
तुळशीचं महत्त्व हे फार मोठं आहे. आयुर्वेदापासून ते धार्मिक. अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचं आणि पूजनीय मानलं जातं. असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात तुळशीचे रोप लावावे. त्यामुळेच अनेक भारतीयांच्या घरी तुळशीचं रोपटं असतंच. भगवान महाविष्णूला (Lord Vishnu) तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. तसेच तुळशीशिवाय श्री हरी विष्णूलाही नैवेद्य प्राप्त होत नाही. जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार तुळशीचं महत्त्व.
इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा सांगतात की, घरात तुळशीचे रोप लावल्याने सुख, समृद्धी आणि संपत्तीची कमतरता कधीच येत नाही. तुळशीचे काही अतिशय सोपे उपाय आहेत जे आपल्या अनेक समस्यांवर मात करू शकतात. त्याविषयी जाणून घेऊया.