Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

August Kranti Diwas: स्वातंत्र्याची शेवटची लढाई कशी झाली? ब्रिटिश राजवटीचा पाया हादरवणाऱ्या ‘भारत छोडो’ आंदोलनाचे खरे चित्र

August Kranti Divas: भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या, पण ९ ऑगस्ट १९४२ चा दिवस हा त्या सर्वांमध्ये एक विशेष स्थान राखून आहे. हा दिवस “ऑगस्ट क्रांती दिवस” म्हणून ओळखला जातो. या दिवशी महात्मा गांधींनी “भारत छोडो” चळवळीची हाक दिली आणि संपूर्ण देशात ब्रिटिश सत्तेविरुद्ध एकजूट निर्माण झाली.

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: Aug 09, 2025 | 10:50 AM

फोटो सौजन्य - Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
1 / 7

दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रज सरकारने भारताची संमती न घेता भारताला युद्धात सामील केले. यामुळे भारतीयांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. अनेक वेळा इंग्रजांना विनंती करूनही त्यांनी स्वातंत्र्याची हमी दिली नाही. अखेर ८ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर एक ठराव मंजूर केला आणि गांधीजींनी “करेंगे या मरेंगे” (Do or Die) हे ब्रीद देत आंदोलन सुरू केले.

2 / 7

७ ऑगस्ट १९४२ रोजी संध्याकाळी मुंबईत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली आणि या बैठकीत निर्णय घेण्यात आला की दुसऱ्या दिवशी ब्रिटिशांपासून सत्ता मिळवण्याच्या मोहिमेत मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर (आता ऑगस्ट क्रांती मैदान) एक मोठी जाहीर सभा आयोजित केली जाईल.

3 / 7

या चळवळीच्या नावाबद्दल बरीच चर्चा झाली. महात्मा गांधींना चळवळीचे नाव असे हवे होते की ते लोकांच्या मनात कोरले जाईल. यासाठी अनेक नावे सुचवण्यात आली. शेवटी ‘भारत छोडो’ ही घोषणा युसूफ मेहेरअली यांनी दिली.

4 / 7

संपूर्ण स्वराज्य या भावनेने प्रेरित होऊन इंग्रजांना भारतातून हुसकावून लावायचं असं ठरल्यानंतर महात्मा गांधीनी करेंगे या मरेंगे आणि चले जाव या दोन क्रांतीकारी घोषणा दिल्या. पुढे याच घोषणेनं सारा भारत ढवळून निघाला आणि देशभरात इंग्रजांविरोधात असंतोष वाढत गेला.

5 / 7

युसूफने ‘सायमन गो बॅक’ ही घोषणा देखील दिली होती.

6 / 7

९ ऑगस्ट १९४२ चं आंदोलन होऊ नये किंवा त्याची सुरूवात होऊ नये यासाठी इंग्रजांनी महात्मा गांधींसह जवळपास सर्वच बड्या नेत्यांना ताब्यात घेतलं होतं. गांधीजींना पुण्याच्या आगाखान पॅलेस इथं ठेवण्यात आलं होतं आणि इतर बड्या नेत्यांना नगरच्या किल्ल्यात ठेवण्यात आलं होतं.

7 / 7

या देशव्यापी भारत छोडो आंदोलनामुळे ब्रिटिश सत्तेला मोठा धक्का बसला. भारतीय जनतेने ब्रिटिशांना हे स्पष्ट करून दिलं की, आता त्यांचं भारतात स्वागत नाही. या आंदोलनानंतर काहीच वर्षांत १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.

Web Title: August kranti diwas how was the last battle for freedom the true picture of the quit india movement that shook the foundations of british rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • Independence Day

संबंधित बातम्या

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
1

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही
2

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
4

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.