Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धान उत्पादकांचे भविष्य धोक्यात ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

ज्या पिकाचे उत्पादन भरपूर आहे तेच पिक न घेता शेतकऱ्यांनी इतर पिकाकडे वळले पाहिजे, भाताबरोबरच आता तेलाच्या उत्पादनावरही भर दिला पाहिजे. देशात तेलाची गरज आहे. भातापासून तांदळाच्या कोंडापासून तेलाची निर्मिती होते. तर सोयाबीन, मोहरी, सूर्यफुलाची लागवड करावी.

  • By Anjali Awari
Updated On: May 30, 2022 | 01:52 PM
Future of paddy growers in danger! Union Minister Nitin Gadkari expressed concern

Future of paddy growers in danger! Union Minister Nitin Gadkari expressed concern

Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : आपल्या देशात तांदळासह अनेक अन्नधान्यांचा मोठा साठा आहे. साठवणुकीसाठी गोदाम नाही. अशात धान उत्पादक शेतकऱ्यांची सध्याची स्थिती पाहता भविष्य चांगले दिसत नाही. असे चिंताजनक प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ३४९ कोटी रुपये खर्चाच्या तीन कामांच्या उद्घाटनासाठी रविवारी २९ मे रोजी गडकरी गोंदियात आले होते. यावेळी धान (तांदूळ) खरेदीचा सरकारी पातळीवरील मान वाढवण्याच्या मुद्द्यावर व सद्यस्थितीवर त्यांनी गांभीर्याने भाष्य केले.

ते म्हणाले की हे मी हवेत बोलत नाही. तर सत्यता आहे. ज्या पिकाचे उत्पादन भरपूर आहे तेच पिक न घेता शेतकऱ्यांनी इतर पिकाकडे वळले पाहिजे, भाताबरोबरच आता तेलाच्या उत्पादनावरही भर दिला पाहिजे. देशात तेलाची गरज आहे.  भातापासून तांदळाचा कोंडापासून तेलाची निर्मिती होते. तर सोयाबीन, मोहरी, सूर्यफुलाची लागवड करावी. उसाच्या रसापासून इथेनॉल, तांदळाच्या दाण्यापासून इथेनॉल बनवण्यावर आमचा भर आहे. सध्या पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल वापरण्यात येत असून त्यात आणखी वाढ करण्यात येणार आहे. असे म्हणतात की जो पाप करतो तो साखर कारखाना काढतो. पण काहींनी माझ्या गळ्यात हे लटकवून पळून गेले. तेव्हा त्यांना मी सांगतो की, मी जे काम करतो ते सोडत नाही.

आजघडीला साखर कारखाना चालतच आहे. आम्ही तांदळाच्या फ्लेक्सपासून इथेनॉल तयार करण्याच्या प्रक्रियेवर काम करू. यासाठी ६०० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. सुमारे ५ हजार लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगत त्यांनी माझ्याकडे माझा ट्रॅक्टर सीएनजी आहे आणि वर्षभरात १ लाख रुपयांची बचत होत आहे. तेव्हा गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही ट्रॅक्टर सीएनजी करून बचत करावी, असा सल्लाही यावेळी दिला.

एका तासात गोंदिया ते नागपूर

मेट्रो रेल्वेचा विस्तार आता गोंदिया पर्यंत करण्यात येणार असून त्यानंतर भविष्यात चंद्रपूरलाही जोडण्यात येईल. म्हणजेच मेट्रो नागपूर ते गोंदिया व गोंदिया ते चंद्रपूर व चंद्रपूर ते नागपूर अशी धावेल. या ट्रेनने प्रवाश्यांना गोंदियावरून नागपूरला येण्यासाठी फक्त १ तास ५ मिनीटांचा वेळ लागणार आहे. तर येत्या ६ महिन्यात या योजनेवर काम सुरू होणार असल्याचे गडकरी म्हणाले.

@nitin_gadkari @OfficeOfNG

Web Title: Future of paddy growers in danger union minister nitin gadkari expressed concern nraa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2022 | 01:52 PM

Topics:  

  • gondia news
  • Union Minister Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना
1

Gondia : जिल्ह्यात गणपती मूर्तीवर अंतिम हात; जिल्ह्यात सर्वत्र होणार इको फ्रेंडली गणपतीची स्थापना

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक
2

पूर्ववैमनस्यातून तलवारीने एकाची हत्या; ‘त्या’ दोन आरोपींना पोलिसांनी 24 तासांत केली अटक

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन
3

तब्बल 259 धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाचे केलं गेलं पालन

जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण
4

जलजीरा प्यायल्याने विद्यार्थिनींना झाली विषबाधा; मुख्याध्यापकांची कार्यतत्परता अन् वाचले मुलींचे प्राण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.