माथेरान डोंगरातील त्या सर्व आदिवासी वाड्या देश स्वातंत्र्य होण्याच्या १०० वर्षे आधीपासून अस्तित्वात आहेत. मात्र त्या ठिकाणी रस्त्याची कामांसाठी अनेक समस्या येत आहेत. त्यामुळे आता ग्रामस्थांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आ
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेलमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
मंगेश काळोखे हत्या प्रकरणात सोशल मीडियावरुन बदनामी केली जात असल्याचा आरोप केला. मंगेश काळोखे यांच्या हत्येनंतर मागील 4 दिवसांपासून आम्ही कोणतेही राजकारण न करता पीडित कुटुंबाच्या दु:खात सहभागी होण्याची भूमिका घेतली होती.
तालुक्याचा पूर्वभाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. टाटा कंपनीच्या आंध्र धरणातील पाण्यावर वीज निर्मिती केल्यानंतर राजनाला कालव्यात सोडले जाते.
शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर वारंवार टीकास्त्र सोडले होते. दरम्यान, शिंदे गटाकडून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यावरही सोशल मीडियावरून टीका केली.
रायगड जिल्ह्याला विस्तृत आणि मनमोहक समुद्र किनारा लाभला आहे. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटनस्थळांवर गर्दी वाढली आहे. स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत.
शेकापच्या वाहतूक सेलचे रायगड जिल्हाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र बबन शेळके यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जयेंद्र शेळके यांनी शेकापची साथ सोडून भाजपात जाहीर प्रवेश केला आहे.
नेरळ माथेरान घाटरस्ता दर सुट्टीला म्हणजेच शनिवार आणि रविवार तसेच सलग सुट्ट्या लागून आल्यांनतर वाहतूक कोंडीत सापडत असतो. यावर्षी ख्रिसमस आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची गर्दी माथेरानमध्ये आले आहेत.
श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवासी शासकीय कामकाज, शिक्षण, आरोग्य सेवेसाठी माणगावात जातात. मात्र एसटी सेवा उपलब्ध नसल्याने या प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
माथेरानघाट रस्त्यावरील निकृष्ट डांबरीकरणाचा फटका आता वाहन चालकांना बसत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माथेरानघाट रस्त्याची अवस्था पाहून संताप व्यक्त केला जात आहे.
अलिबाग तालुक्यातील कुरुळ बायपास ते बेलकडे जाणाऱ्या महामार्गाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवास करताना वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिन फेटाळल्यानंतर, विकास गोगावले हे सुशांत जाबरे यांच्याबरोबर सेटलमेंट करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना ठाकरे गटाचे महाड विधानसभा मतदार संघाचे समन्वयक सोमनाथ ओझर्डे यांनी केला