Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aurangzeb Tomb: औरंगजेबाचे थडगे हटवणार…! फडणवीसांच्या मनात नेमकं चाललंय काय?

27 वर्षे मराठ्यांविरुद्ध लढल्यानंतर औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे 1707 मध्ये, 89 व्या वर्षी झाला. त्याच्या इच्छेनुसार त्याच्या गुरूच्या कबरीजवळच त्याचे अंतिम स्थान करण्यात आले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 09, 2025 | 10:58 AM
Aurangzeb Tomb: औरंगजेबाचे थडगे हटवणार…! फडणवीसांच्या मनात नेमकं चाललंय काय?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:   समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी अचानक औरंगजेबाच्या समर्थनार्थ विधान करत त्याची स्तुती केली. त्यानंतर आझमींवर निलंबनाची कारवाई झाली असली तरी, त्यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले आहे.  त्यांच्या या भूमिकेमागे कोणते राजकीय हेतू आहेत, याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून, यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

तर दुसरीकडे ‘छावा’ चित्रपटाचाही लक्षणीय प्रभाव दिसून येऊ लागला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या हौतात्म्याची ऐतिहासिक नोंद असली, तरी मागील 300-350 वर्षांत औरंगजेबाच्या थडग्याबाबत कोणतीही ठोस मागणी झाली नव्हती. मात्र, या चित्रपटानंतर  भाजपासह अनेक हिंदू संघटना औरंगजेबाचे थडगे हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मोठी बातमी ! एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का; तब्बल 250 कर्मचाऱ्यांची ठाकरेंच्या भारतीय कामगार सेनेत ‘घरवापसी’

 या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली असून, त्यामुळे राजकीय आणि सामाजिक पातळीवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. श्री गुरु तेग बहादूर जी महाराज यांच्या 350 व्या शहीद वर्षाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना औरंगजेबाच्या थडग्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले, ज्यामुळे हा विषय अधिकच चिघळला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या थडग्याबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करत काँग्रेसवर गंभीर आरोप केला. त्यांनी सांगितले की, ही कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली आणि ती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या (ASI) संरक्षणाखाली आहे. त्यामुळे आता काँग्रेसची भूमिका स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pune crime news: भर चौकात अश्लील वर्तन; गौरव अहुजासह साथीदाराला अटक

औरंगजेबाची कबर हटवणार?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. घाईघाईने कोणतेही पाऊल उचलता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी ‘ही कबर किती दिवस राहते, ते पाहा’ असे सूचक वक्तव्य करत भविष्यातील घडामोडींना चालना दिली आहे.

औरंगजेबाचा मृत्यू आणि त्याची कबर

27 वर्षे मराठ्यांविरुद्ध लढल्यानंतर औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे 1707 मध्ये, 89 व्या वर्षी झाला. त्याच्या इच्छेनुसार त्याच्या गुरूच्या कबरीजवळच त्याचे अंतिम स्थान करण्यात आले. सुफी संत शेख झैनुद्दीन यांच्या दर्गा परिसरात खुलताबाद येथे ही कबर असून, त्यासाठी त्याने मृत्यूपत्रात 14 रुपये 12 आणे खर्चाच्या सूचनाही दिल्या होत्या.

Web Title: Fadnavis response to demands to remove aurangzebs tomb nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 10:56 AM

Topics:  

  • Aurangzeb Issue

संबंधित बातम्या

Kolhapur : करवीर पोलिसांनी पाच चोरट्यांना केली अटक | Crime News
1

Kolhapur : करवीर पोलिसांनी पाच चोरट्यांना केली अटक | Crime News

‘महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता औरंगजेब, त्याचं उदात्तीकरण नको’ : उपमुख्यमंत्री शिंदे
2

‘महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला आला होता औरंगजेब, त्याचं उदात्तीकरण नको’ : उपमुख्यमंत्री शिंदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.