Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुकेश अंबानींच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसे आक्रमक; म्हणाले, ‘बोऱ्याबिस्तारा गुंडाळा अन् गुजरातला जा’

रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी धक्कादायक वक्तव्य केले. दरम्यान मनसेने या वक्तव्यावर जहरी टीका केली असून मग महाराष्ट्रात कशाला आलात असा सवाल मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 11, 2024 | 04:17 PM
मुकेश अंबानींच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसे आक्रमक; म्हणाले, ‘बोऱ्याबिस्तारा गुंडाळा अन् गुजरातला जा’
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जगप्रसिद्ध उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे (Reliance Industries Group) अध्यक्ष मुकेश अंबानी (Businessman Mukesh Ambani) यांनी धक्कादायक वक्तव्य केले. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटमध्ये (Vibrant Gujarat Global Summit) मुकेश अंबानी यांनी रिलायन्स ही गुजराती कंपनी होती, आहे आणि राहील असे विधान केले होते. यानंतर सोशल मीडियावर अंबानींच्या या विधानावर उलट सुलट प्रतिक्रिया येत होत्या. दरम्यान मनसेने अंबानीच्या या वक्तव्यावर जहरी टीका केली असून मग महाराष्ट्रात कशाला आलात असा सवाल मनसेचे (MNS) प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी उपस्थित केला आहे.

संदीप देशपांडे यांनी मुकेश अंबानी यांच्यावर निशाणा साधला असून त्यांनी रिलायन्स कंपनी गुजराथी असल्याच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. “आम्हाला रिलायन्स कंपनी भारतीय वाटली होती. पण त्यांनी काल स्पष्ट केलं की, रिलायन्स गुजराती कंपनी आहे. इथे तुमची कंपनी उभारण्यासाठी मराठी माणसाने जमिनी दिलेल्या आहेत. जर तुम्हाला ही कंपनी गुजरातची वाटत असेल तर सगळा बोऱ्याबिस्तारा गुंडाळा,अँटेलियालाही गुंडाळा आणि गुजरातला जाऊन बसा, महाराष्ट्रात तुमचं काय काम आहे? मराठी माणसाने यापुढे विचार केला पाहिजे. मराठी लोकांनी रिलायन्सचं प्रोडक्ट घेताना विचार केला पाहिजे की, आपण हे भारतीय कंपनीकडून नाही घेत आहोत, आपण गुजराती कंपनीकडून घेत आहोत. ह्यांचा उद्देश फक्त गुजरातचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्रात तुम्ही काय करताय हा आमचा प्रश्न आहे.” अशा कडक शब्दांत मनसेच्या संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी तेव्हा त्यांच्या बाजूला उपस्थित होते. त्यावेळी निदान मोदींनी तरी त्यांना सांगायला हवं होतं, तुझी कंपनी भारतीय आहे, गुजराती नाही. आता पंतप्रधानही गुजरातचे आहेत की देशाचे हासुद्धा विचार करण्याचा विषय आहे. जेव्हा राज ठाकरे आणि आम्ही मराठी भाषेबद्दल बोलतो तेव्हा अख्खा देश आम्हाला संकुचित ठरवतो. हे महाराष्ट्राबद्दल विचार करतात हे संकुचित आहेत, हे फक्त मराठी माणसाबद्दल विचार करतात. मग मुकेश अंबानी संकुचित नाही का? मोदी फक्त गुजरातबद्दल विचार करत असतील तर ते संकुचित नाहीत का? हा प्रश्न आहे.” असे संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

मराठी माणसांना आवाहन करत संदीप देशपांडे म्हणाले, “यात मराठी माणसाने जागरूक होण्याची गरज आहे. मराठी माणसाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय, याबद्दल मराठी माणसानं जागरूक राहिलं पाहिजे. मराठ्यांच्या जमिनी जातायत आणि तिथे गुजरात्यांचे उद्योग होतायत, मराठी माणसाला रोजगारही मिळत नसल्याचंही” संदीप देशपांडे यांनी सांगितले.

 

Web Title: Mns express anger on businessman mukesh ambani about reliance is gujarati company nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2024 | 04:17 PM

Topics:  

  • Sandeep Deshpande

संबंधित बातम्या

लक्झरीची नवी परिभाषा! दुबईत विकल्या गेल्या जगातील सर्वात महागड्या वस्तू; ‘या’ भारतीयाने तर उडवली खळबळ
1

लक्झरीची नवी परिभाषा! दुबईत विकल्या गेल्या जगातील सर्वात महागड्या वस्तू; ‘या’ भारतीयाने तर उडवली खळबळ

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
2

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sandeep Deshpande : मराठी नाही तर गुजरात्यांना मोर्चाला परवानगी, सरकार गुजरातचं की महाराष्ट्राचं?
3

Sandeep Deshpande : मराठी नाही तर गुजरात्यांना मोर्चाला परवानगी, सरकार गुजरातचं की महाराष्ट्राचं?

MNS Morcha News: प्रताप सरनाईक मोर्चातून बाहेर; आंदोलकांचा कडाडून विरोध
4

MNS Morcha News: प्रताप सरनाईक मोर्चातून बाहेर; आंदोलकांचा कडाडून विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.