Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा बँकांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून दडपशाही; संभाजी पाटील-निलंगेकर यांचा आरोप

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीकडून प्रशासनावर दडपण आणून लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे. सत्तेचा वापर करून अनेक ठिकाणी विरोधकांचे अर्ज फेटाळले गेले आहेत.

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 29, 2021 | 08:13 PM
Sambhaji Patil Nilangekar

Sambhaji Patil Nilangekar

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीकडून प्रशासनावर दडपण आणून लोकशाहीचा गळा घोटला गेला आहे. सत्तेचा वापर करून अनेक ठिकाणी विरोधकांचे अर्ज फेटाळले गेले आहेत. याविरोधात राज्यपालांकडे दाद मागणार आहोत, अशी माहिती माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी दिली. भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये हे यावेळी उपस्थित होते.

बँकांच्या निवडणुकीत प्रशासनावर दबाव

निलंगेकर यांनी सांगितले की, सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने  लातूर , बीड , जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत प्रशासनावर दबाव आणून विरोधी उमेदवारांचे अर्ज नियमबाह्य पद्धतीने बाद ठरविले गेले. विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद ठरवून बिनविरोध निवडणुका जाहीर केल्या गेल्या. सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा गळा घोटून आपल्या हुकूमशाही वृत्तीचे दर्शन घडविले आहे.

एकाच परिवारातील साखर कारखान्यांना ६०० कोटींचे कर्जवाटप

लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून एकाच परिवारातील साखर कारखान्यांना ६०० कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. फडणवीस सरकार सत्तेत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व सभासदांना मतदानाचा हक्क बहाल करण्यात आला होता. मात्र महविकास आघाडी सरकारने फडणवीस सरकारचा हा निर्णय रद्द केला. लातूर जिल्ह्यात फक्त ८०० जणांना मतदानाचा हक्क देण्यात आला होता. आम्ही या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायालयाने या संदर्भात आमदार धीरज देशमुखांच्या नावाने नोटीस काढली आहे. ज्यांच्या नावाने खासगी, सहकारी संस्था कंपन्या आहेत अशांना जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीत अर्ज दाखल करता येत नाही. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या अशा उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले गेले. शेतकऱ्यांना मतदानाचा दिलेला मूलभूत अधिकार काढून घेऊन त्यांना निवडणुकीपासून वंचित ठेवले गेले. बँकेने थकबाकी नसल्याचे पत्र ज्यांना दिले गेले होते , त्यांनाही थकबाकीदार असल्याचे कळवत त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून दडपण आणले गेले, असेही आ. निलंगेकर यांनी नमूद केले.

Web Title: Mahavikas aghadi repression in district bank elections allegation of sambhaji patil nilangekar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2021 | 08:13 PM

Topics:  

  • Sambhaji Patil Nilangekar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.