Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंथन २०२५ : राष्ट्र-निर्मितीसाठी जागतिक संवाद यशस्वी संपन्न; देशाच्या विकासावर महत्वपूर्ण चर्चा

मंथन २०२५ या शिखर परिषदेने ग्रामीण समृद्धी, हवामान कृती, आणि युवा नेतृत्वावर भर देत भारताच्या विकासासाठी विचारवंत व तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण चर्चा घडवली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 29, 2025 | 07:18 PM
मंथन २०२५ : राष्ट्र-निर्मितीसाठी जागतिक संवाद यशस्वी संपन्न; देशाच्या विकासावर महत्वपूर्ण चर्चा
Follow Us
Close
Follow Us:

मंथन २०२५ हा राष्ट्र-निर्मितीसाठी जागतिक संवाद इमॅजिनेरियम, आवास, अलिबाग येथे यशस्वीरीत्या पार पडला. ग्लोबल विकास ट्रस्टच्या आयोजनाखाली झालेल्या या शिखर परिषदेत जगभरातील विचारवंत, बदलकर्ते व नवकल्पक सहभागी झाले होते. ग्रामीण समृद्धी, हवामान कृती, नाविन्यपूर्ण संसाधन व्यवस्थापन, युवा नेतृत्व व प्रभावी भागीदारी यावर विशेष भर देत भारताच्या विकास आव्हानांवर उपाय शोधणे हे या परिषदेचे उद्दिष्ट होते. ग्लोबल विकास ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त मयंक गांधी व सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सुशील जिवराजका यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेने भारताच्या विकासावर महत्त्वपूर्ण चर्चा घडवून आणल्या. गांधी म्हणाले, “मंथन हा केवळ संवाद नाही; ती प्रत्येक भारतीयाच्या आकांक्षा एकत्र आणण्याची चळवळ आहे.” त्यांनी ग्रामीण भारताच्या स्वयंपूर्णतेसाठी एकत्रितपणे काम करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठाची स्थापना; टास्क फोर्सचे करण्यात येणार गठन

या परिषदेत राजेंद्र सिंह, सत्य त्रिपाठी, रामदेव अगरवाल, विशाल तुलस्यान, अरुण पुरवार, गोविंद अगरवाल यांसारख्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपले विचार मांडले. विविध सत्रांमध्ये तज्ज्ञांनी ग्रामीण विकास, हवामान कृती, संसाधन व्यवस्थापन व युवा नेतृत्व यासंबंधित उपाय सुचवले. प्रमुख सत्रांमध्ये सुशील जिवराजका यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण समृद्धी व हवामान संकटावर चर्चा झाली. सत्य त्रिपाठी, राजेंद्र सिंह व रामदेव अगरवाल यांनी या आव्हानांवर व्यावहारिक अंतर्दृष्टी दिली. “मातीपासून पीक” या सत्रात नंदकिशोर कागलीवाल यांनी शाश्वत शेतीच्या पद्धतींवर प्रकाश टाकला. “डाय विथ झीरो” या चर्चेत अमिताभ जयपुरिया यांनी संपत्ती व वारसा पुनर्विचाराचा विचार मांडला.

विशेष सत्रांमध्ये “फॉरवर्ड लिंकेजेस” या चर्चेत विवेक भारती यांनी शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञानाधारित वितरण मॉडेल्स आणि बाजारपेठ प्रवेशाबाबत मोलाचे विचार मांडले. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेतमालाचा अधिक चांगला व बाजारपेठेत मूल्यवर्धित पुरवठा कसा होऊ शकतो, यावर सखोल माहिती दिली. सत्य त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या हवामान वित्त या सत्रात, पर्यावरणीय संकटांना तोंड देण्यासाठी जागतिक गुंतवणूक कशी आकर्षित करता येईल आणि त्यासाठी नाविन्यपूर्ण निधी मॉडेल्स कसे तयार करता येतील याबाबत महत्वपूर्ण चर्चा झाली.

ग्रामीण भागातील विकासाच्या प्रक्रियेत युवा पिढीचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचे विवेक भार्गव यांनी “तरुण जग वारसा म्हणून घेतील” या सत्रात अधोरेखित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, तरुणांनी नवकल्पनांचा अवलंब करीत ग्रामीण भागातील प्रकल्पांमध्ये सहभागी होऊन समाजाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे. भविष्यातील ग्रामीण विकास व हवामान कृतीत युवा नेतृत्वाची गरज या सत्रातील मुख्य विषय ठरले.

सेंट विल्फ्रेड कॉलेजमध्ये “प्लेटलेट्स डोनेशन आणि कॅन्सर जागृती” उपक्रम आयोजित; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिखर परिषदेची सांगता वल्लभ भणसाली यांच्या अध्यक्षतेखालील “द वे फॉरवर्ड” या महत्त्वपूर्ण सत्राने झाली. या सत्रात मयंक गांधी, सुशील जिवराजका, सत्य त्रिपाठी आणि रामदेव अगरवाल यांसारख्या मान्यवरांनी सहभागी होत भारताच्या विकासासाठी क्रियाशील उपाय सुचवले. या चर्चेत सहभागींनी शिखर परिषदेतील मुख्य शिकवणींवर चिंतन केले आणि भविष्यात राष्ट्रनिर्मितीसाठी ठोस पावले उचलण्याच्या दृष्टीने वचनबद्धता दर्शवली. शेवटी राष्ट्रगीताच्या प्रभावी सादरीकरणाने या कार्यक्रमाचा समारोप झाला, जो सर्व सहभागींच्या भारतासाठी शाश्वत, न्याय्य आणि लवचिक भविष्य घडवण्याच्या सामूहिक संकल्पाचा प्रतीक ठरला.

Web Title: Manthan 2025 global dialogue for nation building successfully concluded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2025 | 07:17 PM

Topics:  

  • discussions

संबंधित बातम्या

हेल्थकेअरमधील मेकाट्रॉनिक्स: एसएसपीयू कार्यशाळेत वैद्यकीय उपकरण नवकल्पनांवर चर्चा
1

हेल्थकेअरमधील मेकाट्रॉनिक्स: एसएसपीयू कार्यशाळेत वैद्यकीय उपकरण नवकल्पनांवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.