पालघर जिल्ह्यासाठी पुढील 2 वर्षांत एकूण 200 नवीन एसटी बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोईसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास तरे यांनी दिली.
डहाणू तालुक्यात आंबेसरी बारीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्यावर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल २० लाख ७० हजार रुपयांचा तंबाखूजन्य माल जप्त केला आहे.
पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्ने यांनी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट घेतली
वसई परिसरात अनधिकृत बांधकामांना यापुढे थारा मिळणार नाही आणि शहराच्या सौंदर्यात बाधा आणणाऱ्या गोष्टींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर अजीव पाटील यांनी दिला.
Mumbai Ahmedabad Highway Chaos :गेल्या काही वर्षांपासून महामार्गाच्या मुंबई-अहमदाबाद काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून रखडलेल्या कामामुळे अपघात, वाहतूक कोंडी यामुळे वाहन बालकांसह नागरीक त्रस्त झाले आहेत.
नालासोपारा पूर्वेकडेल जाबरपाडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी गेलेल्या वसई-विरार महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. यासंबधित प्रकरणी ३० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vasai Fishing Ban : वसईतील मत्स्य व्यवसाय मागील काही दिवसांपासून ठप्प झाला आहे. समुद्रात मत्स्यबीज वाढावे या उद्देशाकरता येथील मच्छिमार सोसायटीने ३० जानेवारी ते १० मार्च या कालावधी दरम्यान मासेमारी बंदीची घोषणा केली.
विक्रमगड तालुक्यातील फुटखंड पाडा रस्त्याचे काम रखडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. काम पुन्हा सुरु करण्याची मागणी होत असून न झाल्यास आंदोलन करु असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.
वसई-विरार महापालिकेमार्फत शहरात अनेक ठिकाणी एसटीपी प्लांटला जोडणारी मलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र, प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि ठेकेदाराकडून सुरक्षिततेकडे केले जात असलेल्या दुर्लक्षामुळे नागरीक त्रस्त आहेत.
विरार शहरातील एका रस्त्यावरील पाणीपुरी विक्री ठिकाणी साप आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक साप दिसताच ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
वसई पूर्वेकडील नायगावच्या टिवरी परिसरात तब्बल १००० कोटी रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट कागदपत्रे आणि कायदेशीररित्या रद्द झालेल्या मुखपत्राचा आधार घेत फिर्यादीची ६५.३३ एकर जमीन हडपल्या आरोप आहे.
वसई-विरार महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करत असताना निवडून आलेल्या बविआच्या नगरसेवकांनी माहिती लपवून ठेवल्याप्रकरणी त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी भाजपचे नितीन ठाकूर यांनी केली आहे.