Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय महिलांना सहन करावा लागतोय ‘विवाह दंड’; महिलांच्या रोजगारात मोठी घट!

भारतात लग्नानंतर महिला रोजगार दर 12 टक्क्यांनी घसरला आहे. जो विवाहपूर्व महिला रोजगार दराच्या जवळपास एक तृतीयांश इतका आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. अर्थात लग्नानंतर काम करणाऱ्या भारतीय महिलांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 16, 2024 | 03:16 PM
भारतीय महिलांना सहन करावा लागतोय 'विवाह दंड'; महिलांच्या रोजगारात मोठी घट!

भारतीय महिलांना सहन करावा लागतोय 'विवाह दंड'; महिलांच्या रोजगारात मोठी घट!

Follow Us
Close
Follow Us:

आता लग्न कर, सासरी जाऊन नोकरी कर… बहुतेक भारतीय स्त्रिया आपल्या कुंटूंबातील व्यक्तींकडून हे वाक्य नेहमी ऐकत असतात. यामध्ये अशा महिला आहेत, ज्या लग्नाआधी नोकरी करत आहेत. पण लग्नानंतरही त्या आपली नोकरी सुरू ठेवू शकणार का? यावर नेहमीच प्रश्नचिन्ह असते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालानुसार, लग्नानंतर काम करणाऱ्या भारतीय महिलांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. म्हणजेच भारतीय महिलांना ‘विवाह दंड’ सहन करावा लागत असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

महिलांच्या रोजगारात होतीये सातत्याने घसरण

जागतिक बँकेच्या या अहवालात म्हटले आहे की, जर एखाद्या पुरुषाने लग्नानंतर नोकरी केली तर ती चांगली मानली जाते. त्याचे कौतुक केले जाते. महिलांच्या बाबतीत मात्र याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. बहुतेक कुटुंबे आपल्या नवविवाहित सुनेला नोकरी करू देत नाहीत. जरी ती स्त्री लग्नाआधी आईवडिलांच्या घरी काम करत असेल. त्यामुळे महिलांच्या रोजगाराचे प्रमाण सातत्याने घसरत आहे.

या अहवालानुसार, भारतात लग्नानंतर महिला रोजगार दर 12 टक्क्यांनी घसरला आहे. जो विवाहपूर्व महिला रोजगार दराच्या जवळपास एक तृतीयांश इतका आहे. मुले नसतानाही लग्नानंतर पुरुषांच्या नोकरीचे प्रमाण वाढले आहे. पुरुषांसाठी प्रीमियम 13 टक्के गुण आहे.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – शेतकरी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; केंद्रिय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी!

मुलांची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी

अहवालात म्हटले आहे की, भारत आणि मालदीवमध्ये लग्नानंतर पाच वर्षांपर्यंत अपत्य नसलेल्या महिलांमध्ये विवाहाशी संबंधित नियम कायम राहतात. तर दुसरीकडे स्त्रियाही मुलांच्या जबाबदारीशी निगडीत असल्याचे पाहायला मिळते. यामुळे महिलांना नोकरीही करता येत नाही किंवा त्यांना नोकरी सोडावी लागते.

दक्षिण आशियातही घसरण

महिलांच्या रोजगार दरातील घट केवळ भारतातच नाही तर संपूर्ण दक्षिण आशियामध्ये आहे. दक्षिण आशियामध्ये ‘महिला, नोकऱ्या आणि विकास’ या विषयावर लक्ष केंद्रित करूनही महिलांच्या रोजगाराच्या दरात घट झाल्याचे या अहवालातून स्पष्ट समोर आले आहे. 2023 मध्ये, दक्षिण आशियामध्ये केवळ 32 टक्के कार्यरत वयाच्या महिला कार्यरत होत्या. तर पुरुषांचा रोजगार दर ७७ टक्के होता. अशा परिस्थितीत महिलांचा सहभाग फारच कमी राहिला आहे.

…तर वाढेल देशाचा जीडीपी

महिलांचा श्रमशक्ती सहभाग दर पुरुषांच्या बरोबरीने वाढवला तर जीडीपी वाढेल, असे अहवालात म्हटले आहे. असे केल्याने दक्षिण आशियाचे प्रादेशिक सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) 13 ते 51 टक्के जास्त असेल, असे अहवालात म्हटले आहे.

Web Title: Employment rate declined for women after marriage according world bank report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 03:15 PM

Topics:  

  • employment Rate
  • women employment

संबंधित बातम्या

बेरोजगारीला त्रासलाय? चपराशी पदासाठी नोकऱ्या जाहीर; आज करा अर्ज
1

बेरोजगारीला त्रासलाय? चपराशी पदासाठी नोकऱ्या जाहीर; आज करा अर्ज

७१ लाख बेरोजगारांच्या हाताला कामच नाही, राज्यात बेरोजगारी वाढतेय
2

७१ लाख बेरोजगारांच्या हाताला कामच नाही, राज्यात बेरोजगारी वाढतेय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.