
जिल्ह्यात विषबाधेचा धोका वाढला; 17 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू
अकोला : पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांची वाढ अपेक्षेप्रमाणे न झाल्याने पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी कपाशी, सोयाबीन, तूर यासह विविध पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्यात व्यस्त आहेत. मात्र, फवारणी करताना आवश्यक खबरदारी न घेतल्याने शेतकरी व शेना विद्याधी होण्याच्या पटना वाढत आहेत. अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ३१ आणि ३२ मध्ये सध्या विषचाधेच्या १७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी व शेतमजूर आवश्यक संरक्षक साधनांचा वापर करीत नसल्याने विषबाधेच्या घटना घडत आहेत. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयात दर आठवड्याला दोन ते तीन विपचाधित रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. सध्या खरीप हंगामातील कपाशीची झाडे चार ते पाच फुटांपर्यंत वाढली असून, दाट पिकांमध्ये फवारणी करताना कीटकनाशकाचे द्रावण शरीराच्या थेट संपर्कात येण्याचा धोका वाढला आहे.
दरम्यान, फवारणी करताना मास्क, हातमोजे, चष्मा व शरीर झाकणारे कपडे यांसारख्या संरक्षक साधनांचा वापर न केल्याने कीटकनाशक नाक, डोळे आणि त्वचेच्या संपर्कात येते. परिणामी, विषबाधेच्या घटना घडत आहेत.
विषबाधा झालेल्यांची वाढतेय संख्या
गेल्या काही दिवसांपासून फवारणीतून विषबाधा इवलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी व शेतमजुरांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.
– डॉ. संजय सोनुने, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला,
शेतकऱ्यांनी पिकांवर फवारणी करताना पूर्ण शरीर झाकेल एवढे शार्ट घालावे, लांब पायघोळ, हातमोजे आणि बुट वापरावा, मास्क आणि डोक्यावर टोपी किंवा गमछा डोळ्यांसाठी गॉगल वापरा, फवारणी करताना तंबाखू, किया इतर बासन करू नये, यादरम्यान उलट्या, मळमळ किया पोटात काही दुखत असल्यास तातळीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
– नितीन सपकाळ, रुग्ण कल्याण समिती सदस्य, अकोला.