Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नीती आयोग रद्द करा”; पीएम मोदींसोबतच्या बैठकीआधी ममता बॅनर्जींची मोठी मागणी!

उद्या अर्थात २७ जुलै रोजी सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रमुख्यांच्या उपस्थितीत नीती आयोगाची नवी दिल्ली येथे बैठक होणार आहे. मात्र, त्याआधीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पवित्रा घेत, नीती आयोग रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या बैठकीत त्यांचा सूर नेमका काय असेल, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 26, 2024 | 06:44 PM
"नीती आयोग रद्द करा"; पीएम मोदींसोबतच्या बैठकीआधी ममता बॅनर्जींची मोठी मागणी!

"नीती आयोग रद्द करा"; पीएम मोदींसोबतच्या बैठकीआधी ममता बॅनर्जींची मोठी मागणी!

Follow Us
Close
Follow Us:

शनिवारी (ता.२६० नवी दिल्ली येथे नीती आयोगाची बैठक होणार आहे. त्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही दिल्लीत पोहोचल्या आहेत. यावेळी त्यांनी बैठकीच्या एक दिवस आधी, नीती आयोग रद्द करण्याची मागणी केली आहे. सध्या कार्यरत असलेला नीती आयोग रद्द करा आणि नियोजन आयोग परत पुन्हा सुरु करा. नियोजन आयोग ही नेताजी बोस यांची कल्पना होती. असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय हे सरकार आपआपसातील भांडणातूनच पडेल, थोडा धीर धरा. असा उच्चारही त्यांनी यावेळी केला आहे.

विकसित भारत @2047 ही असेल थीम

दरम्यान, वर्ष 2047 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 27 जुलै 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची 9 वी बैठक होणार आहे. ज्याची थीम विकसित भारत @2047 अशी ठेवण्यात आली आहे. भारताला विकसित राष्ट्र कसे बनवता येईल? यावर या बैठकीचा भर असणार आहे.

हेही वाचा : जुनं घर विकायचंय, नाही लागणार एक रुपयाही टॅक्स; बस्स… एवढे एक काम करा!

नेमकी काय चर्चा होणार?

नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत विकसित भारत @ 2047 वर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीला केंद्र आणि राज्य सरकारांमधील महत्वाची अनेक जण उपस्थित असणार आहे. यावेळी सहभागात्मक प्रशासन आणि भागीदारी वाढवण्याच्या मार्गांवर चर्चा केली जाईल आणि सरकारी हस्तक्षेपाद्वारे ग्रामीण आणि शहरी रहिवाशांचे जीवनमान सुधारण्यासाठी वितरण यंत्रणा सुधारित केली जाईल. 2047 मध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात राज्यांच्या भूमिकेवरही या बैठकीत चर्चा होणार आहे.

30 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट

भारत सध्या 5 ट्रिलियन डॉलर जीडीपीसह जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला आहे. तर आता देशाला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. असे नीती आयोगाने उद्याच्या बैठकीसाठी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी केंद्र आणि राज्यांमध्ये सहयोगात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे, असेही नीती आयोगाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 9 व्या NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत या व्हिजनवर चर्चा केली जाईल आणि टीम इंडिया म्हणून केंद्र आणि राज्यांनी कसे काम करावे यावर चर्चा केली जाईल.

Web Title: Viksit bharat2047 before meeting pm modi mamta banerjee demands to abolish niti ayog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2024 | 06:41 PM

Topics:  

  • Mamata Banerjee
  • Niti Aayog

संबंधित बातम्या

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज
1

इंडिया आघाडीमध्ये उडाला मतभेदाचा भडका! उपराष्ट्रपती पदाच्या निर्णयावर ममता दीदी नाराज

CM Mamata Banerjee : बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावे, दरमहा ५ हजार देणार… ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2

CM Mamata Banerjee : बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावे, दरमहा ५ हजार देणार… ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा

”ऑपरेशन सिंदूर’ मागे राजकीय डाव, नाव जाणिवपूर्वक दिलं!’; ममता बॅनर्जींनी थेट मोदींना दिलं लाईव्ह चर्चेचं आव्हान
3

”ऑपरेशन सिंदूर’ मागे राजकीय डाव, नाव जाणिवपूर्वक दिलं!’; ममता बॅनर्जींनी थेट मोदींना दिलं लाईव्ह चर्चेचं आव्हान

Indian Economy Rank : भारतीय अर्थव्यवस्था बनली बळकट; जगात पटकवला चौथा क्रमांक, नीती आयोगाची माहिती
4

Indian Economy Rank : भारतीय अर्थव्यवस्था बनली बळकट; जगात पटकवला चौथा क्रमांक, नीती आयोगाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.