Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला …”; Constitution Day निमित्त पंतप्रधान मोदींचे देशवासियांना पत्र

६ नोव्हेंबर हा दिवस भारताच्या लोकशाही  इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने जगातील सर्वात मोठे आणि सखोल संविधान औपचारिकरित्या स्वीकारले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 26, 2025 | 02:34 PM
“माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला …”; Constitution Day निमित्त पंतप्रधान मोदींचे देशवासियांना पत्र
Follow Us
Close
Follow Us:

२०१५ पासून साजरा केला जातो संविधान दिवस
पंतप्रधान मोदींचे देशवासियांना संबोधून पत्र
देश विकसित भारताच्या दिशेने पुढे जातोय – मोदी

२६ नोव्हेंबर हा दिवस भारताच्या लोकशाही  इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला आहे. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारताच्या संविधान सभेने जगातील सर्वात मोठे आणि सखोल संविधान औपचारिकरित्या स्वीकारले. या दिवसाला संविधान दिन (Constitution Day) म्हणून ओळखले जाते. दरम्यान संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधून पात्र लिहिले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “माझे प्रिय देशाचे नागरिक. नमस्कार… आजचा दिवस हा प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. याच दिवशी १९४९ मध्ये संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले होते. म्हणूनच एनडीए सरकारने २०१५ मध्ये २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्ह्णून साजरा करण्याचा निर्णय घेतला.”

Constitution Day 2025 : भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या त्याची खरी ताकद

पुढे आपल्यात पत्रात पंतप्रधान मोदी म्हणतात, “आपले संविधान एक पवित्र दस्तऐवज आहे. भारतीय संविधानाच्या शक्तीमुळेच माझ्यासारख्या गरीब कुटुंबातून पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवले आहे. संविधानाच्या ताकदीमुळेच मला २४ वर्षे सरकारचा प्रमुख म्हणून काम करता आले. मला आठवतंय मी २०१४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा संसद भवनात प्रवेश केला होता, तेव्हा मी संसदेच्या पायऱ्यांवर नतमस्तक झालो होतो. २०१९ मध्ये मी जेव्हा संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश केलेला तेव्हा मी संविधानासमोर मी नतमस्तक झालो होतो.”

संविधान दिवस पर मैंने देशभर के अपने परिवारजनों के नाम एक पत्र लिखा है। इसमें हमारे संविधान की महानता, जीवन में मौलिक कर्तव्यों का महत्त्व और हमें पहली बार मतदाता बनने का उत्सव क्यों मनाना चाहिए, ऐसे कई विषयों पर अपने विचार साझा किए हैं…https://t.co/6SsfdWIUsO — Narendra Modi (@narendramodi) November 26, 2025

भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते?

भारतीय संविधानात असंख्य कलमे आहेत, ज्यांचे महत्त्व आणि उपयोग वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो. अनेक कलमे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करतात, तर काही कलमे केंद्र आणि राज्य यांच्यातील सत्तेचे संतुलन राखतात. परंतु या सर्वांमध्ये कलम ३६८ हे एक अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली कलम मानले जाते. कारण हे कलम भारताच्या संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार प्रदान करते. संविधानातील बदल, सुधारणांचे प्रस्ताव किंवा परिस्थितीनुसार आवश्यक बदल करण्यासाठी कलम ३६८ हा मुख्य आधार आहे.

Constitution Day 2025 : भारतीय संविधानातील सर्वात शक्तिशाली कलम कोणते? जाणून घ्या त्याची खरी ताकद

तथापि, या कलमाची शक्ती असीमित नाही. १९७३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक केशवानंद भारती प्रकरणात ‘मूलभूत संरचना सिद्धांत’ मांडण्यात आला. या सिद्धांतानुसार, संसदेला संविधान दुरुस्त करण्याचा अधिकार असला तरी ती संविधानाच्या मूलभूत रचनेत बदल करू शकत नाही. म्हणजेच संघराज्यवाद, धर्मनिरपेक्षता, कायद्याचे राज्य, न्यायपूर्ण प्रशासन, न्यायालयीन स्वातंत्र्य इत्यादी मुख्य तत्त्वे बदलली जाऊ शकत नाहीत. हा निर्णय भारतीय लोकशाहीच्या सुरक्षेसाठी एक भक्कम ढाल बनला.

Web Title: Pm narendra modi wrote letter to people on constitution day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 02:30 PM

Topics:  

  • Constitution of India
  • Indian Democracy
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज
1

Amit Shah कडाडले! राहुल गांधींना शेतकरी मुद्द्यावरून विचारला १० वर्षांचा हिशोब; आकडेवारीनिशी केलं चॅलेंज

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख
2

भारत स्टार्टअप्सची ‘महासत्ता’! केंद्र सरकारने दिली १०,००० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी, नव्या कल्पनांना मिळणार पंख

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव
3

ओम बिरला कोणच्या दबावाखाली करतायेत काम? विरोधकांचा अविश्वासाचा प्रस्ताव करणार घाव

no-confidence motion : अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला मोठा निर्णय; अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईपर्यंत लोकसभेत…
4

no-confidence motion : अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला मोठा निर्णय; अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईपर्यंत लोकसभेत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.