
या उपक्रमाचा पहिला टप्पा राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत असून,- त्यामध्ये मराठवाड्यातील वरील तीन – जिल्ह्यांचा समावेश महत्त्वाचा मानला जात – आहे. सुमारे 50हजार एकर क्षेत्रावर पाच – हजारांहून अधिक महिला शेतकरी आणि 100 स्वयंसहायता गट या योजनेचा थेट – लाभ घेणार आहेत. पुढील तीन वर्षांत हा – उपक्रम 500पेक्षा अधिक स्वयंसहायता गटांपर्यंत विस्तारण्यात येणार असून, – कापसासह मका व इतर पिकांपर्यंत प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येणार आहे.
शेती व्यवस्थेला मिळेल नवी दिशापरभणी, बीड व नादेडसारख्या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये या उपक्रमामुळे शेती उत्पादनक्षमता वाढीस लागणार असून, ग्रामीण टिकाऊपणा आणि महिलांच्या नेतृत्वाखालील शेती व्यवस्थेला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.दीर्घकालीन फायदा
महिला शेतकरी आत्मनिर्भर बनून राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देतील, असा विश्वास व्यक्त करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, गोदरेज अॅग्रोव्हेटसोबतची ही भागीदारी शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी दीर्घकालीनदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.