Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर इंडिया आघाडीची एकजूट; काढणार महारॅली

  • By प्रीति माने
Updated On: Mar 24, 2024 | 06:05 PM
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर इंडिया आघाडीची एकजूट; काढणार महारॅली
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : आपचे प्रमुख नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पूर्वी केजरीवाल यांना झालेली ही अटक विरोधकांसाठी मोठा धक्का समजला जात आहे. दरम्यान, देशाभरातील विरोधकांनी स्थापन केलेली इंडिया आघाडी अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी उभी आहे. आपले शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी आणि विरोधकांचा आवाज उठवण्यासाठी रविवार, ३१ मार्च २०२४ रोजी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या वतीने राजधानी दिल्लीमधील रामलीला मैदानात महारॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विरोधी पक्षाचे नेते या रॅलीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवणार आहे.

दिल्लीमध्ये रविवारी इंडिया आघाडीच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकूमशाही करत आहेत. त्यामुळे ३१ तारखेला सकाळी १० वाजता रामलीला मैदानात महारॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. अशी घोषणा करण्यात आली. गोपाल राय पुढे म्हणाले की, इंडिया आघाडीच्या नेत्यांवर खोटेनाटे आरोप लावले जात आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यालयाला पोलिस छावणीचं स्वरुप दिलं गेलं आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना आरोपीसारखी वागणूक दिली जात आहे. काँग्रेस पक्षाचं अकाऊंट सील केलं आहे, त्यामुळे प्रचारात अडथळा येत आहे. हे लोक दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक करु शकतात, तर काहीही करु शकतात. असे मत गोपाल राय यांनी मांडले.

पत्रकार परिषदेत दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अरविंदर सिंह लवली यांनी सांगितलं की, विरोधी पक्षांना समान संधी दिली जात नाही. काँग्रेसच्या खात्यावर बंधनं आणली आहेत, मुख्यमंत्र्यांना अटक केली आहे. त्यामुळे ३१ मार्च रोजी महारॅली आयोजित केली आहे. देशाचं संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र यावं लागेल, असं ते म्हणाले.

Web Title: India aghadi united after arvind kejriwals arrest a rally will be held nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2024 | 06:05 PM

Topics:  

  • Poltical News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.