शहराला सध्या प्रतिदिन ५२० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठ केला जातो. त्यात साडेपाच टक्के वाढ गृहीत धरून ६८० दशलक्ष लिटर प्रतिदिन 520 दशलक्ष लिटर पुरवठा सध्या शहराला केला जातो.
एमआयडीसीद्वारे सिन्नर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट विक्री प्रक्रिया सुरु झाली असली, तरी जाहीर दरांवरून उद्योजकांमध्ये नाराजी आहे. अवास्तव किंमतींमुळे उद्योग उभारणीला अडथळा निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
महायुतीने सहाही प्रभाग सभापतीपदे आपल्या खात्यात जमा केली असून भाजपला पाच तर शिवसेना (Eknath Shinde faction) ला एक सभापतीपद मिळाले आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसने माघार घेतल्यामुळे निवडणूक एकतर्फी झाल्याचे चित्र दिसले.
रेशन कार्डमधील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी राज्यभरात 'मिशन सुधार' मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेंतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली.
अहिल्यादेवी होळकर यांनी नद्यांचे महत्व जाणले आणि नदी प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न केले. महिला, गरीब आदिवासीना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याचे कार्य त्यांनी केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपात महापौर, उपमहापौर व स्थायी या महत्वाच्या पदांसाठी इच्छूकांची संख्या अधिक होती. त्यातही शिंदे सेनेला उपमहापौरपद देण्यात आले, त्यामुळे पक्षातील इच्छूकांना मुरड घालावी लागली.
विकासाच्या नावाखाली होत असलेल्या पर्यावरणीय हानीविरोधात Gen Z तरुणांनी शहरात ऑक्सिजन मास्क घालून अनोखे आंदोलन केले. या माध्यमातून प्रदूषण आणि असंतुलित विकासाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
अंत्यसंस्कार हा हिंदू धर्मातील अत्यंत संवेदनशील आणि पारंपरिक विधी असून, तो सन्मानाने पार पाडला जाणे आवश्यक आहे. मात्र अलीकडे काही ठिकाणी या विधींना ‘इव्हेंट’चे स्वरूप येताना दिसत आहे.
उन्हाच्या तीव्रतेनंतर वातावरणात बदल होत ढगाळ स्थिती निर्माण झाली असून तापमान ४० अंशांवरून ३५ अंशांपर्यंत खाली आले आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
अक्षय तृतीयेनिमित्त सोने-चांदीसह वाहनांच्या खरेदीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सुमारे ३ हजार दुचाकी आणि १ हजार कार्सची डिलीव्हरी आज होणार असून, प्री-बुकिंग पूर्ण क्षमतेने भरले आहे.
संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे सांगत मातेला अस्वस्थ वाटत असताना आधी कल्पना न देता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर नातलगांना पेशंटला जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले.