मेट्रो ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका संपूर्ण कल्याण शहराला बसला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून कामादरम्यान मुख्य पाइपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. गुरुदेव हॉटेलजवळील रस्ता खचला असून नागरिकांना २४ तासांहून अधिक काळ पाणी मिळालेले नाही. कल्याण स्टेशन परिसरात आणि बैल बाजार भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. प्रशासन आणि ठेकेदारांमधील समन्वयाच्या अभावामुळे कल्याणकरांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मेट्रो ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका संपूर्ण कल्याण शहराला बसला आहे. मेट्रो प्रकल्पाच्या ठेकेदाराकडून कामादरम्यान मुख्य पाइपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. गुरुदेव हॉटेलजवळील रस्ता खचला असून नागरिकांना २४ तासांहून अधिक काळ पाणी मिळालेले नाही. कल्याण स्टेशन परिसरात आणि बैल बाजार भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. प्रशासन आणि ठेकेदारांमधील समन्वयाच्या अभावामुळे कल्याणकरांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.