Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘…तर मराठा समाज तुमचे राजकीय करियर संपवून टाकेल…’;मनोज जरांगेंचा इशारा कोणाला?

मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय  राहिला नाही. 29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आहे. त्यावेळी आम्ही ठरवणार विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय राहिला नाही, अशी भूमिका मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी घेतली आहे. ते संभाजीनगर येथे बोलत होते. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 26, 2024 | 11:49 AM
‘…तर मराठा समाज तुमचे राजकीय करियर संपवून टाकेल…’;मनोज जरांगेंचा इशारा कोणाला?
Follow Us
Close
Follow Us:

संभाजीनगर:  मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय  राहिला नाही. 29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आहे. त्यावेळी आम्ही ठरवणार विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय राहिला नाही, अशी भूमिका मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी घेतली आहे. ते संभाजीनगर येथे बोलत होते.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख  मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.  परंतू ओबीसी समाजाने त्यांच्या मागणीला विरोध करत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याची मागणी केली आहे. ओबीसी आरक्षणासदर्भात लक्ष्मण हाकेंनी जनआक्रोश यात्रा सुरु केली आहे.  मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्येही आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. दरम्यान, उपोषण मागे घेतल्यानंतर आज मनोज जरांगे पाटील आज त्यांच्या मुळ गावी मातुरी येथे यात्रेसाठी जाणार असल्याची माहिती आहे.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की,  आधी झालेला राडा आणि माझ्या दौऱ्याचा काहीही संबंध नाही. माझे सरकारशी बोलणे झालेले नाही, पाऊस सुरू असल्याने ते  त्यात व्यस्त आहेत.त्यामुळे त्यांना आम्ही त्रास देणार नाही. पण आपला  समाज मोठा करायचा असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे.  आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार आहोत. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही, मला थांबवण्यासाठी प्रयत्न नाही. आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठा समाजापुढे ते शांत बसले नाही तर ते  तुमचे राजकीय करीअर मराठा संपवून टाकतील.

याचवेळी, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही, याबाबत माजी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे. तसेच,  जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावाला, त्यांची वाट पाहू नये. असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

Web Title: Then maratha society will end your political career manoj jaranges warning to whom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 11:06 AM

Topics:  

  • Manoj Jarange on Maratha Reservation

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.