
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रायते नदीच्या घाटावर छठ पूजेचा विधी सुरू होता. या ठिकाणी उपस्थित असलेले प्रिन्स गुप्ता (वय १६) आणि राजन विश्वकर्मा (वय १८) हे दोन तरुण नदीकाठी आले होते. याच वेळी एक मुलगा पाय घसरून नदीत पडला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा मुलगा पुढे सरसावला, मात्र दुर्दैवाने दोघेही पाण्याच्या तीव्र प्रवाहात सापडले आणि वाहून गेले.