
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांत पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, शेती, घरे, जनावरे आणि व्यवसायांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये आणि नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.डोळ्यांदेखत शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याचे पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.