Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान मोदींनी आज ‘मन की बात’ मध्ये मुंबई हल्ल्यातील शहीदांना वाहिली श्रद्धांजली, संविधान निर्मात्यांचं केलं स्मरण!

आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात कार्यक्रमातुन 26/11 च्या हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली. तसेच संविधान दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 26, 2023 | 03:33 PM
पंतप्रधान मोदींनी आज ‘मन की बात’ मध्ये मुंबई हल्ल्यातील शहीदांना वाहिली श्रद्धांजली, संविधान निर्मात्यांचं केलं स्मरण!
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: आज म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘मन की बात’ (Mann Ki Baat) या रेडिओ कार्यक्रमाद्वारे देशाला संबोधित केले. त्यांच्या मन की बात रेडिओ कार्यक्रमाचा हा १०७ वा भाग होता.  आज पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज २६ नोव्हेंबरची तारीख आहे, जी कधीही विसरता येणार नाही. या दिवशी आपल्या देशावर सर्वात भयंकर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी मुंबईसह संपूर्ण देश हादरवून सोडला होता. त्या हल्ल्यातून आपण सावरलो ही भारताची ताकद आहे आणि आज आपण दहशतवादाला चिरडत आहोत.

[read_also content=”मोहाली-चंदीगड सीमेवर शेतकऱ्यांच आदोलन! ३३ शेतकरी संघटना सहभागी, चंदीगड पोलिसही अलर्ट मोडवर https://www.navarashtra.com/india/farmers-gathered-near-moha-chandigarh-border-483903.html”]

संविधान दिनाच्या दिल्या शुभेच्छा

ते पुढे म्हणाले की, २६ नोव्हेंबर हा दिवस आणखी एका कारणासाठीही खूप महत्त्वाचा आहे. याच दिवशी १९४९ साली संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली होती. मी सर्व देशवासियांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि नागरिकांच्या कर्तव्याला प्राधान्य देऊन आपण सर्व मिळून विकसित भारताचा संकल्प नक्कीच पूर्ण करू.

Speaking on a wide range of topics in #MannKiBaat. Do listen! https://t.co/KnDs7iRYoS — Narendra Modi (@narendramodi) November 26, 2023

आज पंतप्रधान मोदी म्हणाले की, जेव्हा प्रत्येकजण राष्ट्र उभारणीत सहभागी होतो, तेव्हाच प्रत्येकाचा विकास होऊ शकतो. संविधान निर्मात्यांच्या याच द्रष्टेपणाला अनुसरून भारताच्या संसदेने आता ‘नारी शक्ती वंदन कायदा’ संमत केला आहे, याचे मला समाधान आहे.

वोकल फॉर लोकलबाबत ते म्हणाले की, दिवाळी, भाऊबीज आणि छठ या सणांवर गेल्या काही दिवसांत देशात ४ लाख कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय झाला असून या काळात बनवलेल्या वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. व्होकल फॉर लोकलची ही मोहीम संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करते.

आज, वाढत्या डिजिटल पेमेंटबद्दल बोलताना ते म्हणाले की, दिवाळीच्या निमित्ताने रोख पैसे देऊन काही वस्तू खरेदी करण्याचा ट्रेंड हळूहळू कमी होत असताना हे सलग दुसरे वर्ष आहे. म्हणजेच आता लोक अधिकाधिक डिजिटल पेमेंट करत आहेत. हे देखील खूप कौतुकास्पद आहे.

स्वच्छ भारत अभियानाबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, या मोहिमेने स्वच्छता आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत लोकांची विचारसरणी बदलली आहे. हा उपक्रम आज राष्ट्रीय भावनेचे प्रतीक बनला आहे, ज्यामुळे करोडो देशवासीयांचे जीवन सुधारले आहे. या मोहिमेने समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांना, विशेषतः तरुणांना मोठ्या प्रमाणात सहभागासाठी प्रेरित केले आहे.

यासोबत कोईम्बतूर येथे राहणारे लोगनाथन यांचे उदाहरण देताना ते म्हणाले की, तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे राहणारे लोगनाथन जी देखील अतुलनीय आहेत.त्यांच्या लहानपणी गरीब मुलांचे फाटलेले कपडे पाहून ते अनेकदा अस्वस्थ व्हायचे. यानंतर, त्यांनी अशा मुलांना मदत करण्याची शपथ घेतली आणि त्यांच्या कमाईचा एक भाग त्यांना दान करण्यास सुरुवात केली. जेव्हा पैशाची कमतरता होती तेव्हा लोगनाथन जी यांनी लोकांची शौचालये देखील स्वच्छ केली, जेणेकरून गरजू मुलांना मदत करता येईल.

जलसुरक्षेवर चर्चा करताना ते म्हणाले की, 21 व्या शतकातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे जलसुरक्षा. पाणी वाचवणे हे जीवन वाचवण्यापेक्षा कमी नाही.ज्यावेळी आपण सामूहिकतेच्या भावनेने कोणतेही कार्य करतो तेव्हा आपल्याला यशही मिळते. त्याचे उदाहरण म्हणजे देशातील प्रत्येक जिल्ह्यात उभारण्यात येत असलेला ‘अमृत सरोवर’.

‘मन की बात’ रेडिओ कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शन, आकाशवाडी न्यूज वेबसाइट, न्यूजऑनएअर मोबाइल अॅप आणि नरेंद्र मोदी मोबाइल अॅपच्या संपूर्ण नेटवर्कवर प्रसारित केला जातो. याशिवाय हा कार्यक्रम ऑल इंडिया रेडिओ न्यूज, डीडी न्यूज, पीएमओ आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रसारित केला जातो. 

Web Title: Prime minister modi today paid tribute to the martyrs of the mumbai attacks in mann ki baat nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2023 | 03:33 PM

Topics:  

  • All India Radio
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

PM Modi : भारताचा सर्वात मोठा सांस्कृतिक विजय! नेदरलँड्सने PM मोदींना परत केला 1000 वर्षांनंतर चोळ साम्राज्याचा ‘हा’ अमूल्य ठेवा
1

PM Modi : भारताचा सर्वात मोठा सांस्कृतिक विजय! नेदरलँड्सने PM मोदींना परत केला 1000 वर्षांनंतर चोळ साम्राज्याचा ‘हा’ अमूल्य ठेवा

Aarthik Deshbhakti आता सिनेसृष्टीत! कमल हासन स्पष्ट शब्दातच बोलले, देशभरातील Filmmakers ला केले आवाहन
2

Aarthik Deshbhakti आता सिनेसृष्टीत! कमल हासन स्पष्ट शब्दातच बोलले, देशभरातील Filmmakers ला केले आवाहन

PM Modi:आता भारत मागे हटणार नाही! मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्याने भारताला मिळणार ‘ग्रीन हायड्रोजन,सेमीकंडक्टर’ची ताकद
3

PM Modi:आता भारत मागे हटणार नाही! मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्याने भारताला मिळणार ‘ग्रीन हायड्रोजन,सेमीकंडक्टर’ची ताकद

PM Modi: भारताकडे नेहमीच राहणार 30 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा साठा; मोदींचा UAE सोबत ‘असा’ महाकारार, भारताला मिळालं कवच
4

PM Modi: भारताकडे नेहमीच राहणार 30 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा साठा; मोदींचा UAE सोबत ‘असा’ महाकारार, भारताला मिळालं कवच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.