Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापूर शहरासाठी उजनीतून पाच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरूवात

सोलापूर, पंढरपूर ,मंगळवेढा ,सांगोला आदी शहरे व भीमा नदी काठावरील गावे व वाड्यावस्त्यावरील नागरिक व पशुधनाच्या पिण्यासाठी म्हणून उजनी धरणातून 5 हजार  क्युसेक्स विसर्गाने मंगळवारी 19 सप्टेंबर पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती जलसंपदा सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.

  • By Aparna
Updated On: Sep 19, 2023 | 06:32 PM
सोलापूर शहरासाठी उजनीतून पाच हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यास सुरूवात
Follow Us
Close
Follow Us:
टेंभुर्णी : सोलापूर, पंढरपूर ,मंगळवेढा ,सांगोला आदी शहरे व भीमा नदी काठावरील गावे व वाड्यावस्त्यावरील नागरिक व पशुधनाच्या पिण्यासाठी म्हणून उजनी धरणातून 5 हजार  क्युसेक्स विसर्गाने मंगळवारी 19 सप्टेंबर पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती जलसंपदा सोलापूर विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे.
सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारे औंज टाकळी व चिंचपूर या बंधाऱ्यातील पाणीसाठा एक ते दोन ऑक्टोबर पर्यंत पुरेल असा अंदाज असून पुढील नियोजनासाठी उजनीतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्तानी केली आहे, त्याचप्रमाणे पंढरपूर मंगळवेढा व सांगोला आदि नगरपालिकांनी देखील पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली आहे. उजनी धरण ते टाकळी बंधारा हे अंतर 232 किलोमीटर अंतर असून पाच हजार क्यूसेक्स वीसर्गाने सोडलेले पाणी या बंधाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी दहा ते अकरा दिवस लागतात. त्यानुसार नियोजन करून 19 सप्टेंबरला दुपारी दोन वाजल्यापासून प्रथम सोळाशे क्यूसेक्स पाणी वीजनिर्मितीकक्षाद्वारे व सायंकाळपर्यंत धरणाच्या आठ दरवाजातून 3हजार400क्युसेक्स याप्रमाणे एकूण पाच हजार क्युसेक्स पाणी भीमा नदी पात्रात सोडण्यास प्रारंभ केला असल्याची माहिती धरण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत माने यांनी दिली आहे.
2023 च्या पावसाळ्याचे तीन महिने संपले असले तरी समाधानकारक पाऊस नाही ,त्यामुळे उजनी धरणात सध्या फक्त 23 टक्के पाणी असून 76 टीएमसी पाणीसाठा आहे व पाणी पातळी 492 मीटर असून येणारा विसर्ग फक्त 594 क्युसेक्स आहे .पिण्यासाठी म्हणून भीमा नदीत 11 दिवसात किमान पाच ते सहा टीएमसी पाणी सोडले जाणार आहे, त्याचप्रमाणे कालवा ,बोगदा ,सीनानदी ,सीना- माढा व दहिगाव योजना यांच्या लाभक्षेत्रातील गावे  व वाड्यावस्त्यांना देखील पिण्यासाठी पाणी कमी पडू लागले आहे व त्यांच्यासाठी देखील पाणी सोडण्यात यावे अशी लाखो नागरिकांची मागणी होऊ लागली आहे. याबाबत जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी  विचार करून उजनी धरणाच्या सर्व विसर्गस्रोतातून तातडीने पाणी सोडावे अशी लाखो नागरिकांची जास्त मागणी होत आहे.

Web Title: 5000 cusecs of water released from ujni for solapur city nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2023 | 06:32 PM

Topics:  

  • Tembhurni

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.