Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Almatti Dam: अलमट्टी धरणाच्या ऊंचीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ अत्यंत महत्वाचा निर्णय; कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील…

पावसाळ्यात अनेक ठिकाणी महापुराच्या घटना घडतात. त्यातीलच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. पश्चिम महाराष्ट्रात महापूराची स्थिती निर्माण होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 01, 2025 | 09:49 PM
Almatti Dam: अलमट्टी धरणाच्या ऊंचीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला ‘हा’ अत्यंत महत्वाचा निर्णय; कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील…
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर: सांगली दोन जिल्ह्याच्या मुळावर उठलेल्या कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे .त्यामुळे या धरणाची उंची भविष्यात वाढणार नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, नागरिकांना दिलासा मिळणार आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना दिली.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी महापुराच्या घटना घडतात. त्यातीलच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. पश्चिम महाराष्ट्रात  महापूरची स्थिति निर्माण होते. त्याला कर्नाटक सरकार जबाबदार आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरला पुराचा फटका बसतो. सध्या या धरणाची ऊंची ५१९ मीटर इतकी आहे. मात्र आता कर्नाटक सरकारने या धरणाची ऊंची वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सांगली-कोल्हापूरवर महापूरचे संकट वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.

Almatti Dam Politics: अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीवरून विशाल पाटलांचे गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सध्या चर्चेचा मुद्दा बनला होता. १२३ टीएमसी क्षमता असलेले अलमट्टी धरण हे कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुराला जबाबदार असल्याच्या तक्रारी साखरपट्ट्यातील शेतकऱ्यांनी केल्या होत्या. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र, कर्नाटक दोन्ही सरकारं आमने-सामने आले होते. अलमट्टी धरणाची उंची ५२४.२५६ मीटरपर्यंत वाढवण्याचं कर्नाटक सरकारचं नियोजन केले होते.  धरणातील पाणीसाठा आणखीन वाढणार असून सिंचन आणि इतर क्षेत्रात वाढ होणार असल्याचे कर्नाटक सरकारचे म्हणणे आहे. मात्र, अलमट्टी धरणामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुराचे संकट येऊन हजारो कोटींचे नुकसान अलिकडच्या काळात झाले आहे. सन २००५, २०१९ आणि २०२१ या वर्षी आलेल्या महापुराच्या संदर्भात कोल्हापूर, सांगलीच्या महापुराला अलमट्टी धरण जबाबदार असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. मात्र, पुन्हा उंची वाढवण्याचा निर्णय चर्चेत आल्याने धरणाच्या बॅकवॉटरचा आणि धरणामुळे येणाऱ्या महापुरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली होती.

सर्वाेच्च न्यायायलयात याचिका दाखल 
अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर आणि सांगलीला दरवर्षी पूरस्थिती निर्माण होते. जर अलमट्टी धरणाची उंची आणखी वाढवली, तर कोल्हापूर आणि सांगलीला पुन्हा एकदा महापुराला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. सिद्धरामय्या सरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्राने विरोध करावा, अशी मागणी सांगली, कोल्हापुरातील जनतेकडून हाेत हाेत अाहे. याचा विचार करून सर्वोच्च न्यायालयात उंची वाढवून देऊ नये याबाबतची याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचा विचार करून उंची वाढवण्यास स्थगिती दिली असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा
सध्या अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटर असल्याने धरण भरल्यानंतर बॅकवॉटरच्या पाण्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पंचगंगा, कृष्णा आणि वारणा नदी काठच्या गावांना महापुराचा विळखा पडतो. जर धरणाची उंची पुन्हा वाढल्यास महाप्रलयकारी पूर या भागात येण्याची शक्यता असल्याने सांगली कोल्हापूरकरांचा या निर्णयाला विरोध वाढत आहे. याबाबत राज्य सरकारनेही केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अलमट्टीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आता शेतकरी करू लागले होते.

५१९ मीटरवरुन ५२४ मीटरला मंजूरी
कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुरासाठी कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणाची उंची ५ मीटरने वाढवण्याचा घातकी निर्णय कर्नाटकने घेतला होता. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या पोटात गोळा आला होता. सांगली-कोल्हापूरला महापुराच्या खाईत लोटणाऱ्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकारने जल लवादात कोणताही आक्षेप नोंदवला नसल्याचे समोर आले होते. कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरुन ५२४ मीटर करण्याला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर कृष्णा खोऱ्यातील एकाही राज्याने जल लवादात तक्रार दिली नसल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटलांनी दिली होती. मात्र या विरोधात महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि ही स्थगिती मिळवली आहे.

कर्नाटकच्या आडमुठ्या भूमिकेवर आक्षेप
अलमट्टीच्या उंची वाढवण्याबाबत कर्नाटकच्या आडमुठ्या भूमिकेवर आक्षेप घेऊन महायुती सरकारने एकप्रकारे त्याला मूक संमती दिल्याचे चित्र होते. मात्र ५ मीटरने अलमट्टीची उंची वाढवल्यास पाणी शिरोळ बंधाऱ्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे  महाराष्ट्र सरकार अभ्यासाच्या भूमिकेतून बाहेर येऊन कर्नाटकच्या निर्णयाला विरोध करणार की सांगली-कोल्हापूरला पुराच्या खाईत लोटणाऱ्या निर्णयाचे मूक साक्षीदार बनणार होते, असे चित्र निर्माण झाले होते.

Web Title: Supreme court stay on karnataka almatti dam increase height decision relief to sangli and kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2025 | 09:49 PM

Topics:  

  • karnataka News

संबंधित बातम्या

काँग्रेस नेत्याला संघाची प्रार्थना तोंडपाठ; सभागृहात ‘नमस्ते सदा वत्सले…’म्हणताच भाजप नेत्यांच्या आनंदाला उधाण
1

काँग्रेस नेत्याला संघाची प्रार्थना तोंडपाठ; सभागृहात ‘नमस्ते सदा वत्सले…’म्हणताच भाजप नेत्यांच्या आनंदाला उधाण

Karnataka News: जावयाने केले सासूचे १९ तुकडे; मानवी शरीराच्या तुकड्यांनी भरून ८ पिशव्या सापडले आणि…,अत्यंत निर्दयतेने केली हत्या
2

Karnataka News: जावयाने केले सासूचे १९ तुकडे; मानवी शरीराच्या तुकड्यांनी भरून ८ पिशव्या सापडले आणि…,अत्यंत निर्दयतेने केली हत्या

मोठी बातमी! माजी पंतप्रधान देवेगौडांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी
3

मोठी बातमी! माजी पंतप्रधान देवेगौडांचे नातू प्रज्ज्वल रेवण्णा बलात्कार प्रकरणात दोषी

‘शहरी जीवन, प्रेम, विरह अन् अध्यात्म’; गोकर्णमधील गुहेत सापडलेली रशियन महिला अन् गोल्डस्टीनची वेदनादायक स्टोरी, वाचा सविस्तर
4

‘शहरी जीवन, प्रेम, विरह अन् अध्यात्म’; गोकर्णमधील गुहेत सापडलेली रशियन महिला अन् गोल्डस्टीनची वेदनादायक स्टोरी, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.