Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौरीपूजनातून पारंपरिक वारशाचे जतन!

मुंबईत नोकरीनिमित्त स्थायिक झालेला कोकणातील नोकरदार वर्ग गणेशोत्सवासाठी आपल्या गावी दाखल झाला आहे. घरोघरी आरती, भजनाचे सूर घुमू लागले आहेत. मात्र, असे असले तरी कोकणातील पारंपरिक गौरीपूजन आणि ओवसा या धार्मिक विधींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या फोर-जी, फाय-जीच्या युगातील कोकणातील तरुणाई पारंपरिकरीत्याच गौरीपूजन करतात. कोकणपट्ट्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील गौरीपूजनाची प्रथा आजही आपली वेगळी ओळख निर्माण करून आहे. वर्षानुवर्षांचा हा वारसा आजची पिढीही तेवढ्याच ताकदीने जपत आहे. हा विधी कसा साजरा होतो, याविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न...

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 04, 2022 | 06:00 AM
गौरीपूजनातून पारंपरिक वारशाचे जतन!
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीच्या चौथ्या दिवशी गौरीचे आगमन होते. काही ठिकाणी तिसऱ्या दिवशीही गौरी आणली जाते. आगमन व पूजनासाठीचे विधी मात्र त्या त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. एकंदरीत गौरी पूजनाच्या पद्धतीकडे पाहिल्यास त्याद्वारे निसर्ग रक्षणावरच अधिक भर असल्याचे दिसते. गौरीपूजन हा महिलांचा सण. यासाठी महिलांची आधीपासूनच तयारी सुरू असते. गौरीच्या आगमनादिवशी सुवासिनी व युवती आपल्या गावातील मुख्य पाणवठ्यावर जातात.

दरवर्षी याच ठिकाणाहून गौरीचे आवाहन केले जाते. काही ठिकाणी नदी, विहीर किंवा गावातील तळ्याकाठी गौरीचे आवाहन करतात. सोबत बांबूपासून बनविलेली ‘रवळी’ घेतली जाते. त्यात हळद, तिरडा यांचे रोपटे घेतले जाते. काही ठिकाणी केवळ हळदीचेच रोपटे वापरतात. रोपट्यांनाच गौरी देवी मानली जाते. सध्या रवळी केवळ लग्नकार्यासाठी वापरतात. रवळीमध्ये विडा, शेण, अगरबत्ती, करंडा, रांगोळी, फुले, पाण्याचा तांब्या घेतला जातो. पाठवठ्यावर नेऊन ती एका विशिष्ट जागी बसविली जाते.

तत्पूर्वी परिसर स्वच्छ केला जातो. यावेळी गौरीची गाणी गायली जातात. या रोपट्यांची व विड्याची विधिवत पूजा केली जाते. विधिवत पूजेनंतर रोपटी रवळीत ठेवून पाण्यात सोडतात. पानाचा विडा पाण्यात सोडल्यावर पाणी तोंडात भरून सर्व महिला आपापली गौरीची रवळी घेऊन घराकडे निघतात. घराची पायरी चढेपर्यंत पाणी तोंडातच ठेवण्याची प्रथा आहे. वाटेत कोणाशी बोलणेही टाळले जाते किंवा तसा अलिखित नियमच आहे. घरात प्रवेश करताना मागे वळून तोंडातील पाणी उंबऱ्याबाहेर फेकले जाते. त्यानंतर रवळी गणेशमूर्तीच्या उजव्या बाजूस ठेवली जाते. दरम्यान, त्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम होतात. यामध्ये महिला वर्ग जागरणही करतात. गौरी आगमनाच्या दुसर्‍या दिवशी गौरीपूजन होते. घराघरांत गौराई येत असली तरी काही गणपतींकडे गौराई आगमन तसेच पूजन होत नाही.

गौरीपूजनादिवशी गौरीचा मुखवटा, हात, तिरडे, बांबू दागदागिने, कपडे घालून गौरीला सजवले जाते. तिरड्यात बांबूची काठी उभी करून तिला झाडाच्या दोरांनी बांधले जाते. गौरीला सजवतात. कुडाळ, कणकवली, वैभववाडीत अशी प्रथा असल्याचे सांगितले जाते. सजवलेल्या गौराईला गणपतीच्या उजव्या बाजूस उभी करून साडीचा पदर गणपतीच्या डोक्यावर ठेवतात. त्यानंतर गौरीपूजनास विधिवत सुरुवात होते. पूजनासाठी पाने व फुले वापरतात.

गौरीच्या पूजेनंतर घरातील सर्व सुवासिनी गौराईसमोर ओवसा भरतात. त्यात वाण म्हणून वापरण्यात येणारे साहित्य शेतीत तयार झालेले असते. त्यामध्ये पोहे, काकडी, केळी आदींचा समावेश असतो. गावातील एक विशिष्ट समाज यासाठीची बांबूची सूपे पुरवितात. त्या बदल्यात त्यांना धान्य किंवा पैशांच्या स्वरूपात मोबदला दिला जातो. सध्या सूपे, सुपल्या, रोवळी बाजारात विकत मिळतात. मुली सुपलीत ओवसा भरतात. लग्नानंतर हा ओवसा त्यांच्या सासरी सुपूर्द केला जातो.

गौराईसमोर व इतर देवतांसमोर ओवशाचे वाण अर्पण केल्यावर आजूबाजूच्या घरात देण्याची प्रथा आजही पाळली जात आहे. तसेच त्याआधी ग्रामदेवतेपुढे ठेवून त्यांचे आशीर्वाद घेतले जातात. लग्नानंतर पहिला ओवसा असेल तर पती-पत्नी ओवसा पुजून वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतात. गौरी पूजनानंतर रात्री गौरी गणपतीसमोर भजन, आरती, फुगड्या होतात. पारंपरिक फुगडी गातानाच नृत्य करून प्रत्येक घरातील स्त्रिया रात्रभर जागरण करतात.

दुसर्‍या दिवशी गौरी गणपतीला गोड नैवेद्य दाखवून व पूजा करून गौरी गणपतीचे ठरलेल्या ठिकाणी विसर्जन केले जाते. काही ठिकाणी गौरीला मांसाहारी नैवेद्यही दाखविला जातो. अनेक ठिकाणी ज्या पाणवठ्यावरून गौराईला आणतात त्याच पाणवठ्यावर गौरीचे विसर्जनही करतात. काही ठिकाणी गणपती विसर्जनाच्या ठिकाणीच गौराईचेही विसर्जन करतात. अनेक ठिकाणी पुरुष गणपती विसर्जनासाठी नदीवर तर सुवासिनी पाणवठ्यावर विसर्जन करतात.

गौरीची भाकर लई भारी…

गौरी विसर्जन केल्यावर विसर्जनासाठी उपस्थित महिला-पुरुषांना तांदळाची, नाचणीची भाकरी देण्याची प्रथा आहे. त्यासाठी एक विशिष्ट मांड (घर) ठरलेला असतो. तेथे विसर्जनानंतर सर्व ग्रामस्थ जमतात. काही ठिकाणी पाणवठ्यावरच देवीची भाकरी दिली जाते. जमलेल्यांना मग तांदूळ, नाचणीच्या भाकरीसह अळू, टाकळा, शेगूल तसेच इतर रानभाज्यांपासून बनविलेल्या भाज्या दिल्या जातात. तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो. सोबत देवीचा भातही असतो. ही प्रथा आजची तरुणाई तेवढ्या आत्मीयतेने पाळत आहे.

–बापू सावंत

Web Title: Preservation of traditional heritage through gauri poojan nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2022 | 06:00 AM

Topics:  

  • Ganeshotsav 2022

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.