Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोटबंदीमुळे प्रचंड नुकसान इतकी वर्ष मनमोहनसिंग शांत का बसले होते?

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग विख्यात अर्थशास्त्रज्ञ आहेत. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते. समाजवादाच्या विळख्यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी त्यांनी खुली अर्थव्यवस्था आणली.

  • By Navarashtra Staff
Updated On: Mar 04, 2021 | 08:35 AM
डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाला आर्थिक संकटातून कसं सावरलं? काय आहे या मागचा इतिहास?

डॉ. मनमोहन सिंह यांनी देशाला आर्थिक संकटातून कसं सावरलं? काय आहे या मागचा इतिहास?

Follow Us
Close
Follow Us:

हे अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपती जॉर्ज बुश यांनी इ.स. २००८ मध्ये जागतिक मंदीच्या लाटेतून सुटका करून घेण्यासाठी डॉ. मनमोहनसिंग यांना सल्ला मागितला होता. ऑक्सफोर्ड विद्यापीठात मनमोहनसिंगनी अर्थशास्त्र हा विषय शिकविलेला आहे. ते जेव्हा पंतप्रधान बनले तेव्हा त्यांची प्रतिमा आज्ञाधारक नोकरशहा अशी बनली होती. युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्त होते. ते १० वर्षे पंतप्रधान होते, परंतु या कालावधीमध्ये त्यांनी कधीच स्वतंत्रपणे निर्णय घेतलेले नाही. त्यावेळी त्यांच्यावर असा आरोप करण्यात येत होता की, पंतप्रधान मनमोहनसिंगांवर सोनिया गांधी यांचे संपूर्ण नियंत्रण आहे. ते एक मजबूर पंतप्रधान आहेत.

१० जनपथने घेतलेले निर्णय राबविणे, हेच त्यांचे काम आहेत. प्रणव मुखर्जी यांची ज्येष्ठता डावळून मनमोहनसिंग यांची पंतप्रधानपदी वर्णी लावण्यात आली होती, कारण ते सोनिया गांधी यांच्याप्रति एकनिष्ठ होते. सोनियांचा त्यांच्यावर प्रचंड विश्‍वास होता. एकदा तर मनमोहनसिंगानी काढलेला अध्यादेश राहुल गांधी यांनी फाडून फेकला होता. याला प्रतिष्ठेचा प्रश्‍न न बनविता ते पदावर कायम राहिले. इतकी वर्षे शांत असलेले मनमोहनसिंग आता मात्र पंतप्रधान मोदींनी इ.स. २०१६ मध्ये लागू केलेली नोटबंदी चुकीची होती. या नोटबंदीमुळे कित्येकांचे रोजगार गेळे. अनेक बेरोजगार झाळे, अशी टीका करीत आहेत. ज्यावेळी नोटबंदी लागू करण्यात आली त्यावेळीच मनमोहनसिंग नोटबंदी चुकीचे आहे, असे सांगू शकत होते, परंतु त्यावेळी ते काहीही बोलले नाही.

नोटबंदीमुळे काळ्या धनावर अंकुश लावता येईल, यामुळे दहशतवादी कारवायांवर लगाम लावता येईल, असे सांगितल्या जात होते, परंतु असे काहीही घडले नाही, असे मनमोहनसिंग म्हणाले. ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद ठरवून २००० ची नवीन नोट चळनात आणण्यात आली, त्यामुळे कोणता फायदा झाला? नोटबंदीमुळे लहान आणि मध्यम उद्योग बंद झाले. बांधकाम व्यवसाय ठप्प झाला अशी टीका मनमोहनसिंग करीत आहे. परंतु हे सांगण्यासाठी मनमोहनसिंगाना ४ वर्षे का लागली, असा प्रश्‍न उपस्थित होतो.

Web Title: Why did manmohan singh sit quietly for so many years nrms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2021 | 08:35 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.