Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी अन् आता यांचे युवराज…; नरेंद्र मोदींचा प्रचार सभेतून मविआविरोधात एल्गार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे दिल्लीचे नेते राज्यामध्ये सभा घेत आहेत. धुळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेमध्ये कलम 370, आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर विरोधकांना घेरले.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 08, 2024 | 02:53 PM
PM Narendra modi in dhule speech for vidhansabha elections

PM Narendra modi in dhule speech for vidhansabha elections

Follow Us
Close
Follow Us:

धुळे : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रातील नेते दौऱ्यावर आले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. त्यांच्या राज्यातील विविध भागांमध्ये प्रचार सभा पार पडत आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांची पहिली प्रचार धुळे विधानसभा मतदारसंघामध्ये पार पडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. आरक्षण, लाडकी बहीण योजना अशा अनेक मुद्द्यांवरुन पंतप्रधान मोदींनी टीकास्त्र डागलं.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी लढा उभा केल्यामुळे हा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. यावरुन नरेंद्र मोदी यांनी भाष्य करत गांधी परिवारावर टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी दलित, मागासवर्गीय समाजास आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आरक्षणासाठी मोठी लढाई लढावी लागली. त्यानंतर इंदिरा गांधी यांनीही एससी, एसटी यांना आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर राजीव गांधी यांनी ओबीसी आरक्षण मिळू नये, असे काम केले. आता त्या परिवारातील युवराज आरक्षणच्या विरोधात आहे. ते आता देशातील ओबीसींना छोट्या छोट्या जातींमध्ये वाटण्याचा प्रयत्न करत आहे. कॉंग्रेसने यापूर्वी देखील धर्माच्या नावावर कट रचला आहे. आता काँग्रेस जातीच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्याला एकजुट राहून काँग्रेसचा खेळ उधळून लावायचा आहे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

हे देखील वाचा : ‘द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ पुस्तकाने उडवली राजकीय वर्तुळात खळबळ; छगन भुजबळ करणार कायदेशीर कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधक असलेल्या महाविकास आघाडीवर निशाणा साधला. “महाविकास आघाडीच्या गाडीला ना चाक आहेत ना ब्रेक आहे. चालकाच्या सीटसाठीही तिन्ही पक्षात रस्सीखेच सुरू आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेने त्यांचं अडीच वर्षांचे शासन बघितलं आहे. आधी त्यांनी सरकार लुटले, नंतर जनतेला लुटलं. त्यांनी मेट्रो प्रकल्प बंद केले, वाढवण बंदराचं काम थांबवण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. तसेच समृद्धी महामार्गाला विरोध केला, अशा नेत्यांपासून आता महाराष्ट्रातील जनतेने सावध होण्याची गरज आहे,” असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

हे देखील वाचा : ‘भाजप आमदार सदाभाऊ खोत यांना सत्तेची मस्ती’; युवक काँग्रेसचा घणाघात

जम्मू काश्मीरमधील मुद्द्यावर देखील नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. सध्या नवीन स्थापन झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये कलम 370 वरुन जोरदार वादंग निर्माण झाला आहे. या राड्यामुळे काश्मीरकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर भाष्य करताना मोदी म्हणाले की, ” देशाच्या स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींना काँग्रेसचे विसर्जन करण्याचे होते. काँग्रेस नेहमी देशाला तोडण्याचे कटाचा भाग राहिला आहे. त्याचे सर्वात मोठे उदाहरण जम्मू-काश्मीर आहे. काँग्रेसने 75 वर्षांपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना जम्मू-काश्मीरमध्ये लागू होऊ दिले नाही. देशात दोन राज्यघटना होत्या. परंतु मोदी आला आणि त्यांनी देशाची राज्यघटना काश्मीरमध्ये लागू केली. आता पुन्हा जम्मू-काश्मीरमध्ये कट करु लागले आहे. त्यांच्या आघाडीने कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव समंत केला आहे. देशात आता कोणीही कलम 370 पुन्हा लागू करु शकणार नाही,” असा घणाघात नरेंद्र मोदी यांनी केला.

Web Title: Pm narendra modi in dhule speech for vidhansabha elections 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 02:53 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी
1

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
2

RSS ला 100 वर्ष झाली तरी ‘मूंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम; हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
3

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार
4

पद्मविभूषण पंडित छन्नुलाल मिश्रा यांचे निधन, वयाच्या ८९ व्या घेतला निरोप; जाणून घ्या कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.