Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vastu Tips: घरात करू नका या चुका, अन्यथा वाढू शकतात आर्थिक अडचणी

वास्तुशास्त्राच्या नियमांचे पालन केल्याने घरात सुख समृद्धी टिकून राहते. मात्र काही चुका केल्यास आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कोणत्या चुका करणे टाळले पाहिजे ते जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Feb 20, 2026 | 03:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • घरात करू नका या चुका
  • आर्थिक अडचणी वाढू शकतात
  • कोणत्या चुका करू नये
 

वास्तुशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. घरात या नियमांचे पालन केल्यास घरात सुख-समृद्धी टिकून राहते. मात्र दैनंदिन जीवनात आपल्याकडून नकळत काही चुका होतात. दैनंदिन जीवनात आपण नकळत काही अशा चुका करतो, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार घरातील या चुकांमुळे जीवनातील आर्थिक अडचणी वाढतात, त्यामुळे घरात या चुका करणे टाळावे. कोणत्या आहेत त्या चुका, जाणून घ्या

ताटात हात धुणे

जेवण झाल्यानंतर ताटातच हात धुण्याची सवय अनेकांना असते. वास्तुशास्त्रानुसार अन्न हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. जेवण झाल्यानंतर ताटात हात धुतल्याने अन्नाचा अपमान होतो असे म्हणतात. यामुळे घरात संपत्तीचा प्रवाह रोखला जातो. त्यामुळे हात वेगळ्या जागी धुणे अधिक योग्य मानले जाते.

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

बंद घड्याळ

बंद किंवा खराब घड्याळ घरात ठेवणे हे प्रगती थांबण्याचे प्रतीक मानले जाते. वेळ ही प्रगती आणि संधीचे प्रतीक आहे. घरात बंद घड्याळ ठेवणे हे आर्थिक अस्थिरतेचे लक्षण मानले जाते. त्यामुळे घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नये. असे घड्याळ त्वरित दुरुस्त करावे किंवा काढून टाकावे.  घरामध्ये बंद घड्याळ ठेवल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

बेडवर घाण कपडे ठेवणे

ज्या घरात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते, तिथे सकारात्मक ऊर्जा कमी होते. यामुळे आर्थिक नुकसान होते. बेडरूम ही विश्रांती आणि सकारात्मक उर्जेची जागा मानली जाते. बेडवर घाण कपडे ठेवणे किंवा अस्ताव्यस्तपणा ठेवणे यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. याचा परिणाम मानसिक ताण आणि आर्थिक अस्थिरतेवर होऊ शकतो.

Dhanshakti Rajyog 2026: 23 फेब्रुवारीपासून तयार होत आहे धनशक्ती योग, या राशीच्या लोकांवर मंगळ आणि शुक्र ग्रहाचा राहील आशीर्वाद

मुख्य दार

मुख्य दारातून घरात सकारात्मक ऊर्जा येत असते. त्यामुळे घराच्या मुख्य दाराजवळ घाण, तुटलेल्या वस्तू, अडगळीचे सामान ठेवू नये. या वस्तू दाराजवळ असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. त्यामुळे मुख्य दार स्वच्छ आणि मोकळे ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आर्थिक समस्या वाढण्याची शक्यता असते.

सुकलेली रोपे

घरात अनेकांना सुकलेली रोपे ठेवण्याची सवय असते. पण घरात ते ठेवल्यानेयामुळे घरातील वातावरणावर नकारात्मक परिणाम होतो आणि आर्थिक अडचणी वाढू शकतात. सुकलेली रोपे त्वरित काढून टाकून ताजी, हिरवीगार रोपे लावावीत. निराशा जाणवते आणि आर्थिक अडचणी येतात.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वास्तुशास्त्रानुसार घरातील चुका आर्थिक अडचणी वाढवू शकतात का?

    Ans: वास्तुशास्त्रानुसार घरातील ऊर्जा, स्वच्छता आणि वस्तूंची मांडणी यांचा मानसिकता व प्रगतीवर परिणाम होतो, अशी श्रद्धा आहे. नकारात्मक ऊर्जा वाढल्यास आर्थिक स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते.

  • Que: आर्थिक स्थैर्यासाठी आणखी कोणते साधे उपाय करता येतील?

    Ans: घर नियमित स्वच्छ ठेवणे, तुटलेल्या वस्तू दुरुस्त करणे किंवा काढून टाकणे, मुख्य दरवाजाजवळ प्रकाश ठेवणे, सकारात्मक विचार आणि शिस्त राखणे

  • Que: सुकलेली रोपे घरात ठेवणे योग्य आहे का?

    Ans: सुकलेली किंवा कोमेजलेली रोपे निराशा आणि अडथळ्यांचे प्रतीक मानली जातात. त्यामुळे अशी रोपे त्वरित काढून टाकून हिरवीगार रोपे लावणे शुभ मानले जाते.

Web Title: Vastu tips do not make these mistakes at home they can increase financial problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • vastu news
  • Vastu Shastra
  • Vastu Tips

संबंधित बातम्या

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब
1

Vastu Tips: नोकरीत अडथळे येत आहेत का? घरात ‘ही’ मूर्ती ठेवल्याने बदलेल तुमचे नशीब

Vastu Tips: पायऱ्यांखाली ठेवा या वस्तू, घरात राहील सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा
2

Vastu Tips: पायऱ्यांखाली ठेवा या वस्तू, घरात राहील सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.