Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द केरला स्टोरी’सिनेमा आता बंगालमध्येही रिलीज होणार,सुप्रीम कोर्टाने हटवला बॅन.. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिनेमावर घातली होती बंदी

'द केरला स्टोरी' सिनेमा आता पश्चिम बंगालमध्ये रिलीज होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या सिनेमावर बंदी घातली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने ही बंदी हटवली आहे. 18 मे रोजी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर पश्चिम बंगाल सरकारचे वकील अभिषेक मनू सिंघवी आणि चित्रपट निर्मात्याचे वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला.

  • By शिल्पा आपटे
Updated On: May 18, 2023 | 05:40 PM
‘द केरला स्टोरी’सिनेमा आता बंगालमध्येही रिलीज होणार,सुप्रीम कोर्टाने हटवला बॅन.. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सिनेमावर घातली होती बंदी
Follow Us
Close
Follow Us:

The Kerala story : ‘द केरला स्टोरी’ ( The Kerala story ) सिनेमा आता पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) रिलीज होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या सिनेमावर बंदी घातली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने (Supreme court)  ही बंदी हटवली आहे. 18 मे रोजी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर पश्चिम बंगाल सरकारचे वकील अभिषेक मनू सिंघवी आणि चित्रपट निर्मात्याचे वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला.

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या निर्मात्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. पश्चिम बंगाल सरकारला दणका देत सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटावरील बंदी उठवली आहे.

चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळण्याच्या मुद्द्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुनावणी होईल, असेही CJI यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर थिएटरला सुरक्षा देणे हे राज्य सरकारचे काम असल्याचेही त्यांनी सांगितले. आता या चित्रपटाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 18 जुलै रोजी होणार आहे. गुरुवारी, 18 मे रोजी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर पश्चिम बंगाल सरकारचे वकील अभिषेक मनु सिंघवी आणि चित्रपट निर्मात्याचे वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान, चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की, सिनेमाच्या डिस्क्लेमरमध्ये काही वेगळं आहे, आणि प्रत्यक्ष सिनेमात वेगळं आहे. असं करता येत नसल्याचं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी सांगितले. यावर CJI यांनी निर्मात्यांचे वकील हरीश साळवे यांना विचारले की. 32 हजार हा आकडा आला कुठून? त्याबद्दल सांगताना साळवे म्हणाले की, घटना घडल्या आहेत याची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. त्यावर कोर्टाने म्हटले की, “चित्रपटात 32 हजार महिला गायब आहेत, अस संवाद आहे.” त्यावर कोणताही डेटा उपलब्ध नाही आणि हे डिस्क्लेमरमध्ये दाखवण्यास तयार असल्याचं हरीश साळवे यांनी म्हटलं आहे.

‘द केरला स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालण्याच्या वादावर पश्चिम बंगाल सरकारची बाजू मांडणारे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, दंगलीची शक्यता लक्षात घेऊन ही बंदी घालण्यात आली आहे. त्यावर उत्तर देताना सरन्यायाधीश म्हणाले की कायदा आणि सुव्यवस्था राखणे ही राज्याची जबाबदारी आहे.

निर्मात्याच्या वतीने हरीश साळवे यांनी सांगितले की, चित्रपटाचा टीझर, ज्यामध्ये 32000 मुलींना लक्ष्य करण्यात आले होते, तो काढून टाकण्यात आला आहे. केरळ उच्च न्यायालयानेही चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिला. त्या उच्च न्यायालयानेही आदेशात हे लिहिले आहे.” अभिव्यक्ती स्वातंत्र्य राखणे ही राज्याचीही जबाबदारी आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने विचारले की, जेव्हा चित्रपट संपूर्ण देशात चालू शकतो तर पश्चिम बंगालमध्ये काय अडचण आहे? कोणत्याही जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तिथ चित्रपटावर बंदी घाला. सीजेआय म्हणाले की, एका जिल्ह्यात समस्या असल्यास सर्वत्र निर्बंध लादले जात नाहीत. लोकसंख्येची समस्या सारखीच असते असे नाही. उत्तरेत वेगळे आहे, दक्षिणेत वेगळे आहे. तुम्ही असे मूलभूत अधिकार हिरावून घेऊ शकत नाही. सीजेआयने असेही म्हटले आहे की राज्य शक्तीचा वापर प्रमाणबद्ध असावा.

 

कोणत्याही प्रकारची असहिष्णुता खपवून घेतली जाऊ शकत नाही. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार एखाद्याच्या भावनांच्या सार्वजनिक प्रदर्शनाच्या आधारे ठरवता येत नाही. भावनांचे सार्वजनिक प्रदर्शन नियंत्रित केले पाहिजे, जर तुम्हाला ते आवडत नसेल तर ते पाहू नका.

 

Web Title: The kerala story movie release west bangal mamata bannerjee supreme court lifts ban nrsa

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2023 | 05:40 PM

Topics:  

  • the kerala story

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.