Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Heat Wave in Maharashtra: राज्यात उष्माघातामुळे 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि अनेक भागात कडक उन्हाळा जाणवत आहे. मात्र सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाने उद्रेक मांडला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 11, 2025 | 05:47 PM
Heat Wave in Maharashtra: राज्यात उष्माघातामुळे 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

Heat Wave in Maharashtra: राज्यात उष्माघातामुळे 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?

Follow Us
Close
Follow Us:

बुलढाणा: राज्यात सध्या उन्हाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. अनेक जिल्ह्यांत तापमान 45 अंशापेक्षा जास्त पाहायला मिळत आहे. दरम्यान महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. बुलढाणा जिल्ह्यात 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

उष्माघाताने मृत्यू झालेला 11 वर्षांचा विद्यार्थी शेगाव येथे शिक्षण घेत असल्याचे समजते आहे. कडक उन्हाचा या विद्यार्थ्याला त्रास झाला. त्यानंतर उपचारांसाठी त्याला अकोला येथील रूग्णालयात घेऊन जात असताना त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे.

चंद्रपूरमध्ये देखील वाढले तापमान

चंद्रपूर जिल्ह्यात देखील तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चंद्रपूरमध्ये तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. वाढत्या उषणेमुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मालेगावमध्ये देखील उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्र तापला! ‘या’ भागात पारा 45 अंशाच्या पुढे

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि अनेक भागात कडक उन्हाळा जाणवत आहे. मात्र सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाने उद्रेक मांडला आहे. अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्याचे चित्र दिसून येत आहे. जळगाव, भुसावळ भागात उष्णतेची लाट दिसून येत आहे. भुसावळ तालुक्यात तापमान 45 अंशावर जाऊन पोचले आहे.

45 अंश तापमान हे सध्या राज्यातील सर्वाधिक तापमान मानले जात आहे. राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट असण्याचा अंदाज आहे. उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. तापमान वाढलेले असल्याने नागरिकांनी घराबाहेर जाण्याचे टाळले आहे. सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Heat Wave in Maharashtra: महाराष्ट्र तापला! ‘या’ भागात पारा 45 अंशाच्या पुढे, कोणत्या जिल्ह्यांत हायअलर्ट

तापमान 3 अंश सेल्सिअसने वाढणार
उत्तरेकडून उष्ण वारे येण्यास सुरुवात झाल्याने राज्यातील तापमान वाढले आहे. अकोल्यात सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक शहरातील तापमान 40 अंशाच्यावर गेले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअस वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा
यंदाच्या मोसमातील 44.2 अंश सेल्सिअस इतकी उच्चांकी तापमान अकोल्यात नोंदवण्यात आली. अकोल्यात सर्वाधिक 43.2 तापमानाची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसांत तापमानात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर निघताना काळजी घ्यावी.

Web Title: Eleven years student death in shegaon buldhana because of heat stroke maharashtra weather update news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2025 | 05:47 PM

Topics:  

  • Maharashtra Weather

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांचे पीक अन् मेहनत गेली वाहून…! सरकारने पूरग्रस्तांची तातडीने मदत करावी हीच अपेक्षा
1

शेतकऱ्यांचे पीक अन् मेहनत गेली वाहून…! सरकारने पूरग्रस्तांची तातडीने मदत करावी हीच अपेक्षा

“अतिवृष्टीग्रस्तांचे सरसकट पंचनामे करत तातडीने मदत करा, अन्यथा.. खासदार प्रणिती शिंदे यांचा इशारा
2

“अतिवृष्टीग्रस्तांचे सरसकट पंचनामे करत तातडीने मदत करा, अन्यथा.. खासदार प्रणिती शिंदे यांचा इशारा

Sharad Pawar News : अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नव्हती…; माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला दिला मोठा सल्ला
3

Sharad Pawar News : अशी अतिवृष्टी याआधी पाहिली नव्हती…; माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी राज्य सरकारला दिला मोठा सल्ला

बुलडाण्यात मुसळधार पाऊस; शिरपूर येथे तासाभरात 75 मिमी पावसाची नोंद, शेतात पाणीच पाणी
4

बुलडाण्यात मुसळधार पाऊस; शिरपूर येथे तासाभरात 75 मिमी पावसाची नोंद, शेतात पाणीच पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.