Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदावरून प्रफुल्ल पटेलांचे महत्त्वाचे विधान; ………पण कधी ना कधी होणार मुख्यमंत्री

  • By युवराज भगत
Updated On: Jul 27, 2023 | 04:47 PM
praful patel

praful patel

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मागील काही दिवसांपासून अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू होत्या. त्या चर्चेला काही प्रमाणात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. आता प्रफुल पटेल यांनीदेखील अजित पवार मुख्यमंत्री होणार का, यावर भूमिका स्पष्ट केली.

नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळवण्यासाठी लढणार

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमच्या पक्षाने काही दिवसांपूर्वी एनडीएमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामुळे आम्ही सगळे ताकतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळवण्यासाठी लढणार आहोत. भारत जीडीपीमध्ये दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आलेला आहे. येणाऱ्या पाच वर्षांत तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो, असा विश्वास आहे. त्यासाठी एक स्थिर, चांगले आणि विकासशील सरकारची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

 

अजित पवार होणार मुख्यमंत्री
अजित पवार मुख्यमंत्री होणार या चर्चेवर पटेल म्हणाले की, आज ती जागा रिकामी नाही. मग चर्चा कशाला करतात? अजित पवार नक्कीच महाराष्ट्राचे एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत. ते आमच्या पक्षाचे नेतृत्व आज नाही तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात करीत आलेले आहेत. काही नवीन गोष्ट नाही. कधी ना कधी काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते, असेही त्यांनी नमूद केले आहे.

आज देशात ज्याप्रमाणे राजकारण चाललेले आहे, म्हणजे कालपर्यंत आम्ही होतो म्हणून काही टीका करायचे कारण नाही. पण, जे काही आपल्याला दिसत आहे, वेगवेगळे पक्ष वेगवेगळे विचारधारा आणि एवढे सारे लोकांना एकत्रित आणि एक संघ आणून आणि देशाला चांगला विकल्प देणे ही सोपी गोष्ट नाही. देशाने अनेक वेळा असे प्रसंग अनुभवले आहेत. त्यामध्ये 1977 असो या 1989 की 1996 असे अनेक प्रसंग आले. ज्यावेळी देशात असं वातावरण निर्माण झालं तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला होता. म्हणून एक चांगलं स्थिर सरकार असले पाहिजे, असंही पटेल यांनी नमूद केलं.

विरोधी पक्षांचे वेगवेगळे विचार कसे एकत्र येणार
काही दिवसांपूर्वी मी आज जे इंडिया म्हणतात, त्यांच्या मीटिंगमध्ये गेलो होतो. त्यावेळी अनेक पक्षाचे वेगवेगळे विचार आणि वेगवेगळी मानसिकता दिसून आली. एकमेकांच्या बाबतीत कोणीही विश्वासार्हता प्रस्थापित करू शकले नाही. हे देशाला कुठपर्यंत परवडणारे आहे. हासुद्धा विचार करण्याची गरज पटेल यांनी व्यक्त केली.

Web Title: Praful patel important statement on ajit pawars cm post nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2023 | 04:47 PM

Topics:  

  • praful patel

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.