Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार? RBI कडून नवीन परिपत्रक जाहीर

Agriculture Loan: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कर्जमाफी संदर्भात सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी लागू करावी लागणार नाही तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना देखील समान लाभ

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Mar 24, 2025 | 07:00 PM
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार? RBI कडून नवीन परिपत्रक जाहीर (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार? RBI कडून नवीन परिपत्रक जाहीर (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

Agriculture Loan Marathi News: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून अनेकदा राजकीय वाद निर्माण झाले असतानाच, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) या संदर्भात नवे मार्गदर्शक तत्त्व जारी केले आहेत. यानुसार, कोणत्याही बँकेला जबरदस्तीने कर्जमाफी योजना लागू करावी लागणार नाही. तसेच, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही समान लाभ मिळावा, असा स्पष्ट आदेश आरबीआयने दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने कर्जमाफी संदर्भात सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

कर्जमाफी धोरणातील महत्त्वाचे बदल

कर्जमाफीचा मुद्दा गेल्या अनेक दशकांपासून चर्चेत आहे. 2008 आणि 2018 मध्ये यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या होत्या. त्या अंतर्गत राज्य सरकारांनी स्वतःची आर्थिक शिस्त राखावी आणि केंद्रीय निधीवर संपूर्ण अवलंबून राहू नये, असे निर्देश देण्यात आले होते. आरबीआयने नुकतेच जारी केलेल्या परिपत्रकात कर्जमाफीबाबत अनेक महत्त्वाचे मुद्दे नमूद केले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली, तरी ती बँकांसाठी बंधनकारक असणार नाही. प्रत्येक बँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय अंतिम असेल, असा स्पष्ट उल्लेख परिपत्रकात करण्यात आला आहे.

‘ही’ 400 दिवसांची FD गुंतवणुकीसाठी आहे सर्वोत्तम, एकदा गुंतवणूक केल्यावर तुम्हाला मिळेल 35000 रुपयांचा नफा!

बँकांसाठी आरबीआयच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार महत्त्वाचे मुद्दे

कर्जमाफी लागू करणे बँकांसाठी अनिवार्य नाही – राज्य सरकारच्या घोषणेनंतरही बँका स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात.

प्रक्रिया 40 ते 60 दिवसांत पूर्ण करणे आवश्यक – जर बँकेने कर्जमाफी मान्य केली, तर वेळेत अंमलबजावणी बंधनकारक असेल.

राजकीय कारणांवर आधारित योजना बँकांवर लादता येणार नाही – बँकांची पूर्वसंमती आवश्यक.

नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही तसाच लाभ द्यावा लागेल – अन्यथा निवडक लाभ मिळवण्यावर आक्षेप.

कर्ज न भरलेल्या शेतकऱ्यांवर कायदेशीर वसुलीची कारवाई सुरु ठेवता येईल – बँकांचा अधिकार कायम.

राजकीय घडामोडींचा परिणाम रोखण्यासाठी निर्णय

आरबीआयच्या या परिपत्रकाचा उद्देश स्पष्ट आहे – बँकांच्या आर्थिक स्थैर्यावर कोणताही अवास्तव बोजा टाकू न देणे. अनेकदा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारे कर्जमाफी जाहीर करतात, परंतु त्या घोषणांमुळे बँकांच्या निधी व्यवस्थापनावर विपरीत परिणाम होतो. राजकीय घोषणांमुळे बँकांवर कर्ज माफ करण्याचा दबाव टाकला जातो. मात्र आरबीआयने आता हे स्पष्ट केले आहे की, कोणत्याही आर्थिक निर्णयात बँकांना स्वायत्तता असावी, हेच या नव्या धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

मात्र या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न उपस्थित झाला आहे की, सरकार कर्जमाफी करणार की नाही? यावर थेट उत्तर देताना आरबीआयने स्पष्ट केले आहे की, कर्जमाफीचा निर्णय बँकांच्या धोरणांनुसार असेल, कोणत्याही दबावाखाली न घेता. आणि त्या स्वायत्तपणे निर्णय घेऊ शकतील, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

Share Market Closing Bell: शेअर बाजारात तुफान वाढ, सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह झाला बंद

Web Title: Big news for farmers will the government waive off farmers loans rbi issues new circular

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 07:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.