Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकरी ते यशस्‍वी उद्योजक म्हणून परिवर्तन; देशातील ‘पाच’ शेतकऱ्यांची यशोगाथा

शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्वाचा कणा आहे. किसान दिनाच्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊया भारतातील पाच शेतकऱ्यांच्‍या प्रेरणादायी गाथा.  ज्यांचे शेतकरी ते यशस्वी उद्योजक म्हणून परिवर्तन झाले.

  • By नारायण परब
Updated On: Dec 21, 2024 | 08:05 PM
शेतकरी ते यशस्‍वी उद्योजक म्हणून परिवर्तन;   देशातील ‘पाच’ शेतकऱ्यांची यशोगाथा
Follow Us
Close
Follow Us:

आपल्या देशात शेतकरी हा महत्वाचा घटक आहे.  देशाचे पोषण करण्‍यासोबत ग्रामीण अर्थव्‍यवस्‍थेच्‍या विकासाला चालना देखील दिली जाते.  23 डिसेंबर हा किसान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.  या किसानदिनाकरिता अवघा एक दिवस राहिला आहे त्यामुळेच आज आम्ही घेऊन आलो आहोत भारतातील पाच शेतकऱ्यांच्‍या प्रेरणादायी गाथा.  ज्‍यांच्‍या उल्‍लेखनीय जीवनप्रवासांमधून समकालीन कृषीचे यशस्‍वी उद्योजकतेमधील परिवर्तन दिसून येते. त्‍यांच्‍या गाथांमधून स्थिरता, नाविन्‍यता व सामुदायिक पाठिंब्‍याची ताकद निदर्शनास येते, तसेच निदर्शनास येते की योग्‍य टूल्‍स व माहितीसह शेतकऱ्यांचे सक्षमीकरण विकसित भारतसाठी मार्ग सुकर करण्‍यास मदत करत आहे.

1. चेन्‍ना रेड्डी 

एकेकाळी बेंगळुरूमध्ये प्लंबर असलेले चेन्‍ना रेड्डी आंध्र प्रदेशातील जंगलापल्ली गावात आपल्या वडिलोपार्जित जमिनीवर परतले, जिथे पाण्याच्या कमतरतेमुळे जमिन नापीक झाली होती. आनंदन – कोका-कोला इंडिया फाऊंडेशनच्या प्रोजेक्‍ट उन्‍नती मँगोच्‍या माध्‍यमातून त्यांनी अल्ट्रा हाय-डेन्सिटी प्लांटिंग (यूएचडीपी) आणि ठिबक सिंचन यांसारखी आधुनिक तंत्रे शिकून घेतली.

या प्रगत पद्धतींमुळे फळांचे उत्पादन व गुणवत्ता तर वाढलीच पण खते आणि कीटकनाशकांची गरजही कमी झाली. क्‍लायमेट-स्मार्ट शेती आणि पीक व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणासह, चेन्‍ना यांनी त्‍यांच्‍या नापीक जमिनीवर भरभराटीने आंब्‍याच्‍या बागा तयार केल्‍या. यामधून दाखवून दिले की शाश्‍वत कृषीपद्धती अगदी नापीक जमिनींनाही पुनरुज्जीवित करू शकतात आणि शेतकऱ्यांना त्यांच्या वारशाशी जोडू शकतात.

2. तुलाबती बदनायक

इको-टूरिझमसह कॉफी फार्मिंगचे मिश्रण: ओडिशातील कोरापुट या आदिवासी गावात कॉफी फार्मरपासून इको-टूरिझमपर्यंत, तुलाबती बदनायक यांनी स्थिरता आणि नाविन्यपूर्णतेच्‍या माध्‍यमातून स्‍वत:चे जीवन व समुदायामध्‍ये बदल घडवून आणला आहे. कॉफी शेतकरी म्हणून स्‍वत:च्‍या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करत असताना त्‍यांनी प्रोजेक्ट उन्‍नती कॉफी अंतर्गत शाश्‍वत पद्धतींचा अवलंब केला, जसे निवडक कापणी आणि उन्हात वाळवणे. या तंत्रांनी त्‍यांच्‍या कॉफीची गुणवत्ता सुधारली, ज्यामुळे त्‍यांना चांगले उत्‍पन्‍न मिळण्यास मदत झाली.
शेती व्‍यतिरिक्‍त तुलाबती यांनी अतिरिक्‍त उत्‍पन्‍न मिळवण्‍यासाठी गावाच्या नैसर्गिक सौंदर्याचा लाभ घेऊन पर्यावरण पर्यटन उपक्रम सुरू केला. आज, त्‍या स्‍वत:च्‍या कुटुंबाला आधार देण्‍यासोबत आपले ज्ञान वाटून देत आणि सामूहिक वाढीस चालना देऊन इतर महिलांना सक्षम करत आहेत.

3.  जे. सी. पुणेथा

माजी कापड अभियंता जे. सी. पुणेथा वयाच्या ७०व्या वर्षी अहमदाबादमधील संपन्‍न औद्योगिक कारकीर्दीनंतर उत्तराखंडमधील चंपावत येथील सफरचंद शेतीकडे वळले. पुन्‍हा निसर्गाशी संलग्‍न होण्‍याची इच्‍छा आणि स्‍वत:च्‍या जमिनीचा उत्‍पादनक्षम वापर करण्‍यामधून प्रेरणा घेत त्‍यांनी हा निर्णय घेतला.

प्रोजेक्ट उन्‍नती अ‍ॅप्‍पलच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी रोपांची लागवड केली आणि ठिबक सिंचन यंत्रणा राबवली. सुरुवातीच्या आव्हानांना न जुमानता आणि अहमदाबादमधील आपल्या कुटुंबापासून दूर राहत शेतीचे व्यवस्थापन करत असतानाही पुणेथा यांनी उल्लेखनीय यश गाठले. त्यांचे लक्ष आता त्याच्या बागेचा विस्तार करण्यावर आणि सहकारी शेतकऱ्यांना शाश्‍वत पद्धती अवलंबण्यात मदत करण्यावर आहे, जेथे त्‍यांना सिद्ध करायचे आहे की, नाविन्‍यता आणि चिकाटीने उल्लेखनीय परिणाम मिळू शकतात.

4. गीता महेश्‍वरी

तामिळनाडूमधील थेनी येथील समर्पित शेतकरी गीता महेश्‍वरी गेल्या एक दशकाहून अधिक काळ जमिनीची लागवड करत आहेत. काही वर्षांपूर्वी, ज्‍यांनी प्रोजेक्ट उन्‍नती ग्रेप्स आणि सेन्‍डेक्‍ट केव्‍हीके (CENDECT KVK) अंतर्गत प्रशिक्षण उपक्रमात प्रवेश घेतला, जेथे त्‍यांनी कीटक व्यवस्थापन आणि कीटकनाशकांचा वापर यासह प्रगत शेती तंत्र अवगत केले. यामुळे त्‍यांना स्‍वत:चे उत्‍पन्‍न दुप्पट करण्यास मदत झाली, तसेच लागवडीमध्‍ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

शेतीव्‍यतिरिक्‍त, गीता यांनी केव्हीके सेन्‍डेक्‍टच्या अनुदान योजनेचा लाभ घेत आपल्‍या चिन्‍नावलापुरम गावात लग्नाचा हॉल पीएसपी महल सुरू केला. हा हॉल वंचित कुटुंबांना परवडणाऱ्या दरात सेवा पुरवतो आणि लग्‍न सोहळ्याचा आर्थिक भार हलका करतो. गीता यांच्‍या प्रवासामधून त्‍यांचा वैयक्तिक विकास, तसेच त्‍यांच्‍या समुदायाला सक्षम करण्‍याप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसून येते.

5. खिलानंद जोशी 
वयाच्‍या ७५व्या वर्षी, सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर खिलानंद जोशी आपल्या कुटुंबाचा शेतीचा वारसा पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टीकोनासह उत्तराखंडमधील चंपावत येथील आपल्या गावी परतले. शाश्‍वत शेतीचा कोणताही पूर्व अनुभव नसतानाही त्यांनी प्रोजेक्‍ट उन्‍नती अ‍ॅप्‍पलअंतर्गत सफरचंद शेतीला सुरूवात केली.

अल्‍ट्रा-हाय-डेन्सिटी वृक्षारोपण तंत्र आणि ठिबक सिंचनाच्या साहाय्याने खिलानंद यांनी आपल्या शेताला वैविध्यपूर्ण कृषी केंद्रात बदलले. त्यांच्या प्रयत्‍नांमुळे सरफचंदाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली, तसेच त्‍यांच्‍या समुदायाला आधुनिक कृषीपद्धतींचा अवलंब करण्‍यास प्रेरणा देखील मिळाली. दहा कामगारांना रोजगार देण्‍यासह त्‍यांनी रोजगार व ज्ञानाची देवाणघेवाण करण्‍याची स्‍थानिक परिसंस्‍था निर्माण केली आहे. खिलानंद यांच्‍या उशिरा, पण प्रभावी शुभारंभामधून दिसून येते की जीवनाच्‍या कोणत्‍याही टप्‍प्‍यावर निर्धार व नाविन्‍यतेसह कृषीमध्‍ये यश मिळू शकते.

Web Title: On the occasion of farmers day know the success stories of five farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 08:05 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर
1

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर

Maritime Dispute : जाफना समुद्रात तणाव; श्रीलंकेच्या नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना केली अटक आणि बोटही केली जप्त
2

Maritime Dispute : जाफना समुद्रात तणाव; श्रीलंकेच्या नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना केली अटक आणि बोटही केली जप्त

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?
3

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती
4

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.