कर्जत तालुक्यातील सांगवी येथील सनाधरा रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या बांधकामाचा स्लॅब अचानक कोसळून मनोज नावाचा कामगार तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. लोखंडी बीममध्ये अडकल्याने तो गंभीर संकटात सापडला होता. खोपोलीच्या हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने तब्बल पाच तास अथक प्रयत्न करून त्याला सुखरूप बाहेर काढले.
रायगड जिल्ह्यातील अवचितगडाच्या ६०० फूट खोल दरीतून शिवशंभू प्रतिष्ठानने अत्यंत कठीण परिस्थितीत दोन ऐतिहासिक शिवकालीन तोफांना सुखरूप बाहेर काढले आहे. या थरारक मोहिमेमुळे गडावरील एकूण तोफांची संख्या आता पाच झाली असून, अवचितगडाच्या स्वराज्यकालीन वैभवात आणि जिवंत इतिहासात एक मोठी भर पडली आहे.
माथेरानमधील शार्लोट लेक संवर्धन कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तलावातील गाळ काढण्याचे काम न करताच निधी खर्च झाल्याचा आरोप होत असून, ठेकेदारावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
कर्जत तालुक्यातील टोरंट पॉवरच्या प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पासाठी आदिवासींच्या संमतीविना दळी जमिनीतून रस्ते तयार करून अवजड मशिनरी नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. झाडतोड आणि ग्रामपंचायत तसेच जमीनमालकांची परवानगी न घेतल्याचा दावा करत दळी भूखंडधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रकल्पाविरोधात आ...
कर्जत तालुक्यातील पाली तर्फे कोतवाल खलाटी ग्रामपंचायतीअंतर्गत साई डोंगर परिसरात टोरंट वीज निर्माण कंपनीचा जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे. या भागातील सुमारे 150 एकर दळी वन जमिनीवर पाली कातकरी वाडी, आंब्याची वाडी आणि मोहमाळवाडी येथील आदिवासी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून वहिवाट आहे.
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर महाडमध्ये रविवारी दमदार पावसाने हजेरी लावली आणि उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, शेतकऱ्यांच्या मनातही शेतीकामांबाबत नव्या आशा जागल्या आहेत.
नेरळ ग्रामपंचायतीअंतर्गत कोंबलवाडीतील ढाकीचा माळ या आदिवासी वस्तीला ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून प्रथमच नळाचे पाणी मिळाले आहे. 17 जून रोजी ग्रामसभेत आदिवासी ग्रामस्थांनी मोर्चा काढून पाणीपुरवठ्याची मागणी केली होती.
माथेरानमधील ब्रिटिशकालीन शार्लोट तलावाच्या संवर्धन कामात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांनी केला आहे. तलावातील गाळ काढण्यासाठी मोठा निधी राखीव ठेवण्यात आला असताना प्रत्यक्षात गाळ न काढताच निधी लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला.
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात बालके आणि गरोदर मातांसाठीच्या योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका राजा केणी यांनी केला आहे.
कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील शासकीय आदिवासी कन्या आश्रमशाळेत विद्यार्थिनींच्या आरोग्य, सुरक्षितता आणि आत्मसन्मानासाठी विशेष ‘पिंक रूम’ची उभारणी करण्यात आली आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या पुढाकारातून साकारलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन आदिवासी विकास विभागाचे सचिव विकास वाघमारे या...
Karjat Water Crisis : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील चाहूचीवाडी येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाडीतील दोन्ही विहिरी कोरड्या पडल्याने आणि जुनी नळपाणी योजना बंद पडल्याने आदिवासी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल ४ किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे.
रायगड किल्ल्यावरील सुरक्षेबाबत शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून बंद असलेले 54 CCTV कॅमेरे पुन्हा सुरू करण्यात आल्याने शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे.
रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या चित्रपट किंवा मालिकेच्या चित्रीकरणामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चित्रीकरणासाठी मोठ्या प्रमाणात कलाकार आणि तांत्रिक कर्मचारी उपस्थित असल्याने रुग्णालय परिसरात गर्दी निर्माण झाली.