चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने आता ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. परिसरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे आणि साइडपट्ट्यांची दुरुस्ती ३१ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याची ‘डेडलाइन’ संबंधित यंत्रणांना दिली आहे.
मुख्य पीएनजी पाइपलाइन पोहोचलेल्या सोसायट्यांमध्ये सुरुवातीला केवळ २० टक्के घरांमध्ये पीएनजीचा वापर होत असल्याचे एमएनजीएलच्या पाहणीत आढळले होते. त्यानंतर सहकार विभागाच्या सहकार्याने सोसायट्यांमध्ये विशेष मोहीम राबविण्यात आली.
खेड तालुक्यातील बहुप्रतिक्षित 'चाकण डी-क्लॉग वर्क' प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कामांचा थेट ताळेबंद मांडण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी प्रत्यक्ष ६ तास सविस्तर पाहणी केली.
पुणे बाजार समितीच्या कथित अनियमिततेच्या चौकशीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केला होता. यापूर्वी झालेली चौकशी आणि त्यातील अहवाल संशयास्पद असल्याने नव्याने सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
पुणे जिल्ह्यातील हजारो शिधापत्रिका वगळण्यात आल्याने संबंधित लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेची स्थिती तपासून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन संबंधित यंत्रणेकडून करण्यात येत आहे.
Pune Ahmednagar Highway Traffic Jam: वाढत्या वाहतुकीच्या तुलनेत रस्त्यांची क्षमता आणि वाहतूक व्यवस्थापन अपुरे पडत असल्याने वाहनांना अनेकदा तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागते. त्याचा थेट परिणाम उद्योगांचे दैनंदिन कामकाज, उत्पादन प्रक्रिया, मालवाहतूक आणि कामगारांच्या वेळेवर होत आहे.
पुण्यात अलीकडच्या वर्षांत उष्णतेच्या लाटा, वाढते डांबरीकरण आणि झपाट्याने होणारे शहरीकरण यामुळे ‘अर्बन हीट आयलंड’चा प्रभाव वाढत असल्याचे विविध अभ्यासांतूनही स्पष्ट झाले आहे.
पुणे महानगरपालिकेच्या (मनपा) प्रभाग समित्यांमध्ये गेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचे ‘पुनर्वसन’ करण्याची सुरू असलेली परंपरा यंदा खंडित होणार आहे. यंदा राजकीय कार्यकर्त्यांसाठी समित्यांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
पुण्यातील तरुण संकलक अथश्री ठुबे यांनी या लघुपटाचे संकलन केले असून, त्यांना सुप्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते नागराज मंजुळे यांच्या हस्ते 'सर्वोत्कृष्ट संकलक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांच्या वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाच्या व अपघातप्रवण ठिकाणी Runaway / Escape Ramp उभारण्यात यावेत, अशी मागणी रविंद्र साळेगावकर यांनी केली आहे.
तीन हजार एकरमध्ये संपूर्ण पुरंदर विमानतळ प्रकल्प पूर्ण होत असताना आमचे क्षेत्र पुन्हा का घेतले जात आहे ? असा जाहीर सवाल उदाचीवाडी येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
केशवनगर-खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.