Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टोमॅटो 100 रुपये किलो; दोन महिने दर चढेच राहण्याची शक्यता, वाचा… नेमकं कारण?

गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो दराने मोठी उसळी घेतली असून, राज्यातील अनेक भागांमध्ये किरकोळ बाजारात टोमॅटो दराने शंभरी गाठली आहे. तर घाऊक बाजारात देखील टोमॅटो दर ५००० ते ६००० रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहचले आहेत. अशातच आता टोमॅटो दर येत्या काळात चढेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jun 22, 2024 | 04:18 PM
टोमॅटो 100 रुपये किलो, दोन महिने दर चढेच राहण्याची शक्यता

टोमॅटो 100 रुपये किलो, दोन महिने दर चढेच राहण्याची शक्यता

Follow Us
Close
Follow Us:

यावर्षीच्या पावसाळ्याच्या तोंडावर अनेक भागांमध्ये पडलेल्या भीषण उष्णतेचा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे. परिणामस्वरूप, सध्या देशभरातील बाजारात टोमॅटो दराने मोठी उसळी घेतली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये टोमॅटोला सध्या १०० रुपये प्रति किलो इतका उच्चांकी दर मिळत आहे. तर महाराष्ट्राशिवाय तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये देखील टोमॅटोचे दर देखील ८० ते १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहचले आहेत.

किती मिळतोय घाऊक बाजारात दर?

दरम्यान, महाराष्टातील सर्वच बाजार समित्यांमध्ये टोमॅटोला प्रति क्विंटल 5000 ते 6000 रुपयेपर्यंतचा दर मिळत आहे. तर किरकोळ बाजारात महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये टोमॅटोने शंभरी गाठली आहे. विशेष म्हणजे उन्हाळी हंगाम आणि पावसाळी हंगाम या दोन्ही हंगामातील काळात टोमॅटोचे भाव नेहमीच वाढत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. अर्थात उन्हाळी टोमॅटो पीक संपल्यानंतर वाढत्या उष्णतेमुळे आणि पावसाचा काहीसा विलंब झाल्यास नवीन पावसाळी हंगामातील टोमॅटो पीक बाजारात येण्यास उशीर लागतो. परिणामी, या काळात नेहमीच टोमॅटोचे दर तेजीत असतात.
(फोटो सौजन्य : istock)

दोन महिने दर चढेच राहणार

सध्या तरी वाढलेल्या टोमॅटोच्या दरात घसरण होणे अशक्यप्राय आहे. राज्यासह देशभरातील अनेक भागांमध्ये नुकतेच मॉन्सूनचे आगमन झाले आहे. ज्यामुळे नवीन टोमॅटो पीक तयार होऊन, बाजारात यायला दीड ते दोन महिन्यांचा कालावधी जाणार आहे. अर्थात सुरुवातीला देखील आवक कमी राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षी झालेल्या कमी पावसामुळे अनेक भागामध्ये पाण्याची टंचाई होती. परिणामी, आगाद टोमॅटोची आवक बाजारात काहीशी कमीच राहणार आहे. परिणामी, आणखी दोन महिने तरी टोमॅटोचे दर हे चढेच पाहायला मिळणार आहे.

दरात आणखी वाढ होण्याची शक्यता

सध्याच्या घडीला देशातील 17 राज्यांमध्ये टोमॅटोचे भाव 50 रुपयांहुन अधिक आहे. तर अशी 9 राज्ये आहेत की ज्या ठिकाणी टोमॅटोचा दर हा 60 रुपये किलोपेक्षा जास्त आहे. तर 4 राज्यांमध्ये टोमॅटोचा भाव 70 रुपयांपेक्षा जास्त आहे. तर महाराष्ट्रात या एकमेव राज्यात टोमॅटोचा भाव 100 रुपयांच्या पुढे गेला आहे. उष्णतेची लाट आणि टोमॅटोचे घटलेले उत्पादन यामुळे टोमॅटोच्या दरात ही वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत टोमॅटोच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Tomato rs 100 per kg in maharashtra rate likely to increase further

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2024 | 04:15 PM

Topics:  

  • Agriculture News

संबंधित बातम्या

फणसकिंग ठरलेले रत्नागिरी येथील देसाई पितापुत्राची आधुनिक शेतीतील यशोगाथा; फणस शेतीतून कमावतात कोट्यवधी
1

फणसकिंग ठरलेले रत्नागिरी येथील देसाई पितापुत्राची आधुनिक शेतीतील यशोगाथा; फणस शेतीतून कमावतात कोट्यवधी

बजेट, उत्पादन, MSP पासून KCC पर्यंत; गेल्या ११ वर्षांत देशाच्या कृषी क्षेत्रात झाले महत्वाचे बदल
2

बजेट, उत्पादन, MSP पासून KCC पर्यंत; गेल्या ११ वर्षांत देशाच्या कृषी क्षेत्रात झाले महत्वाचे बदल

Mosoon Update : पेरणीची घाई करू नका : राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन
3

Mosoon Update : पेरणीची घाई करू नका : राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन

दुकानदारांनो सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक पडेल महागात; कृषी विभागाकडून भरारी पथके तयार
4

दुकानदारांनो सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक पडेल महागात; कृषी विभागाकडून भरारी पथके तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.