Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jitendra Awhad News: राजीव कुमार निवडणूक आयुक्त झाले आणि त्यांनी निवडणुकांची वाट लावली…; जितेंद्र आव्हाडांनी तोफ डागली

तुम्हाला एवढ स्पष्ट बहुमत असताना त्यांनी मागेल त्याला आरक्षणाचं आश्वासन देऊन ठेवलं आहे. तुला आरक्षण.... तुला आरक्षण..... करता करता सगळ्या समाजात त्यांनी द्वेष निर्माण केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 13, 2025 | 02:52 PM
Jitendra Awhad News:

Jitendra Awhad News:

Follow Us
Close
Follow Us:
  • राजीव कुमारांनी निवडणुकांची वाट लावली
  • आज देशातील बहुतांश लोकसंख्या मांसाहारी असेल तर मांसविक्री बंद का
  • तुमच्यात हिंमत असेल तर प्रत्येकाला आरक्षणाचा कायदा पारित करून दाखवा

Jitendra Awhad News: “राजीव कुमार या इसमाला निवडणूक आयुक्त म्हणून नेमलं आणि त्यानंतर निवडणुकांची वाट लावली. या सर्व मतचोरीच्या प्रकारामध्ये निवडणूक आयोगाचाही सहभाग होता. सध्या निवडणूक आयोग हा पूर्णपणे कॉम्प्रोमाईज झालेला आहे.” अशा सडेतोड शब्दांत शरद पवारांच्या नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, निवडणूक आयोग आणि काही सामाजिक प्रश्नांवर जोरदार टीका केली.

आव्हाड म्हणाले की, “३८ वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशानुसार कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय आहे, पण महाराष्ट्रातील बहुतांश लोकसंख्या मांसाहारी आहेत. आपण सर्वजण मांसभक्षक आहोत आणि अचानक ब्राह्मणवाद आणण्याचा प्रयत्न होतोय. कुठलाही सण-उत्सव बकरा कापून साजरा होतो, हे सत्ताधारी पक्षातील एका नेत्यानेच पूर्वी म्हटलं होतं,” असं आव्हाड यांनी स्पष्ट केलं. जर ते स्वत: बोलत असतील ते हे सर्व का सुरू आहे. मांसविक्री का बंद ठेवली जातआहे, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पण त्यांना समाजात द्वेष पेटवत ठेवायचा आहे. याला काही अर्थ नाही.

Tejashwi Yadav: तेजस्वी यादव यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप, म्हणाले मंताची होत आहे चोरी

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत आव्हाड यांनी सांगितले की, ” बीबीडी हा अडकलेला प्रकल्प मी गृहनिर्माण मंत्री असताना आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही हा प्रकल्प सुरू केला. तिथेच भूमीपुजन झालं. आज तिथे ७२ मजली इमारती उभ्या राहत आहेत. त्याचं मला श्रेय घ्यायच नाही.आता मी मंत्री नाही, ज्यांनी केलय त्यांनी श्रेय घ्यावं. पण मी जे केलं केल. विरोधासाठी विरोध करणे हा माझा स्वभाव कधीच नव्हता.” दादर कबुतरखाना वादावरही त्यांनी भूमिका मांडली. “हा विषय अनावश्यकपणे ताणला जातोय. एखाद्या समाजाने इतकी आग्रही भूमिका घेणं हे समाजहिताचे नाही,” असे ते म्हणाले.

जरांगे पाटील यांच्याबाबत विचारले असता आव्हाड म्हणाले, तुम्हाला एवढ स्पष्ट बहुमत असताना त्यांनी मागेल त्याला आरक्षणाचं आश्वासन देऊन ठेवलं आहे. तुला आरक्षण तुला आरक्षण करता करता सगळ्या समाजात त्यांनी द्वेष निर्माण केला. तुमच्यात जर हिंमत, ताकद आहे तर लोकसभेत कायदा पारित करा ना, जर तुम्ही निवडणूक आयोगाच्या निवड समितीची रचना बदलू शकता तर तुम्हाला किती वेळ लागेल द्या ७० टक्के आरक्षण. बिहार मधील जातिगणना काय दाखवते, बहुजनांची संख्या ही ८०-८५ टक्क्यांहून अधिक आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, हे वाक्य आजही भारतात लागू करून दाखवा. जे समाज स्वातंत्र्य काळापासून मुख्य प्रवाहापासून लांब आहेत, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे.

India Rain News: ‘या’ राज्यांना अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा; IMD च्या अलर्टने वाढवले टेन्शन

केंद्र सरकारवर टीका करताना आव्हाड यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा उल्लेख केला. “जेव्हा ट्रम्पला रोखायला हवे होते, तेव्हा मोदी त्यांच्या प्रचारासाठी गेले होते,” असा आरोप त्यांनी केला. संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले, “संजय गायकवाड हे महान तत्वज्ञ आहेत. त्यांच्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्याने काही बोलणं योग्य नाही.”

 

 

Web Title: Ever since rajiv kumar became the election commissioner he has been waiting for elections jitendra awhads criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 02:52 PM

Topics:  

  • Jitendra Awhad

संबंधित बातम्या

Jitendra Awhad on Tuljabhavani Mandir: तुळजाभवानी मंदिराचा गाभारा पाडण्याचा डाव कुणाचा…?; आव्हाडांचा गौप्यस्फोट
1

Jitendra Awhad on Tuljabhavani Mandir: तुळजाभवानी मंदिराचा गाभारा पाडण्याचा डाव कुणाचा…?; आव्हाडांचा गौप्यस्फोट

Thane News : निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी…, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आक्रमक भूमिका
2

Thane News : निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी…, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची आक्रमक भूमिका

Jitendra Awhad News: शिरसाट, कोकाटेंनंतर आता जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान; सनातन धर्म नावाचा कोणताही धर्म नव्हता….’
3

Jitendra Awhad News: शिरसाट, कोकाटेंनंतर आता जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त विधान; सनातन धर्म नावाचा कोणताही धर्म नव्हता….’

एकेकाळी विधिमंडळात शिस्त होती, पण आता…; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
4

एकेकाळी विधिमंडळात शिस्त होती, पण आता…; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.