Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन महिन्यात एक कोटी रुपयांचा भरणा करुनही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा केला बंद; शेतकरी आक्रमक

दोन महिन्यात एक कोटी रुपयांचा भरणा करुनही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा केला बंद; शेतकरी आक्रमक

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 11, 2022 | 04:51 PM
दोन महिन्यात एक कोटी रुपयांचा भरणा करुनही शेतकऱ्यांचा वीज पुरवठा केला बंद; शेतकरी आक्रमक
Follow Us
Close
Follow Us:

नेवासा : बेलपिंपळगांव सबस्टेशन परिसरातील १३ गावांच्या शेतकऱ्यांनी दोन महिण्यात एक कोटी रुपयांचा विज बिल भरणा करुनही शेतकऱ्यांचे विजजोड तोडल्यामुळे बेलपिंपळगांव, पुनतगांव,बेलपांढरी,भालगांव गोधेगांव परिसरातील शेतकरी अधिक आक्रमक होत शुक्रवार (दि.११) रोजी सकाळी ११ वाजता नेवासा तहसिलदारांना निवेदन देवून चिडलेल्या शेतकऱ्यांनी आपला नेवासा मोर्चा महावितरण कार्यालयाकडे वळविला महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करत उपस्थित अधिकाऱ्यांना वीज बंद का केली ? असा परखड सवाल करत शेतकरी यावेळी अधिक आक्रमक झाल्याचे दिसून आले.

शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु असतांना नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार महावितरण कार्यालयात आले असता संतप्त शेतकऱ्यांनी आम्ही १३ गांवाच्या शेतकऱ्यांनी दोन महिण्यात एक कोटी रुपयाचा भरणा करुनही विज बंद केल्याचे वास्तव यावेळी उपस्थित आक्रमक शेतकऱ्यांनी पोलिस निरिक्षक बाजीराव पोवार यांना सांगितले पोलिस निरिक्षक पोवार यांच्यासह शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सबुरीने घेण्याचे सुचविले असता पुन्हा विज सुरु करण्यात आली. या आंदोलनाचे नेत्तृत्व भाजपाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी केले यावेळी आंदोलकांच्या प्रयत्नांना मोठे यश आल्यामुळे शेतकऱ्या अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला.

महावितरणच्या सुलतानी वसुलीच्या कारभाराविरुद्ध भाजपाने माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व माजी खासदार तुकाराम गडाख यांच्यावतीने सोमवार (दि.१४) रोजी महावितरणच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन केलेले असतांनाच तीन दिवस आधीच नेवासा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी ठिय्या आंदोलन करुन बंद पडलेला विद्युत पुरवठा सुरु केल्यामुळे राजकिय रणांगणात चांगलेच चर्चेचे काहुर निर्माण झाले आहे.

याबाबत तालुकाध्यक्ष पेचे यांना आपला १४ तारखेला मोर्चा आहे मग त्या मोर्चाचे काय ? असा सवाल केला असता हे निवेदन माजी आमदार मुरकुटे यांनी दिलेलेच आहे माञ आमच्या १३ गावांनी दोन महिण्यात एक कोटी रुपये विजबिल भरणा केलेला असतांनीही आमचा विद्युत पुरवठा बंद केल्यामुळे आम्ही आंदोलन हाती घेतल्याचे पेचे यांनी सांगितलेले आहे.

Web Title: Farmers aggressive after power cut in ahmednagar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2022 | 04:51 PM

Topics:  

  • Power cut

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.