे. नेपाळने वाद द्विपक्षीय चर्चेतून काढण्यास तयारी दर्शवली आहे. तसेच दोन्ही देशांतील संबंध ऐतिहासिक आणि रोटी-बेटीचे असल्याचे सांगत सीमाही खुल्या केल्या आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/India-Nepal-Relations-_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="India Nepal Relations Nepal Ready For Talks To Resolve Border Dispute With India"     /></figure><ul>
<li>नेपाळचे सूर बदलले</li>
<li>भारतासोबत सीमा वादावर चर्चेतून तोडगा काढण्यास तयार</li>
<li>ब्रिटनचा साथ देण्यास नकार अन्&#8230;</li>
</ul><span class="bullet-text">India Nepal Relations : भारत आणि नेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता. नेपाळचे नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांनी भारत-नेपाळ सीमेबाबत वादग्रस्त विधान केले होते. आता मात्र नेपाळने आपले सूर बदलल्याचे दिसत आहेत. तिसऱ्याच्या देशाच्या मध्यस्थीची मागणी केल्यानंतर नेपाळने भारतासोबत चर्चा करुन सीमावाद सोडवण्यावर सहमती दिली आङे.</span><p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/nepal-fertilizer-crisis-india-supply-80000-ton-deal-1219665.html">Nepal Crisis : युद्धाचा नेपाळवर परिणाम! खतटंचाईमुळे बालेन शाह सरकारची भारताकडे धाव; सरकारचा मोठा निर्णय</a></span></strong></p>
<p>नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांनी बुधवारी (१० जून) नेपाळच्या ससंदेत याबाबत स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की, दोन्ही देशांमधील सीमा वाद द्विपक्षीय विषय आहे. यामुळे ऐतहासिक करार, जुने नकाशे आणि परस्पर सामंजस्यातून वाद सोडवण्यात येईल. यासाठी नेपाळ वचनबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी दोन्ही देशांमध्ये लांबलेल्या चर्चेला पुन्हा गती मिळाली असल्याचे स्पष्ट केले.</p>
<p>भारत-नेपाळ सामी कार्य गटासह इतर क्षेत्रात दोन्ही देशांनी पुन्हा संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. रखडलेल्या अनेक मुद्द्यांवर नव्या चर्चा सुरु करण्यात आली असून वाद मिटण्याच्या दिशेने हे एक सकारात्म पाऊल असल्याचे खनल यांनी म्हटले.</p>
<h3>खनल यांचा भारत दौरा</h3>
<p>गेल्या आठड्यात खनल यांनी भारताला भेट दिली होती. यावेळी त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. यावेळी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी नेपाळ भूभागावर भारताचा कब्जा असल्याचा दाव्यावर चर्चा झाली. पंतप्रधानांनी सीमावाशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना हे विधान केले होते. यावर खनल यांनी चुकीचा अर्थ काढण्यात आला असल्याचे म्हटले.</p>
<p>दरम्यान दोन्ही देशांमधील संबंध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या दृढ असल्याचे अधोरेखित केले. तसेच दोन्ही देशांनी रोटी-बेटीचे नाते असल्याचे सांगत सीमा खुली केली.</p>
<h3>ब्रिटनकडे मध्यस्थीची विनंती</h3>
<p>सीमावादावरुन नेपाळने ब्रिटनकडे मध्यस्थीची विनंती केली होती. मात्र, ब्रिटनकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने नेपाळने वाद द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्यावर तयारी दर्शवली आहे.</p>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="en">Delhi: On Nepal Prime Minister Balen Shah&#8217;s comment about Nepal encroaching on Indian territory, Nepal&#8217;s Foreign Minister Shishir Khanal says, &#8220;My Ministry of Foreign Affairs has already clarified. Prime Minister was speaking when he was responding to a question on what is called… <a href="https://t.co/7U8XEvOIpF">pic.twitter.com/7U8XEvOIpF</a></p>
<p>— IANS (@ians_india) <a href="https://x.com/ians_india/status/2063515991079022658">June 7, 2026</a></p></blockquote>
<p><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><br />
<strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/world/india-nepal-relations-nepal-foreign-minister-clarifies-pm-balen-shah-border-statement-1247204.html">India Nepal Realtions : सीमा वादाच्या PM बालेन वक्तव्यावर नेपाळचा यु-टर्न? परराष्ट्र मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण</a></span></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Aamchya Ladkya Naik Bai : &#8216;अभी तो शूटिंग सुरु हुई है&#8217; झाला हो श्रीगणेशा! ऐश्वर्या नारकरची नवी मालिका, मुहूर्त पडला पार</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/aamchya-ladkya-naik-bai-shooting-started-1250817.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[दिवेश चव्हाण]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 17:13:19 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 17:13:19 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T171227.566_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[Marathi Serial]]></category>
		<category><![CDATA[Aishwarya Rai]]></category>
		<category><![CDATA[marathi serial update]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250817</guid>

					<description><![CDATA['आमच्या लाडक्या नाईक बाई' ही नवी मालिका लवकरच Star Pravah वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत Aishwarya Narkar मुख्य भूमिका साकारणार असून Amruta Dhongade आणि दक्षता जोईलही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/n-2026-06-11T171227.566_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Aamchya Ladkya Naik Bai Shooting Started"     /></figure><ul>
<li>दक्षता जोईलदेखील मालिकेत एक महत्वाचे पात्र साकारणार आहे.</li>
<li>रोजी &#8216;आमच्या लाडक्या नाईक बाई&#8217; मालिकेचा मुहूर्त पार पडला आहे.</li>
<li>लवकरात लवकर मालिका प्रसारित होण्याची इच्छा सगळ्यांनी सांगितली आहे.</li>
</ul><span class="bullet-text">&#8216;आमच्या लाडक्या नाईक बाई&#8217; ही मालिका प्रसारित होण्यासाठी तयार होत आहे. अद्याप या मालिकेची तारीख निश्चित झाली नाहीये, तरीही या मालिकेबाबत प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्कंठा लागून आहे. मुळात, या मालिकेत महाराष्ट्राचे लोकप्रिय चेहरे पाह्यला मिळणार आहेत. ऐश्वर्या नारकर या मालिकेत मुख्य पात्र साकारणार आहे. त्याचबरोबर तरुणांची मन मोजणारी अभिनेत्री अमृता धोंगडे या मालिकेत एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. तिला पाहण्यासाठी तरुणाई उत्सुक आहे. दक्षता जोईलदेखील मालिकेत एक महत्वाचे पात्र साकारणार आहे. मालिकेतील इतर पात्रांविषयी माहिती अद्याप गुपितच ठेवण्यात आली आहे.</span><h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="New Marathi Serial : थरार, रहस्य आणि भावनांची गुंफण; ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला" href="https://www.navarashtra.com/entertainment/the-new-sun-marathi-serial-saubhagyavati-vrunda-mohan-is-set-to-premiere-for-viewers-from-july-6-1250669.html"><span class="color-blue">New Marathi Serial </span>: थरार, रहस्य आणि भावनांची गुंफण; ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला</a></span></h3>
<p>मालिकेचा प्रोमो जाहीर करण्यात आला आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मालिकेच्या शूटिंगची सुरुवात झाली आहे. 11 जून रोजी &#8216;आमच्या लाडक्या नाईक बाई&#8217; मालिकेचा मुहूर्त पार पडला आहे. मालिका स्टार प्रवाह वाहिनेवर प्रसारित होणार असून मालिका ओशन फिल्म कंपनीद्वारे प्रस्तुत आहे. Ocean Film Compony ने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर मालिकेच्या मुहूर्ताचे क्षण शेअर केले आहेत. त्याखाली कॅप्शन देत नमूद केले आहे की &#8220;येत आहे तुमच्या भेटीला&#8230; नवी मालिका ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ लवकरच… Star प्रवाहवर…&#8221;</p>
<p><strong>अनेक मराठी कलाकारांनी दिल्या शुभेच्छा!</strong></p>
<p>मुहूर्ताचे क्षण पाहून अनेक सुप्रसिद्ध मराठी मालिका कलाकारांनी या मालिकेसाठी मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. मालिका क्षेत्रात झळकणारे अनेक कलाकार आणि ऐश्वर्या तसेच अमृताच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच लवकरात लवकर मालिका प्रसारित होण्याची इच्छा सगळ्यांनी सांगितली आहे.</p>
<h3><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Icchadhari Naagin : Zee आणि Star मध्ये स्पर्धा" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/the-shooting-started-of-marathi-serial-icchadhari-naagin-1250764.html"><span class="color-red">Icchadhari Naagin </span>: Zee आणि Star मध्ये स्पर्धा? ‘मी कात टाकली’ नंतर मनोरंजन करण्यासाठी आणखीन एक Naagin आधारित मालिका सज्ज</a></span></h3>
<p><strong>काय असणार मालिका?</strong></p>
<p>मुळात, &#8216;आमच्या लाडक्या नाईक बाई&#8217; या मालिकेत एका सामान्य शिक्षिकेची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या शिक्षिकेचे पात्र ऐश्वर्या नारकर साकारत आहे. तिच्या कुटुंबाची आणि खासकरून तिच्या लेकींची हळवी गोष्ट या मालिकेत दाखवण्यात आली आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>ST workers DA : एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ताही वाढवणार; प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/st-employees-da-hike-58-percent-pratap-sarnaik-house-rent-allowance-1250884.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 17:13:00 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 17:13:00 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/st-bus-3_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[maharashtra]]></category>
		<category><![CDATA[msrtc]]></category>
		<category><![CDATA[pratap sarnaik]]></category>
		<category><![CDATA[st bus]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250884</guid>

					<description><![CDATA[महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासादायक निर्णय घेत परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/st-bus-3_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="St Employees Da Hike 58 Percent Pratap Sarnaik House Rent Allowance"     /></figure><ul>
<li>एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा!</li>
<li>महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा</li>
<li>८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांना लाभ</li>
<li>घरभाडे भत्त्यातही वाढीची घोषणा</li>
</ul><span class="bullet-text"><strong>मुंबई :</strong> एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर येत असून, <span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/msrtc">महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन</a></span> महामंडळाच्या सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची ऐतिहासिक घोषणा केली. यासोबतच कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्त्यात देखील वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.</span><p>मुंबई सेंट्रल येथील &#8216; वाहतूक भवन &#8216; या महामंडळाच्या मुख्यालयात आज राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या आर्थिक व प्रशासकीय मागण्यांवर सकारात्मक आणि सविस्तर चर्चा झाली. बैठकीच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे सर्व कर्मचारी संघटनांना शुभेच्छा देताना, &#8220;सामंजस्याची भूमिका घेऊन महामंडळ अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे,&#8221; असे आवाहन केले.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/maharashtra/st-workers-salary-fund-row-maharashtra-government-controversy-news-marathi-1249549.html">‘<span style="color: #3366ff;">एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीत खंजीर’, निधी नाकारल्याने राज्यभर संताप; राज्य सरकारच्या भूमिकेवर कर्मचाऱ्यांचा आक्रमक पवित्रा</span></a></p>
<p>यावेळी मंत्री<span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/pratap-sarnaik"> प्रताप सरनाईक</a></span> यांनी आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत, भविष्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू होताच तो तात्काळ प्रभावाने एसटी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. तसेच वेतनवाढीची थकबाकीही आर्थिक परिस्थितीचा विचार करून टप्प्याटप्प्याने अदा केली जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सोबत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची बैठक आयोजित करण्यात येईल असे देखील ग्वाही दिली.</p>
<p>बैठकीत कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, सेवाशर्ती, रिक्त पदभरती, बसस्थानक विकास, कल्याणकारी योजना तसेच महामंडळाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासंदर्भातील विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही देत मंत्री सरनाईक यांनी प्रशासनाला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.</p>
<p>कामगार संघटनांशी सातत्याने संवाद साधून प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल, असे सांगताना मंत्री सरनाईक म्हणाले, &#8220;महामंडळाच्या सर्व संघटनांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी असलेली समिती तातडीने स्थापन करण्यात यावी. उत्पन्नवाढीसाठी समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.&#8221; महामंडळाच्या आधुनिकीकरणा वर भर देताना त्यांनी सांगितले की, आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार नवीन बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली २०३५ पर्यंत एसटीचा ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी राज्यभर आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.</p>
<p>महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठीही ठोस उपाययोजना सुरू असल्याचे सांगताना मंत्री सरनाईक यांनी बसस्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर कठोर कारवाईसाठी एसटीच्या मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी श्रीमती प्रियंका नारनवरे यांच्या नेतृत्वाखाली अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरुद्ध धडक मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम एसटीच्या उत्पन्नावाढीवर झाला असून ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल असे त्यांनी नमूद केले. &#8220;कर्मचारी आणि प्रशासन यांच्या सुसंवादातून एसटी महामंडळ अधिक सक्षम, प्रवासी-केंद्रित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,&#8221; असा विश्वास व्यक्त करत मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका कायम राहील, अशी ग्वाही दिली.</p>
<p>या बैठकीस महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी प्रियंका नारनवरे, वरिष्ठ अधिकारी, विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी तसेच राज्यभरातील कामगार प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.<br />
&#8221; एसटीची आर्थिक घडी सावरत असताना कर्मचाऱ्यांच्या न्याय्य आर्थिक मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करू. संघटनांनी आंदोलन मागे घ्यावे . कृपया, प्रवाशांना वेठीस धरू नये, ही मनापासून विनंती.&#8221; अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/maharashtra/statewide-drive-against-illegal-passenger-transport-near-st-bus-stands-pratap-sarnaik-news-marathi-1246221.html"><span class="color-red">St Mahamandal </span>: आता काय खैर नाही! एसटी स्थानकांभोवती अवैध प्रवासी वाहतुकीवर राज्यव्यापी धडक; २०० मीटर परिसरात विशेष मोहीम</a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>AUS Vs BAN Live: धडाधड कोसळली! ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज शून्यावर आउट; बांग्लादेशचा कहर</title>
		<link>https://www.navarashtra.com/sports/bangladesh-team-out-three-australia-batsman-in-zero-odi-series-1250859.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[तेजस भागवत]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 17:12:14 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 17:16:26 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T170958.049_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्रीडा]]></category>
		<category><![CDATA[Australia Cricket Team]]></category>
		<category><![CDATA[Bangladesh Cricket Team]]></category>
		<category><![CDATA[ODI Series]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250859</guid>

					<description><![CDATA[मॅथ्यू शॉर्ट, कुपर कोनोली, मॅट रेनशॉ हे तीन फलंदाज शून्यावर आउट झाले. एकही रन स्कोअरबोर्डवर नसताना ऑस्ट्रेलियाचे तीन प्रमुख फलंदाज आउट झाले. तर कॅमेरून ग्रीन 21 रन्सकरून आउट झाला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/New-Project-2026-06-11T170958.049_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Bangladesh Team Out Three Australia Batsman In Zero Odi Series"     /></figure><p><strong>ऑस्ट्रेलियाचे सलग तीन फलंदाज शून्यावर आउट</strong><br />
<strong>बंगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दूसरा एकदिवसीय सामना </strong><br />
<strong>ऑस्ट्रेलियाचे बांग्लादेशला 188 रन्सचे टार्गेट</strong></p>
<p><strong>Bangladesh Vs Austrelia:</strong> सध्या ढाका येथे <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/team-australia">ऑस्ट्रेलिया</a> </strong></span>आणि <span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/topic/bangladesh-cricket">बांगलादेश</a> </strong></span>यांच्यात वनडे सिरिज सुरू आहे. पहिल्या सामन्यात बांग्लादेशने सामना जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र आता दूसरा सामना देखील ऑस्ट्रेलिया हरणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली आहे.<strong><br />
</strong></p>
<p>दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय एकदम चुकीचा ठरला, दुसऱ्या सामन्यात  ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने अशाच एका थक्क करणाऱ्या आणि ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज शून्यावर आउट झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला तीन फलंदाज शून्यावर आउट झाले असताना मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी शानदार खेळी करत सांनीयचे चित्र बदलून टाकले.</p>
<p>मॅथ्यू शॉर्ट, कुपर कोनोली, मॅट रेनशॉ हे तीन फलंदाज शून्यावर आउट झाले. एकही रन स्कोअरबोर्डवर नसताना ऑस्ट्रेलियाचे तीन प्रमुख फलंदाज आउट झाले. तर कॅमेरून ग्रीन 21 रन्सकरून आउट झाला. अलेक्स कॅरीने 24 रन्स केल्या. मिडल ऑर्डरच्या खेळीमुळे 187 रन्सपर्यन्त मजल मारली आहे. आता बांग्लादेशला जिंकण्यासाठी 188 रन्सची गरज असणार आहे. ऑस्ट्रेलियाची सुरुवात एका भीषण स्वरूपाची झाली. तीन फलंदाज शून्यावर आउट झाले. बांग्लादेशच्या गोलंदाजांनी मैदानावर भेदक गोलंदाजीने धुमाकूळ घातला.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/bangladesh-team-beat-austrelia-by-86-runs-in-dhaka-odi-series-1249291.html">BAN Vs AUS: कांगारूंचा अहंकार चक्काचूर! बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी थरारक विजय</a></strong></span></p>
<p>या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी ७ व्या क्रमांकावर किंवा त्याहून खाली खेळणाऱ्या दोन फलंदाजांनी अर्धशतक खेळी केली आहे. ७ व्या क्रमांकावरील बार्टलेटने ५० आणि त्याच्यासोबत भागीदारी करणाऱ्या लोअर ऑर्डरच्या या लढ्याने ऑस्ट्रेलियाच्या त्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली, जेव्हा मायकेल बेवन, अँडी बिशेल किंवा शेन वॉर्न यांसारखे खेळाडू तळाला येऊन संघाला संकटातून बाहेर काढत असत.</p>
<p><strong>बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी थरारक विजय<br />
</strong></p>
<p>बांगलादेश दौऱ्यावर आलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. मिरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर आजचा सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने अप्रतिम सांघिक कामगिरीच्या जोरावर डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार ऑस्ट्रेलियाचा 86 रन्सने पराभव केला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/sports/pat-cummins-performed-a-miracle-in-the-world-cup-first-hat-trick-of-t20-world-cup-552298.html">पॅट कमिन्सने विश्वचषकात केला चमत्कार! T20 वर्ल्डकपची पहिली हॅटट्रिक</a></strong></span></p>
<p>बांगलादेशने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला तब्बल २१ वर्षांनंतर पराभूत करण्याचा महापराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 285 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र बांग्लादेशसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. बांगलादेशचा नवा वेगवान गोलंदाज नाहिद राणा कर्दनकाळ ठरला. त्याने 10 ओव्हर्समध्ये 4 विकेट घेतल्या.</p>
<p>&nbsp;</p>
<p><strong> </strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Mira Bhayander : मोठी दुर्घटना टळली! भाईंदरच्या उत्तनमध्ये जमिनीत जिवंत तोफगोळा सापडला; एनएसजीच्या कारवाईत सुरक्षित निकामी</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/thane/uttan-bhayander-unexploded-shell-found-nsg-police-defuse-1250866.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्वेता झगडे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 16:56:31 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 16:56:31 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Uttan-Bhayander-bomb_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ठाणे]]></category>
		<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[crime]]></category>
		<category><![CDATA[Mira Bhayander]]></category>
		<category><![CDATA[police]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250866</guid>

					<description><![CDATA[भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात जमिनीत गाडलेला जुन्या काळातील जिवंत तोफगोळा आढळून आल्याने खळबळ उडाली. नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर मिरा-भाईंदर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणीत तो अविस्फोटित स्फोटक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Uttan-Bhayander-bomb_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Uttan Bhayander Unexploded Shell Found Nsg Police Defuse"     /></figure><ul>
<li>उत्तन परिसरात खळबळ!</li>
<li>जमिनीत गाडलेला अविस्फोटित तोफगोळा आढळला</li>
<li>मिरा-भाईंदर पोलिस व एनएसजीने जिवंत तोफगोळा निकामी केला</li>
</ul><span class="bullet-text"><strong>विजय काते, भाईंदर :</strong> भाईंदर पश्चिमेतील उत्तन परिसरात जमिनीत गाडलेला जुन्या काळातील जिवंत तोफगोळा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मिरा-भाईंदर पोलिस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल (एनएसजी) यांच्या संयुक्त कारवाईत हा अविस्फोटित तोफगोळा सुरक्षितपणे निकामी करण्यात आला. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे मानले जात आहे.</span><p>मिळालेल्या माहितीनुसार, उत्तन परिसरात नागरिकांना जमिनीत गाडलेला संशयास्पद धातूचा गोळा आढळून आला. याबाबतची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच मिरा-भाईंदर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणीत सदर वस्तू ही साधी धातूची नसून अविस्फोटित स्फोटक सामग्री असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Fraud News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा" href="https://www.navarashtra.com/crime/a-shocking-incident-has-occurred-where-a-young-woman-was-defrauded-under-the-pretext-of-a-job-offer-1250836.html"> <span class="color-red">Fraud News </span>: नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा </a></span></p>
<p>कोणताही धोका न पत्करता पोलिसांनी तत्काळ राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाशी (एनएसजी) संपर्क साधला. एनएसजीचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिसर सुरक्षा कवचाखाली घेण्यात आला. मंगळवारी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास विशेष तांत्रिक प्रक्रियेचा अवलंब करून हा तोफगोळा सुरक्षितपणे निकामी करण्यात आला.</p>
<p>तपासादरम्यान सदर सामग्री ही अविस्फोटित स्फोटक असल्याचे स्पष्ट झाले. संपूर्ण कारवाईदरम्यान सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले असून कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. एनएसजीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षमता विकास उपक्रमांतर्गत नुकतेच मिरा-भाईंदर पोलिसांना आयईडी तसेच विविध प्रकारच्या स्फोटकांची ओळख पटविण्यासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणाचा लाभ झाल्यामुळे पोलिसांनी वेळेत धोका ओळखून योग्य ती पावले उचलली. उत्तन परिसरात आढळून आलेला हा जिवंत तोफगोळा वेळेत निकामी करण्यात आल्याने मिरा-भाईंदर शहरावर ओढवू शकणारी मोठी दुर्घटना टळली असून पोलिस व एनएसजीच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.</p>
<p>सर्व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून ही मोहीम फत्ते करण्यात आली. क्षमता विकास उपक्रमांतर्गत नुकतेच मीरा-भाईंदर पोलिसांना आयईडी आणि विविध प्रकारच्या स्फोटकांची ओळख पटवण्याबाबत विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते, अशी माहिती एनएसजी अधिकाऱ्यांनी दिली.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="बलात्कारानंतर जीव वाचवण्यासाठी पीडिता नग्नावस्थेत धावली; 2020 च्या प्रकरणात नराधमाला कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा" href="https://www.navarashtra.com/crime/court-sentences-criminal-to-rigorous-imprisonment-in-2020-case-1250684.html"> बलात्कारानंतर जीव वाचवण्यासाठी पीडिता नग्नावस्थेत धावली; 2020 च्या प्रकरणात नराधमाला कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>IGNOU PhD Admission 2026: इग्नूमध्ये ३६ विषयांसाठी पीएचडी प्रवेश प्रक्रिया सुरू; या&#8217; विद्यार्थ्यांना थेट मुलाखतीची सुवर्णसंधी!</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/ignou-phd-admission-2026-july-session-online-eligibility-marathi-news-1250856.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 16:56:28 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 16:56:28 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/6-17-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[education]]></category>
		<category><![CDATA[Phd]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250856</guid>

					<description><![CDATA[IGNOU PhD Application Form 2026: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात ३६ विषयांसाठी पीएचडी प्रवेश सुरू. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, फी आणि महत्त्वाच्या तारखा सविस्तर.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/6-17-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ignou Phd Admission 2026 July Session Online Eligibility Marathi News"     /></figure><p>IGNOU PhD: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) जुलै २०२६ च्या सत्रासाठी पीएचडी (PhD) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अधिकृतपणे सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १० जून ते १ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. विद्यापीठाने आपल्या अधिकृत प्रवेश पोर्टलवर अर्ज प्रक्रिया खुली केली असून, विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे.</p>
<p>इग्नू या सत्रात एकूण ३६ विषयांमध्ये पीएचडी प्रवेशाची संधी देत आहे. यामध्ये मानसशास्त्र (Psychology), मानववंशशास्त्र (Anthropology), राज्यशास्त्र (Political Science), लोकप्रशासन (Public Administration), बायोकेमिस्ट्री (Biochemistry), रसायनशास्त्र (Chemistry) यांसह अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. या कोर्सेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत संशोधन (Research) करण्याची संधी मिळणार आहे.</p>
<p>विद्यापीठाने स्पष्ट केले आहे की, ही प्रवेश प्रक्रिया विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) २०२२ च्या नियमांनुसार आयोजित केली जाईल. या अंतर्गत उमेदवारांना वेगवेगळ्या श्रेणींनुसार प्रवेश मिळवता येईल.</p>
<h3>&#8216;या&#8217; ४ श्रेणींनुसार करता येईल अर्ज</h3>
<p>पीएचडी प्रवेशासाठी उमेदवार चार वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये अर्ज करू शकतात:<br />
१. यूजीसी-नेट (UGC-NET) उत्तीर्ण आणि जेआरएफ (JRF) प्राप्त उमेदवार.<br />
२. असिस्टंट प्रोफेसर आणि पीएचडी प्रवेशासाठी पात्र असलेले यूजीसी-नेट उमेदवार.<br />
३. केवळ पीएचडी प्रवेशासाठी पात्र असणारे यूजीसी-नेट उमेदवार.<br />
४. विद्यापीठ पातळीवर होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या (Entrance Exam) माध्यमातून अर्ज करणारे उमेदवार.</p>
<h3>कोणाला मिळणार थेट मुलाखतीची (Direct Interview) संधी?</h3>
<p>इग्नूच्या नियमांनुसार, सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून मुलाखत किंवा &#8216;व्हायव्हा-व्हॉसी&#8217; (Viva-Voce) देणे अनिवार्य असेल. मात्र, ज्या उमेदवारांनी आधीच जेआरएफ (JRF) किंवा यूजीसी-नेट (UGC-NET) परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांना विद्यापीठाची लेखी प्रवेश परीक्षा देण्याची गरज नाही. अशा उमेदवारांना थेट मुलाखतीच्या टप्प्यासाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/cbse-12th-re-evaluation-result-2026-date-marks-verification-marathi-news-1250682.html">CBSE 12th Re-evaluation Result: तब्बल ३.८ लाख उत्तरपत्रिकांची होणार तपासणी; &#8216;या&#8217; दिवशी लागणार १२ वीचा सुधारित निकाल!</a></strong></span></p>
<p>विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, हा पीएचडी कार्यक्रम फुल-टाइम (Full-Time) आणि पार्ट-टाइम (Part-Time) दोन्ही स्वरूपात उपलब्ध असेल. यामुळे नोकरी करणारे किंवा इतर कामांत व्यस्त असणाऱ्या उमेदवारांनाही त्यांचे संशोधन कार्य पूर्ण करता येईल.</p>
<h3>&#8216;कोर्स वर्क&#8217; आणि उपस्थितीचे नियम</h3>
<p>निवड झालेल्या उमेदवारांना इग्नूच्या (IGNOU) नवी दिल्ली येथील मुख्य मुख्यालयात जाऊन निर्धारित &#8216;कोर्स वर्क&#8217; (Course Work) पूर्ण करावे लागेल. विद्यापीठाने हे देखील स्पष्ट केले आहे की, संशोधक विद्यार्थ्यांना कोर्स वर्क दरम्यान किमान ८० टक्के उपस्थिती (Attendance) राखणे बंधनकारक असेल. आवश्यक उपस्थिती पूर्ण न करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील प्रक्रियेत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/nda-cadets-training-stipend-7th-pay-commission-in-hand-salary-allowances-marathi-news-1250810.html">NDA Cadets Salary Details: एनडीए ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्सना किती पगार मिळतो? पहा एका क्लिकवर&#8230;</a></strong></span></p>
<h3>अर्ज कसा आणि किती फी भरावी लागेल?</h3>
<p>ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. उमेदवारांना सर्वप्रथम इग्नूच्या प्रवेश पोर्टलवर जाऊन नोंदणी (Registration) करावी लागेल. त्यानंतर अर्ज भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि २,००० रुपये अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>मुंबईत एसुसचे नवीन एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटर; विक्रीनंतर सेवा नेटवर्कला मिळणार नवी ताकद</title>
		<link>https://www.navarashtra.com/technology/asus-new-service-centre-to-be-open-in-mumbai-tech-sector-1250860.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 16:56:24 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 17:01:04 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-82_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ताज्या बातम्या]]></category>
		<category><![CDATA[विज्ञान तंत्रज्ञान]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250860</guid>

					<description><![CDATA[सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा देण्याच्या आणि देशभरातील विक्रीपश्चात सेवा नेटवर्क मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करत, तैवानची अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी एसुस इंडियाने आज मुंबईत एका नवीन एसुस एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-82_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Asus New Service Centre To Be Open In Mumbai Tech Sector"     /></figure><p>मुंबई, 11 जून 2026: सर्वोत्कृष्ट ग्राहक सेवा देण्याच्या आणि देशभरातील विक्रीपश्चात सेवा नेटवर्क मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची पुष्टी करत, तैवानची अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी एसुस इंडियाने आज मुंबईत एका नवीन एसुस एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. साकीनाका मेट्रो स्टेशनजवळ स्थित असलेली ही नवीन सुविधा, एसुसच्या ग्राहक उत्पादनांना सर्वसमावेशक सहाय्य प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे <a href="https://www.navarashtra.com/topic/mumbai">मुंबई</a> आणि आसपासच्या परिसरातील ग्राहकांना अखंड सेवेचा अनुभव सुनिश्चित होईल.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/technology/launch-of-the-beyond-incredible-with-asus-community-event-series-in-mumbai-1186525.html">ASUS : मुंबईत ‘बियॉन्ड इन्क्रेडिबल विथ एसुस’ या कम्युनिटी इव्हेंट मालिकेची सुरुवात! ९५+ क्रिएटर्स व तंत्रज्ञानप्रेमी सहभागी</a></p>
<p>800 चौरस फुटांवर पसरलेले हे नवीन सेवा केंद्र , कंझ्युमर लॅपटॉप, रिपब्लिक ऑफ गेमर्स (ROG) आणि टफ गेमिंग पोर्टफोलिओ अंतर्गत गेमिंग लॅपटॉप, ऑल-इन-वन पीसी, डेस्कटॉप आणि ॲक्सेसरीज यांसारख्या एसुसच्या विविध उत्पादनांसाठी सहाय्य प्रदान करेल. स्पेअर पार्ट्सचा साठा आणि अनुभवी तांत्रिक सहाय्य व्यावसायिकांनी सुसज्ज असलेल्या या केंद्रात &#8216;इन-वॉरंटी&#8217; (वॉरंटी कालावधीतील) आणि &#8216;आउट-ऑफ-वॉरंटी&#8217; (वॉरंटी कालावधी संपल्यानंतरची) अशा दोन्ही प्रकारच्या सेवा दिल्या जातील.<br />
नवीन सेवा केंद्र एका समर्पित टोकन व्यवस्थापन प्रणालीद्वारे थेट येणाऱ्या ग्राहकांना सेवा देईल आणि जागेवर जाऊन (ऑन-साइट) सेवा देण्याच्या गरजा देखील पूर्ण करेल. याव्यतिरिक्त, ग्राहकांना वॉरंटी एक्स्टेंशन पॅकेज (WEP) च्या सुविधा उपलब्ध असतील, ज्यामुळे उत्पादनाच्या मालकीचा एकूण अनुभव अधिक सुखद होईल.<br />
या विस्ताराबद्दल बोलताना, एसुस इंडियाचे राष्ट्रीय सेवा व्यवस्थापक, विशाल म्हाळसेकर म्हणाले , &#8220;<a href="https://www.navarashtra.com/technology/launch-of-the-beyond-incredible-with-asus-community-event-series-in-mumbai-1186525.html">एसुस</a> मध्ये, एक विश्वसनीय आणि अखंड ग्राहक अनुभव प्रदान करणे हे आमच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक आहे. मुंबईतील आमच्या नवीन एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटरचे उद्घाटन, हे आमच्या सेवा-सुविधांचे जाळे अधिक सक्षम करण्याच्या आणि ग्राहकांना उच्च दर्जाची सेवा त्यांच्या अधिक जवळ उपलब्ध करून देण्याच्या आमच्या निरंतर गुंतवणुकीचे प्रतीक आहे. ग्राहक, गेमिंग आणि व्यावसायिक अशा विविध क्षेत्रांमध्ये आमचा ग्राहकवर्ग वाढत असताना, आम्ही सुलभता वाढवणे, सेवेसाठी लागणारा वेळ कमी करणे आणि ग्राहकांना जेव्हा गरज असेल तेव्हा तज्ञांची मदत मिळेल याची खात्री करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.&#8221;</p>
<p>संपूर्ण भारतात 210 हून अधिक सेवा केंद्रांसह, ज्यामध्ये मुंबई आणि उपनगरीय भागांतील 10 सेवा केंद्रांचा समावेश आहे , एसुस आपल्या वाढत्या ग्राहक वर्गाला आधार देण्यासाठी आणि देशभरात जलद, अधिक सुलभ विक्रीपश्चात सेवा प्रदान करण्यासाठी आपल्या सेवा नेटवर्कचा विस्तार करत आहे.<br />
सर्व्हिस सेंटरचा पत्ता: एसुस एक्सक्लुझिव्ह सर्व्हिस सेंटर; दुकान क्रमांक 108, पहिला मजला, सागर पॅलाझिओ , सीटीएस क्र. 721 आणि 494, अंधेरी कुर्ला रोड, साकीनाका , अंधेरी , मुंबई (पूर्व) – 400072</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/technology/asus-launches-a-powerful-tablet-a-latest-device-featuring-a-mediatek-processor-designed-especially-for-tech-enthusiasts-1250285.html">Asus चा पॉवरफुल टॅबलेट लाँच! मीडियाटेक प्रोसेसरसह टेकप्रेमींसाठी खास लेटेस्ट डिव्हाइस, जाणून घ्या वैशिष्ट्य</a></p>
<p>एसुस विषयी<br />
एसुस ही जगातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी असून, ती नाविन्यपूर्ण, बुद्धिनिष्ठ आणि वापरकर्ता-केंद्रित उपकरणे, कॉम्पोनंट्स आणि सोल्यूशन्स पुरवते, ज्यामुळे लोकांचे जीवन अधिक समृद्ध होऊ शकते. पाच हजारहून अधिक इन-हाऊस आर अँड डी तज्ज्ञ असलेल्या टीमसह, एसुसने आधुनिक तंत्रज्ञानाचा पुनःविचार करत पुढच्या पिढीसाठी ते पुन्हा आकारण्याचे काम केले आहे. कंपनीला दररोज ११ पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पुरस्कार गुणवत्ता, डिझाइन आणि नाविन्य याबाबतीत मिळतात. तसेच फॉर्च्यूनच्या &#8216;जगातील सर्वाधिक प्रशंसित कंपन्या’ या यादीमध्येही तिचा समावेश आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>प्रशासकीय काळातील 21 कामांवर भाजप आमदाराचे बोट; विनानिविदा खर्च, जीएनआय निविदा अन्&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/chhatrapati-sambhajinagar/a-bjp-mla-has-leveled-allegations-regarding-the-work-carried-out-during-the-administrative-tenure-of-the-chhatrapati-sambhajinagar-municipal-corporation-1250854.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 16:45:38 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 16:45:38 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/M3_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[छत्रपती संभाजीनगर]]></category>
		<category><![CDATA[BJP]]></category>
		<category><![CDATA[Chhatrapati Sambhajinagar]]></category>
		<category><![CDATA[CM Devedra Fadnavis]]></category>
		<category><![CDATA[Prashant Bamb]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250854</guid>

					<description><![CDATA[महापालिकेच्या प्रशासक कार्यकाळात आपत्कालीन अधिकारांचा वापर करून कोट्यवधी रुपयांची कामे विनानिविदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी केला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/M3_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="A Bjp Mla Has Leveled Allegations Regarding The Work Carried Out During The Administrative Tenure Of The Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation"     /></figure><p><strong>छत्रपती संभाजीनगर</strong> : महापालिकेच्या प्रशासक कार्यकाळात आपत्कालीन अधिकारांचा वापर करून कोट्यवधी रुपयांची कामे विनानिविदा करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार <a href="https://www.navarashtra.com/topic/prashant-bamb">प्रशांत बंब</a> यांनी केला आहे. तब्बल २१ कामांबाबत आक्षेप नोंदवत त्यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत जाऊन आयुक्त अमोल येडगे यांची भेट घेतली. दीड तास चाललेल्या बैठकीत प्रशासक काळातील विविध निर्णय, खर्च आणि कार्यादेशांची माहिती मागविण्यात आली. विशेषतः कलम ६७ (३) (क) अंतर्गत करण्यात आलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.</p>
<p>&nbsp;</p>
<p>महापालिकेवर सलग सहा वर्षे प्रशासक राजवट होती. या काळात विविध विकासकामांसाठी आपत्कालीन तरतुदीचा वापर करण्यात आला. मात्र, हे अधिकार केवळ तातडीच्या परिस्थितीसाठी असताना त्यांचा वापर अनावश्यक कामांसाठी केल्याचा दावा बंब यांनी केला. शासकीय निवासस्थानाचे नूतनीकरण, पेव्हर ब्लॉक टाकणे यासारख्या कामांवर २० कोटींचा खर्च केल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यापूर्वीही प्रशासक कार्यकाळातील कामांबाबत माहिती मागण्यासाठी बंब यांनी महापालिकेत भेट दिली होती. कागदपत्रांबाबत प्रशासनाकडून समाधानकारक माहिती मिळाली नसल्याने त्यांनी हा विषय विधिमंडळात उपस्थित केला होता.</p>
<p>आता पुन्हा महापालिकेत येऊन संबंधित कामांची कागदपत्रे, खर्चाचा तपशील आणि प्रशासकीय मंजुरीबाबत माहिती मागितली. बैठकीत मुख्य लेखाधिकारी संतोष वाहूळे यांनी काही मुद्द्यांवर खुलासा केला. मात्र, तो समाधानकारक नसल्याचे सांगत बंब यांनी प्रत्येक प्रकरणाची सविस्तर माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली.</p>
<p><strong>२१ प्रकरणांची यादी आयुक्तांसमोर ठेवली</strong></p>
<p>मंगळवारी झालेल्या बैठकीत आमदार बंब यांनी तब्बल २१ मुद्द्यांची यादी आयुक्तांसमोर ठेवली. आर्थिक अनियमितता, विनानिविदा खर्च आणि प्रशासकीय प्रक्रियेतील त्रुटींची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.</p>
<p><strong>आपत्कालीन अधिकारांचा वापर की गैरवापर?</strong></p>
<p>महापालिका कायद्यातील कलम ६७ (३) (क) अंतर्गत आयुक्तांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीची कामे निविदेविना करण्याचे अधिकार आहेत. मात्र, याच तरतुदीचा आधार घेऊन सुमारे २० कोटी रुपयांची कामे करण्यात आल्याचा आरोप बंब यांनी केला. या कामांपैकी अनेक कामे अत्यावश्यक स्वरूपाची नसल्याने निविदा प्रक्रिया टाळण्यात आली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/a-shocking-incident-has-occurred-where-a-young-woman-was-defrauded-under-the-pretext-of-a-job-offer-1250836.html">हे सुद्धा वाचा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा</a></p>
<p><strong>वर्षभरापासून सुरू आहे बंब यांचा पाठपुरावा</strong></p>
<p>प्रशासक कार्यकाळातील निर्णयांबाबत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत बंब यांनी वर्षभरापूर्वी तत्कालीन प्रशासक जी. श्रीकांत यांच्याकडे माहितीची मागणी केली होती. अपेक्षित माहिती न मिळाल्याने त्यांनी हा विषय विधिमंडळात उपस्थित केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी त्याच मुद्द्यांवर प्रशासनाला जाब विचारला आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>RBI ची मोठी कारवाई, 135 NBFC चं रजिस्ट्रेशन करण्यात आलं रद्द, सर्वाधिक संख्या बंगालमध्ये, नेमकं प्रकरण काय?</title>
		<link>https://www.navarashtra.com/business/rbi-cancels-registration-certificates-of-135-nbfcs-west-bengal-hit-hardest-see-more-details-1250735.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Ankita Karangutkar]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 16:42:46 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 16:42:46 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T163656.425_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्यापार]]></category>
		<category><![CDATA[bank RBI]]></category>
		<category><![CDATA[Business News]]></category>
		<category><![CDATA[Marathi News]]></category>
		<category><![CDATA[RBI]]></category>
		<category><![CDATA[RBI Action]]></category>
		<category><![CDATA[RBI jobs]]></category>
		<category><![CDATA[RBI news]]></category>
		<category><![CDATA[RBI Rule]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250735</guid>

					<description><![CDATA[RBI ने देशात कार्यरत असलेल्या नॉनबँकिंग फायनान्सशियल कंपनीविरुद्ध (NBFCs) आपली कठोर कारवाई सुरूच ठेवली आहे. मध्यवर्ती बँकेने आता १३५ NBFCs ची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. बुधवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात या निर्णयाची घोषणा करताना RBI ने संबंधित कंपन्यांची संपूर्ण यादीही जाहीर केली.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Karanataka-2026-06-11T163656.425_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Rbi Cancels Registration Certificates Of 135 Nbfcs West Bengal Hit Hardest See More Details"     /></figure><p style="text-align: justify;">RBI ने देशात कार्यरत असलेल्या नॉनबँकिंग फायनान्सशियल कंपनीविरुद्ध (NBFCs) आपली कठोर कारवाई सुरूच ठेवली आहे. मध्यवर्ती बँकेने आता १३५ NBFCs ची नोंदणी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. बुधवारी जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात या निर्णयाची घोषणा करताना RBI ने संबंधित कंपन्यांची संपूर्ण यादीही जाहीर केली. उल्लेखनीय आहे की, NBFCs या अशा वित्तीय संस्था आहेत ज्या पारंपरिक बँकांप्रमाणेच ग्राहकांना कर्ज देणे, शेअर्स आणि बाँड्समध्ये गुंतवणूक करणे आणि इतर वित्तीय सेवा पुरवणे यांसारखी कामे करतात; तसेच त्या पूर्णपणे रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली असतात. त्यामुळे चांगलाच दणका बसला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="मोठी लॉटरी! Tata आणि Adani ग्रुपकडून बंपर डिव्हिडंड, जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या शेअर्सने होणार बंफर फायदा" href="https://www.navarashtra.com/business/tata-and-adani-group-stocks-announces-bumper-dividend-payout-list-see-more-details-1250643.html"> मोठी लॉटरी! Tata आणि Adani ग्रुपकडून बंपर डिव्हिडंड, जाणून घ्या कोणत्या कंपनीच्या शेअर्सने होणार बंफर फायदा </a></span></p>
<h3 style="text-align: justify;">प्रमुख NBFCs ला मोठा फटका</h3>
<p style="text-align: justify;">पीटीआयच्या (PTI) वृत्तानुसार, रिझर्व्ह बँकेने ज्या NBFCs ची नोंदणी रद्द केली आहे, त्यामध्ये Express Fincap House, अक्षय फिस्कल सर्व्हिसेस , Times Finance , Jupiter Projects, ज्युपिटर फिनवेस्ट (Jupiter Finvest), एसेल फायनान्स बिझनेस लोन्स (Essel Finance Business Loans) आणि सिटीवाईड फायनान्शियल सर्व्हिसेस (Citywide Financial Services) यांसारख्या कंपन्यांचा समावेश आहे.</p>
<p style="text-align: justify;">रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, १९३४ च्या कलम ४५-आयए (६) अन्वये, <a href="https://www.navarashtra.com/topic/rbi">RBI</a> ने बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांची (NBFCs) नोंदणी रद्द करण्याची पावले उचलली आहेत. विहित आर्थिक मानके आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे, त्या कर्ज देणे, लीजिंग, गुंतवणूक आणि इतर वित्तीय व्यवहारांमध्ये कार्यरत आहेत.</p>
<h3 style="text-align: justify;">पश्चिम बंगालमध्ये खळबळ</h3>
<p style="text-align: justify;">RBI च्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ज्या नॉनबँकिंग फायनान्सशियल कंपन्यांची (NBFCs) नोंदणी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत, त्यापैकी बहुतांश कंपन्यांची नोंदणीकृत कार्यालये पश्चिम बंगालमध्ये होती. आरबीआयच्या या कारवाईमुळे धास्तावलेल्या १३ बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांनी स्वतःहून आपली नोंदणी प्रमाणपत्रे मध्यवर्ती बँकेकडे परत केली.</p>
<h3 style="text-align: justify;">RBI कडून स्पष्टीकरण</h3>
<p style="text-align: justify;">आरबीआयने स्पष्ट केले की, जे. थॉमस फायनान्स, इकॉन-सुपर सेल्स, हितेशा फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट, टिनेवेली ट्युटिकोरिन इन्व्हेस्टमेंट्स, कार्नेक्स विनिमय आणि इम्पॅक्ट लीजिंग या कंपन्यांनी त्यांचे परवाने परत केले कारण त्या NBFI व्यवसायातून बाहेर पडत होत्या. या कंपन्या आता जनता किंवा बाजाराकडून नवीन ठेवी स्वीकारू शकत नाहीत, तसेच कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा वित्तीय सेवा देऊ शकत नाहीत.<br />
आरबीआयच्या या यादीत कॅस्पियन इम्पॅक्ट इन्व्हेस्टमेंट्स, हरी दर्शन सेल्स, आयव्हरी कन्सल्टंट्स, एसकेए कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, त्रिशिता मॅनेजमेंट आणि सुबान ट्रेड्स यांसारख्या एनबीएफसींचाही समावेश आहे.</p>
<h3 style="text-align: justify;">मे महिन्यातही मोठी कारवाई</h3>
<p style="text-align: justify;">भारतीय रिझर्व्ह बँकेने यापूर्वी मे महिन्यातही एनबीएफसींविरुद्ध मोठी कारवाई करत १५० कंपन्यांची नोंदणी रद्द केली होती. मध्यवर्ती बँकेने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या एनबीएफसींपैकी बहुतांश कंपन्या दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील होत्या. यात पश्चिम बंगालमधील सुमारे ७५ एनबीएफसींची नोंदणी रद्द करण्यात आली होती, तर दिल्लीतील सुमारे ६७ कंपन्यांची नोंदणी रद्द करण्यात आली होती.</p>
<p style="text-align: justify;"><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="Petrol News: खुशखबर! पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी रद्द, जाणून घ्या प्रति लीटर किती होणार फायदा" href="https://www.navarashtra.com/business/petrol-price-drop-excise-duty-removed-by-government-check-benefits-per-liter-see-more-details-1250518.html"> <span class="color-red">Petrol News</span>: खुशखबर! पेट्रोलवरील एक्साईज ड्युटी रद्द, जाणून घ्या प्रति लीटर किती होणार फायदा </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>२०२३ मध्ये सुरु केलेली ‘पीएम ई-बस सेवा’ नेमकी काय आहे? सविस्तरपणे जाणून घ्या</title>
		<link>https://www.navarashtra.com/automobile/pm-e-bus-seva-2023-explained-in-detail-1250828.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[Atharva Rajopadhye]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 16:41:37 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 16:41:37 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-81_V_png--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[ऑटोमोबाइल]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250828</guid>

					<description><![CDATA[भारतामध्ये वाढते शहरीकरण, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण या समस्यांवर उपाय म्हणून केंद्र सरकारने २०२३ मध्ये पीएम ई-बस सेवा (PM e-Bus Sewa Scheme) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील शहरांमध्ये आधुनिक, पर्यावरणपूरक आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हा आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/Untitled-design-81_V_png--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Pm E Bus Seva 2023 Explained In Detail"     /></figure><p>भारतामध्ये वाढते शहरीकरण, वाहतूक कोंडी आणि प्रदूषण या समस्यांवर उपाय म्हणून केंद्र सरकारने २०२३ मध्ये <a href="https://www.navarashtra.com/topic/prime-minister">पीएम</a> ई-बस सेवा (PM e-Bus Sewa Scheme) ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील शहरांमध्ये आधुनिक, पर्यावरणपूरक आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करणे हा आहे. ऑटोमोबाईल क्षेत्राच्या दृष्टीने ही योजना इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी मोठी संधी ठरत आहे.</p>
<p>या योजनेअंतर्गत देशातील १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सुमारे १०,००० इलेक्ट्रिक बस टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. केंद्र सरकारने यासाठी सुमारे ₹५७,६१३ कोटींची तरतूद केली असून त्यापैकी केंद्राचा हिस्सा ₹२०,००० कोटींहून अधिक आहे. बस खरेदी, चार्जिंग पायाभूत सुविधा आणि संचालन यासाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलचा वापर केला जात आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/ola-uber-rapidos-backbone-automobile-industry-ayto-sector-1249331.html">ओला-उबर-रॅपिडोच्या यशामागचे ऑटोमोबाईल अर्थशास्त्र! फक्त अॅप नव्हे, तर वाहनांची ताकद!</a></p>
<p><a href="https://www.navarashtra.com/topic/automobile">ऑटोमोबाईल</a> उद्योगासाठी ही योजना विशेष महत्त्वाची आहे. इलेक्ट्रिक बस निर्मितीमुळे देशातील वाहन उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर ऑर्डर्स मिळत आहेत. Tata Motors, Ashok Leyland, JBM Auto आणि Olectra Greentech यांसारख्या कंपन्या इलेक्ट्रिक बस उत्पादनात सक्रिय आहेत. त्यामुळे बॅटरी, मोटर, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि चार्जिंग उपकरणे तयार करणाऱ्या सहाय्यक उद्योगांनाही चालना मिळत आहे.</p>
<p>ई-बस सेवेमुळे डिझेल बसांवरील अवलंबित्व कमी होणार आहे. इलेक्ट्रिक बसमुळे कार्बन उत्सर्जन कमी होते, इंधन खर्चात बचत होते आणि प्रवाशांना कमी आवाजासह अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो. यामुळे शहरे अधिक स्वच्छ आणि शाश्वत बनण्यास मदत होत आहे.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/automobile/mahindra-marketing-campaign-unlimiit-bharat-auto-sector-1248188.html">महिंद्राच्या ‘या’ मार्केटिंग कँपेनने बदलला होता भारतीय ईव्ही मार्केटचा चेहरा! महिंद्राची ‘अनलिमिट भारत’ मोहीम</a></p>
<p>या योजनेमुळे भारताच्या ई-मोबिलिटी मिशनला वेग मिळत असून सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी ही केवळ सरकारी योजना नसून भविष्यातील हरित वाहतूक क्रांतीची सुरुवात आहे. इलेक्ट्रिक बस उत्पादन, तंत्रज्ञान विकास आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून पीएम ई-बस सेवा भारताला जागतिक ई-मोबिलिटी क्षेत्रात अधिक सक्षम बनवत आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>NDA Cadets Salary Details: एनडीए ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्सना किती पगार मिळतो? पहा एका क्लिकवर&#8230;</title>
		<link>https://www.navarashtra.com/career/nda-cadets-training-stipend-7th-pay-commission-in-hand-salary-allowances-marathi-news-1250810.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[श्रेया देशमुख]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 16:38:12 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 16:38:12 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/6-16-1_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[करिअर]]></category>
		<category><![CDATA[air force]]></category>
		<category><![CDATA[Army Jobs]]></category>
		<category><![CDATA[Indian Navy]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250810</guid>

					<description><![CDATA[NDA Cadets Salary Details: एनडीए कॅडेट्सना ट्रेनिंग दरम्यान मिळणारा ५६,१०० रुपयांचा स्टायपेंड, इन-हँड मिळणारी रक्कम आणि अधिकारी झाल्यानंतरच्या पगाराविषयी सविस्तर.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/6-16-1_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Nda Cadets Training Stipend 7th Pay Commission In Hand Salary Allowances Marathi News"     /></figure><p>NDA Cadets Stipend: भारतीय सेना (Army), नौसेना (Navy) किंवा वायुसेनेत (Air Force) अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणारे तरुण एनडीए (NDA) करतात. येथे उमेदवारांना यूपीएससीची कठीण परीक्षा एसएसबी, मुलाखत, मेडिकल टेस्ट पास करावी लागते.</p>
<p>तथापि, एनडीए तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेकदा एक प्रश्न येतो की, ट्रेंनिंग दरम्यान त्यांना पगार दिला मिळतो का? तर याचे उत्तर थोडे वेगळे आहे. एनडीएमध्ये शिक्षण आणि सुरवातीच्या ट्रेनिंग दरम्यान कॅडेट्स ना पगार मिळत नाही. परंतु, सरकार त्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन एक निश्चत स्टायपेंड प्रदान करते. सातव्या वेतनाच्या शिफारशीनुसार, जेव्हा कॅडेट्स आपली ट्रेनिंग पूर्ण करून इंडियन मिलिट्री अकॅडमी, एअर फोर्स अकॅडमी  किंवा इंडियन नेव्हल अकॅडमी मध्ये प्री- कमिशन ट्रेनिंगसाठी पोहचतात. तेव्हा त्यांना दरमहा ५६,१०० रुपये स्टायपेंड दिला जातो. ही रक्कम डिफेन्स पे मॅट्रेक्सच्या &#8216;लेव्हल-१०&#8217; (Level-10) अंतर्गत येते. जी सैन्यातील नवीन अधिकाऱ्याच्या सुरुवातीच्या वेतनाइतकी असते. याच कारणामुळे एनडीए हा सर्वात आकर्षक पर्यायापैकी एक पर्याय आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/what-is-ugc-how-university-grants-commission-works-funding-marathi-news-1250600.html">उच्च शिक्षणाचा &#8216;रिमोट कंट्रोल&#8217; असणारी UGC संस्था नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या नव्या गाइडलाईन्स आणि विद्यापीठ मान्यता प्रक्रिया!</a></strong></span></p>
<h3>इन-हॅंड (In-Hand) रक्कम किती मिळते?</h3>
<p>जरी स्टायपेंड ५६,१०० रुपये निश्चत असला तरी ही संपूर्ण रक्कम कॅडेटच्या बँक खात्यात जमा होत नाही. थोडक्यात, त्यांच्याकडे इन हँड  १०,००० ते १५,००० रुपये उरतात. ही रक्कम काही आवश्यक आणि अनिवार्य कपातीशिवाय असते. यामध्ये युनिफॉर्म, लाँड्री, हेअरकट, क्रीडा साहित्य आणि इतर आवश्यक सुविधांसाठीही काही रक्कम खर्च होते. या सर्व कपाती लष्करी जीवनाच्या गरजांचा भाग असतो. त्यामुळे यासाठीही काही शुल्क कपात केली जाते. हातात येणारा १०,००० ते १५,००० हजार पगार कमी वाटू शकतो. पण ट्रेनिंंग दरम्यान राहणे, खाणे, वैद्यकीय उपचार आणि इतर बहुतांश सुविधा सरकारद्वारे पुरवल्या जातात, त्यामुळे कॅडेटना खूपच कमी खर्च खिशातून करावा लागतो.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/career/cbse-12th-re-evaluation-result-2026-date-marks-verification-marathi-news-1250682.html">CBSE 12th Re-evaluation Result: तब्बल ३.८ लाख उत्तरपत्रिकांची होणार तपासणी; &#8216;या&#8217; दिवशी लागणार १२ वीचा सुधारित निकाल!</a></strong></span></p>
<h3>अधिकारी झाल्यानंतर पगार किती वाढतो?</h3>
<p>प्री कमिशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर कॅडेट्सना लष्करात अधिकृतपणे पद मिळते आणि ते अधिकारी बनतात. यानंतर त्यांना बेसिक पे सोबत, मिलिटरी सर्व्हिस पे (MSP), महागाई भत्ता (DA), वाहतूक भत्ता (TA)  आणि इतर सुविधा मिळतात. विविध भत्ते मिळून एका नवीन अधिकाऱ्याचे मासिक उत्पन्न सहज १ लाखापेक्षा जास्त होते. पुढे अनुभवानुसारही या पगारात वाढ होते.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>‘ग्रीन गडचिरोली मिशन’ला राज्य सरकारचे बळ; रोजगार आणि पर्यावरण दोन्हीला चालना</title>
		<link>https://www.navarashtra.com/maharashtra/green-gadchiroli-mission-5-lakh-saplings-employment-environment-development-maharashtra-1250839.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[प्रियंका मुंदिनकेरी]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 16:36:50 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 16:36:50 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/gadchiroli_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[महाराष्ट्र]]></category>
		<category><![CDATA[CM Devendra Fadnavis]]></category>
		<category><![CDATA[Gadchiroli]]></category>
		<category><![CDATA[Gadchiroli News]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250839</guid>

					<description><![CDATA[Green Gadchiroli Mission: ‘ग्रीन गडचिरोली मिशन’ला राज्य सरकारकडून मोठे बळ मिळाले असून सूरजगड इस्पात प्रा. लि. आणि एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टने मिळून ५ लाख रोपांचे योगदान जाहीर केले आहे. या उपक्रमाचा कृती आराखडा ट्रस्टच्या संस्थापिका नीतू जोशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत सादर केला.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/gadchiroli_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Green Gadchiroli Mission 5 Lakh Saplings Employment Environment Development Maharashtra"     /></figure><ul>
<li style="text-align: justify;"><strong>‘ग्रीन गडचिरोली मिशन</strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>५ लाख रोपांचे योगदान </strong></li>
<li style="text-align: justify;"><strong>रोजगार आणि पर्यावरण दोन्हीला चालना</strong></li>
</ul><span style="text-align: justify;" class="bullet-text">
<strong>मुंबई</strong> : गडचिरोली जिल्ह्याला पर्यावरणपूरक आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून, &#8216;ग्रीन गडचिरोली मिशन&#8217;ला आता सूरजगड इस्पात प्रा. लि. आणि एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टचे मोठे बळ लाभले आहे. या उपक्रमांतर्गत तब्बल ५ लाख रोपांचे योगदान जाहीर करण्यात आले असून, ट्रस्टच्या संस्थापिका नीतू जोशी यांनी नुकतीच मुख्यमंत्री <a href="https://www.navarashtra.com/topic/cm-devendra-fadnavis">देवेंद्र फडणवीस</a> यांची मुंबईत भेट घेऊन या हरित विकासाचा कृती आराखडा सादर केला.</span><p><a class="title" title="दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला, शेती कामांना वेग" href="https://www.navarashtra.com/maharashtra/pune/significant-rainfall-in-the-eastern-part-of-daund-taluka-1250745.html"><span style="color: #3366ff;"> दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाची दमदार हजेरी; बळीराजा सुखावला, शेती कामांना वेग</span> </a></p>
<p style="text-align: justify;">दुर्गम भागात पर्यावरण संवर्धन आणि स्थानिक रोजगाराला गती देणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या ५ लाख रोपांच्या लागवडीमुळे आणि देखभालीमुळे जिल्ह्यातील हरित क्षेत्र वाढेल. तसेच, या मोहिमेतील रोपवाटिका व लागवडीच्या कामांमुळे गडचिरोलीतील २०० हून अधिक स्थानिक आदिवासी महिलांना थेट रोजगार मिळून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे.</p>
<p style="text-align: justify;">एमआयएएम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून नाशिक आणि <a href="https://www.navarashtra.com/topic/gadchiroli">गडचिरोली</a> भागात मोफत ग्रंथालये व करिअर मार्गदर्शन उपक्रम चालवले जात आहेत. याचा फायदा घेऊन ३० हून अधिक ग्रामीण तरुणांना सैन्यदल, पोलीस दल आणि शासकीय सेवांमध्ये नोकरी मिळाली आहे. याशिवाय, १०० हून अधिक महिलांना अन्नप्रक्रिया आणि आदरातिथ्य सेवांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सरकारच्या कौशल्य विकास मोहिमेला समांतर चालणाऱ्या या प्रयत्नांमुळे गडचिरोलीतील तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यास मोठी मदत होत आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><a class="title" style="color: #3366ff;" title="Free Ration Distribution: राजगुरूनगर परिसरात अलर्ट!  १५ जूननंतर मोफत रेशन वितरण थांबणार" href="https://www.navarashtra.com/maharashtra/khed-taluka-free-ration-distribution-deadline-e-pos-machine-closing-date-1250674.html"> <span class="color-red">Free Ration Distribution</span>: राजगुरूनगर परिसरात अलर्ट! १५ जूननंतर मोफत रेशन वितरण थांबणार </a></span></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>धक्कादायक! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर फेकलं अन्न; रेल्वे केटरिंग स्टाफचा VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांडून संताप व्यक्त</title>
		<link>https://www.navarashtra.com/viral/shocking-video-food-thrown-on-railway-track-from-moving-train-netizens-outraged-1250791.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[स्वराली शहा]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 16:34:48 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 16:34:48 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/shocking-viral-video_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[व्हायरल]]></category>
		<category><![CDATA[viral news]]></category>
		<category><![CDATA[viral video]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250791</guid>

					<description><![CDATA[सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वे केटरिंग स्टाफचे कर्मचारी उरलेले अन्न आणि प्लेट्स थेट रेल्वे ट्रॅकवर फेकून देत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/shocking-viral-video_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Shocking Video Food Thrown On Railway Track From Moving Train Netizens Outraged"     /></figure><ul>
<li>धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर फेकलं अन्न</li>
<li>रेल्वे केटरिंग स्टाफचा VIDEO व्हायरल,</li>
<li>नेटकऱ्यांडून संताप व्यक्त</li>
</ul><span class="bullet-text">सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत अत्यंत संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वे प्रवासातील खाद्यपदार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कुठे विक्रेता समोशाच्या टोपलीत पाय ठेवनू बसला आहे, तर कुठे फेकून दिलेले अन्नाचे कंटरने पुन्हा धुवून वापरले जात आहेत. काही ठिकाणी जमिनीवर पडलेले अन्न पुन्हा उचलून ते प्रवाशांना विकले जात आहे. सध्या एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये रेल्वे कर्मचारी धावत्या ट्रेनमधून अन्न ट्रॅकवर फेकताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वेगाने व्हायरल होत आहे.</span><p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/viral/viral-video-ground-fallen-vadas-put-back-in-serving-tray-passengers-shocked-1250385.html">प्रवाशांच्या जीवाशी खेळ? जमिनीवर पडलेले वडे पुन्हा ट्रेमध्ये ठेवले अन्…; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…</a></span></strong></p>
<h3>नेमकं काय आहे प्रकरण?</h3>
<p>व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेन अत्यंत वेगाने धावत आहे. याच वेळी रेल्वे केंटरिंग स्टाफचे कर्मचारी डब्याच्या दरवाज्याजवळ उभे आहेत.  तिथे ते उरलेलं अन्न आणि वापरलेल्या प्लेट्स थेट ट्रॅकवर फेकताना व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.</p>
<p>नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त</p>
<h3>व्हायरल व्हिडिओ</h3>
<blockquote class="twitter-tweet">
<p dir="ltr" lang="hi">भारत से गरीबी और भुखमरी खत्म करने के लिए रेलवे कर्मचारी काफी मेहनत कर रहे हैं।<br />
ट्रेन से जरूरतमंदों को खाने की प्लेट बांटकर नया रिकॉर्ड भी बनाया है। इन्हें रेल मंत्री सम्मानित कब करेंगे"https://t.co/IGRTTAn02I">pic.twitter.com/IGRTTAn02I</a></p>
<p>— Arvind Sharma (@sarviind) <a href="https://x.com/sarviind/status/2064554106463891923">June 10, 2026</a></p></blockquote>
<h3><script async src="https://platform.x.com/widgets.js" charset="utf-8"></script><br />
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया</h3>
<p>व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @sarviind या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. एका नेटकऱ्याने अन्न फेकून देण्यापेक्षा एखाद्या गरजू व्यक्तीला द्यायचे ना असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना सुट आणि प्रवाशांंना नियम असा भेदभाव का? असा प्रश्न केला आहे. तर तिसऱ्या एकाने अरे ट्रेनमध्ये डस्टबिनची व्यवस्था नाही का असा प्रश्न केला आहे. अनेकांनी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. यांच्यामुळे ट्रॅक्स खराब होत असणार असे लोकांचे म्हणणे आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" href="https://www.navarashtra.com/viral/viral-video-young-man-bike-stunt-in-front-of-girls-goes-wrong-1249879.html">Stunt Video : मुलींसमोर हिरोगिरी आली अंगलट; इंप्रेस करण्यासाठी बाईक स्टंट करायला गेले अन्…, पाहा काय घडलं? Video Viral</a></span></strong></p>
<p><strong>टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.</strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>Fraud News : नोकरीचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा</title>
		<link>https://www.navarashtra.com/crime/a-shocking-incident-has-occurred-where-a-young-woman-was-defrauded-under-the-pretext-of-a-job-offer-1250836.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[ज्ञानेश्वर मोरे]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 16:29:39 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 16:29:39 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/f46_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[क्राईम]]></category>
		<category><![CDATA[Arrested News]]></category>
		<category><![CDATA[crime news]]></category>
		<category><![CDATA[Fraud Case]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250836</guid>

					<description><![CDATA[शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कणकवलीत एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणीची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/f46_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="A Shocking Incident Has Occurred Where A Young Woman Was Defrauded Under The Pretext Of A Job Offer"     /></figure><p><strong>कणकवली</strong> : शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कणकवलीत एका उच्चशिक्षित बेरोजगार तरुणीची लाखो रुपयांची <a href="https://www.navarashtra.com/topic/fraud">फसवणूक</a> झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या गोपनीय विभागात नोकरी लावतो, असे खोटे सांगून संशयित आरोपीने या तरुणीकडून २ लाख २४ हजार ६५० रुपये उकळले. पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने आणि दिलेले पैसे परत देण्यास नकार दिल्याने अखेर या प्रकरणी तोंडवली येथील श्रीकृष्ण शामसुंदर कुडतरकर याच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>
<p>&nbsp;</p>
<p>कणकवली येथे राहणाऱ्या एका पदव्युत्तर (एम. कॉम.) शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणीला नोकरीची अत्यंत गरज होती. याचाच गैरफायदा घेत संशयित आरोपी श्रीकृष्ण कुडतरकर याने आपण स्वत: अँटी करप्शन मध्ये काम करत असल्याची बतावणी केली. तसेच जिल्हाधिकारी मॅडम यांच्या विशेष अधिकारातील गोपनीय विभागात वरिष्ठ लिपिक या पदावर तिला नोकरीस लावून देतो, असे प्रलोभन त्याने तरुणीच्या कुटुंबाला दाखवले. या कामासाठी एकूण दोन लाख रुपयांची मागणी केली.</p>
<p><a href="https://www.navarashtra.com/crime/the-police-have-arrested-the-accused-who-was-harassing-young-women-1250719.html">हे सुद्धा वाचा : 50 हून अधिक तरुणींना त्रास देणारा विकृत जाळ्यात; व्हॉट्सॲप ग्रुपवरून नंबर घेयचा अन्…</a></p>
<p><strong>वेगवेगळ्या सबबी सांगून वारंवार टाळाटाळ</strong></p>
<p>पीडित तरुणीच्या कुटुंबाने श्रीकृष्ण याच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या तारखांना गुगल पे आणि नेट बैंकिंगद्वारे पैशांचे व्यवहार केले. २ ऑक्टोबंर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत टप्याटप्प्याने एकूण २ लाख २४ हजार ६५० रुपये कुडतरकर याने दिलेल्या बँक खात्यांवर वर्ग केले. पैसे देऊनही अनेक महिने नोकरी लागत नसल्याने आणि श्रीकृष्ण कुडतरकर याच्याकडून वेगवेगळ्ळ्या सबबी सांगून वारंवार टाळाटाळ केली जात असल्याने तरुणीला व तिच्या कुटुंबाला संशय आला. त्यांनी दिलेल्या पैशांची मागणी लावून धरली असता त्याने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणी व तिच्या कुटुंबाने कुडतरकर याच्या विरोधात तक्रार नोंदवली. संबंधित संशयित श्रीकृष्ण कुडतरकर हा अँटी करप्शनमध्ये कोणत्याही पदावर कार्यरत नसून, त्याने केवळ आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी हा खोटा बनाव रचल्याचे तपासात समोर आले आहे.</p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
		<item>
		<title>‘मर्दिनी’मधून अहमद खान यांचं मराठीत पदार्पण; आदर्श शिंदेंच्या दमदार आवाजात उमटणार स्त्रीशक्तीचा जयघोष</title>
		<link>https://www.navarashtra.com/entertainment/ahmed-khan-makes-his-marathi-debut-with-mardini-adarsh-shindes-powerful-voice-to-celebrate-the-spirit-of-women-empowerment-1250781.html</link>
		
		<dc:creator><![CDATA[अमृता यादव]]></dc:creator>
<pubDate>Thu, 11 Jun 2026 16:23:24 +05:30</pubDate>
<modifiedDate>Thu, 11 Jun 2026 16:23:24 +05:30</modifiedDate>
				<media:thumbnail url="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/song_V_jpg--1280x720-4g.webp"/>
						<category><![CDATA[Entertainment]]></category>
		<category><![CDATA[Marathi Cinema]]></category>
		<category><![CDATA[Adarsh Shinde]]></category>
		<category><![CDATA[Entertainemnt News]]></category>
		<category><![CDATA[marathi movie]]></category>
		<guid isPermaLink="false">https://www.navarashtra.com/?p=1250781</guid>

					<description><![CDATA[‘मर्दिनी’ चित्रपटातील विशेष गीताला अहमद खान यांची पहिली मराठी कोरिओग्राफी लाभली आहे. आदर्श शिंदेंच्या दमदार आवाजात साकारलेले हे गीत स्त्रीशक्ती आणि मातृत्वाचा प्रेरणादायी संदेश देणार आहे.]]></description>
													<content:encoded><![CDATA[<figure><img width="1280" height="720" src="https://images.navarashtra.com/wp-content/uploads/2026/06/song_V_jpg--1280x720-4g.webp" class="attachment-full size-full wp-post-image" alt="Ahmed Khan Makes His Marathi Debut With Mardini Adarsh Shindes Powerful Voice To Celebrate The Spirit Of Women Empowerment"     /></figure><p>आगामी मराठी चित्रपट मर्दिनी सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. आता चित्रपटातील एका खास गीतामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या गीताच्या निमित्ताने बॉलिवूडचे प्रसिद्ध कोरिओग्राफर अहमद खान यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले आहे. विशेष म्हणजे या गीताला गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजाची साथ लाभली आहे.</p>
<p>अहमद खान यांनी या अनुभवाबद्दल बोलताना सांगितले की, ‘मर्दिनी’ हे केवळ एक गाणं किंवा चित्रपट नसून भावनांचा, श्रद्धेचा आणि स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याचा प्रवास आहे. चित्रपटाच्या कथेशी आणि त्यातील भावविश्वाशी ते सहज जोडले गेले. मराठी चित्रपटासाठी प्रथमच काम करण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी असल्याचेही त्यांनी नमूद केले.</p>
<p>नारीसामर्थ्य, मातृत्व आणि संघर्षाची कहाणी मांडणारा ‘मर्दिनी’ हा चित्रपट समाजाने घालून दिलेल्या चौकटी मोडून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रीचा प्रेरणादायी प्रवास उलगडणार आहे. चित्रपटातील शीर्षक गीत या भावनांना अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार असल्याचे बोलले जात आहे.</p>
<p>चित्रपटात प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले आणि बालकलाकार मायरा वैकुळ यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यांच्या दमदार अभिनयामुळे कथेला अधिक प्रभावी परिमाण लाभले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अजय मयेकर यांनी केले असून, निर्मिती दिप्ती तळपदे यांची आहे. सहनिर्माती टिना राकेश कोठारी आहेत. छायांकन शब्बीर नाईक, संकलन अभिषेक शेठ, संगीत हितेश मोडक तसेच पटकथा आणि संवाद महाबळेश्वर नार्वेकर यांनी चित्रपटाच्या तांत्रिक बाजूला सक्षम आधार दिला आहे.</p>
<p><span style="color: #3366ff;"><strong><a style="color: #3366ff;" title="Icchadhari Naagin : Zee आणि Star मध्ये स्पर्धा" href="https://www.navarashtra.com/entertainment/marathi-serial/the-shooting-started-of-marathi-serial-icchadhari-naagin-1250764.html"> <span class="color-red">Icchadhari Naagin </span>: Zee आणि Star मध्ये स्पर्धा? ‘मी कात टाकली’ नंतर मनोरंजन करण्यासाठी आणखीन एक Naagin आधारित मालिका सज्ज </a></strong></span></p>
<p>पोस्टर लॉन्चपासूनच चर्चेचा विषय ठरलेल्या ‘मर्दिनी’ने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. नारीशक्तीचा जयघोष, मातृत्वाच्या सामर्थ्याला सलाम आणि संकटांशी दोन हात करणाऱ्या स्त्रीच्या अदम्य जिद्दीची कहाणी घेऊन येणारा हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारा अनुभव ठरणार आहे. भावनिक कथानक, प्रभावी कलाकार, हृदयस्पर्शी संगीत आणि आशयपूर्ण मांडणी यांच्या जोरावर ‘मर्दिनी’ हा यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या मराठी चित्रपटांपैकी एक ठरण्याची चिन्हे आहेत. येत्या ३ जुलै २०२६ रोजी ही प्रेरणादायी कथा रुपेरी पडद्यावर अवतरणार असून, प्रेक्षकांच्या मनावर आपली अमिट छाप उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे.</p>
<p><strong><span style="color: #3366ff;"><a style="color: #3366ff;" title="New Marathi Serial : थरार, रहस्य आणि भावनांची गुंफण; ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला" href="https://www.navarashtra.com/entertainment/the-new-sun-marathi-serial-saubhagyavati-vrunda-mohan-is-set-to-premiere-for-viewers-from-july-6-1250669.html"> <span class="color-blue">New Marathi Serial </span>: थरार, रहस्य आणि भावनांची गुंफण; ‘सौभाग्यवती वृंदा मोहन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला </a></span></strong></p>
]]></content:encoded>
					
		
		
			</item>
	</channel>
</rss>