
यंदा कार्तिक पौर्णिमा 8 नोव्हेंबर दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी उत्तर भारतीय देव दीपावली देखील साजरी करतात. देव दीपावली किंवा त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त सारा परिसर दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघतो.
कार्तिक पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या एका राक्षसाचा वध केला होता. अशी पुराणकथा आहे. या राक्षसाच्या वधानंतर भगवान श्री शंकर यांची ओळख त्रिपुरारी झाली. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पूजेचे सुद्धा महत्व आहे. ते सहा कृत्तिकांचे प्रिय पुत्र होते, अशी धारणा आहे. शिवा, संभूती, संतती, प्रीती, अनुसया व क्षमा नावाच्या कृत्तिकांचे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पूजन केल्यास भगवान शंकर व त्यांच्या परिवाराची कृपा आपल्यावर राहते.
कार्तिक पौर्णिमेदिवशी धनलाभ व्हावा म्हणून काय कराल?