Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोन्याच्या लंकेवर अवकळा – देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोजक्या घराण्यांचा ताबा, भ्रष्ट धोरणांमुळे अन्नधान्यासाठीच्या रांगेत नागरिक गमावतायत प्राण

श्रीलंकेची अर्थव्यवस्था (Economic System Of Srilanka) ही विदेशात काम करणारे नोकरदार आणि पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना काळात हे दोन्हीही बंद असल्याने याचा मोठा परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. यात श्रीलंकेची अर्थव्यवस्था (Economic Crisis In Srilanka) पुरती कोलमडली आहे.

  • By साधना
Updated On: Mar 29, 2022 | 03:28 PM
srilanka food crisis

srilanka food crisis

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : भारताचे दक्षिणेकडील मित्रराष्ट्र श्रीलंका (Srilanka), स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक गंभीर आर्थिक परिस्थितीतून जात आहे. देशात महागाईचा दर (Inflation Rate) १७ टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. पेट्रोल, स्वयंपाकाचा गॅस, रॉकेल खरेदी करण्यासाठी काही तासांच्या रांगेत (Economic Crisis In Srilanka) उभे राहावे लागत आहे. काही जणांचा मृत्यू या रांगेतच होतो आहे. भारतावरही या सगळ्याचा दबाव वाढतो आहे. सरकारच्या भ्रष्ट धोरणामुळे ही वेळ आल्याचे श्रीलंकन नागरिकांचे मत आहे. गेल्या दोन वर्षांत परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे नागरिक सांगत आहेत.

ज्यांच्या घरात एक दोन रोजगार होते, ते रोजगारही आता गेले आहेत. घरातील वयस्कर व्यक्तिंना औषधासाठीही पैसे उपलब्ध नाहीत. बाजारात औषधे उपलब्ध नाहीत, असली तर ती दुप्पट किमतीने विकत घ्यावी लागत आहेत. अनेक तरुण मुलांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बचत अपुरी पडते आहे, कारण वस्तुंचे भाव चौपच पाचपट झाले आहेत. अशा स्थितीत घर चालवायेच कसे, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.श्रीलंकेत सध्या अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत. स्थानिकांच्या माहितीनुसार सध्या एक कप चहा पिणेही परवडेनासे झाले आहे.

[read_also content=”आयएएस टीना डाबी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकणार, १३ वर्षांनी मोठ्या असलेल्या मराठी आयएएस अधिकाऱ्याशी करणार लग्न, गेल्या वर्षी झाला होता घटस्फोट https://www.navarashtra.com/india/ias-tina-dabi-to-tie-the-knot-for-second-time-to-marry-a-13-year-old-marathi-ias-officer-nrps-261274.html”]

इंधन नसल्याने वीज नाही
श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही विदेशात काम करणारे नोकरदार आणि पर्यटनावर अवलंबून आहे. कोरोना काळात हे दोन्हीही बंद असल्याने याचा मोठा परिणाम जनतेला भोगावा लागत आहे. यात श्रीलंकेची अर्थव्यवस्था पुरती कोलमडली आहे.श्रीलंकेकडे परकीय भांडवल नसल्याने इंधन विकत घेणे अवघड झाले आहे. तसेच अन्नधान्य आणि औषधांबाबतही हीच बोंब आहे. मार्च २०२० पासून कोणत्याही वस्तूच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. इंधन नसल्याने सहा सहा तास वीज गायब आहे.

श्रीलंकेवर सध्या ५१ अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे. क्रेडिट एजन्सींच्या माहितीनुसार, हे कर्ज देश फेडूच शकणार नाही, अशी स्थिती आहे. श्रीलंकेने चीनकडूनही मोठे कर्ज घेतले आहे. आता या कर्जाची पुनर्बांधणी करण्याची मागणी करण्यात येते आहे.

श्रीलंकेत गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या भ्रष्टाचारामुळे ही स्थिती ओढवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. काही मोजक्या राजकीय घराण्यांच्या हातात सत्ता आणि आर्थव्यवस्था एकवटलेली आहे. भ्रष्टाचार, राजकीय घराणेशाही यामुळे देश गाळात रुतत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. भारतातील एका रुपयाचे मूल्य श्रीलंकेत ३.८१ इतके आहे. श्रीलंकेत सध्या अर्धा किलो दूध पावडर ८०० रुपयांना मिळते आहे. या सगळ्या काळात पैशांचे मूल्य कमी झआल्याने भाज्या, दूध, अन्नधान्य प्रचंड महागली आहेत. दररोजचे पोट भरण्याचेही अनेकांचे वांधे आहेत.

या सगळ्या काळात सरकारविरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम श्रीलंकन सरकारतर्फे करण्यात येते आहे. वस्तुंचा तुटवडा निर्माण झाल्यासारखी स्थिती असल्याने नागरिकांचे अनेक तास हे रांगेत उभे राहण्यात खर्च पडत आहेत. सगळ्याच ठिकाणी रांगा असल्याने नागरिक वैतागले आहेत. अनेकांचे प्राण या रांगेत गेल्याचेही सांगण्यात येत आहे. हळूहळू सरकारविरोधातील राग वाढत चालला आहे. अनेक ठिकाणी सरकारविरोधात आंदोलने होत आहेत.

Web Title: Economic crisis in srilanka people dying in queue of food collection centers nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2022 | 03:19 PM

Topics:  

  • Srilanka

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.