Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतूट नात्यासाठी श्री श्री रविशंकर यांच्या 5 टिप्स ठरतील योग्य, प्रेमाच्या बंधनात राहाल गुरफटून

Sri Sri Ravi Shankar Quotes: प्रेम शोधणे केवळ पुरेसे आहे का? एकत्र हसणे आणि सतत प्रेमात राहणे हे सुंदर नात्याचे लक्षण आहे का? कदाचित नाही. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी परफेक्ट नात्यासाठी काही खास टिप्स शेअर केल्या आहेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 05, 2024 | 11:10 AM
अतूट नात्यासाठी श्री श्री रविशंकर यांच्या 5 टिप्स ठरतील योग्य, प्रेमाच्या बंधनात राहाल गुरफटून
Follow Us
Close
Follow Us:

आयुष्यात प्रेम करणं खूप सोपं आहे पण ते निभावणं मात्र तितकंच कठीण आहे. केवळ एकमेकांसाठी सुख शेअर करणं म्हणजे प्रेम नाही. सतत हसतखेळत राहणं याला प्रेम म्हणतात का? तर नक्कीच नाही. आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आणि लोकप्रिय अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी नातं आनंदी कसं राहील याबाबात काही टिप्स शेअर केल्या आहेत. 

तुम्हालाही तुमचे नाते आनंदी आणि दीर्घकाळ टिकवायचे असेल, तर श्री श्री रवी शंकर यांचे काही कोट्स आणि त्यांच्या काही टिप्स या तुम्हाला नक्कीच आयुष्यात मदत करतील. तुम्हीही प्रेम म्हणजे नक्की काय आणि अशा अनेक प्रश्नांनी त्रस्त असाल तर हा लेख केवळ तुमच्यासाठी आहे. नातं सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही त्यामुळे तुम्ही या टिप्स नक्की लक्षात घ्या. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/iStock)  

गरजेपेक्षा अधिक जोडीदाराकडे लक्ष देऊ नका

श्री श्री रवी शंकर यांच्या सांगण्यानुसार, जर तुमचे जीवन काही ध्येय साध्य करण्यावर केंद्रित असेल तर तुम्ही त्या दिशेने वाटचाल कराल आणि तुमचे नातेही पुढे जाईल. पण जर तुमचे संपूर्ण लक्ष फक्त तुमच्या नात्यावर असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. जोडपं म्हणून एकत्र राहणं आणि संसार करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच आपण वैयक्तिक वाढ आणि जीवनातील यशांवरदेखील लक्ष केंद्रित केले पाहिजे, जे आपले जीवन अधिक अर्थपूर्ण बनवेल आणि नातंही त्यामुळे सुदृढ राहील.

[read_also content=”नातं टिकविण्यासाठी बोलणं महत्त्वाचं https://www.navarashtra.com/lifestyle/how-to-maintain-relationship-need-to-speak-with-each-other-on-daily-basis-to-solve-problems-539425.html”] 

एकमेकांना स्पेस देणे 

प्रेम फुलण्यासाठी इच्छा किंवा तळमळ आवश्यक आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही सतत एकमेकांना चिकटून राहायला हवं. तुमच्या मनातील इच्छा नाहीशी केली किंवा तुमच्या नात्यात इच्छेला स्थान दिले नाही तर प्रेम बहरत नाही. त्यामुळे एकमेकांना योग्य वेळ द्या आणि एकमेकांना स्पेसही द्या. जेणेकरून तुम्ही अधिक चांगले एकमेकांना ओळखू शकाल. अंतराने प्रेम वाढते. त्यामुळे काही वेळा एकमेकांमध्ये अंतर राखणेही गरजेचे आहे. 

नात्यात घ्यायलाही शिका 

श्री श्री रविशंकर म्हणतात की नात्यात, समोरची व्यक्तीही तुमच्या जीवनात किती योगदान देते हे पहा. मात्र सतत तुम्ही एखाद्याला सर्वस्व देत राहू नका. घ्यायलाही शिका. प्रेम फुलण्यासाठी स्वाभिमान आवश्यक आहे. हे मानसशास्त्रानुसारदेखील खरे आहे, त्याला बेंजामिन फ्रँकलिन प्रभाव म्हणतात. यानुसार, जोडीदाराचा सल्ला घेण्यास किंवा लहान कामे सोपविण्यात अजिबात संकोच करू नका. एकमेकांवर अवलंबून राहणे कधीतरी चांगले असते. त्याने प्रेम वाढते. 

[read_also content=”काय आहे टॉक्झिक ब्रेंडक्रंबिंग ट्रेंड https://www.navarashtra.com/lifestyle/what-is-toxic-dating-trend-breadcrumbing-know-the-signs-hows-to-handle-it-538924.html”]

गोष्टी सोडायला शिकणे 

श्री श्री रवी शंकर यांच्या सांगण्यानुसार, अनेकांना आपल्या जोडीदारावरील नियंत्रण सोडण्याची समस्या असते. यामुळे अस्वस्थता निर्माण होते आणि संबंधही बिघडतात. त्यामुळे तुम्ही नात्यात असताना काही वेळा आरामात बसा आणि ध्यानासारख्या सजगतेचा अवलंब करा, ज्याचा तुमच्या नातेसंबंधांवर सकारात्मक परिणाम होईल. गोष्टींकडे काही वेळा दुर्लक्ष करणे चांगले ठरते. 

नेहमी आदर राखा 

श्री श्री रविशंकर म्हणतात की प्रत्येक नातेसंबंधात आदर हाच नाते वाचविण्यास आधार ठरतो. बऱ्याचदा तुम्ही नकळतपणे एकमेकांबाबत आदर गमावता. तुमच्या वागणुकीमुळे ही गोष्ट घडते. मात्र आदर हा तुम्हाला लोभ, मत्सर आणि वासनेपासून मुक्त करतो. म्हणून, तुमच्या आयुष्यात जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञतेचा भाव बाळगा. जोडीदाराबाबत आदर ठेवा. नातं टिकवणे अधिक सोपे होईल. 

Web Title: Sri sri ravishankar shared tips for strong and unbreakable relationship 5 successful relation tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2024 | 11:10 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.