डहाणू तालुक्यातील उर्से या आदर्श गावातील विद्यार्थिनी नेहा संदीप पाटील हिने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आयोजित ‘युविका 2026’ या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड मिळवत संपूर्ण पालघर जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे.
तलासरी तालुक्यातील एका महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या कामामुळे स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येकडे आता प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.
डहाणू शहरात दिवसाढवळ्या घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेबाहेरच 'नकली नोटा तपासून देतो' असा बहाणा करून २ अज्ञात इसमांनी हातचलाखी करत महिलेची १५ हजार रुपयांची फसवणूक केली.
अर्नाळा किल्ला हा पालघर जिल्ह्यातील विरारजवळ अरबी समुद्रातील अर्नाळा बेटावर वसलेला प्रसिद्ध जलदुर्ग आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी समुद्रमार्गावरील व्यापार आणि संरक्षणासाठी हा किल्ला मजबूत बांधला.
पालघर जिल्ह्यासाठी पुढील 2 वर्षांत एकूण 200 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवक तथा गटनेता अशोक शेळके यांच्या कार्यालयाच्या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका भाजपच्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेचा विषय बनली असून पक्षांतर्गत धुसफुशीला तोंड फुटले आहे.
वसई-विरार महानगरपालिकेत प्रभारी शाखा अभियंता (ठेका) पदावरील नियुक्त्यांवरून सध्या जोरदार वादंग निर्माण झाला आहे. १ जानेवारी २०२५ च्या आदेशांनुसार काही कंत्राटी अभियंत्यांना महत्त्वाच्या प्रभागांची जबाबदारी देण्यात आले.
वसई विरारच्या मनोर येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून या घटनेत २ अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बंद दगड खाणीत ही घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त होते आहे
पालघर ते त्र्यंबक दरम्यानच्या १५४ किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या रुंदीकरणाचा मुद्दा सध्या जिल्ह्यातील राजकारण व प्रशासनाच्या केंद्रस्थानी आला आहे. महामार्ग विभागाने २ वेळा दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामेही केली.
वाढती लोकसंख्या, शहरांचा झपाट्याने होत असलेला भौगोलिक विस्तार आणि महसूल विभागाच्या कामकाजाचा वाढता व्याप लक्षात घेऊन प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
डहाणू तालुक्यात आंबेसरी बारीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्यावर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल २० लाख ७० हजार रुपयांचा तंबाखूजन्य माल जप्त केला आहे.