Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, वांद्रे चेंगराचेंगरीनंतर रेल्वेचा नवा आदेश जारी

वांद्रे टर्मिनस येथे नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीनंतर काही दिवसांनी पश्चिम रेल्वेने नवा आदेश जारी केला आहे. तुम्ही जर पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 30, 2024 | 02:05 PM
पनवेल रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी; ऐनवेळी रेल्वे गाड्यांचे प्लॅटफॉर्म बदलल्याने एकच धावपळ

पनवेल रेल्वे पुलावर चेंगराचेंगरी; ऐनवेळी रेल्वे गाड्यांचे प्लॅटफॉर्म बदलल्याने एकच धावपळ

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर रविवारी (30 ऑक्टोबर) सकाळी गोरखपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्याच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 9 जण जखमी झाले होते. याचपार्श्वभूमीवर आता वांद्रे टर्मिनस येथे नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीनंतर काही दिवसांनी पश्चिम रेल्वेने नवा आदेश जारी केला आहे. त्यात म्हटले आहे की, प्रवाशांचे सामान त्यांच्या संबंधित प्रवासी वर्गासाठी अनुज्ञेय आणि विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्यांना दंड आकारला जाईल. रेल्वेनेही लोकांना स्थानकांवर गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान दररोज सुमारे २.५ कोटी लोक रेल्वेने दररोज प्रवास करत असतात. वाहतुकीसाठी भारतीयांची पहिली पसंती रेल्वे आहे. देशातील सर्व प्रमुख शहरे रेल्वे नेटवर्कशी जोडलेली असल्यामुळे आणि कमी भाडे यामुळे लोक प्रवासासाठी ट्रेनला प्राधान्य देतात. रेल्वे प्रवासी रेल्वेच्या डब्यातही सामान घेऊन जाऊ शकतात. पण, सामानाचे वजन आणि आकारही ठरलेला असतो. विहित वजन आणि आकारापेक्षा जास्त सामान घेऊन डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दंड होऊ शकतो. अनेकवेळा लोकांना चालत्या ट्रेनमध्ये गैरसोयीचा सामना करावा लागतो. याचपार्श्वभूमीवर रेल्वेकडून नवा आदेश जारी करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा: पेट्रोल आणि डिझेल ५ रुपयांनी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्‍यांकडून दिवाळीचं मोठ गिफ्ट

रेल्वेच्या नियमांनुसार वेगवेगळ्या श्रेणीतील रेल्वे प्रवासी 40 किलो ते 70 किलो वजनाचे सामान त्यांच्यासोबत रेल्वेच्या डब्यात ठेवू शकतात. रेल्वेने डब्यानुसार वजन निश्चित केले आहे. स्लीपर क्लासमध्ये प्रवासी 40 किलो वजन उचलू शकतात. एसी टू टायरमध्ये ५० किलोपर्यंत सामान नेण्यासाठी भत्ता आहे. फर्स्ट क्लास एसीमध्ये, प्रवासी कोचमध्ये ७० किलोपर्यंतचे सामान सोबत घेऊन जाऊ शकतात. प्रवाशांचे सामान निर्दिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असल्यास रेल्वे त्यांच्याकडून अतिरिक्त शुल्क आकारू शकते. वजनाबरोबरच सामानाचा आकारही ठरलेला असतो. 100 सें.मी. X 60 सेमी. X 25 सेमी. ट्रंक, सूटकेस आणि बॉक्सेस (लांबी X रुंदी X उंची) आकाराचे वैयक्तिक सामान म्हणून प्रवासी डब्यात नेण्याची परवानगी आहे.

नेमकी प्रकरण काय?

27 ऑक्टोबरला पहाटे 5.56 वाजता वांद्रे रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी घटना घडली. 22921 वांद्रे-गोरखपूर अंत्योदय एक्सप्रेसमध्ये चढण्यासाठी वांद्रे टर्मिनलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते. दिवाळी आणि छठ सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी केली होती. रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व 22 सामान्य वर्गाचे डबे असलेली रिकामी अंत्योदय एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आणली जात होती.

हे सुद्धा वाचा: सायबर चोरट्यांनी हॉस्पिटलच्या बँक खात्यातून चोरले 29 लाख रुपये , ई-मेलही केला हॅक

ट्रेनची वाट पाहणाऱ्या प्रवाशांनी गाडीत चढण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली. ट्रेन नुकतीच यार्डातून फलाटावर आणली होती आणि बोगीचे दरवाजे आतून बंद होते. काही लोक ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्लॅटफॉर्मवर पडले. सुरुवातीला असे दिसते की, लोक बोगीला आदळल्याने या दोन बोगींमधील लोक प्लॅटफॉर्मवर पडले. ‘सामान्यत: ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबल्यानंतर बोगींचे दरवाजे उघडले जातात आणि त्यानंतर प्रवासी ट्रेनमध्ये चढतात.’

Web Title: Western railway on now there is a limit on carrying luggage on the train decision after bandra stampede

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 01:08 PM

Topics:  

  • Indian Railways
  • Western Railway

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल, जानेवारीपासून बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावणार २२ नवीन लोकल
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल, जानेवारीपासून बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावणार २२ नवीन लोकल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.