Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांद्यावरील निर्यातबंदी हटवल्यानंतरही दर मात्र ‘जैसे थे’; सर्वसामान्यांना दिलासा नाहीच !

सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच कांद्याला साडेतीन हजार रुपयांवर भाव मिळण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात 10 ते 15 टक्के कांदा शिल्लक असल्याने कितीही भाववाढ झाली तरी आवक आहे तेवढीच राहील. केंद्र सरकारने याचा अचूकपणे अंदाज घेऊन कांदा निर्यातीवरील 500 डॉलरचे शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 01, 2024 | 10:37 AM
कांदा ८० तर लसणाचा ४०० रुपये प्रतिकिलो दर

कांदा ८० तर लसणाचा ४०० रुपये प्रतिकिलो दर

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात किमान निर्यातमूल्यही 20 टक्क्यांनी कमी केले. आता निर्यातीचा मार्ग खुला झाला आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढणे अपेक्षित होते; मात्र, कांद्याचे दर ‘जैसे थे’च आहेत. कांदा आजही 60 ते 70 रुपये किलो या दराने खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे निर्यातबंदी हटविल्याचा कोणताही सकारात्मक परिणाम दिसून आला नाही.

हेदेखील वाचा : राज्यात आता पुन्हा पाऊस बरसणार; हवामान विभागाने व्यक्त केला ‘हा’ अंदाज

सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच कांद्याला साडेतीन हजार रुपयांवर भाव मिळण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात 10 ते 15 टक्के कांदा शिल्लक असल्याने कितीही भाववाढ झाली तरी आवक आहे तेवढीच राहील. केंद्र सरकारने याचा अचूकपणे अंदाज घेऊन कांदा निर्यातीवरील 500 डॉलरचे शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला. यामुळे निर्यात खुली होण्यास मदत झाली व त्याचा कांद्याच्या भावावर थेट परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, कांद्याचे उत्पादनच घटल्याने आता शेतकऱ्यांकडे थोडाच कांदा शिल्लक राहिला आहे.

दरम्यान, काद्यांचे दर कितीही वाढले तरी उन्हाळ कांद्याची आवक वाढणार नाही. त्याला पर्याय म्हणून लाल कांद्याची आवक वाढत चालली आहे. या कांद्याची टिकवण क्षमता कमी असल्यामुळे काढणीनंतर हा कांदा तत्काळ बाजारात विक्रीसाठी आणावा लागतो. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी साडेतीन ते चार हजार रुपये भाव मिळत आहे.

6 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक

लासलगाव बाजार समितीत दररोज पाच ते सहा हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होते. त्यापाठोपाठ निफाड, विंचूर, सिन्नर, कळवण, चांदवड, मनमाड, बागलाण, पिंपळगाव बसवंत बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होते. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची सर्वाधिक आवक आहे.

हेदेखील वाचा : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान आज ; 39 लाख नागरिक बजावणार मतदानाचा हक्क

Web Title: Onion prices not decreased even after export resume nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2024 | 10:37 AM

Topics:  

  • Onion Prices

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.