Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nirmala Sitharaman: आव्हानांच्या तोंडावर विकसित भारताचे लक्ष्य कसे साध्य करणार? निर्मला सीतारमण यांनी सांगितली रणनीती

वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही परकीय आव्हानांचा  सामना करण्याची आणि त्यातून सावरण्याची भारताची क्षमता मजबूत आहे, असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 03, 2025 | 03:04 PM
Nirmala Sitharaman:

Nirmala Sitharaman:

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत ८% जीडीपी वाढ साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे
  • २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे ध्येय
  • भांडवली खर्च सुरू ठेवण्यासाठी सरकारदेखील वचनबद्ध

Nirmala Sitharaman News:  “आज केवळ जागतिक अनिश्चिततेचे व्यवस्थापन करणेच नव्हे तर व्यापार, वित्त आणि ऊर्जा क्षेत्रातील खोलवर रुजलेल्या असमतोलांना तोंड देणे ही मोठी आव्हाने आहेत. भारत ८% जीडीपी वाढ साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. जागतिक व्यवस्थेचा पाया बदलत असून हा केवळ तात्पुरता व्यत्यय नसून एक संरचनात्मक परिवर्तन आहे. अशी प्रतिक्रीया केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. त्या कौटिल्य आर्थिक परिषदेत बोलत होत्या.

वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही परकीय आव्हानांचा  सामना करण्याची आणि त्यातून सावरण्याची भारताची क्षमता मजबूत आहे, असा विश्वासही अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. अशा परिषदांनी भारताच्या धोरणात्मक विचारसरणी आणि रणनीतीला मार्गदर्शन केले आहे आणि त्यांचा प्रभाव जागतिक व्यासपीठांवर दिसून आला आहे. २०२३ च्या जी-२० शिखर परिषद ही भारताच्या जागतिक नेतृत्वाचे उत्कृष्ट उदाहरण होती. असेही सीतारामण यांनी यावेळी नमुद केले.

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

मंत्री सीतारामण म्हणाल्या, पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या समृद्धीसाठी दोन मार्गांचा दृष्टिकोन मांडला आहे. पहिले, २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे ध्येय आहे. आणि दुसरे म्हणजे आत्मनिर्भर भारत’च्या माध्यातून हे ध्येय साध्य करण्याचा ते ध्येय साध्य करण्याचा उद्देश आहे.

सीतारामण म्हणाल्या, आजचे जग गंभीर असमतोलांनी ग्रस्त आहे. व्यापार असमतोलामुळे काही देशांतील उद्योग संकटात सापडले आहेत, आर्थिक असमतोलामुळे वास्तविक अर्थव्यवस्था गुंतवणुकीपासून वंचित राहिली आहे, तर ऊर्जा असमतोलामुळे मोठा समाज महागड्या आयातीवर अवलंबून झाला आहे. हे असंतुलन आता जागतिक व्यवस्थेचे कायमस्वरूपी वास्तव ठरले आहे. त्यामुळे आव्हान केवळ अनिश्चिततेचे व्यवस्थापन करण्याचे नसून या असमतोलांना धैर्याने सामोरे जाण्याचे आहे.

ही असमतोलाची साखळी आता जागतिक व्यवस्थेचे कायमस्वरूपी वास्तव बनली आहे. त्यामुळे आव्हान केवळ अनिश्चिततेचे व्यवस्थापन करण्याचे नाही, तर या असंतुलनांना धैर्याने आणि ठोस पावले उचलून तोंड देण्याची वेळ आली आहे.

Shutdown in France: अमेरिकेनंतर आता फ्रान्समध्येही शटडाऊन; नेमकी काय आहेत कारणे?

वाढलेला भांडवली खर्च

भारतात खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधी निर्माण होऊ लागल्या आहेत आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) प्रकल्पांमध्ये नवीन सह निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षांत सार्वजनिक खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. भांडवली खर्च सुरू ठेवण्यासाठी सरकारदेखील वचनबद्ध, असल्याची ग्वाही सीतारामण यांनी यावेळी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने कोविड-१९ महामारीच्या काळात आर्थिक गती राखण्यासाठी पायाभूत सुविधांवर खर्च वाढवला. भांडवली खर्चाबाबत सरकारची वचनबद्धता केवळ वाढली नाही तर आता ती स्थिर झाली आहे. सरकारने २०२५-२६ (एप्रिल-मार्च) साठी एकूण भांडवली खर्चाचे लक्ष्य ₹११.२१ लाख कोटी ठेवले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत भांडवली खर्च ₹३३ टक्क्यांनी वाढून ₹३.४७ लाख कोटी झाला आहे.

 

Web Title: How will we achieve the goal of a developed india in the face of challenges nirmala sitharamans strategy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 03:04 PM

Topics:  

  • Finance Minister
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

GST Collection : खूशखबर! सरकारी तिजोरीत 1.89 लाख कोटींचा जीएसटी जमा, आता सर्वसामान्यांना मिळणार दर कपातीची भेट!
1

GST Collection : खूशखबर! सरकारी तिजोरीत 1.89 लाख कोटींचा जीएसटी जमा, आता सर्वसामान्यांना मिळणार दर कपातीची भेट!

Old Pension Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! २०२६ पासून जुनी पेन्शन पुनर्संचयित होणार
2

Old Pension Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! २०२६ पासून जुनी पेन्शन पुनर्संचयित होणार

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? CBIC अध्यक्षांनी सांगितले ‘हे’ वास्तव
3

पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? CBIC अध्यक्षांनी सांगितले ‘हे’ वास्तव

नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलकांनी पळवत पळवत हाणलं, भिंतीवर आदळलं… कपडे फाडून गटारात लोळवलं; भयावह Video Viral
4

नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलकांनी पळवत पळवत हाणलं, भिंतीवर आदळलं… कपडे फाडून गटारात लोळवलं; भयावह Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.