डहाणू येथे अल्पवयीन मुलींवरील कथित लैंगिक अत्याचार आणि मानव तस्करीसदृश प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली आहे. मोठ्या बहिणीसह लहान बहिणीवरही अत्याचार झाल्याचा आरोप असून, पुरवणी जबाबानंतर गुन्ह्यात आणखी कलमे जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनाच बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. वसई येथे वाहतूक पोलिसांच्या विरोधात चुकीची माहिती पसरवून त्यांची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर पोलीसांनी कायदेशीर कारवाई केली.
वसई-विरार महापालिकेचा बोळिंज येथील ३८५ कोटी रुपयांचा मलनिस्सारण प्रकल्प हा प्रशासनाच्या निष्काळजीपणा आणि निकृष्ट नियोजनाचा पुरावा आहे. ९ वर्षांतच प्रकल्पाची दुर्दशा झाल्याचा पर्दाफाश करत विरोधी पक्षनेते मनोज पाटील केला.
वसई-विरार महापालिकेत समाविष्ट झालेल्या कामगार-कर्मचाऱ्यांना तब्बल १७ वर्षांनंतर 'समान काम, समान वेतन' या तत्त्वावर न्याय मिळाला असून मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला स्पष्ट आणि कठोर निर्देश दिले आहेत.
तलासरी तालुक्यातील एका महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे आता प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
डहाणू शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेबाहेरच 'नकली नोटा तपासून देतो' असा बहाणा करून २ अज्ञात इसमांनी हातचलाखी करत महिलेची १५ हजार रुपयांची फसवणूक केली.
अर्नाळा किल्ला हा पालघर जिल्ह्यातील विरारजवळ अरबी समुद्रातील अर्नाळा बेटावर वसलेला प्रसिद्ध जलदुर्ग आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी समुद्रमार्गावरील व्यापार आणि संरक्षणासाठी हा किल्ला मजबूत बांधला.
पालघर जिल्ह्यासाठी पुढील 2 वर्षांत एकूण 200 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक तथा गटनेता अशोक शेळके यांच्या कार्यालयाच्या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका भाजपच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय बनली असून पक्षांतर्गत धुसफुशीला तोंड फुटले आहे.
वसई-विरार महानगरपालिकेत प्रभारी शाखा अभियंता (ठेका) पदावरील नियुक्त्यांवरून सध्या जोरदार वादंग निर्माण झाला आहे. १ जानेवारी २०२५ च्या आदेशांनुसार काही कंत्राटी अभियंत्यांना महत्त्वाच्या प्रभागांची जबाबदारी देण्यात आले.