Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar SIR: बिहारमधील ‘या’ तीन जिल्ह्यांत सर्वाधिक मते वगळली; २५ जागांवर वगळलेल्या मतांपेक्षा विजयाचा फरक कमी

निवडणूक आयोगाने मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी चार कारणे दिली आहेत, ज्यामध्ये कायमचे स्थलांतरित, मृत, अनुपस्थित आणि आधीच नोंदणीकृत यांचा समावेश आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 26, 2025 | 01:54 PM
Bihar SIR: बिहारमधील ‘या’ तीन जिल्ह्यांत सर्वाधिक मते वगळली; २५ जागांवर वगळलेल्या मतांपेक्षा विजयाचा फरक कमी
Follow Us
Close
Follow Us:
  • बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदान यादीसाठी विशेष सघन सुधारणा
  • बिहारमधील पटना, मधुबनी आणि पूर्व चंपारण जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मते वगळली
  • जिथे मतदारांची संख्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या विजयाच्या फरकापेक्षा जास्त

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदान यादीसाठी विशेष सघन सुधारणा (SIR) करण्याचे काम सुरू आहे. पण यावर विरोधी इंडिया आघाडीकडून जोरदार विरोध होतआहे. त्यातच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीच आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यातच एसआयआरच्या माध्यमातून बिहारमधीस ६५ लाख मते कापली गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या मतचोरीच्या विरोधात आणि एसआयआरच्या विरोधात राहुल गांधी सध्या बिहारमध्ये वोट अधिकार यात्रा करत आहे. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

निवडणूक आयोगाने १८ ऑगस्ट रोजी मतदार यादी जाहीर केली आणि ६५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर बिहारमधील पटना, मधुबनी आणि पूर्व चंपारण जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मते वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वगळण्यात आलेल्या मतामंध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. तसेच, १८ ते ४० वर्षे वयोगटातील मतदार हे वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले आहे.

Aadhaar द्वारे होणार Starlink यूजर्सचं व्हेरिफिकेशन, भारतात लवकरच सुरु होणार सॅटेलाइट इंटरनेट सर्विस!

एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, पटना, मधुबनी आणि पूर्व चंपारण जिल्ह्यांमधून एकूण १०.६३ लाख नावे वगळण्यात आली आहेत, जी राज्यातील ३८ जिल्ह्यांमधील वगळण्यात आलेल्या ६५ लाख मतदारांपैकी १६.३५ टक्के इतकी आहेत. हे तीन जिल्हे बिहारमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चार जिल्ह्यांपैकी आहेत. या तीन जिल्ह्यांमध्ये ३६ विधानसभा जागा आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भाजप-जेडीयू यांच्या युतीने या ३६ जागांपैकी २२ जागा जिंकल्या होत्या, तर विरोधी महाआघाडीने १४ जागा जिंकल्या होत्या.

अहवालानुसार, पटना, मधुबनी आणि पूर्व चंपारण जिल्ह्यातील ३६ जागांपैकी २५ जागा अशा आहेत जिथे मतदारांची संख्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या विजयाच्या फरकापेक्षा जास्त आहे. एनडीए युतीकडे या २५ जागांपैकी १८ जागा आहेत.

निवडणूक आयोगाने मते वगळण्याची दिली चार कारणे

पटना , मधुबनी आणि पूर्व चंपारण जिल्ह्यांमध्ये ४० वर्षांखालील ४.०२ लाख मतदार वगळण्यात आले आहेत, जे या जिल्ह्यांमध्ये काढून टाकण्यात आलेल्या एकूण मतदारांपैकी ३७.८७ टक्के आहे. हे असे मतदार आहेत ज्यांना २००३ च्या मतदार यादीचा भाग नसल्यामुळे एसआयआर दरम्यान नागरिकत्वाचा पुरावा सादर करणे आवश्यक होते. या जिल्ह्यांमध्ये पुरुषांपेक्षा जास्त महिला मतदार वगळण्यात आले. त्यांची संख्या ५.६७ लाख आहे.

Rane Vs Raut : वादग्रस्त वक्तव्य करणं राणेंना भोवणार! संजय राऊतांच्या मानहानीच्या दाव्यावर कोर्टात सुनावणी

निवडणूक आयोगाने मतदार यादीतून नावे वगळण्यासाठी चार कारणे दिली आहेत, ज्यामध्ये कायमचे स्थलांतरित, मृत, अनुपस्थित आणि आधीच नोंदणीकृत यांचा समावेश आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये कायमचे स्थलांतरित मतदारांची सर्वाधिक संख्या ३.९ लाख आहे. त्यानंतर ३.४२ लाख मतदारांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, २.२५ लाख गैरहजर राहिले आहेत आणि १.०४ लाख मतदार इतरत्र नोंदणीकृत आहेत.

 महिलांच्या स्थलांतराची प्रकरणे वाढती; रोजगारासाठी स्थलांतर प्रमुख कारण

बिहारमधील तिन्ही जिल्ह्यांमध्ये महिला मतदारांच्या स्थलांतराची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, महिलांच्या स्थलांतरामागील प्रमुख कारण कायमचे स्थलांतर (पतीच्या घरी जाणे इत्यादी) असून, पुरुष मतदारांमध्ये मृत्यू हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे.मतदारांच्या वर्गीकरणात ‘कायमचे स्थलांतरित’ म्हणजे राज्याबाहेर गेलेले मतदार, ‘नोंदणीकृत स्थलांतरित’ म्हणजे राज्याबाहेरील इतरत्र मतदानासाठी नोंदणीकृत असलेले मतदार, आणि ‘अनुपस्थित’ म्हणजे जे मतदार नोंदणी असलेल्या पत्त्यावर उपलब्ध नाहीत – अशी विभागणी करण्यात आली आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार, स्थलांतराचे सर्वात सामान्य कारण रोजगार होते. बिहारसारख्या राज्यात बाहेरगावी स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या देशातील सर्वाधिक असल्याचेही यातून समोर आले आहे. यामुळे मतदार यादीच्या अद्ययावत तपासणीच्या प्रक्रियेत स्थलांतराच्या या मुद्द्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Patna madhubani and east champaran saw the highest number of votes cut a number that was more than the margin of victory in 25 seats

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • Bihar Elections 2025

संबंधित बातम्या

Bihar Elections 2025:  बिहार निवडणुकीत काय असेल जागावाटपाचा फॉर्म्युला; BJP-JDU मुळे चिराग पासवानांना फटका
1

Bihar Elections 2025: बिहार निवडणुकीत काय असेल जागावाटपाचा फॉर्म्युला; BJP-JDU मुळे चिराग पासवानांना फटका

Bihar Elections 2025 : बिहारच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली तरुणपिढी; तरीही जातिवादाची अडकलीये कडी
2

Bihar Elections 2025 : बिहारच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरली तरुणपिढी; तरीही जातिवादाची अडकलीये कडी

बिहारच्या निवडणुकीचे घोडे अडणार मध्येच? ३० दिवसांत ३ कोटी मतदारांची नावे नोंदणी शक्य आहे का?
3

बिहारच्या निवडणुकीचे घोडे अडणार मध्येच? ३० दिवसांत ३ कोटी मतदारांची नावे नोंदणी शक्य आहे का?

Bihar Election: बिहार जिंकण्यासाठी नितीश कुमारांनी खेळला मोठा डाव; सरकारी नोकरीत महिलांना थेट…
4

Bihar Election: बिहार जिंकण्यासाठी नितीश कुमारांनी खेळला मोठा डाव; सरकारी नोकरीत महिलांना थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.