मुंबई - गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम गेल्या 13 वर्षांपासून रखडले आहे. वडखळ जवळी अलिबागकडे जाण्यासाठी महामार्गावरुन उतरण्यासाठी असलेल्या सर्विस रोडची चाळण झाली आहे.
माथेरानमधील शार्लोट लेकमधून भर पावसात वारंवार पाणी सोडण्यात आल्याने या प्रकारावरून आता प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी माथेरान नगरपरिषदेला नोटीस बजावत पाणी सोडण्यामागील कारणांसह संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला आहे.
महाड एमआयडीसीतील विषारी वायूगळतीच्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थ संतप्त झाले असून कंपनीच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत मृतांच्या कुटुंबीयांना योग्य भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
Alibag news: अलिबागमधील कुडुस ग्रामपंचायतीच्या स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात राष्ट्रध्वज उलटा फडकविल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असून, संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मान मिळाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपदाबाबत मोठा दावा केला. तर आमदार अनिकेत तटकरे यांनी अंतिम निर्णय वरिष्ठ नेतेमंडळी घेतील, असे स्पष्ट केले.
श्रीवर्धन नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील विकासकामांसह अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांचा मुद्दा चांगलाच गाजला. नगरसेवकांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकामांवर तातडीने आणि सरसकट कारवाई करण्याची मागणी केली.
रायगड जिल्ह्यातील १,८५९ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत या शेतकऱ्यांसाठी १० कोटी ९५ लाख ४३ हजार ८ रुपये शासनाकडून प्राप्त झाले आहेत. संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा करून त्यांना कर्जमाफी प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
Matheran Charlotte Lake: माथेरानमधील शारलोट लेकमधील गाळ काढण्याच्या कामावरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. लेकमधून 1000 ब्रास माती काढल्याचे बिल अदा करण्यात आले, मात्र ही माती नेमकी कुठे आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्ती, पावसाचे प्रमाण, धोकादायक गावांचे स्थलांतर आणि प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. 13 ऑगस्ट 2026 रोजीच्या नैसर्गिक आपत्ती अहवालातील आकडेवारीच्या आधारे या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
उरणमधील नवीन शेवा आणि हनुमान कोळीवाडा गावकऱ्यांनी हक्काच्या पुनर्वसन जमिनीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीसाठी दोन्ही गावांनी एकत्र येत आता आरपारच्या लढ्याचा इशारा दिला आहे.
Alibag ST Bus: अलिबाग आगारातून धावणाऱ्या एसटी बसच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांकडून प्रत्येक तिकिटामागे ₹2 स्वच्छता अधिभार घेतला जात असतानाही बसच्या अस्वच्छ अवस्थेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे.
आषाढी अमावस्येनिमित्त गटारीचा बेत करण्यासाठी खवय्यांची तयारी सुरू झाली आहे. मात्र यंदा मटणाच्या दरात मोठी वाढ झाल्याने गटारीचा बेत खवय्यांच्या खिशाला चांगलाच चटका बसणार आहे. मटणाच्या दराने १,००० रुपयांचा टप्पा गाठला आहे.
Matheran E Rickshaw: माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई-रिक्षांची संख्या कमी असल्याची चर्चा सुरू असतानाच रात्रीच्या वेळी एका तरुणीला ई-रिक्षा सेवा नाकारल्याचा आरोप समोर आला आहे. ८ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता पुण्याहून माथेरानला आलेल्या प्रिया कळंबे यांनी प्रकृतीची माहिती देत दस्तुरी नाका येथून रिगल नाक्य...