Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर कडाडले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडलं

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दररोज सरासरी २५० ते ३०० भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक असते. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

  • By Swapnil Jadhav
Updated On: Sep 29, 2020 | 10:03 AM
vegitable price hike

vegitable price hike

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या आठवडय़ात जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे भाज्यांच्या मळ्यांचे अतोनात नुकसान झाले. परिणामी मुंबई आणि ठाण्याकडे होणारी भाज्यांची आवक मंदावली आणि त्याची परिणती दरवाढीत झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये  (APMC market) आज केवळ १०० ते १२० गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे भाज्यांच्या दरातही मोठी (prices of vegetables) वाढ झाली आहे.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दररोज सरासरी २५० ते ३०० भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक असते. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे भाज्यांच्या गाड्यांची आवक कमी झाली आहे. परिणामी दुसरीकडे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. प्रत्येक भाजीचे दर हे १० ते २० रुपये प्रति किलोने वाढले आहेत. तसेच पालेभाज्यासुद्धा महागल्या आहेत.

सध्या नवी मुंबईत टोमॅटोचे दर हे ३५ ते ४० रुपये किलो असून किरकोळ बाजारात टोमॅटोची विक्री ५० ते ६० रुपये प्रतिकिलो सुरु आहे. तर शेवगा ६० ते ७० रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. आधी लॉकडाऊन आणि आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे.

कांद्याचे भावही गगनाला भिडले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचे दर २९ रुपये ते ४० रुपयांवर गेले आहेत. किरकोळ बाजारात कांद्याचे दर ४० वरुन ६० रुपये किलो झाला आहे. तसेच बटाट्याच्या किंमतीमध्येही १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे.

भाज्या  घाऊक   किरकोळ

भेंडी      ४०        ८०

गवार     ५०        १२०

फरसबी ७०        १२०

फ्लाँवर  २८          १२०

कोबी    १८           ६०

टोमॅटो    ४०         ८०

वाटाणा   १५०        ३००

वांगी        २५         ६०

शिमला मिरची ४०  ६०

पडवळ           ४०    १००

पालेभाज्या (जुडीचे दर)

भाजी    घाऊक     किरकोळ

मेथी        २०            ३०

पालक     १५            २०

शेपू         २०             ३०

कोथिंबीर ४५             ५०

Web Title: In the apmc market the prices of vegetables have gone up and the budget of the common man has collapsed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2020 | 10:03 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.