Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पर्यटकांसाठी खुशखबर ! जंजिरा किल्ला पुन्हा एकदा झाला सुरू; खराब हवामानामुळे ठेवला होता बंद

यंदा सतत पाऊस पडत राहिल्याने जॉजिरा जल वाहतुक संस्थेतील कर्मचारी व बोट मालकांचा रोजगार कमी झाल्याने आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 08, 2025 | 08:03 AM
अखेर जंजिरा किल्ला पुन्हा एकदा झाला सुरू

अखेर जंजिरा किल्ला पुन्हा एकदा झाला सुरू

Follow Us
Close
Follow Us:

मुरुड जंजिरा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. या सतत पडणाऱ्या पावसामुळे व खराब हवामानामुळे जंजिरा किल्ला पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता. हा किल्ला काही दिवस बंद होता. त्यामुळे पर्यटकांना किल्ला दर्शन न होताच परतावे लागत होते. परिणामी, पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी होती. मात्र, आता हवामान पूवर्वत झाल्याने जंजिरा दर्शनासाठी किल्ल्यावर जाणे शक्य झाले आहे.

पावसाळ्यात १ जून ते ३१ ऑगस्ट या काळात समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव जंजिरा किल्ल्यावरील प्रवासी वाहतूक पुरातत्त्व खात्याकडून बंद ठेवली जाते. यंदा सतत पाऊस पडत राहिल्याने जॉजिरा जल वाहतुक संस्थेतील कर्मचारी व बोट मालकांचा रोजगार कमी झाल्याने आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजपुरी बंदर, दिघी बंदर तसेच खोराबंदर येथून पर्यटकांना ऐतिहासिक जलदुर्ग पाहता येणार आहे. दिवाळीनंतर खरा मासळीचा हंगाम सुरु होतो. त्यामुळे सुरमाई, पापलेट, हलवा, रावस, शेवंड, कोळंबी आदी ताज्या मासळींवर खवय्यांना ताव मारण्याची खरी पर्वणी आहे.

हेदेखील वाचा : कुणाचीच हिंमत नाही या ठिकाणांना भेट देण्याची… चुकूनही इथे कोणी जात नाही; भारताच्याही एका ठिकाणचा समावेश

दरम्यान, याठिकाणचे निसर्ग सौंदर्य, ऐतिहासिक स्थळे, जंजिरा, पद्मदुर्ग किल्ले व गोड माडी हे पर्यटकांना आकर्षित करत असते. २६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर किल्ला बंद असल्याने दूरदूरच्या पर्यटकांची घोर निराशा होत होती. परंतु आता हवामान अनुकूल असल्याने जंजिरा पाहण्यासाठी पर्यटकांना जाता येणार आहे.

अरबी समुद्राच्या लहान बेटावर किल्ला

अरबी समुद्राच्या एका लहान बेटावर हा किल्ला बांधण्यात आला आहे. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ९० फूट आहे. हा किल्ला इतका मजबूत आहे की, शत्रूंसाठी तो अजिंक्य किल्ला बनला. किल्ल्याची रचना फार अनोखी असून त्याला समुद्राच्या मध्यभागी बांधले गेले आहे, म्हणजेच किल्ल्याच्या चारही बाजूंनी आपल्याला फक्त पाणीच पाणी दिसून येणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा याला चांगला प्रतिसाद असतो. त्याच हा किल्ला काही दिवस बंद असल्याने अनेकांची नाराजी होती. मात्र, आता हा किल्ला सुरु झाला आहे.

Web Title: Janjira fort reopens after long period of time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 08:01 AM

Topics:  

  • Tourism Places

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.